शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Municipal Election 2026 Voting Live Updates: मुंबईत पहिला दुबार मतदार सापडला; मनसे उमेदवार यशवंत किल्लेदारांसमोर घडला प्रकार
2
कर्मचाऱ्यांना मिळणार ₹२ कोटींपर्यंतच्या इन्शुरन्स, स्वस्त लोनसह हे फायदे; लाँच झाली नवी सुविधा, जाणून घ्या
3
वनमंत्री गणेश नाईक यांची मतदान केंद्र शोधण्यासाठी धावपळ; व्यक्त केली तीव्र नाराजी
4
Mohan Bhagwat : सरसंघचालक मोहन भागवतांनी बजावला मतदानाचा अधिकार; कुणाला मतदान करायला हवं? हेही सांगितलं
5
"ज्या शाळेत मतदान केलं त्याबाहेरच ही अवस्था...", शशांक केतकरने दाखवली परिस्थिती, व्यक्त केला राग
6
731666404000 रुपये 'साफ'...! मुकेश अंबानी 100 अब्ज डॉलरच्या क्लब मधून बाहेर; आता Q3 वर नजर
7
मीरारोड येथील मतदान केंद्रात भाजपचे केंद्र प्रतिनिधी चक्क उमेदवारांच्या नावांचे कार्ड लाऊन बसले
8
गोंधळच गोंधळ...! नाशिकमध्ये मतदार याद्यांचा घोळ, मतदान यंत्रातही बिघाड, सुरुवातीला संथ गतीने मतदान 
9
"आजचाच दिवस जेव्हा रिमोट कंट्रोल...", मतदान केल्यानंतर अक्षय कुमारने दिली प्रतिक्रिया
10
अबू धाबीमध्ये भारताच्या सरकारी तेल कंपन्यांना सापडला खजिना; 'इंडियन ऑईल', 'बीपीसीएल'ला सापडले तेलाचे नवीन साठे
11
आज साडेतीन कोटी मतदारांचा दिवस,'महा'मतदान करू, 'योग्य' सेवक निवडू; २,८६९ जागांसाठी दिग्गजांची प्रतिष्ठा पणाला
12
मस्क यांच्यावर डॉलर्सचा पाऊस, एकाच दिवसात संपत्तीत ४२.२ अब्ज डॉलर्सची वाढ
13
आजचे राशीभविष्य, १५ जानेवारी २०२६: अचानक धनलाभ, अलौकिक अनुभूती; मान-सन्मानाचा दिवस
14
दिग्गज नेत्यांची प्रतिष्ठा आज 'ईव्हीएम' बंद होणार; मुंबईत ठाकरे बंधू की भाजप-शिंदे याचा फैसला
15
शिंदेसेनेच्या दोन उमेदवारांना रुग्णालयातच अटक केल्यावरून उडाला गोंधळ, भाजपने केली होती मागणी
16
मतदारांनो, घरबसल्याच शोधा मतदार यादीमध्ये नाव! निवडणूक आयोगाचे पोर्टल, मोबाइलवर सुविधा
17
उन्हाचा तडाखा अन् उकाडा... मतदानाला सकाळीच पडा बाहेर, मुंबईकर घामाघूम होण्याची शक्यता
18
मुंबईत मतमोजणीत अडचण आली तरच करणार 'पाडू' यंत्राचा वापर; निवडणूक आयोगाचे स्पष्टीकरण
19
ट्रम्प यांच्या टॅरिफवर आज कोणताही निर्णय नाही, अमेरिकेच्या सर्वोच्च न्यायालयाची सुनावणी दुसऱ्यांदा पुढे ढकलली
20
Daryl Mitchell च्या शतकासह यंगची 'विल पॉवर'! टीम इंडियावर पलटवार करत न्यूझीलंडनं साधला बरोबरीचा डाव
Daily Top 2Weekly Top 5

आयुष्याच्या अखेरच्या क्षणी तुम्ही ज्या गोष्टीचा विचार करता, त्याच योनीत पुनर्जन्म मिळतो!

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 10, 2023 13:54 IST

हिंदू धर्मात पुनर्जन्मावर लोकांचा विश्वास असतो आणि पुढचा जन्म कोणत्या योनीत मिळेल याबद्दल उत्सुकता असते, त्यावर हे उत्तर!

मरणोत्तर मोक्ष मिळावा अशी आपली अपेक्षा असते. त्यासाठी जिवंतपणी सर्व इच्छा आकांक्षा पूर्ण करण्याची आपली खटपट सुरु असते. मोक्ष कधी मिळतो, तर श्वास बाकी आहेत पण इच्छा पूर्ण झाल्या तर मोक्ष आणि श्वास संपले पण इच्छा बाकी राहिल्या तर पुनर्जन्म! आपल्या इच्छा-अपेक्षांची यादी पूर्ण होत नाही. म्हणूनच आपण परत जन्म मृत्यूच्या फेऱ्यात अडकतो. हा जन्म कुठल्या योनीत मिळतो हे जाणून घेण्यासाठी वाचा पुढील कथा...!

एकदा महर्षी नारद आणि भगवान विष्णू वेषांतर करून पृथ्वीवर अवतीर्ण झाले. तिथून चालत असताना नारद म्हणाले, देवा तुमचे भक्त गरीब आणि लोकांना लुबाडणारे, फसवणारे, त्रास देणारे श्रीमंत का? त्यामागचे कारण विष्णूंनी नारदांना सोदाहरण पटवून दिले. 

नारदांना घेऊन भगवान विष्णू फकिराच्या वेशात एका धनिकाच्या घराजवळ आले. भिक्षेची याचना करू लागले. धनिक बाहेर आला आणि काही बाही बोलून त्यांने दोघांना हाकलून लावले. भिक्षा तर दूरच पण अतिथी धर्माचेही पालन त्याने केले नाही. नारदांना वाटले आता विष्णू रागावणार आणि त्याला राजाचा रंक बनवणार, मात्र झाले उलटच! विष्णूंनी त्याला आणखी धनवान हो असा आशीर्वाद दिला. 

तिथून ते दोघे एका आजीच्या झोपडीत गेले. आजींनी त्यांना आत बोलावले. बसायला पाट दिले व म्हणाली. महाराज माझ्या कडे तुम्हाला खाऊ घालायला काही नाही, परंतु माझ्याकडे दुभती गाय आहे, मी तुम्हाला भिक्षा म्हणून पेलाभर दूध देते. देवाने तिची सेवा मान्य केली आणि निघाले. त्या सेवेने तृप्त होऊन विष्णू भगवान तिला आशीर्वाद देतील असे नारदांना वाटले, तर तिथेही उलटच झाले. भगवान म्हणाले, 'आजी काही दिवसातच तुमची गाय मृत्युमुखी पडणार आहे.'

हे ऐकून चकित झालेल्या नारदांनी विष्णूंना विचारले, देवा तुमचा न्याय असा कसा? विष्णू म्हणाले, 'नारदा, धनिकाला माझ्यापेक्षा पैसा प्रिय, तो शेवट्पर्यंत पैसा पैसाच करणार. त्यामुळे तो मोक्ष प्राप्ती तर करणार नाहीच, उलट पुढच्या जन्मी तिजोरीची राखण करत साप होऊन या पृथ्वीतलावर जन्म घेईल. याउलट त्या आजीचा जीव गायीमध्ये अडकला होता. तिला मोक्ष हवा होता, परंतु आपल्यानंतर गायीचा सांभाळ कोण करणार याची तिला काळजी होती. तिची काळजी मिटवून तिचा मोक्षाचा मार्ग मोकळा केला. 

म्हणून अवास्तव अपेक्षा न ठेवता जोवर श्वास सुरु आहेत तोवर इच्छा संपवण्याचा प्रयत्न करा, त्यामुळे जन्म मरणाच्या फेऱ्यात अडकण्यापेक्षा मोक्षाची प्राप्ती होईल.