शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai Fire: मुंबईत अग्नितांडव; कफ परेड आगीत एका मुलाचा मृत्यू, तीन जण रुग्णालयात; एकाची प्रकृती चिंताजनक
2
"भारताने इस्रायलकडून शिकायला हवे", RSS नेते भैयाजी जोशी नेमकं काय म्हणाले? धर्मांतरणावरही स्पष्टच बोलले!
3
'आमचा विश्वास कायद्यावर आहे, पण...' : जुबिन गर्ग यांच्या मृत्यूला एक महिना पूर्ण, तरीही गूढ कायम!
4
मालक असावा तर असा... या व्यक्तीनं दिवाळीला कर्मचाऱ्यांना वाटल्या ५१ लक्झरी कार्स
5
गेल्या महिन्यातच लाँच केलेली...! मारुतीने विक्टोरिसची किंमत वाढविली, पहा नेमकी किती...
6
दिवाळीच्या मुहूर्तावर शेअर बाजार सुस्साट; सेन्सेक्स ३१७ तर निफ्टीमध्ये ११५ अंकांची तेजी, 'या' शेअर्समध्ये तेजी
7
VIRAL : भीती नाही, थरार! एका व्यक्तीने १००हून अधिक विषारी सापांचा वाचवला जीव; Video पाहून नेटकरी हैराण
8
विकली जाणार देशातील 'ही' दिग्गज खासगी बँक; ₹२६,८५० कोटींची डील, UAE च्या या कंपनीच्या हाती येणार सूत्रं
9
कतारने मोठी चूक केली...! तालिबानने युद्धविरामातील एका शब्दावर तीव्र आक्षेप घेतला, निवेदन बदलण्याची वेळ आली...
10
'दीया और बाती' फेम अभिनेत्रीने ११ वर्षांचा संसार मोडल्यानंतर घेतला संन्यास, पदरात आहे एक मुलगा
11
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष ट्र्म्प आणि युक्रेनच्या झेलेन्स्कींचे पुन्हा जोरदार भांडण; नकाशा बाजुला फेकला... 
12
हाँगकाँगमध्ये UAE चे कार्गो प्लेन रनवेवरून समुद्रात घसरले; विमानातील कर्मचारी वाचले, पण दोन ग्राउंड स्टाफचा मृत्यू
13
"जेव्हा हिचे हिरोईन म्हणून करिअर चालले नाही, तेव्हा...", राखी सावंतचा तमन्ना भाटियावर हल्लाबोल, म्हणाली - "लाज बाळग..."
14
Delhi AQI: दिवाळी सुरु नाही झाली तोच दिल्लीची हवा अतिविषारी बनली; आनंद विहारमध्ये गुणवत्ता ४१७ वर...
15
'त्या' तरूणाचा प्रायव्हेट पार्ट कुणी कापला? अखेर उलगडा झाला! समोर आलं धक्कादायक सत्य
16
ट्रम्पविरोधात अमेरिकन पेटून उठले, ‘नो किंग्ज’ म्हणत रस्त्यावर उतरले! सरकारी हुकुमशाहीचा विरोध
17
आजचे राशीभविष्य : सोमवार २० ऑक्टोबर २०२५; आजचा दिवस व्यापार-व्यवसायासाठी लाभदायी, जुनी येणी, प्रवास, अर्थ प्राप्तीसाठीही अनुकूल
18
महाराष्ट्राला केंद्राकडून १,५६६ कोटी मदत; अमित शाह यांची घोषणा, CM फडणवीसांनी मानले आभार
19
परकीयांनी आधी विध्वंस करून लुटले, तर नंतर आलेल्यांनी बुद्धीला लुटले: सरसंघचालक मोहन भागवत
20
राज्यात ९६ लाख खोटे मतदार; राज ठाकरेंचा आरोप, निवडणुका शांततेत हव्या तर मतदार याद्या स्वच्छ करा

Vastu Shastra: अंघोळ झाल्यावर करत असाल 'ही' एक चूक तर घरात भरेल नकारात्मक ऊर्जा!

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 7, 2025 16:57 IST

Vastu Tips: अंघोळीनंतर राहणारे पाणी घरात नकारात्मक ऊर्जा आकर्षून घेण्यास कारणीभूत ठरू शकते, यासाठी कोणती चूक टाळायला हवी ते जाणून घ्या. 

पाण्यात प्रचंड ताकद असते. दोन घोट पाणी प्यायल्याने ताजे तवाने वाटते. ऋतुमानानुसार गरम-थंड पाण्याने अंघोळ केल्यावर फ्रेश वाटते. स्वच्छ अंघोळ झाली की त-मनाला तजेला जाणवतो, एवढेच काय तर पाणी हे ऊर्जानिर्मितीचे माध्यम म्हणूनही वापरले जाते. मात्र हेच पाणी नकारात्मक उर्जेला आमंत्रण ठरू शकते. याबाबत देवकीनंदन ठाकूर महाराज यांनी वास्तू नियम सांगितला आहे, तो पुढीलप्रमाणे -

महाराज म्हणतात, 'अंघोळ झाल्यावर तुमच्या मोरीत पाणी तसेच शिल्लक राहत असेल किंवा बादली आणि मग घेऊन तुम्ही अंघोळ करत असाल आणि बादलीत पाणी शिल्लक राहिले असेल तर तुमच्या वास्तू मध्ये नकारात्मक ऊर्जेला ती कारणीभूत ठरू शकते. 

ते सांगतात, शास्त्रानुसार काही सवयी अंगभूत असल्या पाहिजे, जसे की झोपून उठल्यावर अंथरूण आणि पांघरूण यांची घडी आपणच आपली घातली पाहिजे. अंघोळ झाल्यावर खराट्याने मोरी झाडून काढले पाहिजे. आपल्या आंघोळीचे पाणी मोरीत शिल्लक राहता कामा नये. एवढेच नाही, तर आपण वापरलेली पाण्याची बादली रिकामी करून ती पालथी घालून ठेवली पाहिजे. त्यातही पाणी शिल्लक राहता कामा नये. 

तार्किक दृष्ट्या विचार केला तर लक्षात येते, पाण्याने मोरी निसरडी होते आणि आपल्या नंतर येणारी व्यक्ती बेसावधपणे पाऊल टाकते. अशा वेळी अपघाताने पाय सटकून व्यक्ती पडण्याची शक्यता बळावते आणि डोक्याला मार लागू शकतो. म्हणून आपली अंघोळ झाल्यावर मोरी स्वच्छ करणे सर्वांच्याच हिताचे ठरते. तसेच आपण वापरलेली वस्तू आपण उचलून ठेवावी ही चांगली शिस्त आहे. त्यानुसार आपली बादली आणि मग रिकामा करून पालथा घालून ठेवला असता साचलेल्या पाण्यातून रोगराई पसरण्याचा धोका टळतो आणि नंतर येणाऱ्या व्यक्तीला स्वच्छ झालेली बादली, मग नव्याने वापरता येते. 

महाराज तिसरी चांगली सवय सांगतात, लहान मुलांना नकळत्या वयापासून कामाची आणि स्वावलंबनाची सवय लावा. प्रत्येक गोष्टीसाठी आई वडिलांवर अवलंबून ठेवू नका. स्वतःचे अन्न स्वतः ताटात वाढून घेणे, स्वतःच्या कपड्यांची घडी करणे, आपली खोली आवरणे आणि घरातील वडीलधाऱ्यांना यथाशक्ती मदत करणे. 

या तीन सवयी लहानपणापासून लावल्या तर आयुष्यभर कामी येतात आणि स्वावलंबन अंगी बाणल्यामुळे घरात कलह रुपी नकारात्मक ऊर्जा प्रवेश करत नाही. 

टीप : सदर माहिती व्हिडीओच्या आधारे दिलेली असून लोकमत सदर माहितीला पुष्टी देत नाही.

टॅग्स :Vastu shastraवास्तुशास्त्र