शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

महात्मा गांधीजींच्या हातून बालपणी कोणती चूक घडली आणि त्यांनी ती कशी सुधारली? वाचा!

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 29, 2021 08:00 IST

गांधीजींच्या ठायी असलेल्या या विनयशील वृत्तीमुळेच ते महात्मा झाले.

महात्मा गांधींच्या मातोश्री अतिशय धार्मिक वृत्तीच्या होत्या. त्या देवपूजा केल्याशिवाय पाणीदेखील पीत नसत. त्या नेहमी व्रतवैकल्यात मग्न राहत असत. त्याचप्रमाणे त्यांचे वडीलही सत्यवादी, धीट व उदार होते. ते न्यायी म्हणून त्यांचा मोठा नावलौकिक होता. अशा पुण्यशील जोडप्याच्या पोटी २ ऑक्टोबर १८६९ रोजी मोहनदास करमचंद गांधी यांचा जन्म झाला. पालक सात्विक वृत्तीचे असल्याने गांधीजींमध्ये बालपणापासूनच सद्गुणांची वाढ होत गेली. मात्र, गांधीजी जेव्हा शाळेत जाऊ लागले, तेव्हा त्यांना वाईट संगत लागली. 

शालेय वयातच काही मुलांच्या संगतीने ते बिडी, सिगारेट ओढू लागले. त्यात उद्देश एवढाच, की तोंडातून धूर बाहेर काढल्यास त्यांना मोठी मजा वाटे. पैशाशिवाय विडी, सिगारेट मिळत नाही. पैसा तर जवळ नाही म्हणून चुलत्याने टाकलेली सिगारेटची थोटके ते ओढू लागले. पुढे पुढे ती थोटकेही त्यांना मिळेनाशी झाली. एकदा सिगरेट ओढण्याची चटक आली तेव्हा त्यांनी गड्याच्या खिशातले पैसे चोरले. त्यासमयी त्यांचे वय नऊ वर्षांचे होते. त्याही पुढे जाऊन मित्रांच्या आग्रहाखातर त्यांनी मद्यपान आणि मांसाहारदेखील करून पाहिला होता. 

सगळी मौज मजा झाल्यावर आपण केलेल्या कृत्याची गांधीजींच्या मनाला टोचणी लागली. आई वडिलांना ही गोष्ट जर समजली तर त्यांना मरणप्राय दु:ख होईल असे गांधीजींना सारखे वाटत होते. आपण जे सेवन केले, ती एक आपल्या हातून घोडचूक झाली, असे त्यांना सातत्याने वाटू लागले. आपल्या चुकीची कबुली द्यावी आणि या दडपणातून मुक्त व्हावे, असे गांधीजींना सतत वाटत राही. तरीदेखील तो प्रसंग आला, तर टाळणे त्यांना मोठे कठीण जात असे. 

आपल्या हातून कळत नकळत कितीतरी पापं घडली. आपण दारु, मांस, बिडी, सिगारेट ओढली, चोरी केली. गुणी आईबापाच्या पोटी जन्म घेऊन आपण चुकीचा मार्ग पत्करला ही देवाला न आवडणाऱ्या गोष्टी केल्या. कोणतीही गोष्ट आईवडीलांपासून लपवून ठेवणे ही कपट वृत्ती आहे. देवाला तर निष्कपटपणा आवडतो, असे थोर लोक सांगतात. तेव्हा आपण कपटवृत्तीचा जर त्याग केला नाही, तर आपणापासून देव कायमचा दुरावेल. या विचाराने आपण आतापर्यंत जे काही केले ते सर्व काही लिहून वडिलांच्या हाती कागद द्यायचा आणि कलेल्या अपराधाबद्दल क्षमा मागायची आणि पुन्हा ही चूक कधीच करणार नाही असे कबुल करायचे त्यांनी ठरवले. 

त्याप्रमाणे त्यांनी सर्व अपराध लिहून एका सकाळी वडिलांच्या हाती लिहिलेला कागद दिला. त्यादरम्यान त्यांचे वडील वरचेवर आजारी असल्याने पलंगावर पडून राहत असत. हा कागद वाचल्यावर वडील रागावतील, आपल्याला मारतील, खूप ओरडतील, असे गांधीजींना वाटले होते. परंतु झाले उलटच! वडिलांच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले. त्यांनी सर्व काही वाचून कागद फाडून टाकला आणि लहानग्या मोहनला मायेने जवळ घेतले. ते पाहून गांधीजींचे डोळे पाणावले आणि त्यांच्याही डोळ्यातून पश्चात्तापाचे अश्रू वाहू लागले. त्यांनी वडिलांना त्याक्षणी वचन दिले, अभक्ष्य भक्षण करणार नाही आणि अपेयपान करणार नाही. देवाची आणि देशाची सेवा करेन. वडिलांना दिलेला शब्द गांधीजींनी आजन्म पाळला. परदेशात शिक्षणार्थ वास्तव्य असतानाही ते क्षणभरही मोहाला भुलले नाहीत. त्यांनी आपले ब्रीद पाळले. त्यांच्या ठायी असलेल्या अशाच लहान मोठ्या सवयींमुळे, प्रामाणिकपणामुळे, राष्ट्रभक्तीमुळे ते महात्मा झाले. 

टॅग्स :Mahatma Gandhiमहात्मा गांधी