शहरं
Join us  
Trending Stories
1
आधार, पॅन बाळगले म्हणून कुणी भारतीय ठरत नाही; बांगलादेशी नागरिकाचे १० वर्षे वास्तव्य, जामीन नाकारला
2
आजचे राशीभविष्य: बुधवार १३ ऑगस्ट २०२५; बोलण्यावर ताबा ठेवा, खर्च वाढणार नाही याकडे लक्ष द्या, कामात यश मिळेल
3
तुळजापुरातील मंदिरात जिंतेंद्र आव्हाड समर्थक आणि सुरक्षारक्षकांमध्ये धक्काबुक्की, नेमकं काय घडलं?
4
'आमदार असल्याने मारहाण करण्याचे लायसन्स मिळत नाही'; बच्चू कडू यांना ३ महिन्यांची शिक्षा
5
अग्रलेख: भटक्यांचा 'अनाथाश्रम'; कल्पना यशस्वी झाली तर मोकळेपणाने करता येईल संचार
6
काँग्रेसने ३००० मते खरेदी केली, भाजप निवडणूक आयोगात पोहोचला; २०१८ मध्ये CM सिद्धरामय्या १६९६ मतांनी विजयी झाले
7
पगार येताच, ५ मिनिटांनी कर्मचाऱ्याने राजीनामा दिला! एचआरची पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल
8
पुन्हा आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या! सात अधिकाऱ्यांचे खाते बदलले; कोणते खाते कोणाकडे?
9
India-China Flight: भारत - चीन दरम्यान लवकरच थेट विमानसेवा सुरू होणार; सरकारने विमान कंपन्यांना दिल्या या सूचना
10
जगदीप धनखड अचानक पंतप्रधान मोदींना का भेटले? काँग्रेसचा नवा दावा आणखी एक प्रश्न
11
केंद्र सरकारचा मोठा निर्णय; ४ सेमीकंडक्टर प्रकल्पांना मंजुरी, 'या' राज्यांमध्ये हजारो कोटींची गुंतवणूक
12
Aaditya Thackeray: "आम्ही काय खायचं, हे सांगणारे तुम्ही कोण?" आदित्य ठाकरे केडीएमसीवर भडकले!
13
आधी पत्नीचे नग्न फोटो काढले, मग बळजबरी बाप आणि मेहुण्यासोबत ठेवायला लावले संबंध; कारण...
14
"...त्यानंतरच होणार राज ठाकरेंना मविआत घेण्याचा निर्णय", काँग्रेसचे प्रभारी रमेश चेन्निथला स्पष्टच सांगितलं
15
महाराष्ट्राच्या पैठणीला लंडनमध्ये मोठा मान, व्हिक्टोरिया अल्बर्ट संग्रहालयामध्ये दिसणार!
16
आधारबाबत सुप्रीम कोर्टाचं सूचक विधान, बिहारमधील SIRवरून निवडणूक आयोगाला दिलासा 
17
कोण आहेत 'बेडरूम जिहादी', जे सुरक्षा यंत्रणेसाठी बनले डोकेदुखी?; भारतात दहशत पसरवण्याचा नवा डाव
18
बिहारपासून दिल्लीपर्यंत गोंधळ, अखेर १२४ वर्षांची महिला मतदार आली समोर, वयाबाबत म्हणाली...  
19
"शोना, मला मार" फक्त एवढेच ऐकताच प्रेयसीने प्रियकराचं डोकं भिंतीवर आपटलं, त्यानंतर जे घडले...
20
पाकिस्तानी दहशतवादी दक्षिण कोरियात पोहोचला, ओळख बदलून कंपनीत काम करत होता; दहशतवाद्याला अटक

Vastu Tips: वास्तुशास्त्रातील 'हे' तोडगे वाढवतील तुमचा आत्मविश्वास आणि मिळेल करिअरला नवीन दिशा!

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 9, 2022 07:05 IST

Vastu Shastra: आत्मविश्वास वाढवण्यासाठी आपली मानसिक स्थिती शांत असावी लागते. यासाठी वास्तू शास्त्राने दिलेले उपाय अवश्य करून बघा, लाभ होईल!

यश आणि आत्मविश्वास या एका नाण्याच्या दोन बाजू आहेत. आत्मविश्वास तेव्हाच वाढतो जेव्हा यश मिळते आणि यश तेव्हाच मिळते जेव्हा आत्मविश्वास असतो. मात्र अपयशाने या दोन्ही गोष्टी दुरावतात आणि बुडत्याचा पाय अधिकच खोलात शिरत जातो. म्हणून आपल्या प्रगतीसाठी आत्मविश्वास मिळवण्यावर भर दिला पाहिजे. आत्मविश्वास कशाने वाढतो? तर सुयोग्य नियोजनामुळे! योग्य निर्णयामुळे! त्यासाठी आपली मानसिक स्थिती शांत असावी लागते. यासाठी वास्तू शास्त्राने दिलेले उपाय अवश्य करून बघा, लाभ होईल!

>>वास्तुशास्त्रानुसार, तुमचा दिवाणखाना  उगवत्या सूर्याच्या किंवा धावत्या घोड्याच्या चित्राने सजवा. ते चित्र पाहून आत्मविश्वास वाढण्यास मदत होईल आणि घरातील नकारात्मकताही दूर होईल. ज्याप्रमाणे उत्साहवर्धक गाणी आपला मूड छान करतात तशीच उत्साहवर्धक चित्रे आत्मविश्वास वाढवतात. 

>> वास्तूनुसार घराच्या खिडक्या उघड्या ठेवा. घरात जेवढा जास्त प्रकाश तेवढी जास्त सकारात्मकता घरात प्रवेश करते. स्वच्छ प्रकाश, मोकळी हवा, ताजेतवाने वातावरण मन प्रसन्न ठेवते. त्यामुळे नकारात्मक विचारांचा निचरा होतो आणि आपसूकच आत्मविश्वास वाढतो. 

>> वास्तूनुसार घरामध्ये छोटेसे मत्स्यालय अर्थात फिश टॅंक ठेवा. ज्यामध्ये किमान दोन सोनेरी मासे असतील. त्यांना नियमित आहार देत राहा. 

याशिवाय तुमचा आत्मविश्वास वाढवण्यासाठी तुम्ही काही ज्योतिष उपाय देखील करून पाहू शकता. जसे की... 

>> पक्ष्यांना अन्न आणि पाणी पुरवल्याने आत्मविश्वास वाढतो असे मानले जाते. त्यामुळे घराच्या छतावर पक्ष्यांसाठी नियमित चारा ठेवावा आणि त्यात पाणी भरून ठेवावे.

>> आत्मविश्वास वाढवण्यासाठी सकाळी लवकर उठून उगवत्या सूर्याची पूजा करावी. ‘आदित्य हृदय स्तोत्र’ नियमित म्हणा. दररोज सकाळी सूर्याला अर्घ्य दिल्याने आत्मविश्वास वाढतो. 

>> सकाळी गायत्री मंत्राचा जप करावा. शक्य झाल्यास नैसर्गिक ठिकाणी फिरायला जा. सकारात्मक उर्जेने भरलेल्या लोकांसोबत तुमचा वेळ घालवा आणि दुसऱ्यांना दोष देणाऱ्या नकारात्मक लोकांची सांगत टाळा. 

>> आपल्या क्षेत्राशी निगडित अभ्यासासाठी, सरावासाठी दिवसभरातला एक तास राखीव ठेवा. हा एक तास ब्रह्म मुहूर्ताचा अर्थात पहाटे ४-६ वेळेतील असेल तर उत्तम. ती वेळ तुम्हाला नवनवीन कल्पना देईल, ऊर्जा देईल, चिंतनाला वेळ मिळेल, निर्णय क्षमता वाढेल आणि या सर्व प्रक्रियेमुळे आत्मविश्वास वाढेल. 

टॅग्स :Vastu shastraवास्तुशास्त्र