शहरं
Join us  
Trending Stories
1
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
2
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
3
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
4
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
5
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
6
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
7
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
8
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
9
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
10
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
11
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
12
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
13
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
14
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
15
Jasprit Bumrah Unwanted Records : बुमराहच्या नावे लाजिरवाणी 'हॅटट्रिक'! ८ वर्षांनी आली 'ही' वेळ
16
अमेरिका, इस्रायलचे हल्ले सुरु झाले, इराणमध्ये ३००० भारतीय विद्यार्थी होते...; भारतातील राजदुतांनी पै-पाहुण्यांना, ओळखीच्यांना फोन करायला सुरुवात केली...
17
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर केंद्र सरकारचा मोठा निर्णय; LPG पुरवठ्याबाबत नवा फॉर्म्युला तयार
18
ही कसली सीझफायर? लावन रिफायनरीनंतर सिर्री बेटही स्फोटांनी हादरले; तेलाच्या साठ्यांवर हल्ले?
19
आगीतून फुफाट्यात! बाईक चोरली अन् ट्रॅफिक नियमही मोडला; चोराचा फोटो पोहोचला मालकाच्या मोबाईलवर
20
Tech Tips: कोणालाही न कळता कॉल रेकॉर्डिंग कसे करावे? ९९% लोकांना माहित नाही ही सोपी ट्रिक!
Daily Top 2Weekly Top 5

शंभर वर्षं निरोगी आयुष्य जगायचे आहे? मग 'ही' शास्त्रशुद्ध आहारपद्धत आजपासूनच सुरू करा!

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 30, 2024 13:00 IST

food habit: आपण जसा आहार घेतो तशी आपली प्रकृती बनते; म्हणून संतुलित आहार कसा असावा याची शास्त्रशुद्ध पद्धत जाणून घ्या.

आपण काय खावे आणि काय खाऊ नये, याबद्दल आपल्यापेक्षा लोकांनाच आपल्या स्वाथ्याची काळजी दिसून येते. जो उठतो, तो वेगवेगळे सल्ले देतो. इंटरनेटवर तर सगळाच भुलभुलैया आहे. कोणी दोन वेळेस जेवणाचा सल्ला देतो, तर कोणी दर दोन तासांनी! कोणी म्हणतो पोळी खाऊ नका, कोणी म्हणतो भात खाऊ नका! सकाळी उठल्यावर अंश पोटी खाण्याच्या पदार्थांची यादी काढली, तर ती एवढी मोठी निघेल, की ते खाल्यानंतर दिवसभर जेवायची वेळच येणार नाही. 

अशीच सगळी माहिती वाचून गोंधळलेल्या एक मावशी डॉक्टरांकडे गेल्या. 'काही केल्या माझे वजन कमी होत नाही, त्यावर काहीतरी उपाय सांगा डॉक्टर', असे म्हणाल्या.

डॉक्टरांनी त्यांना दहा बारा प्रकारच्या रंगीबेरंगी गोळ्या दिल्या. गोळ्यांची पुडी मावशींच्या हाती दिली. मावशींचा पुढचा प्रश्न तयार होता. त्या म्हणाल्या, 'डॉक्टर या गोळ्या जेवणाआधी घ्यायच्या, की जेवणानंतर?'डॉक्टर म्हणाले, `मावशी, या गोळ्या जेवणाआधी घ्यायच्या नाहीत, किंवा जेवणानंतरही घ्यायच्या नाहीत...'`मऽऽऽग?' मावशींनी आ वासला.'या गोळ्या जेवणा`ऐवजी' घ्या...!'

या प्रसंगातला गमतीचा भाग सोडा, परंतु खरोखरच, आहाराचे व्यवस्थापन उचित वेळी झाले नाही, तर अन्नापेक्षा जास्त गोळ्यांचा भडीमार शरीरावर होऊ लागतो. म्हणून शरीराची गरज ओळखून त्याला उचित वेळी अन्नपुरवठा केला पाहिजे. ज्यामुळे अन्नाचे रुपांतर आळसात किंवा मेदात न होता ऊर्जेत होईल. याबद्दल आयुर्वेद सांगते,

आयुष्यं भोजनं जीर्णे वेगानां चाविधारण्ब्रह्मचर्यमहिंसान च साहसानां च वर्जनम्

सुश्रुतसंहितेतीतल या श्लोकानुसार, आधी जेवलेले अन्न पूर्ण जिरल्यावरच पुन्हा जेवावे. केवळ जेवणाची वेळ झाली म्हणून किंवा वेळ जात नाही म्हणून खात राहणे योग्य नाही. शरीराची चयापचय प्रक्रीया पूर्ण होण्यासाठी त्याला पुरेसा अवधी दिला पाहिजे. तरच, शरीराचे यंत्र सुरळीत चालेल. शिवाय, अन्नाचे पचन नीट होण्यासाठी वाघ मागे लावल्यागत न जेवता सावकाश जेवावे. जेवणात रुची घ्यावी. जेवणाचा आनंद आणि समाधान पंचेंद्रियांपर्यंत पोहोचले पाहिजे. 

याचबरोबर मलमूत्र विसर्जनात दिरंगाई करता कामा नये. ब्रह्मचर्याचे पालन केले पाहिजे. म्हणजेच कामवासनांवर नियंत्रण ठेवले पाहिजे. हिंसा आणि नको तिथे साहस टाळले पाहिजे. या सर्व गोष्टींमुळे शरीराचे चक्र नियंत्रित राहते. आपल्या षडविकारांवर नियंत्रण राहते आणि सुदृढ देह व प्रसन्न जीनवशैलीमुळे आयुष्य वृद्धिंगत होते.

टॅग्स :foodअन्नHealth Tipsहेल्थ टिप्सHealthy Diet Planआहार योजनाAyurvedic Home Remediesघरगुती उपाय