शहरं
Join us  
Trending Stories
1
"हे गोंधळ पसरवण्यासारखे ..."; एअर इंडियाच्या विमान अपघातावर तुर्कीचे विधान; मेंटनन्स कंपनीवर स्पष्टीकरण दिले
2
Donald Trump : "जर आमच्यावर हल्ला केला तर अमेरिकन सैन्य..."; डोनाल्ड ट्रम्प यांचा इराणला कडक इशारा
3
केदारनाथहून परतताना कोसळलं हेलिकॉप्टर; महाराष्ट्रातल्या जयस्वाल दाम्पत्यासह २ वर्षाची चिमुरडी ठार
4
माळेगाव कारखान्याचा चेअरमन मीच होणार..! भर सभेत अजित पवार नेमकं काय म्हणाले ?
5
खुल्लम खुल्ला प्यार... 'चॅम्पियन' एडन मार्करमने भरमैदानात सर्वांसमोर पत्नीला केलं किस, Photo व्हायरल
6
पहिली गोळी मांडीवर अन् शाहरुख आडवा झाला; असा होता एन्काऊंटरचा थरार...
7
Kedarnath Helicopter Crash : चारधाम यात्रेची हेलिकॉप्टर सेवा स्थगित; गौरीकुंडमधील दुर्घटनेनंतर नवा आदेश
8
कोल्हार- घोटी राज्यमार्गावर भीषण अपघात; तीन ठार, दहा जखमी
9
पालकांच्या कष्टाची जाण! मराठी अभिनेत्याने आई-बाबांसाठी घेतलं नवीन घर, चाहत्यांकडून कौतुकाचा वर्षाव
10
Maharashtra Rains: राज्यात पावसाचा जोर वाढला, वीज पडून ९ जणांचा मृत्यू; ७ जण भाजले!
11
हेलिकॉप्टर पायलट बनायचंय? किती खर्च, किती पगार? जाणून घ्या A to Z माहिती!
12
Ahmedabad Plane Crash : आईच्या शब्दाखातर 'तो' थांबला अन् विमान अपघातातून जीव वाचला; ऐनवेळी नेमकं काय घडलं?
13
Israel–Iran War : इस्त्रायल-इराण युद्धात जग दोन गटात विभागले! 'या' मुस्लीम देशांनी घेतली इराणची बाजू; भारत कोणासोबत?
14
BCCI ने जाहीर केलं 'टीम इंडिया'चं पुढल्या वर्षीचं वेळापत्रक, रोहित-विराट 'या' तगड्या संघाविरूद्ध मैदानात उतरणार
15
केदारनाथला जाण्यासाठी हेलिकॉप्टरचं तिकीट किती? अपघात झाल्यास कोण देतं भरपाई?
16
Bhiwandi Fire: भिवंडीत भीषण आगीत, १२ केमिकल गोदामे जळून खाक!
17
मोठी बातमी: पुणे पोलिसांनी केलेल्या गोळीबारात कुख्यात गुन्हेगार ठार; सोलापूर जिल्ह्यातील घटना
18
चंद्रपूर: 'फादर्स डे'च्या दिवशी पाच मुले झाली पोरकी! दोन रानटी हत्तीनी सोंडेने आपटून एकाला केले ठार
19
मोठा दिलासा! आधार मोफत अपडेट करण्याची शेवटची संधी? UIDAI ने तारीख बदलली!
20
राशीभविष्य, १५ जून २०२५: कामात समाधान लाभेल, आवडत्या व्यक्तीची भेट होईल, प्रवासाचा बेत आखाल !

वाईटांशी चांगले आणि चांगल्यांशी वाईट का घडते? वाचा त्यामागचे कारण... 

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 13, 2022 10:36 IST

जे होते ते चांगल्यासाठी असे आपण म्हणतो, पण जेव्हा स्वतःची समजूत घालायची वेळ येते तेव्हा हे विसरतो. त्यासाठीच ही उजळणी!

आपण सगळेच जण दुसऱ्याचे सुख पाहून असूया धरून बसतो. खजील होतो, दुःखी होतो, स्वतःला कमी लेखू लागतो. एवढेच काय तर नशिबाला दोष देऊ लागतो. विशेषतः तेव्हा, जेव्हा चांगले वागणारे लोक अपयशी आणि वाईट वागणारे लोक यशस्वी होताना दिसतात. पण हे असे का घडते, याबद्दल एकदा महर्षी नारदांनी भगवान विष्णूंना विचारणा केली... 

देवा न्याय देताना तुम्ही कधी कधी चुकता असे मला वाटते. विष्णू म्हणाले, ''नारदा माझी चूक मला निदर्शनास आणून दे मी नक्की दुरुस्त करतो!'' नारद म्हणाले, ''देवा हे केवळ माझे म्हणणे नाही तर समस्त पृथ्वीवासियांचे म्हणणे आहे. एक उदाहरण देतो.''

''काही वेळापूर्वी एक गाय एका खड्ड्यात अडकली होती. अशा अवस्थेत एक चोर तिथून गेला. त्याने गायीला पाहिलं आणि दुर्लक्ष करून निघून गेला. शिवाय काही अंतर पुढे गेल्यावर त्याला सोन्याच्या मोहरांची थैलीसुद्धा मिळाली. याउलट, एक साधू तिथून जात असताना त्याने गायीला अडचणीत पाहिलं, तो मदतीला गेला त्याने गायीला बाहेर काढली, पण स्वतः मात्र खड्ड्यात अडकला. हा तुमचा कुठला न्याय आहे सांगा???''

विष्णू हसले आणि म्हणाले, ''नारदा दिसतं तसं नसतं म्हणून जग फसतं! अरे तुला त्या चोराला मिळालेल्या मोहरा दिसल्या, पण त्याचे काय नुकसान झाले ते मला माहितीय. त्या चोराने गायीला वाचवले असते, तर ते पुण्य कामी येऊन त्याला मोठा खजिना हाती लागणार होता. पण त्याला मोहरांचा पुरचुंडीवर समाधान मानावे लागले. आणि साधूंच्या बाबतीत म्हणशील, तर साधूंनी केलेल्या पुण्यकर्मामुळे त्यांचा आज मृत्यू लिहिलेला होता, पण खड्ड्यात पडण्यावर ते संकट निभावलं. अंगाला चिखल लागले पण मृत्यू टळला. त्यामुळे नारदा, आपण प्राप्त परिस्थितीवर प्रतिक्रिया देऊन मोकळे होतो. पण मला प्रत्येक जिवाच्या वर्तमानाचीच नव्हे तर भविष्याचीही काळजी असते. त्यांच्या कर्मानुसार मी फळ देत असतो!"'

तात्पर्य हेच, की ''आपल्या बाबतीत काही वाईट आणि वाईट वागणाऱ्यांच्या बाबतीत काही चांगले घडताना दिसले म्हणून नाराज होऊ नका. त्यांनी कोणता खजिना गमावला आणि तुम्ही नकळत कोणत्या संकटावर मात केली, याची तुम्हालाही कल्पना येणार नाही. म्हणून फक्त सत्कर्म करत राहा. चांगल्या कर्माचे फळ चांगलेच मिळते, हे लक्षात ठेवा!

टॅग्स :Inspirational Storiesप्रेरणादायक गोष्टी