शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB चा 'विराट' विजय! प्ले ऑफच्या शर्यतीत इतरांच्या जीवावर उभे, पण PBKS ला बाहेर फेकले
2
वैजयंतीमाला, चिरंजीवी यांच्यासह १३२ विजेत्यांना राष्ट्रपतींच्या हस्ते पद्म पुरस्कार प्रदान
3
गंमत-जंमत केली तर खपवून घेणार नाही, मीच बंदोबस्त करेन; अजित पवारांनी दिला सज्जड दम
4
सेनेगलमध्ये ८५ प्रवाशांनी भरलेले विमान धावपट्टीवरून घसरले, लागली आग; मोठी दुर्घटना टळली!
5
रायली रुसोने फिफ्टी मारून बॅट उंचावली, विराट कोहलीने विकेट पडताच खोड काढली
6
भारतीय प्रवाशांनी भरलेलं विमान या देशानं माघारी पाठवलं! नेमकं काय घढलं? सरकारनं सांगितलं
7
जंगल सफारीला निघाला क्रिकेटचा देव! Sachin Tendulkar ने शेअर केले जिम कॉर्बेट नॅशनल पार्कमधील निसर्गरम्य Photos
8
मुंबईची लोकसभा निवडणूक आता भारत-पाकिस्तान लढाई झालेली आहे; भाजपाचे मविआवर टीकास्त्र
9
स्ट्राइक रेटवरून विराट कोहलीची अप्रत्यक्षपणे पुन्हा गावस्करांना कोपरखळी, म्हणाला...  
10
मतदान झालं, बारामतीत लीड कोणाला?; सुनेत्रा पवारांच्या विजयाबद्दल अजित पवार म्हणाले...
11
विराट कोहलीला शतकाची हुलकावणी, पण RCB ची आतषबाजी; PBKS समोर २४२ धावांचे लक्ष्य
12
यशाची गॅरंटी; 'पुष्य नक्षत्र' असेल PM मोदींसाठी खास, 'या' दिवशी उमेदवारी अर्ज भरणार...
13
शिवसेना नेते सुरेशदादा जैन यांचा उद्धवसेनेच्या प्राथमिक सदस्यत्वाचा राजीनामा
14
"खलिस्तानवर नियंत्रण ठेवण्याची गरज", ब्रिटनच्या NSA सोबत अजित डोवालांची चर्चा
15
ही निवडणूक राहुल गांधी vs नरेंद्र मोदी अन् जिहाद विरुद्ध...; अमित शाह यांचा मोठा हल्ला
16
PBKS vs RCB सामन्यात गारांचा पाऊस! सामना झालाच नाही तर कोण होईल 'गार'? चाहत्यांची वाढलीय चिंता
17
"अदानी, अंबानींची चौकशी करा; सत्य बाहेर येईल"; पंतप्रधान मोदींच्या टीकेवर काँग्रेसकडून पलटवार
18
धक्कादायक! चार दिवसांत दोन मातांनी गमावले प्राण, अहेरीत आरोग्यसेवेचा बोजवारा
19
तुफान राडा अन् लाथा-बुक्क्यांची जुगलबंदी! बसच्या दरवाज्यात दोन महिलांमध्ये तुंबळ हाणामारी (Video)
20
अब की बार, मतदान जोरदार!... कोल्हापुरातील वाढलेला टक्का कुणाला देणार धक्का? 

साधनेच्या वेळी मन एकाग्र होण्यासाठी काय करावे? मन एकाग्र झाल्यामुळे काय प्राप्त होते, वाचा!

By ऑनलाइन लोकमत | Published: October 21, 2021 2:50 PM

साधनेच्या काळात प्रारंभी मनामध्ये एकाच वेळी शेकडो विचार उद्भवतात. त्यानंतर मन हव्या त्या गोष्टींवर केंद्रित होऊ लागते. 

साधना सफल होण्यासाठी मनाची एकाग्रता व ती साधण्यासाठी साधना असा बीजांकुरन्याय साधना आणि मनाची एकाग्रता याबाबतीत लागू पडतो. साधना करताना प्रथम देह स्थिर ठेवावा लागतो. त्यानंतर इंद्रिये स्थिर ठेवावी लागतात. त्यानंतर इंद्रियांच्या मागून सैरभैर धावणारे मन हळू हळू स्थिर होऊ लागते. 

साधनेचे पूर्ण यश पदरात पाडण्यासाठी साधकाने प्रथम आहार व आचारशुद्धी करावी. पूर्ण सात्विक आहार घेऊन शुद्ध आचार ठेवणारा साधक हळूहळू निश्चित प्रगतावस्थेत जातो. ज्यावेळी अल्प कष्टात पुष्कळ धनप्राप्ती, स्त्रीविषयक विचार, दुसऱ्याचा उत्कर्ष सहन न होणे, मृगजळवत सुखाच्या मागे धावणे, विविध समस्यांचे कर्तृत्त्व स्वत:कडे घेऊन त्यावर उपाय शोधत बसणे, परमार्थाला उपयुक्त नसणाNया वस्तूंची प्रिती बाळगणे अशा गोष्टी जोपासल्या जाताता तेव्हा मनाचा कार्यव्याप मोठा असल्यामुळे त्याला स्थिर होण्यासाठी सवडच सापडत नाही. कार्यव्याप कमी करण्यासाठी वरील गोष्टी सोडून देण्याचा सराव केला पाहिजे. 

इकडे साधना व तिकडे सराव अशा दोन्ही गोष्टी चालू झाल्यावर हळूहळू मनाची चंचलता नष्ट होऊ लागते. साधनेच्या काळात प्रारंभी मनामध्ये एकाच वेळी शेकडो विचार उद्भवतात. त्यांच्यावर नियंत्रण घालण्यापेक्षा ते तसेच उद्भवू द्यावेत पण त्यांच्याकडे लक्ष देऊ नये. असे करता करता उद्भवलेले विचार दुसऱ्या खेपेस सौम्य होतात व अशा क्रमाने त्यांची तीव्रता नष्ट होते. त्यानंतर मन हव्या त्या गोष्टींवर केंद्रित होऊ लागते. 

मनाला एकावेळी एकच विचार करण्याची सवय लागते. अशा वेळी मन अस्थिर झाले, तरी त्याला चिंतनाची व नामस्मरणाची सवय लागल्याने ते चटकन स्थिर होते. साधनेचा गाभा म्हणजे चिंतन मनन! प्रारंभीच्या अवस्थेत ते शक्य झाले नाही, तरी रोजच्या सरावाने या अवस्थेपर्यंत पोहोचून मनुष्य सच्चिदानंद प्राप्त करू शकतो.