शहरं
Join us  
Trending Stories
1
'पाकिस्तानचे दोन तुकडे करा, पाकव्याप्त काश्मीर भारतात घ्या', काँग्रेसच्या मुख्यमंत्र्याची PM मोदींकडे मागणी
2
पहलगाम हल्ल्यात हिंदूच टार्गेट! आधी पॅन्ट काढल्या अन् 'खतना' न केलेल्यांचीच हत्या; तपास पथकाकडून मोठा खुलासा
3
Pahalgam Terror Attack: लष्कराची मोठी कारवाई! आणखी दोन दहशतवाद्यांची घरे स्फोटके लावून पाडली
4
पाकिस्तानच्या नापाक कारवाया थांबत नाहीत, २४ तासांत दुसऱ्यांदा नियंत्रण रेषेवर गोळीबार, भारतीय सैन्याने दिले चोख प्रत्युत्तर
5
"विकी कौशलमुळे 'छावा' चालला असं नाही, तर...", महेश मांजरेकर स्पष्टच बोलले
6
"हे काही टीव्ही शोज नाहीयेत...", अभिनेत्री शिवानी सुर्वेनं प्रसारमाध्यमांना फटकारलं
7
EPFO नं केला मोठा बदल, जॉब बदल्यावर PF ट्रान्सफर करणं होणार सोपं; १.२५ कोटी लोकांना फायदा
8
अक्षय शिंदे प्रकरणी आदेश देऊनही पोलिसांविरोधात गुन्हा दाखल न केल्याने हायकोर्टाचा संताप
9
PPF ची 'ही' ट्रिक अनेकांना माहीत नाही, बनेल १ कोटींचा फंड, वर्षाला मिळू शकतं ७ लाखांपेक्षा अधिक व्याज
10
भारताची धास्ती घेत पाक लष्कराची सीमेवर मोठ्या प्रमाणात जमवाजमव; सैनिकांची संख्या वाढवली
11
मोठी बातमी: एल्फिन्स्टन ब्रिज सोमवारपर्यंत बंद होणार नाही; नागरिकांच्या आंदोलनाची थेट मुख्यमंत्र्यांनी घेतली दखल!
12
भारत-पाकमध्ये पाण्यावरून युद्ध होईल? तणाव वाढला; पाकिस्तानात हाहाकार, कारण...
13
भारताकडून पाकिस्तानला पाण्याचा थेंबही मिळणार नाही; केंद्र सरकारनं आखली रणनीती
14
अजित पवार यांचा अधिकाऱ्यांना सज्जड दम; सांगितलेली कामे केली नाहीत, तर पुढच्या बैठकीला..
15
आजचे राशीभविष्य, २६ एप्रिल २०२५: शक्यतो आज आर्थिक देवाण-घेवाण करू नका
16
अखेर पाक म्हणाला, होय, आम्ही दहशतवाद्यांना पोसले; संरक्षणमंत्री ख्वाजा आसिफ यांची कबुली
17
एकही पाकिस्तानी भारतात राहणार नाही याची खात्री करा; शाहांचा सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना फोन
18
पाकिस्तानी नागरिकांवर महाराष्ट्रात वॉच; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे पोलिसांना आदेश
19
राहुल गांधी यांना सर्वोच्च न्यायालयाने फटकारले; "स्वातंत्र्यवीर सावरकरांबद्दल..."
20
संसदेने मंजूर केलेला कायदा संवैधानिक, स्थगिती देऊ नका; केंद्र सरकारची मागणी

Vastu Tips : सकाळी उठून कोणा व्यक्तीचे तर नाहीच, पण 'या' वस्तूंचेही दर्शन घेऊ नका!

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 2, 2022 15:25 IST

Vastu Shastra : दिवस खराब करायला अनेक गोष्टी कारणीभूत असतात, त्यात आणखी या गोष्टींची भर नको, म्हणून वास्तुशास्त्राने केल्यात पुढील सूचना!

दिवस खराब गेला की त्याचे खापर फोडताना एक वाक्य आपण हमखास म्हणतो, 'आज सकाळी कोणाचे तोंड बघितले काय माहीत?' परंतु वास्तू शास्त्र सांगते, की सकाळी उठल्यावर केवळ व्यक्तीच नाही तर ठराविक वस्तूंचेही दर्शन टाळा. 

सकाळ प्रसन्नतेने झाली तर दिवस प्रसन्न जातो. यासाठी आपल्या पूर्वजांनी अन्य कोणत्याही गोष्टींचे दर्शन घेण्याआधी आपल्या हाताचे दर्शन घ्या असे सांगितले आहे. हाताचेच का? तर आपण हातांनी दिवसभर काम करतो. आपल्या हातांमध्ये श्रीकृष्ण, लक्ष्मी आणि सरस्वती या देवतांचा वास असतो. त्यांच्या कृपेने आणि त्यांच्या साक्षीने प्रत्येक काम चांगलेच घडावे यासाठी प्रभाते करदर्शन घ्यावे आणि जमिनीवर पाय ठेवण्याआधी तिला नमस्कार करावा असे आपले पूर्वज आपल्याला सांगत असत. आपण आताही या गोष्टीचे अनुसरण करू शकतो, त्याचबरोबर आपल्याला वास्तू शास्त्राने सांगितलेल्या गोष्टीही लक्षात ठेवल्या पाहिजेत. त्या पुढीलप्रमाणे-

आरसा : वास्तूनुसार सकाळी उठल्यावर आरशात तोंड पाहू नये. कारण सकाळी आपण आळसावलेले असतो. अशातच स्वतःला आळसावलेले पाहिले तर आळस आणखीनच अंगावर येऊ शकतो. यासाठी सकाळी उठल्यावर आरशात न पाहता आधी चेहरा पाण्याने स्वच्छ धुवा. मरगळ झटकून टाका आणि नंतर स्वतःला आरशात बघा. 

खरकटी भांडी : शास्त्रानुसार जेवण झाल्यावर भांडी खरकटी ठेवू नयेत असे म्हणतात. म्हणून पूर्वीच्या काळी जेवण झाल्या झाल्या भांडी घासून टाकली जात असे. मात्र आता सगळेच जण व्यस्त जीवन शैलीमुळे ठराविक कामे वेळच्या वेळी करू शकतीलच असे नाही. यावर पर्याय म्हणून भांड्यांमध्ये पाणी घालून ठेवा आणि सकाळी सकाळी ती निदर्शनास पडणार नाही याची काळजी घ्या. त्यामुळे नकारात्म ऊर्जा निर्माण होऊन दिवस खराब जाऊ शकतो. तोंड धुवून ताजेतवाने होईपर्यंत खरकटी भांडी दिसणार नाहीत याची काळजी घ्या. 

बंद घड्याळ : वास्तूनुसार घरात कधीही बंद घड्याळ लावू नये. जर तुम्ही सकाळी उठून बंद घड्याळ पाहिले, तर त्यावर विसंबून तुमचा दिवस उशिरा सुरु होऊ शकतो. त्यामुळे अन्य कामांमध्ये दिरंगाई होऊ शकते आणि त्यामुळे तुमची चिडचिड होऊ शकते. म्हणून घरात बंद घड्याळ असेल तर ते आधी दुरुस्त करा किंवा त्याजागी नवे घड्याळ लावा, मात्र जुने घड्याळ वापरू नका!

आक्रमक चित्र : आपली बुद्धी डोळ्याला दिसणारी प्रत्येकी छबी डोक्यात साठवून ठेवते आणि ती प्रतिमा आणि त्याच्याशी संबंधित विचार दिवसभर घोळवत ठेवते. म्हणून सकाळी उठल्यावर आणि रात्री झोपताना आपल्या डोळ्यासमोर प्रसन्न चित्राकृती असणे अत्यंत महत्त्वाचे आहे. म्हणून अधिकतर लोक देवाचे, लहान बाळांचे, निसर्गाचे, फुलांचे चित्र आपल्या बेडरूम मध्ये लावणे पसंत करतात. वास्तुशास्त्राच्या दृष्टीने ती योग्य निवड मानली जाते. 

टॅग्स :Vastu shastraवास्तुशास्त्र