शहरं
Join us  
Trending Stories
1
"चीनने भारताची जमीन बळकावली हे तुम्हाला कसं कळलं? तुम्ही खरे भारतीय असता तर…’’, सुप्रीम कोर्टाचे राहुल गांधींना खडे बोल  
2
बीएसएनएलने आणला १ रुपयांत फ्रिडम प्लॅन! ३० दिवस डेटा, कॉलिंग अन्... मोफत...
3
“सप्टेंबरमध्ये देशात मोठ्या राजकीय घडामोडी”; संजय राऊतांचे भाकित, म्हणाले, “RSS बैठकीत...”
4
'तो' खेळणार नाही असं इंग्लंडनेच सांगितलं होतं, पण आता बॅटिंग करणार; असं कसं? ICC नियमांत बसतं?
5
पाणी पाकिस्तानची पाठ सोडेना! उन्हाळ्यात पाणी प्यायला मिळेना, पावसाळ्यात महापूर
6
"मी स्किन व्हाइटनिंग सर्जरी केलेली नाही तर...", काजोलने सांगितलेलं तिच्या फेअरनेसचं रहस्य
7
"२० वर्षांनी आम्ही भाऊ एकत्र येऊ शकतो, मग..."; मनसे मेळाव्यात राज ठाकरेंचा कार्यकर्त्यांना कानमंत्र
8
Video - बँड-बाजा अन् शेवटचा निरोप! गाव रडलं पण 'तो' मित्राच्या अंत्ययात्रेत आनंदाने नाचला, कारण...
9
Lunchbox Recipe: परवलाचं चमचमीत भरीतही होऊ शकतं, कधी ट्राय केलंय का? पहा सोप्पी रेसिपी
10
रेपो दराच्या बैठकीपूर्वी सोन्या-चांदीच्या दरात वाढ, तुमच्या शहरात २४ कॅरेट सोन्याचा भाव काय?
11
१० हजारांत भारतीय थायलंडमध्ये काय काय करू शकतात? भारताच्या रुपयाची 'बाथ'मध्ये किती किंमत?
12
"माझ्या नादी लागू नका, पुराव्यासह फाईल्स उघडू..."; भाजपात प्रवेश करताच शिंदेसेनेच्या नेत्याला इशारा
13
"मुंबईत जो येईल त्याचं स्वागत करू..."; निशिकांत दुबेंबाबत देवेंद्र फडणवीस काय म्हणाले?
14
रॉयल एनफिल्डने चीनचे रेअर अर्थ मटेरिअल टाळले! नवीन धातू वापरला, ऑटो कंपन्या चकीत झाल्या...
15
काहीही करा, ‘हम नही सुधरेंगे’; CM देवेंद्र फडणवीसांचा क्लास वाया, वादग्रस्त विधाने सुरूच!
16
AI घेणार तुमच्या नोकरीची जागा? गुंतवणूकदार विनोद खोसला यांचा इशारा, म्हणाले यातून वाचायचं असेल तर..
17
‘झुकेगा नही’! ट्रम्प यांची धमकी, पण सरकार ठाम; अमेरिकेला भारताचं स्वतंत्र धोरण का खुपतंय?
18
मराठी अभिनेत्याचं साउथ इंडस्ट्रीत काम करण्याचं होतं स्वप्न, लॉकडाऊननंतर हैदराबाद गाठलं अन्...
19
चहा करताना 'ही' छोटीशी चूक कराल तर आयुष्याला मुकाल, योग्य पद्धत कोणती एकदा बघाच
20
ऑपरेशन महादेवमध्ये मारले गेलेले सगळे दहशतवादी पाकिस्तानीच! 'त्या' एका पुराव्याने समोर आली कुंडली

आयुष्याच्या अखेरच्या क्षणी तुम्ही ज्या गोष्टीचा विचार करता, त्याच योनीत पुनर्जन्म मिळतो!

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 10, 2023 13:54 IST

हिंदू धर्मात पुनर्जन्मावर लोकांचा विश्वास असतो आणि पुढचा जन्म कोणत्या योनीत मिळेल याबद्दल उत्सुकता असते, त्यावर हे उत्तर!

मरणोत्तर मोक्ष मिळावा अशी आपली अपेक्षा असते. त्यासाठी जिवंतपणी सर्व इच्छा आकांक्षा पूर्ण करण्याची आपली खटपट सुरु असते. मोक्ष कधी मिळतो, तर श्वास बाकी आहेत पण इच्छा पूर्ण झाल्या तर मोक्ष आणि श्वास संपले पण इच्छा बाकी राहिल्या तर पुनर्जन्म! आपल्या इच्छा-अपेक्षांची यादी पूर्ण होत नाही. म्हणूनच आपण परत जन्म मृत्यूच्या फेऱ्यात अडकतो. हा जन्म कुठल्या योनीत मिळतो हे जाणून घेण्यासाठी वाचा पुढील कथा...!

एकदा महर्षी नारद आणि भगवान विष्णू वेषांतर करून पृथ्वीवर अवतीर्ण झाले. तिथून चालत असताना नारद म्हणाले, देवा तुमचे भक्त गरीब आणि लोकांना लुबाडणारे, फसवणारे, त्रास देणारे श्रीमंत का? त्यामागचे कारण विष्णूंनी नारदांना सोदाहरण पटवून दिले. 

नारदांना घेऊन भगवान विष्णू फकिराच्या वेशात एका धनिकाच्या घराजवळ आले. भिक्षेची याचना करू लागले. धनिक बाहेर आला आणि काही बाही बोलून त्यांने दोघांना हाकलून लावले. भिक्षा तर दूरच पण अतिथी धर्माचेही पालन त्याने केले नाही. नारदांना वाटले आता विष्णू रागावणार आणि त्याला राजाचा रंक बनवणार, मात्र झाले उलटच! विष्णूंनी त्याला आणखी धनवान हो असा आशीर्वाद दिला. 

तिथून ते दोघे एका आजीच्या झोपडीत गेले. आजींनी त्यांना आत बोलावले. बसायला पाट दिले व म्हणाली. महाराज माझ्या कडे तुम्हाला खाऊ घालायला काही नाही, परंतु माझ्याकडे दुभती गाय आहे, मी तुम्हाला भिक्षा म्हणून पेलाभर दूध देते. देवाने तिची सेवा मान्य केली आणि निघाले. त्या सेवेने तृप्त होऊन विष्णू भगवान तिला आशीर्वाद देतील असे नारदांना वाटले, तर तिथेही उलटच झाले. भगवान म्हणाले, 'आजी काही दिवसातच तुमची गाय मृत्युमुखी पडणार आहे.'

हे ऐकून चकित झालेल्या नारदांनी विष्णूंना विचारले, देवा तुमचा न्याय असा कसा? विष्णू म्हणाले, 'नारदा, धनिकाला माझ्यापेक्षा पैसा प्रिय, तो शेवट्पर्यंत पैसा पैसाच करणार. त्यामुळे तो मोक्ष प्राप्ती तर करणार नाहीच, उलट पुढच्या जन्मी तिजोरीची राखण करत साप होऊन या पृथ्वीतलावर जन्म घेईल. याउलट त्या आजीचा जीव गायीमध्ये अडकला होता. तिला मोक्ष हवा होता, परंतु आपल्यानंतर गायीचा सांभाळ कोण करणार याची तिला काळजी होती. तिची काळजी मिटवून तिचा मोक्षाचा मार्ग मोकळा केला. 

म्हणून अवास्तव अपेक्षा न ठेवता जोवर श्वास सुरु आहेत तोवर इच्छा संपवण्याचा प्रयत्न करा, त्यामुळे जन्म मरणाच्या फेऱ्यात अडकण्यापेक्षा मोक्षाची प्राप्ती होईल.