शहरं
Join us  
Trending Stories
1
Anant Garje : "अनैतिक संबंध ठेवणारी महिला...", रुपाली पाटील ठोंबरे यांची गौरी पालवे मृत्यू प्रकरणी संतप्त पोस्ट
2
पाकिस्तानचा अफगाणिस्तानवर पुन्हा हवाई हल्ला; ९ निष्पाप बालकांसह १० जणांचा मृत्यू
3
शनी देव कोपला? भव्य कडे अचानक दिसेनासे झाले; काय आहे दुर्मीळ खगोलीय घटनेमागील रहस्य?
4
इथे २०२५ नाही, २०१८ आहे, सूर्योदय १२ वाजता होतो; ज्वालामुखीची राख याच देशातून भारतात आली
5
स्त्रियांसाठी स्वतःचेच घर बनलेय सर्वात धोकादायक ठिकाण! प्रत्येक १० मिनिटाला महिलेची जवळच्याच माणसाकडून झाली हत्या
6
Priyanka Chaturvedi: भाजलेल्या चण्यांमध्ये 'कर्करोगजन्य' विषारी केमिकल? प्रियंका चतुर्वेदींचं केंद्रीय मंत्र्यांना पत्र!
7
आयटी इंजिनिअर नोकरी गमावली, होम लोनचा हप्ता भरण्यासाठी थेट रॅपिडो ड्रायव्हर बनला!
8
गाड्यांच्या सुरक्षेसाठी 'भारत NCAP 2.0' नियम लवकरच लागू; 'क्रॅश टेस्ट' आता कठीण...
9
'जुबिन गर्ग यांची हत्या झाली!'; आसामचे मुख्यमंत्री हिमंता बिस्वा सरमा यांचा सिंगापूर मृत्यू प्रकरणावर धक्कादायक दावा
10
GST नंतर आता कर्जही होणार स्वस्त? RBI लवकरच रेपो दरात कपात करण्याची शक्यता; गव्हर्नर म्हणाले..
11
“सत्ताधाऱ्यांची विधाने म्हणजे सत्तेची गुर्मी, निवडणूक आयोग कारवाई का करत नाही?”: वडेट्टीवार
12
IND vs SA 2nd Test : द.आफ्रिकेनं ठेवलं अशक्यप्राय लक्ष्य! टीम इंडियासमोर सामना वाचवण्याचं आव्हान
13
“मार्च २०२६ पासून मीरा–भाईंदरला पूर्ण क्षमतेने सूर्या योजनेचा जल पुरवठा सुरू होणार”: सरनाईक
14
धक्कादायक! 'गुप्त रोग' बरे करण्याच्या नावाखाली भोंदू बाबाने ४८ लाखांना फसवलं; इंजिनीअरची किडनीही फेल 
15
हाय-डिमांड नोकऱ्यांची लिस्ट आऊट! या २५ फील्डमध्ये पडणार पगाराचा जोरदार पाऊस!
16
महानगरपालिका प्रारुप मतदार याद्यांच्या हरकतीची मुदत वाढवा; काँग्रेसचे निवडणूक आयोगाला पत्र
17
सेलिना जेटलीचा पतीवर कौटुंबिक हिंसाचाराचा आरोप, ५० कोटींसह मागितला घटस्फोट
18
"हा केवळ ध्वज नाही तर,..." राम मंदिराच्या शिखरावर भगवा फडकावल्यानंतर PM Modi म्हणाले...
19
"सरकार कोणाचेही असो, मानसन्मान पाळायलाच पाहिजे"; सुप्रिया सुळेंची CM-DCM वर टीका
20
दत्त जयंती २०२५: गुरुचरित्र सप्ताह कधीपासून सुरू करावा? पाहा, मान्यता, महत्त्वाच्या गोष्टी
Daily Top 2Weekly Top 5

आयुष्याच्या अखेरच्या क्षणी तुम्ही ज्या गोष्टीचा विचार करता, त्याच योनीत पुनर्जन्म मिळतो!

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 10, 2023 13:54 IST

हिंदू धर्मात पुनर्जन्मावर लोकांचा विश्वास असतो आणि पुढचा जन्म कोणत्या योनीत मिळेल याबद्दल उत्सुकता असते, त्यावर हे उत्तर!

मरणोत्तर मोक्ष मिळावा अशी आपली अपेक्षा असते. त्यासाठी जिवंतपणी सर्व इच्छा आकांक्षा पूर्ण करण्याची आपली खटपट सुरु असते. मोक्ष कधी मिळतो, तर श्वास बाकी आहेत पण इच्छा पूर्ण झाल्या तर मोक्ष आणि श्वास संपले पण इच्छा बाकी राहिल्या तर पुनर्जन्म! आपल्या इच्छा-अपेक्षांची यादी पूर्ण होत नाही. म्हणूनच आपण परत जन्म मृत्यूच्या फेऱ्यात अडकतो. हा जन्म कुठल्या योनीत मिळतो हे जाणून घेण्यासाठी वाचा पुढील कथा...!

एकदा महर्षी नारद आणि भगवान विष्णू वेषांतर करून पृथ्वीवर अवतीर्ण झाले. तिथून चालत असताना नारद म्हणाले, देवा तुमचे भक्त गरीब आणि लोकांना लुबाडणारे, फसवणारे, त्रास देणारे श्रीमंत का? त्यामागचे कारण विष्णूंनी नारदांना सोदाहरण पटवून दिले. 

नारदांना घेऊन भगवान विष्णू फकिराच्या वेशात एका धनिकाच्या घराजवळ आले. भिक्षेची याचना करू लागले. धनिक बाहेर आला आणि काही बाही बोलून त्यांने दोघांना हाकलून लावले. भिक्षा तर दूरच पण अतिथी धर्माचेही पालन त्याने केले नाही. नारदांना वाटले आता विष्णू रागावणार आणि त्याला राजाचा रंक बनवणार, मात्र झाले उलटच! विष्णूंनी त्याला आणखी धनवान हो असा आशीर्वाद दिला. 

तिथून ते दोघे एका आजीच्या झोपडीत गेले. आजींनी त्यांना आत बोलावले. बसायला पाट दिले व म्हणाली. महाराज माझ्या कडे तुम्हाला खाऊ घालायला काही नाही, परंतु माझ्याकडे दुभती गाय आहे, मी तुम्हाला भिक्षा म्हणून पेलाभर दूध देते. देवाने तिची सेवा मान्य केली आणि निघाले. त्या सेवेने तृप्त होऊन विष्णू भगवान तिला आशीर्वाद देतील असे नारदांना वाटले, तर तिथेही उलटच झाले. भगवान म्हणाले, 'आजी काही दिवसातच तुमची गाय मृत्युमुखी पडणार आहे.'

हे ऐकून चकित झालेल्या नारदांनी विष्णूंना विचारले, देवा तुमचा न्याय असा कसा? विष्णू म्हणाले, 'नारदा, धनिकाला माझ्यापेक्षा पैसा प्रिय, तो शेवट्पर्यंत पैसा पैसाच करणार. त्यामुळे तो मोक्ष प्राप्ती तर करणार नाहीच, उलट पुढच्या जन्मी तिजोरीची राखण करत साप होऊन या पृथ्वीतलावर जन्म घेईल. याउलट त्या आजीचा जीव गायीमध्ये अडकला होता. तिला मोक्ष हवा होता, परंतु आपल्यानंतर गायीचा सांभाळ कोण करणार याची तिला काळजी होती. तिची काळजी मिटवून तिचा मोक्षाचा मार्ग मोकळा केला. 

म्हणून अवास्तव अपेक्षा न ठेवता जोवर श्वास सुरु आहेत तोवर इच्छा संपवण्याचा प्रयत्न करा, त्यामुळे जन्म मरणाच्या फेऱ्यात अडकण्यापेक्षा मोक्षाची प्राप्ती होईल.