शहरं
Join us  
Trending Stories
1
ख्रिसमसच्या सकाळी PM नरेंद्र मोदींनी लावली ऐतिहासिक चर्चमध्ये हजेरी; प्रार्थनेत सहभागी
2
नाशिक भाजपात मोठा राडा! पक्षप्रवेशावरून २ गटांमध्ये तणाव; फरांदे समर्थकांकडून घोषणाबाजी
3
“भाजपाने मराठी माणसासाठी काय केले? ठाकरे आहेत म्हणून तुम्ही राज्याचे CM आहात”: संजय राऊत
4
Vinayak Pande and Yatin Wagh: उद्धव ठाकरेंचा आदेश, विनायक पांडे- यतिन वाघ यांची पक्षातून हकालपट्टी; राऊतांची पोस्ट!
5
ज्यांनी घेतलीय त्यांनी मागच्या सीटवर बसू नका, या देशाने घातली मारुती सुझुकीच्या Fronx विक्रीवर बंदी...
6
"युतीमुळे तुम्हाला फरक पडत नाही, तर तोंडाची डबडी का वाजवताय?", संजय राऊत भाजपा नेत्यांवर भडकले
7
१७ वर्षानंतर तारिक रहमान बांगलादेशात परतले; राजकीय हालचालींना वेग, भारतासाठी फायद्याचे की तोट्याचे
8
एका वर्षात 'ग्रॅच्युइटी' मिळण्याचा नियम कागदावरच; नव्या लेबर कोडची प्रतीक्षा लांबली! का होतोय उशीर?
9
जीएसटी कमी होऊन, दोन महिनेही झाले नाहीत तोच कारच्या किंमती महागणार; मारुतीपासून महिंद्रापर्यंत सर्वच कंपन्या वाढवणार किमती
10
नांदेडमध्ये काळजाचा थरकाप! आई-वडील घरात मृतावस्थेत, तर मुलांनी रेल्वेखाली संपवलं आयुष्य
11
संतापजनक घटना! नातीनं विरोधात जाऊन लग्न केलं, संतापलेल्या आजीने नातीच्या ४० दिवसांच्या बाळाला संपवलं
12
जिथे कोंडी केली, तेच ठिकाण ‘गेम चेंजर’ ठरणार; ठाकूरांना खिंडीत गाठण्यासाठी भाजपाची रणनीती!
13
Nigeria Mosque Explosion: नायजेरिया हादरलं! मशिदीत नमाजाच्या वेळी मोठा बॉम्बस्फोट; ५ ठार, ३५ जण गंभीर जखमी
14
ऑस्ट्रेलियात ख्रिसमसपूर्वी ज्यूंवर पुन्हा हल्ला, कारवर 'फायर बॉम्बिंग'; PM अल्बनीज म्हणाले, 'अँटी-सेमिटिझम' कृत्य!
15
सुधीर मुनगंटीवारांचं पक्षाने ऐकलं? आमदार किशोर जोरगेवारांना पदावरून हटवलं; भाजपचा निवडणुकीच्या तोंडावर मोठा निर्णय
16
५० नगरपालिकांमध्ये भाजपाचा नगराध्यक्ष पण नगरसेवकांची संख्या निम्मीही नाही; २ ठिकाणी 'भोपळा'
17
महापालिका निवडणूक २०२६: काँग्रेस-वंचितची आघाडी फिस्कटली! अकोल्यात पाच उमेदवार जाहीर, यादीत कोणाची नावे?
18
“अखेर ‘बाळासाहेबांचे वाघ’ एकत्र आले”; ठाकरे बंधूंच्या युतीनंतर बाळा नांदगावकरांची खास पोस्ट
19
नक्षलवादानंतर अमित शाहांचे नवे मिशन; 2029 पर्यंत देशातून ड्रग्स हद्दपार करण्याचा निर्धार
20
इन्फोसिसमध्ये फ्रेशर्सची चांदी! 'या' पदांसाठी मिळणार २१ लाखांचे पॅकेज; २०,००० नव्या भरतीचे संकेत
Daily Top 2Weekly Top 5

मोक्ष म्हणजे तरी काय...?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 25, 2020 18:58 IST

हृदयातील संपूर्ण कामवासना नष्ट होऊन मनुष्य जेव्हा पूर्णपणे वैराग्यसंपन्न होतो तेव्हाच तो मुक्त होतो आणि ही मुक्तावस्था म्हणजेच मोक्ष..!

- युवा कीर्तनकार, ह.भ.प. ऋतुपर्ण भरतबुवा रामदासी ( बीड, महाराष्ट्र )

आपल्या भारतीय धर्मशास्त्राने धर्म, अर्थ, काम आणि मोक्ष या चतुर्विध पुरुषार्थांना नितांत महत्त्व दिले आहे. मनुष्य देहातच या चतुर्विध पुरुषार्थांची प्राप्ती करता येते इतर देहात हे कालत्रयी शक्य नाही.

आपल्या सर्वांना काही प्रश्न सतत पडत असतात ते असे की, मोक्ष म्हणजे नेमके काय...?तो कुठे असतो..?कुठे गेले म्हणजे तो प्राप्त होतो..?

तर लक्षांत घ्या की, मोक्ष आकाशात नाही, पाताळात नाही, भूतलावर नाही. मोक्ष तर आज, आत्ता, इथेच मिळवता येतो. शिवगीताकार मोक्षाचे वर्णन करतात -

मोक्षस्य न हि वासोडस्ति न ग्रामांत्तर मेव ना ।अज्ञान ह्रदयग्रंथि नाशो मोक्ष इति स्मृत: ॥ 

हृदयातील संपूर्ण कामवासना नष्ट होऊन मनुष्य जेव्हा पूर्णपणे वैराग्यसंपन्न होतो तेव्हाच तो मुक्त होतो आणि ही मुक्तावस्था म्हणजेच मोक्ष..!

देहाच्या ठिकाणी अहं आणि मम हे दोन भाव सतत निर्माण होत असतात. या भावापासून वेगळे होणे, भावातीत होणे म्हणजे मोक्ष..! देहाच्या ठिकाणी आत्मबुद्धी रत झाली की जीवाला बंध प्राप्त होतो व आत्म्याच्या ठिकाणी आत्मबुद्धी रत झाली की मोक्ष प्राप्त होतो. आत्मस्वरूपाच्या अज्ञानामुळे खरं तर जीवनमुक्त अवस्था प्राप्त होत नाही यासाठी आत्मज्ञानाचीच गरज असते.

रज्जूवर भासलेल्या सर्पाला मारण्याकरिता कुठले शस्त्र वापरणार..? अहो.! दोरीवर सापाचा भास झाला तो घनदाट किर्र्  अंधारामुळे. हा फक्त भास झाला आहे. तो साप आहे की दोरी याचे ज्ञान फक्त प्रकाशानेच होणार आहे. तसे देह म्हणजेच मी या अज्ञान ग्रंथीची निवृत्ती फक्त आत्मज्ञानाच्या प्रकाशानेच होणार आहे.

ज्ञानेश्वर महाराज म्हणतात -

वाचुनी ज्ञानेविण एके ।उपाय करिसी जितुके ।तिही गुंफसि अधिके ।रुखी इथे ॥

एका आत्मज्ञानावाचून या वृक्षाला छेदण्याचे जेवढे म्हणून आपण प्रयत्न करू तेवढे आपण अधिक बंधनात पडू. हे आत्मज्ञान याच देहात, जिवंतपणी प्राप्त करावयाचे आहे. मोक्ष काही मृत्यूनंतर मिळविण्याचे साधन नाही. मोक्ष हा जिवंतपणी घ्यावयाचा अनुभव आहे.

ज्ञानराज माऊली म्हणतात -

मोक्ष मेल्यापाठी आम्हासी होईल ।ऐसे जे म्हणतील अतिमूर्ख ॥

दीप गेल्यावरी कैचा जी प्रकाश ।झाका झाकी त्यास कासयाची ॥

जवंवरी देह आहे तवंवरी साधन ।करूनिया ज्ञान सिद्ध करा ॥

आहे मी हा कोण करावा विचार ।म्हणे ज्ञानेश्वर निवृत्तीचा ॥

॥ जय जय रघुवीर समर्थ ॥

( लेखक हे युवा कीर्तनकार आहेत, त्यांचा भ्रमणध्वनी 87 93 03 03 03 )

टॅग्स :Adhyatmikआध्यात्मिकspiritualअध्यात्मिक