शहरं
Join us  
Trending Stories
1
एअर इंडियाकडून मदत जाहीर, मृतांच्या नातेवाईकांना २५ लाखांची मदत देणार; टाटा सन्सचेही १ कोटी मिळणार...
2
आयुष्यात कधीच विमानात बसणार नाही; व्हिडीओ रेकॉर्ड करणाऱ्या आर्यनने घेतली धास्ती, पोलीस चौकशीनंतर...
3
Ahmedabad Plane Crash : "माणुसकी दाखवा, माझी मुलगी रुग्णालयात..."; विमान अपघातानंतर डॉक्टरची हात जोडून विनंती
4
राज-उद्धव ठाकरे एकत्र आले तर महापालिका निवडणुकीत ५४ टक्के मते मिळतील; सर्व्हे आल्याचा शिवसेना नेत्याचा दावा
5
बलात्कार करणाऱ्याला महिलेने घडवली जन्माची अद्दल; विळ्याने नराधमाचे गुप्तांगच कापले
6
लंच ब्रेक झाला म्हणून २० वर्षीय तरुणी घरी गेली; बेडरुममध्ये तिचा बॉस... 
7
SA Won WTC Final 2025 : 'चोकर्स'चा शिक्का पुसला, द. आफ्रिकेने इतिहास रचला; ऑस्ट्रेलियाला हरवून २७ वर्षांनी जिंकली ICC ट्रॉफी! मार्करमचे धमाकेदार शतक
8
Israel Rran War: 'हल्ले थांबवा नाहीतर तेहरानला आग लावू'; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इराणच्या खोमेनींना इशारा
9
आत्महत्येबाबत इन्स्टावर तरूणाने टाकली पोस्ट; १२ मिनिटांत पोलिसांनी फासावरून खाली उतरवला
10
WTC 2025 Final Prize Money : चांदीची गदा अन् IPL चॅम्पियन्स RCB पेक्षा अधिक रक्कम; दक्षिण आफ्रिकेसह कोणत्या संघाला किती बक्षीस मिळालं?
11
रोज विमाने उडतात, पण या विमानातून आवाजच येत नव्हता...; व्हिडीओ काढणाऱ्या तरुणाच्या काकीला वाटले...
12
इराण-इस्रायल युद्ध लांबलं तर 'या' महत्वाच्या वस्तू महागणार! जाणून घ्या, या देशांकडून काय-काय आयात करतो भारत?
13
Air India Plane Crash: ज्या आगीत जिवंत माणसांची झाली राख, त्यात एकच मानवी अवयव वाचला
14
दिवसभर खुर्चीवर बसून वाढतंय वजन? ३०-३०-३० नियमाची जादू, लठ्ठपणाला कराल बाय-बाय
15
अ‍ॅमेझॉनवर १६ जूनला अवघ्या १६ रुपयांना स्मार्टवॉच वाटली जाणार; कुपन कोड अन् वेळ लक्षात ठेवा...
16
"जर इस्त्रायलची साथ दिली तर..."; संतापलेल्या इराणचा पाश्चात्य देशांना मोठा इशारा
17
ऐन पेरणीत शेतकरी कुटुंबांवर संकट! वीज कोसळून दोन सख्ख्या भावांसह चार शेतकऱ्यांचा मृत्यू
18
अहमदाबाद प्लेन क्रॅशसंदर्भात बाबा रामदेव यांना वेगळाच संशय, स्पष्टच बोलले! केली मोठी मागणी
19
Maharashtra Rain Alert: कोकणाला रेड अलर्ट! मुंबई-ठाण्यासह 'या' जिल्ह्यात मुसळधार पावसाचा इशारा
20
Tarot Card: कष्ट करावे लागतील, तडकाफडकी कोणतेही निर्णय घेऊ नका; वाचा साप्ताहिक टॅरो भविष्य!

शंभर वर्षं निरोगी आयुष्य जगायचे आहे? मग 'ही' शास्त्रशुद्ध आहारपद्धत आजपासूनच सुरू करा!

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 30, 2024 13:00 IST

food habit: आपण जसा आहार घेतो तशी आपली प्रकृती बनते; म्हणून संतुलित आहार कसा असावा याची शास्त्रशुद्ध पद्धत जाणून घ्या.

आपण काय खावे आणि काय खाऊ नये, याबद्दल आपल्यापेक्षा लोकांनाच आपल्या स्वाथ्याची काळजी दिसून येते. जो उठतो, तो वेगवेगळे सल्ले देतो. इंटरनेटवर तर सगळाच भुलभुलैया आहे. कोणी दोन वेळेस जेवणाचा सल्ला देतो, तर कोणी दर दोन तासांनी! कोणी म्हणतो पोळी खाऊ नका, कोणी म्हणतो भात खाऊ नका! सकाळी उठल्यावर अंश पोटी खाण्याच्या पदार्थांची यादी काढली, तर ती एवढी मोठी निघेल, की ते खाल्यानंतर दिवसभर जेवायची वेळच येणार नाही. 

अशीच सगळी माहिती वाचून गोंधळलेल्या एक मावशी डॉक्टरांकडे गेल्या. 'काही केल्या माझे वजन कमी होत नाही, त्यावर काहीतरी उपाय सांगा डॉक्टर', असे म्हणाल्या.

डॉक्टरांनी त्यांना दहा बारा प्रकारच्या रंगीबेरंगी गोळ्या दिल्या. गोळ्यांची पुडी मावशींच्या हाती दिली. मावशींचा पुढचा प्रश्न तयार होता. त्या म्हणाल्या, 'डॉक्टर या गोळ्या जेवणाआधी घ्यायच्या, की जेवणानंतर?'डॉक्टर म्हणाले, `मावशी, या गोळ्या जेवणाआधी घ्यायच्या नाहीत, किंवा जेवणानंतरही घ्यायच्या नाहीत...'`मऽऽऽग?' मावशींनी आ वासला.'या गोळ्या जेवणा`ऐवजी' घ्या...!'

या प्रसंगातला गमतीचा भाग सोडा, परंतु खरोखरच, आहाराचे व्यवस्थापन उचित वेळी झाले नाही, तर अन्नापेक्षा जास्त गोळ्यांचा भडीमार शरीरावर होऊ लागतो. म्हणून शरीराची गरज ओळखून त्याला उचित वेळी अन्नपुरवठा केला पाहिजे. ज्यामुळे अन्नाचे रुपांतर आळसात किंवा मेदात न होता ऊर्जेत होईल. याबद्दल आयुर्वेद सांगते,

आयुष्यं भोजनं जीर्णे वेगानां चाविधारण्ब्रह्मचर्यमहिंसान च साहसानां च वर्जनम्

सुश्रुतसंहितेतीतल या श्लोकानुसार, आधी जेवलेले अन्न पूर्ण जिरल्यावरच पुन्हा जेवावे. केवळ जेवणाची वेळ झाली म्हणून किंवा वेळ जात नाही म्हणून खात राहणे योग्य नाही. शरीराची चयापचय प्रक्रीया पूर्ण होण्यासाठी त्याला पुरेसा अवधी दिला पाहिजे. तरच, शरीराचे यंत्र सुरळीत चालेल. शिवाय, अन्नाचे पचन नीट होण्यासाठी वाघ मागे लावल्यागत न जेवता सावकाश जेवावे. जेवणात रुची घ्यावी. जेवणाचा आनंद आणि समाधान पंचेंद्रियांपर्यंत पोहोचले पाहिजे. 

याचबरोबर मलमूत्र विसर्जनात दिरंगाई करता कामा नये. ब्रह्मचर्याचे पालन केले पाहिजे. म्हणजेच कामवासनांवर नियंत्रण ठेवले पाहिजे. हिंसा आणि नको तिथे साहस टाळले पाहिजे. या सर्व गोष्टींमुळे शरीराचे चक्र नियंत्रित राहते. आपल्या षडविकारांवर नियंत्रण राहते आणि सुदृढ देह व प्रसन्न जीनवशैलीमुळे आयुष्य वृद्धिंगत होते.

टॅग्स :foodअन्नHealth Tipsहेल्थ टिप्सHealthy Diet Planआहार योजनाAyurvedic Home Remediesघरगुती उपाय