शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्रात ४ आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या; पराग सोमण वर्धा झेडपीचे नवे CEO, सौम्या शर्मा अमरावती पालिकेच्या आयुक्त
2
"घरी कुणी नाही, तू ये"; दोन मुलांच्या आईनं बॉयफ्रेंडला बोलावलं, पण पुढे जे झालं ते ऐकून बसेल धक्का!
3
अहमदाबाद प्लेन क्रॅश : अपघातस्थळावरून किती तोळे सोनं अन् रोख रक्कम मिळाली? प्रत्यक्षदर्शीनं सांगितलं
4
इराणकडे थोडी थोडकी नव्हे, २०,००० मिसाईल, दिवसाला २०० जरी डागली...; धमकीने खळबळ
5
डोनाल्ड ट्रम्प यांच्या एका पोस्टने तेहरानमध्ये भीषण गर्दी, लोक शहर सोडून काढतायत पळ! पाहा व्हिडीओ
6
राजावर पहिला वार कुणी केला...? कुठे उभी होती सोनम...? क्राइम सीनवरून परतलेल्या मेघालय पोलिसांनी सगळंच सांगितलं
7
लेडी डॉन अनुराधा चौधरीला आई व्हायचेय; गँगस्टरने तिहारमधून शुक्राणू पाठविले...
8
"तू नाही, तुझी वहिनी आवडली"; मेहुण्याच्या बायकोवर जडला नवऱ्याचा जीव, लग्नाच्या एका महिन्यातच बायकोला सोडून पसार!
9
"त्यांना केवळ प्रसिद्धी हवी आहे...!"; G7 समिट अर्ध्यावर सोडून अमेरिकेत पोहोचताच फ्रान्सच्या राष्ट्रपतींवर भडकले ट्रम्प, नेमकं काय घडलं?
10
आता केवळ रामलला नाही, तर श्रीराम दरबाराचेही करा दर्शन; १ दिवसात किती भाविकांना पाहता येणार?
11
'संधी-साधूपणाच्या राजकारणाला प्रोत्साहित करायचे नाही,भाजपसोबत..' शरद पवार स्पष्टच बोलले
12
सुधाकर बडगुजर भाजपात येताच नितेश राणेंचे सूर बदलले; दहशतवादाबाबत केले होते आरोप
13
५०, १०० नाही, तब्बल ‘इतकी’ विमाने रद्द! ‘असा’ आहे एअर इंडियाचा ३ वर्षांचा रेकॉर्ड, आकडे पाहाच
14
व्हिसा नाकारल्याचा राग, तरुणाने अमेरिकन दूतावासाला बॉम्बने उडवण्याची धमकी दिली! पोलिसांकडून अटक
15
पीएमजीपी वसाहतीमधील रहिवाशांना ४५० फुटांचे घर मिळणार! म्हाडामार्फत कंत्राटदार नियुक्तीसाठी निविदा प्रक्रिया सुरू
16
'हुकूमशहा-पाकिस्तानचा खुनी..', अमेरिकेत गेलेल्या असीम मुनीरच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी
17
“सुधाकर बडगुजर यांच्या प्रवेशाने भाजपाची ताकद वाढली, आता महापालिका निवडणूक...”: गिरीश महाजन
18
राजा रघुवंशी हत्याकांडाची पुनरावृत्ती; पैसे देऊन गुंड बोलावले, पत्नीने प्रियकरासोबत मिळून पतीला संपवलं!
19
आम्ही मोसादचं हेडक्वार्टर उडवलं, इस्रायली मिलिट्री इंटेलिजन्सलाही निशाणा बनवलं; इराणचा मोठा दावा
20
IND vs ENG : तेंडुलकर-अँडरसन ट्रॉफीसह आता मालिका विजेत्या कर्णधाराला दिले जाणार 'पतौडी मेडल'

आयुष्याच्या अखेरच्या क्षणी तुम्ही ज्या गोष्टीचा विचार करता, त्याच योनीत पुनर्जन्म मिळतो!

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 10, 2023 13:54 IST

हिंदू धर्मात पुनर्जन्मावर लोकांचा विश्वास असतो आणि पुढचा जन्म कोणत्या योनीत मिळेल याबद्दल उत्सुकता असते, त्यावर हे उत्तर!

मरणोत्तर मोक्ष मिळावा अशी आपली अपेक्षा असते. त्यासाठी जिवंतपणी सर्व इच्छा आकांक्षा पूर्ण करण्याची आपली खटपट सुरु असते. मोक्ष कधी मिळतो, तर श्वास बाकी आहेत पण इच्छा पूर्ण झाल्या तर मोक्ष आणि श्वास संपले पण इच्छा बाकी राहिल्या तर पुनर्जन्म! आपल्या इच्छा-अपेक्षांची यादी पूर्ण होत नाही. म्हणूनच आपण परत जन्म मृत्यूच्या फेऱ्यात अडकतो. हा जन्म कुठल्या योनीत मिळतो हे जाणून घेण्यासाठी वाचा पुढील कथा...!

एकदा महर्षी नारद आणि भगवान विष्णू वेषांतर करून पृथ्वीवर अवतीर्ण झाले. तिथून चालत असताना नारद म्हणाले, देवा तुमचे भक्त गरीब आणि लोकांना लुबाडणारे, फसवणारे, त्रास देणारे श्रीमंत का? त्यामागचे कारण विष्णूंनी नारदांना सोदाहरण पटवून दिले. 

नारदांना घेऊन भगवान विष्णू फकिराच्या वेशात एका धनिकाच्या घराजवळ आले. भिक्षेची याचना करू लागले. धनिक बाहेर आला आणि काही बाही बोलून त्यांने दोघांना हाकलून लावले. भिक्षा तर दूरच पण अतिथी धर्माचेही पालन त्याने केले नाही. नारदांना वाटले आता विष्णू रागावणार आणि त्याला राजाचा रंक बनवणार, मात्र झाले उलटच! विष्णूंनी त्याला आणखी धनवान हो असा आशीर्वाद दिला. 

तिथून ते दोघे एका आजीच्या झोपडीत गेले. आजींनी त्यांना आत बोलावले. बसायला पाट दिले व म्हणाली. महाराज माझ्या कडे तुम्हाला खाऊ घालायला काही नाही, परंतु माझ्याकडे दुभती गाय आहे, मी तुम्हाला भिक्षा म्हणून पेलाभर दूध देते. देवाने तिची सेवा मान्य केली आणि निघाले. त्या सेवेने तृप्त होऊन विष्णू भगवान तिला आशीर्वाद देतील असे नारदांना वाटले, तर तिथेही उलटच झाले. भगवान म्हणाले, 'आजी काही दिवसातच तुमची गाय मृत्युमुखी पडणार आहे.'

हे ऐकून चकित झालेल्या नारदांनी विष्णूंना विचारले, देवा तुमचा न्याय असा कसा? विष्णू म्हणाले, 'नारदा, धनिकाला माझ्यापेक्षा पैसा प्रिय, तो शेवट्पर्यंत पैसा पैसाच करणार. त्यामुळे तो मोक्ष प्राप्ती तर करणार नाहीच, उलट पुढच्या जन्मी तिजोरीची राखण करत साप होऊन या पृथ्वीतलावर जन्म घेईल. याउलट त्या आजीचा जीव गायीमध्ये अडकला होता. तिला मोक्ष हवा होता, परंतु आपल्यानंतर गायीचा सांभाळ कोण करणार याची तिला काळजी होती. तिची काळजी मिटवून तिचा मोक्षाचा मार्ग मोकळा केला. 

म्हणून अवास्तव अपेक्षा न ठेवता जोवर श्वास सुरु आहेत तोवर इच्छा संपवण्याचा प्रयत्न करा, त्यामुळे जन्म मरणाच्या फेऱ्यात अडकण्यापेक्षा मोक्षाची प्राप्ती होईल.