शहरं
Join us  
Trending Stories
1
Aadhaar New Rules : आधार फेस ऑथेंटिकेशन म्हणजे काय? केंद्र सरकार नवीन नियम लागू करणार
2
IPL Auction 2026 : काव्या मारन vs आकाश अंबानी यांच्यात जुगलबंदी; त्यात अनकॅप्ड खेळाडू झाला 'करोडपती'
3
रोजगार क्षेत्रातून दिलासादायक बातमी; बेरोजगारी 9 महिन्यांच्या नीचांकी पातळीवर
4
IPL 2026 Auction: 'त्या' खेळाडूविषयी मनात आदरच..; आकाश अंबानींनी सांगितली पडद्यामागची गोष्ट
5
धक्कादायक! विमानतळावर भुताटकी, प्रवाशांना त्रास देते एक रहस्यमय सावली, प्रवाशांचा दावा
6
विरार हत्याकांड प्रकरण: कुख्यात गुंड सुभाषसिंह ठाकूर याला ७ दिवसांची पोलीस कोठडी
7
Harsimrat Kaur Badal : "सरकार गरिबांच्या पोटावर लाथा मारतंय...", मनरेगावरून हरसिमरत कौर यांचा जोरदार हल्लाबोल
8
पीएम मोदींना दोन गोष्टींची खूप चीड; 'जी राम जी' विधेयकावरुन राहुल गांधींची टीका
9
कोण आहे Prashant Veer? MS धोनीसोबत खेळण्याचं स्वप्न पाहणाऱ्या खेळाडूवर CSK नं लावली विक्रमी बोली
10
VIDEO: पाहावं ते नवलंच... मुलीने चक्क केली ख्रिसमस ट्री हेअरस्टाईल, नेटकऱ्यांना हसू आवरेना
11
बेस प्राईस अवघी ३० लाख, पण लिलावात या ५ खेळाडूंवर पडला पैशांचा पाऊस, बनले करोडपती
12
गीझर-हीटरमुळे तुमचे वीज बिल जास्त येतंय? या स्मार्ट टिप्स वापरून पैसे वाचवा
13
IPL 2026: ऑक्शनमध्ये चेन्नईचा मोठा डाव! १४ कोटी खर्च केले, पण परफेक्ट खेळाडू निवडला, धोनीची जागा घेणार?
14
BJP Assets: 2014 पूर्वी भाजपाच्या तिजोरीत किती पैसा होता? 11 वर्षांत किती वाढला? जाणून थक्क व्हाल!
15
आत्मनिर्भर भारताच्या दिशेने मोठे पाऊल, भारतातील पहिला स्वदेशी 64- बिट मायक्रोप्रोसेसर Dhruv64 लाँच
16
तब्बल ८ कोटी २० लाखांची बोली, दिल्ली कॅपिटल्सने संघात घेतलेला अकीब नबी दार कोण?
17
बाँडी बिचवर हल्ला करणाऱ्या साजिदचं भारताशी कनेक्शन समोर, २७ वर्षांपूर्वी सोडलं होतं हैदराबाद
18
आईने पाय धरले, तर वडिलांनी गळा आवळला; निवृत्त पोलिस अधिकाऱ्याने मुलीला संपवले, कारण...
19
Foldable Smartphones: सॅमसंग गॅलेक्सी ते गुगल पिक्सेलपर्यंत, यावर्षी लॉन्च झालेले प्रीमियम फोल्डेबल स्मार्टफोन!
20
"त्याला वर्षभर संधी, मला २-३ मॅचनंतर बाहेर काढलं..."; शुबमन गिलला संघाबाहेर न केल्याचा संताप
Daily Top 2Weekly Top 5

धर्म म्हणजे काय? शास्त्र म्हणजे काय? हिंदू धर्माचा प्रमाण ग्रंथ कोणता? सविस्तर वाचा!

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 22, 2021 12:49 IST

आजच्या घडीला 'शास्त्र असतं ते' असे म्हणत जी टिंगल टवाळी केली जाते, ती योग्य नाही. केवळ कोणीतरी सांगितले म्हणून एखाद्या गोष्टीचे अंधानुकरण करणेही योग्य नाही. ते तसे का केले जाते, याची उकल आपल्या धर्मग्रंथात दिलेली आहे.

धर्माशिवाय कोणतेही राष्ट्र उभे राहू शकत नाही. प्रत्येक राष्ट्राचा स्वतंत्र धर्म आहे. भारत देशात अनेक धर्माचे लोक एकत्र नांदतात.  सर्वधर्मसमभावाचे धोरण आपल्या देशाने स्वीकारले आहे. असे असूनही अनेकदा धार्मिक तेढ निर्माण होऊन वाद विकोपाला जातात. याचे कारण हेच आहे, की धर्म या शब्दाची व्याख्याच आपण समजून घेतलेली नाही. पं. धुंडिराजशास्त्री दाते यांनी धर्मशास्त्रीय निर्णय या पुस्तकार धर्म आणि शास्त्र ही संकल्पना छान समजावून सांगितली आहे. तसेच आपल्याकडे विपुल साहित्याची उपलब्धता असल्यामुळे हिंदूंनी प्रमाण ग्रंथ कोणता मानावा, याचीही उकल त्यांनी केली आहे. कशी ते पाहू-

धर्म शास्त्र यामध्ये दोन शब्द आहेत. धर्म आणि शास्त्र! धर्माच्या अनेक व्याख्या आहेत. वस्तुत: इतक्या व्याख्यांची जरूरी नाही. एक व्याख्या उत्कृष्ट आहे. तेवढी पाहिली म्हणजे झाले. १. आपल्या आचरणातून समाजव्यवस्था उत्तम राहिली पाहिजे.२. प्रत्येक प्राणिमात्राची ऐहिक उन्नति म्हणजे विकास झाला पाहिजे. ३. सांसारिक उन्नतीबरोबर आध्यात्मिक उन्नतीही झाली पाहिजे. अशी व्यवस्था ज्यात आहे, त्याला धर्म म्हणतात. 'जगत: स्थितिकारणं प्राणिना साक्षात अभ्यदय नि:श्रेयस हेतुर्य: स: धर्म:' आद्य श्री शंकराचार्यांनी ही धर्माची व्याख्या केली आहे. या तीनही गोष्टी प्रत्येक कर्मातून साध्य झाल्या पाहिजेत अशी सर्व कर्मांची रचना केली, ती श्रुति, स्मृति, पुराणे व सूत्रे यांच्या आधाराने केली. म्हणून प्रत्येक कर्माने या तीनही गोष्टी साध्य होतात, याला धर्म म्हणतात.

शास्त्राची व्याख्यादेखील पूर्वसूरींनी स्पष्ट केली आहे. माणसाचे हित व अहित ज्यात सांगितले जाते, त्याला शास्त्र म्हणतात. हिताकरता प्रवृत्त व्हावे व अहितापासून निवृत्त व्हावे असे ज्यात सांगितले जाते, त्याला शास्त्र म्हणतात. 

आजच्या घडीला 'शास्त्र असतं ते' असे म्हणत जी टिंगल टवाळी केली जाते, ती योग्य नाही. केवळ कोणीतरी सांगितले म्हणून एखाद्या गोष्टीचे अंधानुकरण करणेही योग्य नाही. ते तसे का केले जाते, याची उकल आपल्या धर्मग्रंथात दिलेली आहे. परंतु अनेकांना प्रश्न पडतो, की नेमका कोणता धर्मग्रंथ प्रमाण मानावा, ज्यात सर्व शास्त्रांची उत्तरे एकत्र सापडू शकतील? त्यावर पं. धुंडिराजशास्त्री दाते लिहितात, शास्त्राचे जे ग्रंथ आहेत, त्या सर्वात अधिक गाजलेला व लोकप्रिय झालेला 'धर्मसिंधू' हा ग्रंथ प्रमाण मानावा. या ग्रंथात ऋषींची मूळ वचने दिली नाहीत, पण त्यांचा आशय दिला आहे व त्यावरून जे कर्तव्य केले पाहिजे त्याचीही माहिती दिली आहे. निर्णयसिंधू व पुरुषार्थ चिंतामणी या ग्रंथात ऋषींची सर्व मूळ वचने दिली आहेत. 

हे ग्रंथ अभ्यासले गेले पाहिजेत. आपल्या पूर्वजांनी सांगितलेल्या गोष्टी निराधार नसून प्रत्येक गोष्टीची शास्त्रीय उकल आहे. त्याचे पालन करणे हे आपले कर्तव्य आहे. हे कर्तव्यपालन म्हणजेच धर्म. 

'वस्तू' म्हणून 'कन्यादान' करतच नाहीत; लग्नातील हा विधी खूपच महत्त्वाचा... समजून घ्या त्यामागचा 'भावार्थ'

परंतु, आजच्या धकाधकीच्या काळात या ग्रंथांचा अभ्यास करणे शक्य नाही? मग सुरुवातीला दिलेली तीन वचने लक्षात ठेवा आणि आचरणात आणा. धर्मपालन आपोआप होईल. हीच तीन वचने सर्व धर्मातील धर्मगुरुंना अभिप्रेत आहेत. ती म्हणजे-१. आपल्या आचरणातून समाजव्यवस्था उत्तम राहिली पाहिजे.२. प्रत्येक प्राणिमात्राची ऐहिक उन्नति म्हणजे विकास झाला पाहिजे. ३. सांसारिक उन्नतीबरोबर आध्यात्मिक उन्नतीही झाली पाहिजे.