शहरं
Join us  
Trending Stories
1
"मुंबईत जो येईल त्याचं स्वागत करू..."; निशिकांत दुबेंबाबत देवेंद्र फडणवीस काय म्हणाले?
2
रॉयल एनफिल्डने चीनचे रेअर अर्थ मटेरिअल टाळले! नवीन धातू वापरला, ऑटो कंपन्या चकीत झाल्या...
3
‘झुकेगा नही’! ट्रम्प यांची धमकी, पण सरकार ठाम; अमेरिकेला भारताचं स्वतंत्र धोरण का खुपतंय?
4
ऑपरेशन महादेवमध्ये मारले गेलेले सगळे दहशतवादी पाकिस्तानीच! 'त्या' एका पुराव्याने समोर आली कुंडली
5
IND vs ENG: ३५ धावा की ४ गडी... पाचवी कसोटी निर्णायक वळणावर, 'हा' घटक भारतासाठी ठरेल 'गेमचेंजर'
6
ट्रम्प यांच्यासोबतची मैत्री तुटल्यानंतर मस्क मोठ्या अडचणीत; टेस्लाला द्यावे लागणार तब्बल २ हजार कोटी
7
ट्रम्पच्या जिगरी दोस्तावर पाकिस्तान का चिडला? पोस्ट लिहीत व्यक्त केला राग! शाहबाज शरीफ म्हणाले... 
8
"सचिन माझ्या मुलाचा बाप...", महिलेने दाखवला DNA रिपोर्ट; राजा रघुवंशीच्या घरात भलताच वाद
9
हृदयस्पर्शी! बाळासाठी वडील झाले वासुदेव, पुराच्या पाण्यातून काढली वाट, भावुक करणारा Video
10
शिवसेनेचा बाप मीच आहे, भाजपा आमदार परिणय फुकेंचं वादग्रस्त विधान; शिंदेसेना संतप्त
11
Shravan 2025: शास्त्रानुसार, संसारी व्यक्तीने रुद्राक्षाची जपमाळ ओढावी, पण गळ्यात घालू नये!
12
रक्षाबंधन नेमके कधी आहे? शुभ मुहूर्त कोणता? पाहा, महत्त्व, महात्म्य अन् काही मान्यता
13
नोकरीसाठी विदेशात जायचंय तर पत्नीला भारतात ठेवा, अटीविरुद्ध ‘तो’ सुप्रीम कोर्टात
14
७१% चं रेकॉर्डब्रेकिंग इनक्रिमेंट! 'हे' आहेत भारतातील IT क्षेत्रातील सर्वाधिक कमाई करणारे CEO; मिळणार १५४ कोटी सॅलरी
15
४४ भूखंड, एक किलो सोने, २ किलो चांदी...! आरटीओ अधिकाऱ्याची संपत्ती एवढी की पाहून अधिकारी थक्क झाले...
16
वय वर्ष ८०, तरीही फिट! दिलीप प्रभावळकरांना स्वत:च्या फिटनेसचं आश्चर्य, म्हणाले- "एकदा ५ कुत्रे माझ्या लागले तेव्हा..."
17
त्याच पाकिस्तानने सणसणीत वाजवली! इराणच्या अण्वस्त्र कार्यक्रमाला दिला पाठिंबा, अमेरिका...
18
NSDL IPO Allotment Status: NSDL आयपीओला तुफान प्रतिसाद; लेटेस्ट GMP सह जाणून घ्या कसं चेक कराल अलॉटमेंट स्टेटस?
19
विराट कोहलीसोबतच्या अफेअरच्या चर्चांवर तमन्नानं अखेर सत्य सांगितलं, म्हणाली...
20
झारखंडचे माजी मुख्यमंत्री शिबू सोरेन यांचे निधन; किडनीच्या आजाराने होते त्रस्त

महात्मा गांधीजींच्या हातून बालपणी कोणती चूक घडली आणि त्यांनी ती कशी सुधारली? वाचा!

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 29, 2021 08:00 IST

गांधीजींच्या ठायी असलेल्या या विनयशील वृत्तीमुळेच ते महात्मा झाले.

महात्मा गांधींच्या मातोश्री अतिशय धार्मिक वृत्तीच्या होत्या. त्या देवपूजा केल्याशिवाय पाणीदेखील पीत नसत. त्या नेहमी व्रतवैकल्यात मग्न राहत असत. त्याचप्रमाणे त्यांचे वडीलही सत्यवादी, धीट व उदार होते. ते न्यायी म्हणून त्यांचा मोठा नावलौकिक होता. अशा पुण्यशील जोडप्याच्या पोटी २ ऑक्टोबर १८६९ रोजी मोहनदास करमचंद गांधी यांचा जन्म झाला. पालक सात्विक वृत्तीचे असल्याने गांधीजींमध्ये बालपणापासूनच सद्गुणांची वाढ होत गेली. मात्र, गांधीजी जेव्हा शाळेत जाऊ लागले, तेव्हा त्यांना वाईट संगत लागली. 

शालेय वयातच काही मुलांच्या संगतीने ते बिडी, सिगारेट ओढू लागले. त्यात उद्देश एवढाच, की तोंडातून धूर बाहेर काढल्यास त्यांना मोठी मजा वाटे. पैशाशिवाय विडी, सिगारेट मिळत नाही. पैसा तर जवळ नाही म्हणून चुलत्याने टाकलेली सिगारेटची थोटके ते ओढू लागले. पुढे पुढे ती थोटकेही त्यांना मिळेनाशी झाली. एकदा सिगरेट ओढण्याची चटक आली तेव्हा त्यांनी गड्याच्या खिशातले पैसे चोरले. त्यासमयी त्यांचे वय नऊ वर्षांचे होते. त्याही पुढे जाऊन मित्रांच्या आग्रहाखातर त्यांनी मद्यपान आणि मांसाहारदेखील करून पाहिला होता. 

सगळी मौज मजा झाल्यावर आपण केलेल्या कृत्याची गांधीजींच्या मनाला टोचणी लागली. आई वडिलांना ही गोष्ट जर समजली तर त्यांना मरणप्राय दु:ख होईल असे गांधीजींना सारखे वाटत होते. आपण जे सेवन केले, ती एक आपल्या हातून घोडचूक झाली, असे त्यांना सातत्याने वाटू लागले. आपल्या चुकीची कबुली द्यावी आणि या दडपणातून मुक्त व्हावे, असे गांधीजींना सतत वाटत राही. तरीदेखील तो प्रसंग आला, तर टाळणे त्यांना मोठे कठीण जात असे. 

आपल्या हातून कळत नकळत कितीतरी पापं घडली. आपण दारु, मांस, बिडी, सिगारेट ओढली, चोरी केली. गुणी आईबापाच्या पोटी जन्म घेऊन आपण चुकीचा मार्ग पत्करला ही देवाला न आवडणाऱ्या गोष्टी केल्या. कोणतीही गोष्ट आईवडीलांपासून लपवून ठेवणे ही कपट वृत्ती आहे. देवाला तर निष्कपटपणा आवडतो, असे थोर लोक सांगतात. तेव्हा आपण कपटवृत्तीचा जर त्याग केला नाही, तर आपणापासून देव कायमचा दुरावेल. या विचाराने आपण आतापर्यंत जे काही केले ते सर्व काही लिहून वडिलांच्या हाती कागद द्यायचा आणि कलेल्या अपराधाबद्दल क्षमा मागायची आणि पुन्हा ही चूक कधीच करणार नाही असे कबुल करायचे त्यांनी ठरवले. 

त्याप्रमाणे त्यांनी सर्व अपराध लिहून एका सकाळी वडिलांच्या हाती लिहिलेला कागद दिला. त्यादरम्यान त्यांचे वडील वरचेवर आजारी असल्याने पलंगावर पडून राहत असत. हा कागद वाचल्यावर वडील रागावतील, आपल्याला मारतील, खूप ओरडतील, असे गांधीजींना वाटले होते. परंतु झाले उलटच! वडिलांच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले. त्यांनी सर्व काही वाचून कागद फाडून टाकला आणि लहानग्या मोहनला मायेने जवळ घेतले. ते पाहून गांधीजींचे डोळे पाणावले आणि त्यांच्याही डोळ्यातून पश्चात्तापाचे अश्रू वाहू लागले. त्यांनी वडिलांना त्याक्षणी वचन दिले, अभक्ष्य भक्षण करणार नाही आणि अपेयपान करणार नाही. देवाची आणि देशाची सेवा करेन. वडिलांना दिलेला शब्द गांधीजींनी आजन्म पाळला. परदेशात शिक्षणार्थ वास्तव्य असतानाही ते क्षणभरही मोहाला भुलले नाहीत. त्यांनी आपले ब्रीद पाळले. त्यांच्या ठायी असलेल्या अशाच लहान मोठ्या सवयींमुळे, प्रामाणिकपणामुळे, राष्ट्रभक्तीमुळे ते महात्मा झाले. 

टॅग्स :Mahatma Gandhiमहात्मा गांधी