शहरं
Join us  
Trending Stories
1
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
4
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
5
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
6
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
7
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
8
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
9
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
10
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
11
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
12
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
13
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
14
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
15
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
16
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
17
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
18
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
19
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
20
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
Daily Top 2Weekly Top 5

Vastu Tips for Evening: तिन्हीसांजेला ‘ही’ कामे टाळा; अन्यथा येतील अडचणी, समस्या! नेमके काय करु नये? जाणून घ्या

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 12, 2022 15:53 IST

तिन्हीसांज लक्ष्मी देवीच्या आगमनाची वेळ असल्याची मान्यता आहे. या कालावधीत काही गोष्टी करू नये, असे सांगितले जाते. नेमके काय करू नये? जाणून घ्या...

भारतीय परंपरा आणि संस्कृतींमध्ये आचार-विचारांना महत्त्व आहे. दिवसाच्या प्रत्येक प्रहारात काय करावे आणि काय करू नये, याच्या काही मान्यता आपल्याकडे असलेल्या पाहायला मिळू शकतात. ज्योतिषशास्त्रातील एक महत्त्वाची शाखा असलेल्या वास्तूशास्त्रात याबाबत काही उल्लेख असल्याचे सांगितले जाते. आपल्याकडे तिन्हीसांज किंवा दिवेलागण सूर्यास्ताची वेळ महत्त्वाची मानली गेली आहे. या कालावधीत काही गोष्टी टाळाव्यात किंवा करू नये, असे सांगितले जाते. 

सूर्यास्तावेळी म्हणजेच तिन्हीसांजेला सांजवात केली जाते. दररोज कोट्यवधी लोकांच्या घरी देवासमोर दिवे लावले जातात. तिन्हीसांजेला सांजवात करताना तुळशीसमोर दिवा लावण्याची परंपरा आजही जोपासली जाते. दिवा पाहूनी लक्ष्मी येते, करू तिची प्रार्थना, असे म्हटले जाते. यावेळी लक्ष्मी देवीच्या आगमनाची वेळ असल्याचे मानले जाते. या कालावधीत काही गोष्टी करू नये, असे सांगितले जाते. नेमके काय करू नये? जाणून घेऊया...

सायंकाळी स्वच्छता करू नये

घराची स्वच्छता करणे आणि ती राखणे ही खूप चांगली गोष्ट आहे. मात्र, तिन्हीसांजेला केर काढणे शुभ मानले जात नाही. कारण केरसुणीला लक्ष्मी देवीचे प्रतिक मानले जाते. त्यामुळे या कालावधीत केर काढू नये, असे म्हटले जाते. तिन्हीसांजेच्या पूर्वी केर काढून घ्यावा. अन्यथा आर्थिक चणचणीचा सामना करावा लागू शकतो. तसेच मानहानी होऊ शकते, असे म्हटले जाते. 

आराम चालेल पण झोपू नये

दिवसभराच्या दगदगीनंतर काही जण तिन्हीसांजेला झोपतात किंवा आराम करतात. आराम केला जाऊ शकतो. मात्र, आडवे होऊ नये किंवा झोपू नये, असे सांगितले जाते. ही वेळ देवी लक्ष्मीच्या आगमनाची आहे, त्यामुळे या वेळी झोपल्याने प्रगती आणि आर्थिक प्रगतीमध्ये अडथळे येऊ शकतात. 

तुळशीची पाने खुडू नयेत

सूर्यास्ताच्या वेळी किंवा नंतर तुळशीची पाने खुडू नयेत, या वेळी तुळशीच्या पानांना स्पर्श करू नये. सायंकाळी किंवा रात्री तुळशीची पाने हवी असल्यास दिवसा काढून घ्यावीत, असे सांगितले जाते. सायंकाळी दारात भिक्षुक आला, तर त्याला रिकाम्या हाती पाठवू नये, असे म्हटले जाते. तसेच तिन्हीसांजेला घराचा मुख्य दरवाजा बंद ठेवू नये. ही वेळ लक्ष्मी देवीच्या आगमनाची मानली गेली असल्यामुळे मुख्य दरवाजा खुला ठेवावा. यामुळे लक्ष्मी देवी घरात येऊ शकते, अशी मान्यता आहे. अन्यथा लक्ष्मी देवी नाराज होऊन निघून जाऊ शकते, असे म्हटले जाते.  

टॅग्स :Astrologyफलज्योतिषVastu shastraवास्तुशास्त्र