शहरं
Join us  
Trending Stories
1
'ना पारसी ना मुंबईकर', Tata Trust मध्ये नवा वाद! मेहली मिस्त्रींचं श्रीनिवासन-विजय सिंग यांच्या नियुक्तीला आव्हान, प्रकरण काय?
2
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
3
“बारामती पोटनिवडणुकीत पाठिंबा द्या”; सुनेत्रा पवार यांचा उद्धव ठाकरेंना फोन, घडामोडींना वेग
4
रिक्षा परमिट हवे, तर मग मराठी येणे अनिवार्य; परवाने पुनर्तपासणीचे प्रताप सरनाईकांचे निर्देश
5
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
6
'तू मरून जा, नाही तर तुला मारणार!' आरमोरीत हनी ट्रॅप, ब्लॅकमेलिंग अन् तरुणावर विषप्रयोग, तरुणीसह दोघांवर गुन्हा दाखल 
7
लखनौमध्ये रेल्वे सिग्नल बॉक्स उडवण्याचा मोठा कट उधळला; ISI च्या ४ संशयितांना अटक
8
Video - निसर्गाच्या देणगीला भेसळीचा विळखा; तुम्ही पिताय ते नारळपाणी खरंच 'नॅचरल' आहे का?
9
हजारो भारतीयांसह ३० हजार जणांना कामावरून काढणाऱ्या कंपनीच्या ऑफिसवर इराणने केला हल्ला 
10
रात्रीस खेळ चाले! झोपेतच घात, सौदी दूतावास बेचिराक; इराणचा प्रहार, अमेरिकेने विचारही केला नाही
11
Mithun Chakraborty : "मी पश्चिम बंगालचा बांगलादेश होऊ देणार नाही, ओवैसी रिअल लीडर"; मिथुन चक्रवर्ती यांचं मोठं विधान
12
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अधीर रंजन चौधरी यांच्यावर हल्ला, बंगालमध्ये काँग्रेस-तृणमूलचे कार्यकर्ते भिडले  
13
संकष्ट चतुर्थी २०२६: संकष्टीला करा राशीनुसार दिलेले उपाय; 'ही' गणेशसेवा पालटून टाकेल तुमचं आयुष्य!
14
IPL 2026: मराठमोळ्या आयुष म्हात्रेबद्दल अंपायरने केली मोठ्ठी चूक! सारेच हैराण; काय घडलं?
15
खळबळजनक!!! २०० किलो बनावट पद्धतीने पिकवलेले आंबे जप्त; श्वसनाच्या आजारांचा होता धोका
16
Gold-Silver Price Fall: खुशखबर! सोनं-चांदी झाली स्वस्त; खरेदी करणाऱ्यांसाठी 'गोल्डन चान्स'
17
दोन लढाऊ विमाने पाडली, २ चॉपर उद्ध्वस्त, पायलट बेपत्ता, २४ तासांत इराणचा अमेरिकेला जबर दणका
18
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
19
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
20
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
Daily Top 2Weekly Top 5

Vastu Shastra: अंघोळ झाल्यावर करत असाल 'ही' एक चूक तर घरात भरेल नकारात्मक ऊर्जा!

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 7, 2025 16:57 IST

Vastu Tips: अंघोळीनंतर राहणारे पाणी घरात नकारात्मक ऊर्जा आकर्षून घेण्यास कारणीभूत ठरू शकते, यासाठी कोणती चूक टाळायला हवी ते जाणून घ्या. 

पाण्यात प्रचंड ताकद असते. दोन घोट पाणी प्यायल्याने ताजे तवाने वाटते. ऋतुमानानुसार गरम-थंड पाण्याने अंघोळ केल्यावर फ्रेश वाटते. स्वच्छ अंघोळ झाली की त-मनाला तजेला जाणवतो, एवढेच काय तर पाणी हे ऊर्जानिर्मितीचे माध्यम म्हणूनही वापरले जाते. मात्र हेच पाणी नकारात्मक उर्जेला आमंत्रण ठरू शकते. याबाबत देवकीनंदन ठाकूर महाराज यांनी वास्तू नियम सांगितला आहे, तो पुढीलप्रमाणे -

महाराज म्हणतात, 'अंघोळ झाल्यावर तुमच्या मोरीत पाणी तसेच शिल्लक राहत असेल किंवा बादली आणि मग घेऊन तुम्ही अंघोळ करत असाल आणि बादलीत पाणी शिल्लक राहिले असेल तर तुमच्या वास्तू मध्ये नकारात्मक ऊर्जेला ती कारणीभूत ठरू शकते. 

ते सांगतात, शास्त्रानुसार काही सवयी अंगभूत असल्या पाहिजे, जसे की झोपून उठल्यावर अंथरूण आणि पांघरूण यांची घडी आपणच आपली घातली पाहिजे. अंघोळ झाल्यावर खराट्याने मोरी झाडून काढले पाहिजे. आपल्या आंघोळीचे पाणी मोरीत शिल्लक राहता कामा नये. एवढेच नाही, तर आपण वापरलेली पाण्याची बादली रिकामी करून ती पालथी घालून ठेवली पाहिजे. त्यातही पाणी शिल्लक राहता कामा नये. 

तार्किक दृष्ट्या विचार केला तर लक्षात येते, पाण्याने मोरी निसरडी होते आणि आपल्या नंतर येणारी व्यक्ती बेसावधपणे पाऊल टाकते. अशा वेळी अपघाताने पाय सटकून व्यक्ती पडण्याची शक्यता बळावते आणि डोक्याला मार लागू शकतो. म्हणून आपली अंघोळ झाल्यावर मोरी स्वच्छ करणे सर्वांच्याच हिताचे ठरते. तसेच आपण वापरलेली वस्तू आपण उचलून ठेवावी ही चांगली शिस्त आहे. त्यानुसार आपली बादली आणि मग रिकामा करून पालथा घालून ठेवला असता साचलेल्या पाण्यातून रोगराई पसरण्याचा धोका टळतो आणि नंतर येणाऱ्या व्यक्तीला स्वच्छ झालेली बादली, मग नव्याने वापरता येते. 

महाराज तिसरी चांगली सवय सांगतात, लहान मुलांना नकळत्या वयापासून कामाची आणि स्वावलंबनाची सवय लावा. प्रत्येक गोष्टीसाठी आई वडिलांवर अवलंबून ठेवू नका. स्वतःचे अन्न स्वतः ताटात वाढून घेणे, स्वतःच्या कपड्यांची घडी करणे, आपली खोली आवरणे आणि घरातील वडीलधाऱ्यांना यथाशक्ती मदत करणे. 

या तीन सवयी लहानपणापासून लावल्या तर आयुष्यभर कामी येतात आणि स्वावलंबन अंगी बाणल्यामुळे घरात कलह रुपी नकारात्मक ऊर्जा प्रवेश करत नाही. 

टीप : सदर माहिती व्हिडीओच्या आधारे दिलेली असून लोकमत सदर माहितीला पुष्टी देत नाही.

टॅग्स :Vastu shastraवास्तुशास्त्र