शहरं
Join us  
Trending Stories
1
Delhi Blast : शू बॉम्बर, रॉकेट, ड्रोन... दिल्ली स्फोटातील उमरने हमाससारख्या भयंकर हल्ल्याचा रचलेला कट?
2
धक्कादायक! धावत्या अँम्बुलन्सला भीषण आग, नवजात बालकासह चार जणांचा होरपळून मृत्यू
3
"साहेबांसाठी काहीतरी करा"; वॉशरूममध्ये लाच मागितली, पैसे मिळताच WhatsApp कॉल केला अन् अडकले न्यायमूर्ती
4
बिहार निकालावरील चर्चेमुळे गेला जीव, २२ वर्षीय भाच्याचा दोन मामांनीच काढला काटा
5
गर्भात जुळ्या मुलांचा मृत्यू, उपचारादरम्यान आईचा गेला जीव; दुःखी झालेल्या पतीने स्वत:ला संपवलं
6
सुमार मराठीवरून झाल्या ट्रोल, भाजपाच्या नगराध्यक्षपदाच्या 'त्या' महिला उमेदवार कोण? व्हिडीओ होतोय व्हायरल
7
Delhi Car Blast: अल-फलाह विद्यापीठाविरुद्ध EDची कारवाई, ओखला-जामिया नगरसह २५ ठिकाणी छापे
8
भर कॉन्सर्टमध्ये पाकिस्तानी सिंगरने फडकावला भारताचा झेंडा, ट्रोलिंग झाल्यावर म्हणतो- "मी हे पुन्हा करेन, कारण..."
9
"त्याने माझ्या पाठीवरून हात फिरवला आणि...", गिरिजा ओकला आलेला लोकल ट्रेनमध्ये धक्कादायक अनुभव
10
रांगेत उभे राहू नका! पोस्ट ऑफिसमध्ये जा आणि कागदपत्रांशिवाय मिनिटांत नंबर अपडेट करा
11
दत्त जयंती २०२५: गुरुचरित्र वाचण्यावर स्त्रियांना बंदी का? सद्गुरू टेंबे स्वामींनी दिले आहे स्पष्टीकरण!
12
Mumbai: अनैतिक संबंधातून बाळाचा जन्म, डॉक्टरांकडून ५ लाखांत विकण्याचा प्रयत्न, ५ जणांवर गुन्हा दाखल
13
दोन PAN Card ठेवल्यास ₹१०,००० दंड आणि तुरुंगवासाची शिक्षा; 'या' सोप्या पद्धतीने सरेंडर करा दुसरे कार्ड!
14
नवी मुंबईत शिवरायांचा पुतळा पुन्हा झाकला; नुकतेच अमित ठाकरेंनी आंदोलन करत केले होते अनावरण
15
श्रीमंतीचा दिखावा, ६ गर्लफ्रेंड पटवल्या, कायम जंगलात राहायचा; अखेर पोलिसांनी 'त्याला' अटक केली
16
शेअर बाजारातील 'जॅकपॉट' स्टॉक्स : १० महिन्यांत ₹१०००० चे झाले ₹५ लाख; पैशांचा वर्षाव करताहेत ‘हे’ ४ स्टॅाक
17
श्रीकांत शिंदे यांना भाजपाचा मोठा धक्का; कल्याण डोंबिवलीत शिंदेसेनेच्या नेत्यांचा भाजपात प्रवेश
18
Mumbai: मुंबईत कांदा स्वस्त होणार की महागणार? पावसामुळे मोठे नुकसान; उत्पादनाचा अंदाज येईना
19
धक्कादायक! ३४ वर्षांच्या प्रसिद्ध गायकाचं निधन, समोर आलं हादरवून सोडणारं कारण
20
Mumbai: शाळेच्या कॅन्टीनमधील समोसा खाल्ल्याने २० विद्यार्थ्यांना विषबाधा, तेलात कापूर पडल्याची माहिती
Daily Top 2Weekly Top 5

महात्मा गांधीजींच्या हातून बालपणी कोणती चूक घडली आणि त्यांनी ती कशी सुधारली? वाचा!

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 29, 2021 08:00 IST

गांधीजींच्या ठायी असलेल्या या विनयशील वृत्तीमुळेच ते महात्मा झाले.

महात्मा गांधींच्या मातोश्री अतिशय धार्मिक वृत्तीच्या होत्या. त्या देवपूजा केल्याशिवाय पाणीदेखील पीत नसत. त्या नेहमी व्रतवैकल्यात मग्न राहत असत. त्याचप्रमाणे त्यांचे वडीलही सत्यवादी, धीट व उदार होते. ते न्यायी म्हणून त्यांचा मोठा नावलौकिक होता. अशा पुण्यशील जोडप्याच्या पोटी २ ऑक्टोबर १८६९ रोजी मोहनदास करमचंद गांधी यांचा जन्म झाला. पालक सात्विक वृत्तीचे असल्याने गांधीजींमध्ये बालपणापासूनच सद्गुणांची वाढ होत गेली. मात्र, गांधीजी जेव्हा शाळेत जाऊ लागले, तेव्हा त्यांना वाईट संगत लागली. 

शालेय वयातच काही मुलांच्या संगतीने ते बिडी, सिगारेट ओढू लागले. त्यात उद्देश एवढाच, की तोंडातून धूर बाहेर काढल्यास त्यांना मोठी मजा वाटे. पैशाशिवाय विडी, सिगारेट मिळत नाही. पैसा तर जवळ नाही म्हणून चुलत्याने टाकलेली सिगारेटची थोटके ते ओढू लागले. पुढे पुढे ती थोटकेही त्यांना मिळेनाशी झाली. एकदा सिगरेट ओढण्याची चटक आली तेव्हा त्यांनी गड्याच्या खिशातले पैसे चोरले. त्यासमयी त्यांचे वय नऊ वर्षांचे होते. त्याही पुढे जाऊन मित्रांच्या आग्रहाखातर त्यांनी मद्यपान आणि मांसाहारदेखील करून पाहिला होता. 

सगळी मौज मजा झाल्यावर आपण केलेल्या कृत्याची गांधीजींच्या मनाला टोचणी लागली. आई वडिलांना ही गोष्ट जर समजली तर त्यांना मरणप्राय दु:ख होईल असे गांधीजींना सारखे वाटत होते. आपण जे सेवन केले, ती एक आपल्या हातून घोडचूक झाली, असे त्यांना सातत्याने वाटू लागले. आपल्या चुकीची कबुली द्यावी आणि या दडपणातून मुक्त व्हावे, असे गांधीजींना सतत वाटत राही. तरीदेखील तो प्रसंग आला, तर टाळणे त्यांना मोठे कठीण जात असे. 

आपल्या हातून कळत नकळत कितीतरी पापं घडली. आपण दारु, मांस, बिडी, सिगारेट ओढली, चोरी केली. गुणी आईबापाच्या पोटी जन्म घेऊन आपण चुकीचा मार्ग पत्करला ही देवाला न आवडणाऱ्या गोष्टी केल्या. कोणतीही गोष्ट आईवडीलांपासून लपवून ठेवणे ही कपट वृत्ती आहे. देवाला तर निष्कपटपणा आवडतो, असे थोर लोक सांगतात. तेव्हा आपण कपटवृत्तीचा जर त्याग केला नाही, तर आपणापासून देव कायमचा दुरावेल. या विचाराने आपण आतापर्यंत जे काही केले ते सर्व काही लिहून वडिलांच्या हाती कागद द्यायचा आणि कलेल्या अपराधाबद्दल क्षमा मागायची आणि पुन्हा ही चूक कधीच करणार नाही असे कबुल करायचे त्यांनी ठरवले. 

त्याप्रमाणे त्यांनी सर्व अपराध लिहून एका सकाळी वडिलांच्या हाती लिहिलेला कागद दिला. त्यादरम्यान त्यांचे वडील वरचेवर आजारी असल्याने पलंगावर पडून राहत असत. हा कागद वाचल्यावर वडील रागावतील, आपल्याला मारतील, खूप ओरडतील, असे गांधीजींना वाटले होते. परंतु झाले उलटच! वडिलांच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले. त्यांनी सर्व काही वाचून कागद फाडून टाकला आणि लहानग्या मोहनला मायेने जवळ घेतले. ते पाहून गांधीजींचे डोळे पाणावले आणि त्यांच्याही डोळ्यातून पश्चात्तापाचे अश्रू वाहू लागले. त्यांनी वडिलांना त्याक्षणी वचन दिले, अभक्ष्य भक्षण करणार नाही आणि अपेयपान करणार नाही. देवाची आणि देशाची सेवा करेन. वडिलांना दिलेला शब्द गांधीजींनी आजन्म पाळला. परदेशात शिक्षणार्थ वास्तव्य असतानाही ते क्षणभरही मोहाला भुलले नाहीत. त्यांनी आपले ब्रीद पाळले. त्यांच्या ठायी असलेल्या अशाच लहान मोठ्या सवयींमुळे, प्रामाणिकपणामुळे, राष्ट्रभक्तीमुळे ते महात्मा झाले. 

टॅग्स :Mahatma Gandhiमहात्मा गांधी