शहरं
Join us  
Trending Stories
1
Bacchu Kadu Morcha: मुख्यमंत्र्यांसोबत चर्चा करणार, पण नागपुरातील आंदोलन सुरूच राहणार; हायकोर्टाच्या आदेशानंतर काय काय घडलं?
2
हद्दच झाली! उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या स्वाक्षरीचे बनावट पत्र केले सादर, आरोपी कोण?
3
मोठी बातमी!बच्चू कडूंना पाठिंबा देण्यासाठी मनोज जरांगे पाटील नागपूरकडे रवाना
4
आमदार अनिल कुमार यांच्यावर दगडफेक, दगड-विटा मारत गाड्या फोडल्या; प्रचारादरम्यान घडली घटना
5
इंग्लंडचा खेळ खल्लास! दक्षिण आफ्रिकेच्या संघानं पहिल्यांदाच वर्ल्ड कप फायनल गाठत रचला इतिहास
6
Bacchu Kadu Morcha: मंत्री बच्चू कडूंच्या भेटीला, भरपावसात रस्त्यावरच चर्चा; आंदोलनाबद्दल काय ठरलं?
7
Nilesh Ghaiwal: गँगस्टर निलेश घायवळ 'भू-माफियाही'; ३ वर्षांत जमवली ५८ एकर जमीन
8
योगी सरकारच्या सहकार्याने, उत्तर प्रदेशातील गावा-गावात परिवर्तनाची मशाल पेटवत आहेत 'चेंजमेकर्स'!
9
भारत-चीन सीमा वाद सुटला? लष्करी कमांडर्सच्या बैठकीत दोन्ही देशांचं एकमत; 'या' महत्वाच्या मुद्द्यांवर सहमती
10
Sudhir Dalvi: 'साई बाबा' फेम ज्येष्ठ अभिनेते सुधीर दळवी यांची प्रकृती गंभीर; उपचारासाठी १५ लाखांची गरज, मदतीचं आवाहन
11
"ना बिहारमध्ये CM पद, ना दिल्लीत PM पद खाली..."; सोनिया गांधी अन् लालू यादव यांचं नाव घेत अमित शाह यांची मोठी भविष्यवाणी!
12
Phaltan Doctor: डॉक्टर तरुणीने प्रशांत बनकरला लटकलेल्या ओढणीसह पाठवला होता फोटो
13
फलटण महिला डॉक्टर मृत्यू प्रकरणात ट्विस्ट; मेहबुब शेख यांना मिळालं ३ पानी पत्र, काय लिहिलंय?
14
शेतकऱ्यांचा मोठा आक्रोश! "सुरुवात फडणवीसांनी केली, शेवट आम्ही करणार, आम्हाला जेलमध्ये टाका"
15
"मुंबईतील आंदोलन, जरांगे पाटलांवर कोर्टाच्या माध्यमातून दबाव आणला, तोच पॅटर्न..."; अजित नवलेंचा गंभीर आरोप
16
शेतकऱ्यांची एकजूट! नागपूर आंदोलनासाठी मनोज जरांगेंनी रद्द केली २ नोव्हेंबरची बैठक
17
Most Sixes in T20: टी-२० क्रिकेटमध्ये सर्वाधिक षटकार, सूर्यकुमारची टॉप-५ मध्ये एन्ट्री, हिटमॅनचा जलवा!
18
Womens World Cup 2025: दक्षिण आफ्रिकेनं उभारली विक्रमी धावसंख्या! इंग्लंडवर दुसऱ्यांदा ओढावली नामुष्की
19
'मोदीजी मतांसाठी स्टेजवर येऊन डान्सही करतील...!', बिहारमध्ये राहुल गांधींचा हल्लाबोल; 'लोकल...', म्हणत भाजपचाही पलटवार
20
ऑफिसमधील महिला मुंबईत आली, व्यवस्थापकाने जेवायला घरी नेले अन् बलात्कार केला; पत्नीने बनवला व्हिडीओ

धर्म म्हणजे काय? शास्त्र म्हणजे काय? हिंदू धर्माचा प्रमाण ग्रंथ कोणता? सविस्तर वाचा!

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 22, 2021 12:49 IST

आजच्या घडीला 'शास्त्र असतं ते' असे म्हणत जी टिंगल टवाळी केली जाते, ती योग्य नाही. केवळ कोणीतरी सांगितले म्हणून एखाद्या गोष्टीचे अंधानुकरण करणेही योग्य नाही. ते तसे का केले जाते, याची उकल आपल्या धर्मग्रंथात दिलेली आहे.

धर्माशिवाय कोणतेही राष्ट्र उभे राहू शकत नाही. प्रत्येक राष्ट्राचा स्वतंत्र धर्म आहे. भारत देशात अनेक धर्माचे लोक एकत्र नांदतात.  सर्वधर्मसमभावाचे धोरण आपल्या देशाने स्वीकारले आहे. असे असूनही अनेकदा धार्मिक तेढ निर्माण होऊन वाद विकोपाला जातात. याचे कारण हेच आहे, की धर्म या शब्दाची व्याख्याच आपण समजून घेतलेली नाही. पं. धुंडिराजशास्त्री दाते यांनी धर्मशास्त्रीय निर्णय या पुस्तकार धर्म आणि शास्त्र ही संकल्पना छान समजावून सांगितली आहे. तसेच आपल्याकडे विपुल साहित्याची उपलब्धता असल्यामुळे हिंदूंनी प्रमाण ग्रंथ कोणता मानावा, याचीही उकल त्यांनी केली आहे. कशी ते पाहू-

धर्म शास्त्र यामध्ये दोन शब्द आहेत. धर्म आणि शास्त्र! धर्माच्या अनेक व्याख्या आहेत. वस्तुत: इतक्या व्याख्यांची जरूरी नाही. एक व्याख्या उत्कृष्ट आहे. तेवढी पाहिली म्हणजे झाले. १. आपल्या आचरणातून समाजव्यवस्था उत्तम राहिली पाहिजे.२. प्रत्येक प्राणिमात्राची ऐहिक उन्नति म्हणजे विकास झाला पाहिजे. ३. सांसारिक उन्नतीबरोबर आध्यात्मिक उन्नतीही झाली पाहिजे. अशी व्यवस्था ज्यात आहे, त्याला धर्म म्हणतात. 'जगत: स्थितिकारणं प्राणिना साक्षात अभ्यदय नि:श्रेयस हेतुर्य: स: धर्म:' आद्य श्री शंकराचार्यांनी ही धर्माची व्याख्या केली आहे. या तीनही गोष्टी प्रत्येक कर्मातून साध्य झाल्या पाहिजेत अशी सर्व कर्मांची रचना केली, ती श्रुति, स्मृति, पुराणे व सूत्रे यांच्या आधाराने केली. म्हणून प्रत्येक कर्माने या तीनही गोष्टी साध्य होतात, याला धर्म म्हणतात.

शास्त्राची व्याख्यादेखील पूर्वसूरींनी स्पष्ट केली आहे. माणसाचे हित व अहित ज्यात सांगितले जाते, त्याला शास्त्र म्हणतात. हिताकरता प्रवृत्त व्हावे व अहितापासून निवृत्त व्हावे असे ज्यात सांगितले जाते, त्याला शास्त्र म्हणतात. 

आजच्या घडीला 'शास्त्र असतं ते' असे म्हणत जी टिंगल टवाळी केली जाते, ती योग्य नाही. केवळ कोणीतरी सांगितले म्हणून एखाद्या गोष्टीचे अंधानुकरण करणेही योग्य नाही. ते तसे का केले जाते, याची उकल आपल्या धर्मग्रंथात दिलेली आहे. परंतु अनेकांना प्रश्न पडतो, की नेमका कोणता धर्मग्रंथ प्रमाण मानावा, ज्यात सर्व शास्त्रांची उत्तरे एकत्र सापडू शकतील? त्यावर पं. धुंडिराजशास्त्री दाते लिहितात, शास्त्राचे जे ग्रंथ आहेत, त्या सर्वात अधिक गाजलेला व लोकप्रिय झालेला 'धर्मसिंधू' हा ग्रंथ प्रमाण मानावा. या ग्रंथात ऋषींची मूळ वचने दिली नाहीत, पण त्यांचा आशय दिला आहे व त्यावरून जे कर्तव्य केले पाहिजे त्याचीही माहिती दिली आहे. निर्णयसिंधू व पुरुषार्थ चिंतामणी या ग्रंथात ऋषींची सर्व मूळ वचने दिली आहेत. 

हे ग्रंथ अभ्यासले गेले पाहिजेत. आपल्या पूर्वजांनी सांगितलेल्या गोष्टी निराधार नसून प्रत्येक गोष्टीची शास्त्रीय उकल आहे. त्याचे पालन करणे हे आपले कर्तव्य आहे. हे कर्तव्यपालन म्हणजेच धर्म. 

'वस्तू' म्हणून 'कन्यादान' करतच नाहीत; लग्नातील हा विधी खूपच महत्त्वाचा... समजून घ्या त्यामागचा 'भावार्थ'

परंतु, आजच्या धकाधकीच्या काळात या ग्रंथांचा अभ्यास करणे शक्य नाही? मग सुरुवातीला दिलेली तीन वचने लक्षात ठेवा आणि आचरणात आणा. धर्मपालन आपोआप होईल. हीच तीन वचने सर्व धर्मातील धर्मगुरुंना अभिप्रेत आहेत. ती म्हणजे-१. आपल्या आचरणातून समाजव्यवस्था उत्तम राहिली पाहिजे.२. प्रत्येक प्राणिमात्राची ऐहिक उन्नति म्हणजे विकास झाला पाहिजे. ३. सांसारिक उन्नतीबरोबर आध्यात्मिक उन्नतीही झाली पाहिजे.