शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानने पीओकेमध्ये इमरजन्सी घोषित केली, आरोग्य कर्मचाऱ्यांच्या सुट्या रद्द; काय घडतेय...
2
Pahalgam Terror Attack : "माझ्या पतीला शहीद दर्जा द्यावा, त्याने अनेकांचा जीव वाचवला"; शुभमच्या पत्नीची सरकारकडे मागणी
3
जिल्हाधिकारी पैसे घेतात, अधिकारी २% शिवाय फाइल काढत नाहीत, खासदार, आमदारांचा आरोप
4
TCS की इन्फोसिस, कोणी वाढवला सर्वाधिक पगार? आयटी क्षेत्रात कोणती कंपनी देणार जास्त नोकऱ्या?
5
घर खरेदीदारांच्या नुकसान भरपाईसाठी अधिकाऱ्यांची होणार नियुक्ती; राज्यभरात १२ जिल्हा नियंत्रक अधिकारी, महसूल वसुली अधिकारी
6
Pahalgam Terror Attack : Video- मोठी कारवाई! पहलगाम हल्ल्यानंतर सुरक्षा दलांनी ९ दहशतवाद्यांची घरं केली उद्ध्वस्त
7
इराणच्या बंदरावर भीषण स्फोट की घातपात? १४ जणांचा मृत्यू तर ७५० लोक जखमी 
8
गुजरात पोलिसांची मोठी कारवाई! अहमदाबाद, सुरतमध्ये १ हजार बांगलादेशी ताब्यात
9
पर्यटकांवरील गोळीबाराच्या व्हिडीओंमुळे बेचैनी, अस्वस्थता वाढली, देशभरात नागरिकांमध्ये चिंता
10
ईडीचे कार्यालय असलेल्या कैसर-ए-हिंद इमारतीला भीषण आग; पहाटे २.३० वाजल्यापासून अद्याप धुमसतेय...
11
पहिलाच प्रकार! बँक अकाऊंट सांभाळता सांभाळता डीमॅट अकाऊंट खाली झाले; रातोरात ५ लाखांचे शेअर वळते केले
12
पाकची कोंडी करण्यासाठी हालचाली; अमेरिकेसह विविध देशांचा पाठिंबा मिळविण्यासाठी संपर्क साधणे सुरू
13
पाकिस्तानी दहशतवाद्यांना आता धास्ती 'अननोन गनमॅन'ची; दोन वर्षांत २० ते २५ अतिरेक्यांचा केला खात्मा
14
आजचे राशीभविष्य, २७ एप्रिल २०२५: नव्या कार्याचा आरंभ न करणे हितावह राहील
15
बिलावल बरळले; पाणी रोखले तर भारतीयांच्या रक्ताचे पाट वाहतील
16
काश्मीरमध्ये मोठे कोंबिंग ऑपरेशन, दहशतवाद्यांना मदत करणाऱ्या ४४६ पेक्षा जास्त लोकांना घेतले ताब्यात
17
दहशतीच्या भयाण रात्री खुर्शीदभाईंनी आम्हा पाच कुटुंबांना दिला घरात आश्रय; आमच्यासाठी धावून आलेले देवदूतच
18
बेकायदा पार्किंगबाबत जनजागृती करा; उच्च न्यायालयाची ज्येष्ठ नागरिकांना सूचना
19
पर्यटकांना होऊ शकतो घाबरण्याचा आजार; मानसिक आरोग्यावर घातक परिणाम होऊ शकतात
20
पाकचे तीन तुकडे होणे गरजेचे, तर युद्ध क्षमता कमी होईल..!

Vastu Tips for Evening: तिन्हीसांजेला ‘ही’ कामे टाळा; अन्यथा येतील अडचणी, समस्या! नेमके काय करु नये? जाणून घ्या

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 12, 2022 15:53 IST

तिन्हीसांज लक्ष्मी देवीच्या आगमनाची वेळ असल्याची मान्यता आहे. या कालावधीत काही गोष्टी करू नये, असे सांगितले जाते. नेमके काय करू नये? जाणून घ्या...

भारतीय परंपरा आणि संस्कृतींमध्ये आचार-विचारांना महत्त्व आहे. दिवसाच्या प्रत्येक प्रहारात काय करावे आणि काय करू नये, याच्या काही मान्यता आपल्याकडे असलेल्या पाहायला मिळू शकतात. ज्योतिषशास्त्रातील एक महत्त्वाची शाखा असलेल्या वास्तूशास्त्रात याबाबत काही उल्लेख असल्याचे सांगितले जाते. आपल्याकडे तिन्हीसांज किंवा दिवेलागण सूर्यास्ताची वेळ महत्त्वाची मानली गेली आहे. या कालावधीत काही गोष्टी टाळाव्यात किंवा करू नये, असे सांगितले जाते. 

सूर्यास्तावेळी म्हणजेच तिन्हीसांजेला सांजवात केली जाते. दररोज कोट्यवधी लोकांच्या घरी देवासमोर दिवे लावले जातात. तिन्हीसांजेला सांजवात करताना तुळशीसमोर दिवा लावण्याची परंपरा आजही जोपासली जाते. दिवा पाहूनी लक्ष्मी येते, करू तिची प्रार्थना, असे म्हटले जाते. यावेळी लक्ष्मी देवीच्या आगमनाची वेळ असल्याचे मानले जाते. या कालावधीत काही गोष्टी करू नये, असे सांगितले जाते. नेमके काय करू नये? जाणून घेऊया...

सायंकाळी स्वच्छता करू नये

घराची स्वच्छता करणे आणि ती राखणे ही खूप चांगली गोष्ट आहे. मात्र, तिन्हीसांजेला केर काढणे शुभ मानले जात नाही. कारण केरसुणीला लक्ष्मी देवीचे प्रतिक मानले जाते. त्यामुळे या कालावधीत केर काढू नये, असे म्हटले जाते. तिन्हीसांजेच्या पूर्वी केर काढून घ्यावा. अन्यथा आर्थिक चणचणीचा सामना करावा लागू शकतो. तसेच मानहानी होऊ शकते, असे म्हटले जाते. 

आराम चालेल पण झोपू नये

दिवसभराच्या दगदगीनंतर काही जण तिन्हीसांजेला झोपतात किंवा आराम करतात. आराम केला जाऊ शकतो. मात्र, आडवे होऊ नये किंवा झोपू नये, असे सांगितले जाते. ही वेळ देवी लक्ष्मीच्या आगमनाची आहे, त्यामुळे या वेळी झोपल्याने प्रगती आणि आर्थिक प्रगतीमध्ये अडथळे येऊ शकतात. 

तुळशीची पाने खुडू नयेत

सूर्यास्ताच्या वेळी किंवा नंतर तुळशीची पाने खुडू नयेत, या वेळी तुळशीच्या पानांना स्पर्श करू नये. सायंकाळी किंवा रात्री तुळशीची पाने हवी असल्यास दिवसा काढून घ्यावीत, असे सांगितले जाते. सायंकाळी दारात भिक्षुक आला, तर त्याला रिकाम्या हाती पाठवू नये, असे म्हटले जाते. तसेच तिन्हीसांजेला घराचा मुख्य दरवाजा बंद ठेवू नये. ही वेळ लक्ष्मी देवीच्या आगमनाची मानली गेली असल्यामुळे मुख्य दरवाजा खुला ठेवावा. यामुळे लक्ष्मी देवी घरात येऊ शकते, अशी मान्यता आहे. अन्यथा लक्ष्मी देवी नाराज होऊन निघून जाऊ शकते, असे म्हटले जाते.  

टॅग्स :Astrologyफलज्योतिषVastu shastraवास्तुशास्त्र