शहरं
Join us  
Trending Stories
1
‘राजुरा’वर राहुल गांधींनी जाहीर आरोप केले, आता निवडणूक आयोगाने सत्य समोर आणले, पुरावेच दिले
2
मणिपूर अशांतच! आसाम रायफल्सच्या ताफ्यावर गोळीबार; दोन जवानांना हौतात्म्य, अनेक जखमी
3
'ते त्रास देतायेत...!'; इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहूंवर डोनाल्ड ट्रम्प प्रचंड नाराज, अपशब्द वापरले!
4
IND vs Oman : सूर्या दादा बॅटिंग करायलाही विसरला की काय?
5
ECIची झाडाझडती! महाराष्ट्रातील ४४ पक्षांना दणका, यादीतून वगळले; देशभरात ४७४ पार्टींवर कारवाई
6
मराठा-ओबीसी वाद तापला, मकरंद अनासपुरे यांची मोठी प्रतिक्रिया; सरकारला केले महत्त्वाचे आवाहन
7
Shubman Gill Another KL Rahul: कॅज्युअल अप्रोच! बोल्ड झाल्यावर नेटकऱ्यांनी घेतली गिलची शाळा (VIDEO)
8
मारुती व्हिक्टोरिसचं खरं माइलेज आलं समोर, 1L पेट्रोलमध्ये फक्त 'एवढंच' धावली; कंपनीनं केलाय 21Kmpl चा दावा!
9
IND vs Oman : टॉस वेळी सूर्याचा झाला 'गजनी'; मग त्याने रोहितच्या नावे फाडलं बिल! नेमकं काय घडलं?
10
वा रे व्वा...! GST घटल्यानंतर तब्बल ₹98000 पर्यंत स्वस्त झाली TATA ची ही 5-स्टार सेफ्टी रिटिंग कार, जाणून घ्या व्हेरिअंट वाइज सूट
11
ज्योतिरादित्य शिंदेंच्या ४०,००० कोटींच्या संपत्तीच्या वादावर मोठी अपडेट; तीन आत्यांसोबत मिळून वाद सोडवावा लागणार
12
भारताला घेरण्याचा प्रयत्न? सौदीनंतर कतार-UAE देणार पाकला साथ? MEA ची पहिली प्रतिक्रिया आली
13
लाडकी बहीण योजना: यापुढेही १५००₹ हवे असल्यास ‘हे’ काम करणे अनिवार्य; पाहा, संपूर्ण प्रक्रिया
14
“१०० वर्षे पूर्ण करणाऱ्या RSSने आता संविधान अन् गांधी विचार स्वीकारावा”: हर्षवर्धन सपकाळ
15
१८ वर्षांनी पुनरावृत्ती, आता मीनाताई ठाकरे पुतळा रक्षणासाठी मोठा निर्णय; ठाकरे गट काय करणार?
16
२०२७ मध्ये भारताला मिळणार पहिली बुलेट ट्रेन; आतापर्यंत किती काम झाले? पाहा Video...
17
जीएसटी कपातीनंतरही गाड्या स्वस्त होणार नाहीत? सणासुदीच्या काळातही डिस्काउंट नाही, 'हे' आहे कारण
18
जीएसटी कपातीनंतर MRP चा गोंधळ: केंद्र सरकारचा मोठा निर्णय
19
आयटीआर भरताच आरबीआयचा मोठा निर्णय; क्रेडिट कार्डद्वारे करता येणार नाही हे काम...
20
"20 रुपयांच्या 6 ऐवजी फक्त 4 च पाणीपुरी दिल्या..."; गुजरातमध्ये भररस्त्यात महिलेनं सुरू केलं आंदोलन, अन् मग...!

Vastu Tips : सकाळी उठून कोणा व्यक्तीचे तर नाहीच, पण 'या' वस्तूंचेही दर्शन घेऊ नका!

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 2, 2022 15:25 IST

Vastu Shastra : दिवस खराब करायला अनेक गोष्टी कारणीभूत असतात, त्यात आणखी या गोष्टींची भर नको, म्हणून वास्तुशास्त्राने केल्यात पुढील सूचना!

दिवस खराब गेला की त्याचे खापर फोडताना एक वाक्य आपण हमखास म्हणतो, 'आज सकाळी कोणाचे तोंड बघितले काय माहीत?' परंतु वास्तू शास्त्र सांगते, की सकाळी उठल्यावर केवळ व्यक्तीच नाही तर ठराविक वस्तूंचेही दर्शन टाळा. 

सकाळ प्रसन्नतेने झाली तर दिवस प्रसन्न जातो. यासाठी आपल्या पूर्वजांनी अन्य कोणत्याही गोष्टींचे दर्शन घेण्याआधी आपल्या हाताचे दर्शन घ्या असे सांगितले आहे. हाताचेच का? तर आपण हातांनी दिवसभर काम करतो. आपल्या हातांमध्ये श्रीकृष्ण, लक्ष्मी आणि सरस्वती या देवतांचा वास असतो. त्यांच्या कृपेने आणि त्यांच्या साक्षीने प्रत्येक काम चांगलेच घडावे यासाठी प्रभाते करदर्शन घ्यावे आणि जमिनीवर पाय ठेवण्याआधी तिला नमस्कार करावा असे आपले पूर्वज आपल्याला सांगत असत. आपण आताही या गोष्टीचे अनुसरण करू शकतो, त्याचबरोबर आपल्याला वास्तू शास्त्राने सांगितलेल्या गोष्टीही लक्षात ठेवल्या पाहिजेत. त्या पुढीलप्रमाणे-

आरसा : वास्तूनुसार सकाळी उठल्यावर आरशात तोंड पाहू नये. कारण सकाळी आपण आळसावलेले असतो. अशातच स्वतःला आळसावलेले पाहिले तर आळस आणखीनच अंगावर येऊ शकतो. यासाठी सकाळी उठल्यावर आरशात न पाहता आधी चेहरा पाण्याने स्वच्छ धुवा. मरगळ झटकून टाका आणि नंतर स्वतःला आरशात बघा. 

खरकटी भांडी : शास्त्रानुसार जेवण झाल्यावर भांडी खरकटी ठेवू नयेत असे म्हणतात. म्हणून पूर्वीच्या काळी जेवण झाल्या झाल्या भांडी घासून टाकली जात असे. मात्र आता सगळेच जण व्यस्त जीवन शैलीमुळे ठराविक कामे वेळच्या वेळी करू शकतीलच असे नाही. यावर पर्याय म्हणून भांड्यांमध्ये पाणी घालून ठेवा आणि सकाळी सकाळी ती निदर्शनास पडणार नाही याची काळजी घ्या. त्यामुळे नकारात्म ऊर्जा निर्माण होऊन दिवस खराब जाऊ शकतो. तोंड धुवून ताजेतवाने होईपर्यंत खरकटी भांडी दिसणार नाहीत याची काळजी घ्या. 

बंद घड्याळ : वास्तूनुसार घरात कधीही बंद घड्याळ लावू नये. जर तुम्ही सकाळी उठून बंद घड्याळ पाहिले, तर त्यावर विसंबून तुमचा दिवस उशिरा सुरु होऊ शकतो. त्यामुळे अन्य कामांमध्ये दिरंगाई होऊ शकते आणि त्यामुळे तुमची चिडचिड होऊ शकते. म्हणून घरात बंद घड्याळ असेल तर ते आधी दुरुस्त करा किंवा त्याजागी नवे घड्याळ लावा, मात्र जुने घड्याळ वापरू नका!

आक्रमक चित्र : आपली बुद्धी डोळ्याला दिसणारी प्रत्येकी छबी डोक्यात साठवून ठेवते आणि ती प्रतिमा आणि त्याच्याशी संबंधित विचार दिवसभर घोळवत ठेवते. म्हणून सकाळी उठल्यावर आणि रात्री झोपताना आपल्या डोळ्यासमोर प्रसन्न चित्राकृती असणे अत्यंत महत्त्वाचे आहे. म्हणून अधिकतर लोक देवाचे, लहान बाळांचे, निसर्गाचे, फुलांचे चित्र आपल्या बेडरूम मध्ये लावणे पसंत करतात. वास्तुशास्त्राच्या दृष्टीने ती योग्य निवड मानली जाते. 

टॅग्स :Vastu shastraवास्तुशास्त्र