शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

गरुड पुराणातील नियम आपण पाळतो, पण हे पुराण कधी, कसे व कोणी निर्माण केले ते जाणून घ्या!

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 27, 2021 15:04 IST

ब्रह्मदेवाने समस्त शास्त्राच्या आधी पुराणांची निर्मिती केली. कारण जगात सर्वश्रेष्ठ ज्ञान देणारी पुराणे हीच खरी मार्गदर्शक आहेत. वाचा त्याची उत्पती कथा!

अठरा पुराणात भारतीय संस्कृति आणि धर्मतत्त्वाचे सामान्य जनांसाठी विद्वान महर्षींनी संकलन केले आहे. निती, सदाचार आणि स्वातंत्र्य यांचे शिक्षण देणारे आसेतु हिमाचल शिक्षक म्हणजे पुराणे आहेत.

पुराणां सर्व शास्त्राणां प्रथमं ब्रह्मणा स्मृतम्उत्तम सर्वलोकानां सर्व ज्ञानोपदकम् ।।

म्हणजे ब्रह्मदेवाने समस्त शास्त्राच्या आधी पुराणांची निर्मिती केली. कारण जगात सर्वश्रेष्ठ ज्ञान देणारी पुराणे हीच खरी मार्गदर्शक आहेत. ही पुराणे मुळात ब्रह्मदेवाने निर्माण केली असे म्हणतात आणि व्यासांनी त्यांना ग्रंथरूप दिले.

श्री गरुड पुराण हे सामान्य जनतेच्या उपयोगी पडणाऱ्या अनेकविध गोष्टींच्या माहितीचे हे प्राचीन संकलन होय. ज्ञानी आणि सत्यव्रती व्यक्ती कर्मकांडाशिवाय परलोकात उच्च गती प्राप्त करू शकते, याचीही वर्णने अनेक कथा व स्तोत्राद्वारा या पुराणात आली आहेत. 

गरुड पुराणाची उत्पत्ती कथा : 

मुनींनी विचारले, महामुनी व्यासांनी आपल्याला गरुडपुराण कसे सांगितले ते सांगा. सूत म्हणाले, `एकदा मी मुनींबरोबर बद्रिकाश्रमाला गेलो होतो. तेथे व्यास मुनी मला भेटले व तेथे मी त्यांना यासंबंधी विचारले होते. त्यावेळी त्यांनी मला हे गरुड पुराण सांगितले होते. व्यास मला म्हणाले होते की, एकदा ते आणि नारद दक्ष आणि भृगु इ सर्वजण ब्रह्मदेवाकडे गेले होते. त्यावेळी ब्रह्मदेवाने आम्हा सर्वांना हे गरुड पुराण सांगितले.

त्यांनी सांगितले, की ते एकदा कैलास पर्वतावर गेले असता श्रीशंकर कोणत्या तरी देवाचे ध्यान करीत होते. ते कोणत्या देवाचे ध्यान करतात असे आम्ही विचारले असता, त्यांनी सांगितले, की मी भगवान विष्णूंचे ध्यान करत आहे.

भगवान विष्णु हा देहरहित आहे. अग्नि त्याचे मुख आहे. आकाश त्याची नाभी आहे. जमीन त्याचे पाय आहेत. चंद्र सूर्य त्याचे नेत्र आहेत. अशा विष्णूचे मी ध्यान करतो, असे श्री शंकरानी आम्हाला कथन केले.

हे तिन्ही लोक त्यांच्या उदरात आहेत. सर्व दिशा म्हणजे त्यांचे बाहू आहेत. पवन त्यांचा उच्छ्वास आहे. मेघ त्यांचे केस आहे. नद्या त्यांच्या अंगावरील वाहिन्या आहेत. अशा विष्णूंचे मी ध्यान करतो. 

असा हा विष्णु काळालाही भेदून जाणाराआहे. यज्ञापासून, सत्यापासून, असत्यापासून तो वेगळा आहे. ज्याचा आदिकाल नाही असा हा रूद्र देव श्वेत दीपात राहतो. त्याच्या भेटीला सर्वजण गेले असता, त्यांनी त्याला प्रणाम केला. 

भगवान हरी रुद्राला म्हणाले, `मानवाने शुद्ध आचारव्रत नियम पाळले, तर मी त्यांच्यावर प्रसन्न होतो. सर्व प्रथम गरुडपक्ष्याने भूतलावर माझी तपश्चर्या केली होती. त्याच्यावर मी प्रसन्न झालो होतो. 

तो म्हणाला, 'माझी आई विनता हिला नागांनी दासी केले आहे. आपण मला असा वर द्या की, मी देवांना जिंकून अमृत घेऊन येईन आणि आईची सुटका करीन. त्याप्रमाणे आपण मला आपल्या सेवेची संधी द्यावी.

विष्णू म्हणाले, 'हे गरुडा, जे काही तू मागितले आहेस त्याप्रमाणे होईल. तुझ्या नावाने लोक पुराण रचतील.' अशा प्रकारे श्रीविष्णूंनी गरुडाला वर दिल्याने त्याने विष्णूंना प्रणाम केला व कालांतराने त्याच्या भक्तीचे प्रतीक म्हणून गरुडपुराण निर्माण झाले.