शहरं
Join us  
Trending Stories
1
"भारतावर टीका करणारे देशच रशियासोबत व्यापार करताहेत"; ट्रम्प यांना भारताने दाखवला आरसा, आकडेवारीसह सुनावले
2
"...त्यामुळे मी भारतावरील टॅरिफ भरपूर वाढवणार आहे"; अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचा पुन्हा इशारा
3
DSP सिराजचा ऑन ड्युटी फॉर्म्युला! सर्वाधिक विकेट्स अन् १००० पेक्षा अधिक चेंडू टाकण्याचा मोठा पराक्रम
4
धक्कादायक! नागपुरात भर रस्त्यावर महिला पोलिसाला मारहाण करत विनयभंग
5
मोबाईलसाठी रेल्वेतील प्रवाशाच्या हातावर फटका, तरुणाने गमावला पाय; २० हजार रुपयेही पळवले
6
Pahalgam Attack: ते दहशतवादी पाकिस्तानी असल्याचे लष्कराने म्हटले नाही; संरक्षण मंत्रालयाचा खुलासा
7
१२,००० सॅमसंग स्मार्टफोनने भरलेला ट्रक चोरीला गेला; चोरट्यांनी ९१ कोटींच्या वस्तू लंपास केल्या
8
IND vs ENG : एक मालिका अन् दोन मालिकावीर! गंभीरमुळं गिलसोबत हॅरी ब्रूकला मिळाला हा पुरस्कार
9
अमित शाह मोडणार देशाच्या गृहमंत्र्यांचा रेकॉर्ड! जम्मू काश्मीरबद्दल सरकार घेणार आणखी एक मोठा निर्णय?
10
मारहाण, शिवीगाळ असं काहीच घडलं नाही; पुणे पोलिसांनी मुलींचे सगळेच आरोप फेटाळले
11
'भारत आगीशी खेळत आहे'; डोनाल्ड ट्रम्प, एस. जयशंकर यांच्याबद्दल खोटी विधाने केली पोस्ट, 'एक्स'ने खातीच केली बंद
12
iPhone 16: पहिल्यांदाच आयफोन १६ च्या खरेदीवर एवढी मोठी सूट!
13
भारत रशियाला युक्रेनविरुद्ध युद्धासाठी अप्रत्यक्षपणे निधी पुरवतोय, अमेरिकेचा आरोप!
14
येमेनमध्ये निमिषा प्रियाच्या अडचणी वाढल्या! मृताच्या भावाने पत्र लिहून केली मोठी मागणी
15
Siraj, IND vs ENG: 'तो' एक शब्द अन् सिराजने फिरवला अख्खा सामना... टीम इंडियाच्या विजयानंतर उघड केलं गुपित
16
आपच्या सत्येंद्र जैन यांना दिलासा, CBIच्या क्लोजर रिपोर्टवर कोर्टाचं शिक्कामोर्तब
17
माझा 'तो' व्हिडीओ रोहित पवारांना कुणी पाठवला? मंत्री मेघना बोर्डीकर म्हणाल्या...
18
राज ठाकरेंच्या 'मराठी'नंतर नितीश कुमारांची 'बिहारी' घोषणा; शिक्षक भरतीत नोकरी बिहारींनाच मिळणार
19
Siraj, IND vs ENG: ‘पूरा खोल दिए पाशा...’; सिराजच्या 'मॅचविनिंग' गोलंदाजीवर ओवेसींची हैदराबादी शैलीत स्तुती
20
कमाल झाली राव! रशियन महिलेने सांगितली भारतीय पुरुषाशी लग्न करण्याची खास कारणं, जिंकलं मन

मोक्ष म्हणजे तरी काय...?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 25, 2020 18:58 IST

हृदयातील संपूर्ण कामवासना नष्ट होऊन मनुष्य जेव्हा पूर्णपणे वैराग्यसंपन्न होतो तेव्हाच तो मुक्त होतो आणि ही मुक्तावस्था म्हणजेच मोक्ष..!

- युवा कीर्तनकार, ह.भ.प. ऋतुपर्ण भरतबुवा रामदासी ( बीड, महाराष्ट्र )

आपल्या भारतीय धर्मशास्त्राने धर्म, अर्थ, काम आणि मोक्ष या चतुर्विध पुरुषार्थांना नितांत महत्त्व दिले आहे. मनुष्य देहातच या चतुर्विध पुरुषार्थांची प्राप्ती करता येते इतर देहात हे कालत्रयी शक्य नाही.

आपल्या सर्वांना काही प्रश्न सतत पडत असतात ते असे की, मोक्ष म्हणजे नेमके काय...?तो कुठे असतो..?कुठे गेले म्हणजे तो प्राप्त होतो..?

तर लक्षांत घ्या की, मोक्ष आकाशात नाही, पाताळात नाही, भूतलावर नाही. मोक्ष तर आज, आत्ता, इथेच मिळवता येतो. शिवगीताकार मोक्षाचे वर्णन करतात -

मोक्षस्य न हि वासोडस्ति न ग्रामांत्तर मेव ना ।अज्ञान ह्रदयग्रंथि नाशो मोक्ष इति स्मृत: ॥ 

हृदयातील संपूर्ण कामवासना नष्ट होऊन मनुष्य जेव्हा पूर्णपणे वैराग्यसंपन्न होतो तेव्हाच तो मुक्त होतो आणि ही मुक्तावस्था म्हणजेच मोक्ष..!

देहाच्या ठिकाणी अहं आणि मम हे दोन भाव सतत निर्माण होत असतात. या भावापासून वेगळे होणे, भावातीत होणे म्हणजे मोक्ष..! देहाच्या ठिकाणी आत्मबुद्धी रत झाली की जीवाला बंध प्राप्त होतो व आत्म्याच्या ठिकाणी आत्मबुद्धी रत झाली की मोक्ष प्राप्त होतो. आत्मस्वरूपाच्या अज्ञानामुळे खरं तर जीवनमुक्त अवस्था प्राप्त होत नाही यासाठी आत्मज्ञानाचीच गरज असते.

रज्जूवर भासलेल्या सर्पाला मारण्याकरिता कुठले शस्त्र वापरणार..? अहो.! दोरीवर सापाचा भास झाला तो घनदाट किर्र्  अंधारामुळे. हा फक्त भास झाला आहे. तो साप आहे की दोरी याचे ज्ञान फक्त प्रकाशानेच होणार आहे. तसे देह म्हणजेच मी या अज्ञान ग्रंथीची निवृत्ती फक्त आत्मज्ञानाच्या प्रकाशानेच होणार आहे.

ज्ञानेश्वर महाराज म्हणतात -

वाचुनी ज्ञानेविण एके ।उपाय करिसी जितुके ।तिही गुंफसि अधिके ।रुखी इथे ॥

एका आत्मज्ञानावाचून या वृक्षाला छेदण्याचे जेवढे म्हणून आपण प्रयत्न करू तेवढे आपण अधिक बंधनात पडू. हे आत्मज्ञान याच देहात, जिवंतपणी प्राप्त करावयाचे आहे. मोक्ष काही मृत्यूनंतर मिळविण्याचे साधन नाही. मोक्ष हा जिवंतपणी घ्यावयाचा अनुभव आहे.

ज्ञानराज माऊली म्हणतात -

मोक्ष मेल्यापाठी आम्हासी होईल ।ऐसे जे म्हणतील अतिमूर्ख ॥

दीप गेल्यावरी कैचा जी प्रकाश ।झाका झाकी त्यास कासयाची ॥

जवंवरी देह आहे तवंवरी साधन ।करूनिया ज्ञान सिद्ध करा ॥

आहे मी हा कोण करावा विचार ।म्हणे ज्ञानेश्वर निवृत्तीचा ॥

॥ जय जय रघुवीर समर्थ ॥

( लेखक हे युवा कीर्तनकार आहेत, त्यांचा भ्रमणध्वनी 87 93 03 03 03 )

टॅग्स :Adhyatmikआध्यात्मिकspiritualअध्यात्मिक