शहरं
Join us  
Trending Stories
1
मीनाताई ठाकरेंच्या पुतळ्यावर लाल रंग टाकणारा अटकेत; कृत्याची कबुली, केले धक्कादायक खुलासे
2
Asia Cup 2025 : पाकनं UAE संघाला केलं 'आउट'! Super 4 मध्ये पुन्हा सेट झाली IND vs PAK मॅच
3
ज्येष्ठ इतिहास संशोधक गजानन भास्कर मेहेंदळे यांचे निधन; ७८ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
4
“त्रिभाषा धोरण निश्चित करण्यासाठी जनमताचा कानोसा घेणार, ५ डिसेंबरला...”: डॉ.नरेंद्र जाधव
5
आता डोनाल्ड ट्रम्प यांचं नवं नाटक...! भारताला, अफगाणिस्तान-पाकिस्तानसारख्या देशांशी जोडलं, चीनचंही नाव घेतलं!
6
IND W vs AUS W 2nd ODI : स्मृतीच्या शतकी खेळीनंतर 'क्रांती'चा भेदक मारा! टीम इंडियाचा ऑस्ट्रेलियासमोर विक्रमी विजय
7
Asia Cup 2025 : दुबईत 'सिंग इज किंग' शो! PAK विरुद्ध UAE च्या ताफ्यातून सिमरनजीतचा भांगडा
8
"वेळ येणार, नद्या आणि धरणांसह संपूर्ण काश्मीर...", पहलगाम हल्ल्याचा मास्टरमाइंड सैफुल्लाह कसूरीची भारताला धमकी!
9
दिशा पाटनीच्या घरावर गोळीबार करणाऱ्या आरोपींचं एन्काउंटर, गाजियाबादमध्ये दोन्ही शूटर ठार; अशी पटवली ओळख
10
मीनाताई ठाकरे यांच्या पुतळ्याची विटंबना; CM देवेंद्र फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
11
Asia Cup 2025 : आधी टीम इंडियानं हँडशेक न केल्याची बोंब! आता UAE विरुद्धच्या मॅचआधी PAK चं नवं सोंग!
12
कुणबी प्रमाणपत्र कसे काढले जाते? १, २ नाही, १२ ते १६ कागदपत्रे आवश्यक; पाहा, पूर्ण प्रक्रिया
13
पंतप्रधान नरेंद्र मोदींना वाढदिवशी राहुल गांधींने पाठवले 'विशेष' पत्र; केली एक खास मागणी
14
"ह्या... हू... काय तुम्ही? कधी रे सुधारणार...? परत मी बोललो की...!" अजित दादांनी 'त्यांना' झाप-झाप झापलं
15
चलो दिल्ली! मनोज जरांगेंनी केली मोठी घोषणा; मराठा समाजाचे अधिवेशन घेणार, महत्त्वाचे कारण समोर
16
ह्युंदाईच्या या SUV ची किंमत ₹6 लाखही नव्हती, नव्या GST नंतर ₹86156 नं स्वस्त झाली; वरून ₹50000 चा डिस्काउंटही!
17
"क्लेमोर, वायर, पावडर... सगळं तयार होतं !" गुप्त माहितीने गडचिरोली पोलिसांनी रोखला भीषण कट
18
पाक आशिया कप स्पर्धेतून Out? सामान बसमध्ये अन् पाक खेळाडू हॉटेलमध्ये! नेमकं काय घडलं?
19
वाघाला घोरताना कधी पाहिलंय? VIDEO पाहून नेटकरी म्हणतायत, "हे तर आमच्या बाबांसारखेच..."

जी गोष्ट तुमच्या भाग्यात लिहिली आहे ती कुठूनही तुमच्यापर्यंत पोहोचणारच; वाचा ही छानशी गोष्ट!

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 3, 2023 15:51 IST

कृष्ण आणि अर्जुनाची ही सुंदर कथा आपल्याला दोन मिनिटात कर्मयोगाचा पाठ शिकवते; चांगले कर्म करत राहा, देव चांगले फळ देईलच!

एकदा कृष्ण आणि अर्जुन एका गावातून जात होते. तिथून जाताना त्यांना एक गरीब माणूस भीक मागताना दिसला. अर्जुनाने त्याला आपल्या जवळची सोन्याच्या मोहरांची थैली दिली आणि परत भीक मागू नकोस असे सांगितले. थैलीभर मोहोरांमुळे त्याचे आयुष्य नक्कीच सावरणार होते. तो आनंदात घरी निघाला. मात्र एका चोराने ते पाहिले आणि त्याचा पाठलाग करत मोहरांची थैली लंपास केली. 

गरीब माणूस स्वतःच्या नशिबाला दोष देऊ लागला. पोटापाण्यासाठी दुसऱ्या दिवशी तो परत भीक मागू लागला. अर्जुनाने विचारले, काल तर तुला मोठी भिक्षा दिली, तरी तू आज परत भीक मागतोयेस? त्याने आपबिती सांगितली. अर्जुनाला वाईट वाटले. त्याने आपल्या जवळचा बहुमूल्य मोती त्याला भेट दिला. तो आनंदात मोती घरी घेऊन आला. पण घरात अठरा विश्व दारिद्रय असल्याने तो मोती ठेवावा कुठे असा त्याला प्रश्न पडला. एका मडक्यात त्याने तो मोती ठेवला आणि तो निवांत झोपला. बायको घरी आली, तिने नवऱ्याला अनेक दिवसानंतर एवढं शांत झोपताना पाहिलं. आवाज न करता ती गाडगी मडकी घेऊन नदीवर पाणी भरायला गेली. परत येऊन पाहते तर नवरा शोधाशोध करत होता. तिच्या हातात ते मडकं पाहून म्हणाला, 'हे तू काय केल, यात मी बहुमूल्य मोती ठेवला होता. आपले नशीबच खराब! जाऊदे' 

असं म्हणत तो माणूस परत भीक मागायला नेहमीच्या ठिकाणी जात होता. अर्जुनाने त्याला पाहिले आणि त्याला राग आला. तो कृष्णाला म्हणाला आता तूच काय ते बघ. कृष्णाने त्याला दोन शिक्के दिले. तो काही न बोलता ते घेऊन निघाला. वाटेत त्याला एक कोळी दिसला. त्याच्याकडे एक मासळी जाळ्यात अडकलेली दिसली. तिची चरफड पाहून त्याला दया आली. त्याने कोळ्याला दोन शिक्के दिले आणि ती मासोळी विकत घेऊन एका कटोरीत घालून घरी घेऊन आला. पाहतो तर काय, मासळी पाण्यात टाकताच तिने गिळलेला मोती बाहेर टाकला. तो मोती पाहून गरीब माणूस 'दिसला दिसला' म्हणत ओरडू लागला. त्याच्या झोपडीबाहेरून जाणाऱ्या भुरट्या चोराला वाटले, सोन्याच्या मोहरांची थैली नेताना कोणी आपल्याला पाहिले. आपल्याला कोणी शिक्षा देण्याआधी इथून निसटून जाणे चांगले. असे म्हणत त्याने मोहरांची थैली गरिबाला सुपूर्द केली. तो तिथून पळून गेला. गरिबाला आश्चर्याचा धक्का बसला. मोती मिळाला आणि थैली पण! दुसऱ्या दिवशी त्याने आठवणीने जाऊन कृष्णाचे आभार मानले. तेव्हा अर्जुन आश्चर्यचकित झाला. त्याने कृष्णाला विचारले, आधी मी त्याला मोहरा दिल्या, मोती दिला, पण त्या गोष्टी त्याला लाभल्या नाहीत, मात्र तू दिलेले दोन शिक्के कसे काय लाभले?

कृष्णाने सांगितलं, 'आधी मिळालेल्या लाभाचा विचार तो स्वतःपुरता करत होता, दोन शिक्के मिळाले तर त्यात त्याने स्वतःचा विचार सोडून दुसऱ्याचा विचार केला. जो दुसऱ्यासाठी झटतो, त्यांचा उत्कर्ष होतो. चांगल्या कामाची पेरणी केली तर मोबदलाही चांगलाच मिळतो. म्हणून चांगले कर्म करत राहा हे मी कर्मयोगात सांगितले आहे. 

हीच बाब लक्षात ठेवून आपणही सत्कर्माची कास न सोडता आपले काम करत राहावे, असे श्रीकृष्ण सांगतात. 

टॅग्स :Inspirational Storiesप्रेरणादायक गोष्टी