शहरं
Join us  
Trending Stories
1
सुटकेचा थरार! ओलीस ठेवलेल्या मुलांना सोडवण्यासाठी पोलिसांचा गोळीबार; आरोपी रोहित आर्यचा मृत्यू
2
IND vs AUS : ऑस्ट्रेलिया ऑलआउट! पण फायनलसाठी टीम इंडियासमोर सेट केलं ३३९ धावांचं टार्गेट
3
मुंबईत अपहरणाचा थरार: पोलिसांची एकीकडे आरोपीशी चर्चा, दुसरीकडे बाथरूमच्या खिडकीतून एन्ट्री
4
मंदिरांच्या भिंतीवर आय लव्ह मोहम्मद लिहिणारे हिंदू तरुण, पोलिसांनी ठोकल्या बेड्या; नावे आली समोर
5
IPL 2026: रोहित शर्मा KKRच्या वाटेवर? Mumbai Indiansची खास पोस्ट चर्चेत, नेमकं काय घडतंय?
6
"...पेक्षाही अधिक धाडस त्या महिलेत होतं"; इंदिरा गांधींचा उल्लेख करत राहुल गांधींचा पंतप्रधान मोदींवर हल्लाबोल
7
Crime: पतीच्या मृत्युनंतर पुन्हा पडली प्रेमात; ४० लाखांच्या विम्यासाठी एकुलत्या एक मुलाला संपवलं!
8
Phoebe Litchfield Fastest Century : फीबीचा 'ट्रॅविस हेड पॅटर्न'; विक्रमी शतकानंतर अतरंगी फटका मारताना फसली!
9
बिहारमध्ये प्रचारादरम्यान वाद, गोळीबारात प्रशांत किशोर यांच्या पक्षाच्या नेत्याचा मृत्यू  
10
नगराध्यक्ष निवडणुकीसाठी शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचा पहिला उमेदवार घोषित, दोन नावे होती चर्चेत 
11
पवईत मुलांना ओलीस ठेवणारा रोहित आर्य कोण?; शिक्षण विभागाशी समोर आले कनेक्शन, काय आहे प्रकार?
12
बीचवर स्टंट करणे तरुणाच्या अंगलट; 60 लाखांची मर्सिडीज समुद्रात अडकली, पाहा Video...
13
Rohit Pawar: रोहित पवार यांच्या अडचणीत वाढ, मुंबईत गुन्हा दाखल; नेमकं प्रकरण काय?
14
बाजारात 'ब्लॅक थर्सडे'! निफ्टी २६,००० च्या खाली; एकाच दिवसात गुंतवणूकदारांचे १.८२ लाख कोटी बुडाले
15
सोनं १ लाखाच्या खाली येणार, चांदीही चमक गमावणार, ही ४ कारणं निर्णायक ठरणार
16
'मी का लोकांच्या शिव्या खाऊ; यापुढे रस्ता खराब झाला तर...', नितीन गडकरींचा मोठा निर्णय, जाणून घ्या
17
KKR: आयपीएल २०२६ पूर्वी केकेआरच्या संघात मोठा बदल, अभिषेक नायरवर मोठी जबाबदारी!
18
Mumbai Children Hostage: ओलीस मुलांची सुखरुप सुटका; अपहरणकर्त्याला पोलिसांनी ताब्यात घेतले 
19
जिओचा 'या' २ राज्यात दबदबा! दोन कोटी ५१ लाखांहून अधिक युजर्स; एअरटेल-व्हीआयला मोठा फटका
20
Mumbai Hostage: बिग ब्रेकिंग! मुंबईत एका क्लासमधील मुलांना ओलीस ठेवण्यात आले; पोलिसांनी इमारत घेरली  

Vastu Shastra: सकाळी उठून चुकूनही पाहू नका 'या' गोष्टी; दिवस वाईट जाण्याची शक्यता!

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 22, 2023 07:00 IST

Vastu Tips: आपली संस्कृती आपल्याला प्रभाते करदर्शन अर्थात हाताचे दर्शन घ्या असं सांगते तर वास्तुशास्त्र पुढील वस्तूंचे दर्शन टाळायला सांगते. 

दिवस खराब गेला की त्याचे खापर फोडताना एक वाक्य आपण हमखास म्हणतो, 'आज सकाळी कोणाचे तोंड बघितले काय माहीत?' परंतु वास्तू शास्त्र सांगते, की सकाळी उठल्यावर केवळ व्यक्तीच नाही तर ठराविक वस्तूंचेही दर्शन टाळा. 

सकाळ प्रसन्नतेने झाली तर दिवस प्रसन्न जातो. यासाठी आपल्या पूर्वजांनी अन्य कोणत्याही गोष्टींचे दर्शन घेण्याआधी आपल्या हाताचे दर्शन घ्या असे सांगितले आहे. हाताचेच का? तर आपण हातांनी दिवसभर काम करतो. आपल्या हातांमध्ये श्रीकृष्ण, लक्ष्मी आणि सरस्वती या देवतांचा वास असतो. त्यांच्या कृपेने आणि त्यांच्या साक्षीने प्रत्येक काम चांगलेच घडावे यासाठी प्रभाते करदर्शन घ्यावे आणि जमिनीवर पाय ठेवण्याआधी तिला नमस्कार करावा असे आपले पूर्वज आपल्याला सांगत असत. आपण आताही या गोष्टीचे अनुसरण करू शकतो, त्याचबरोबर आपल्याला वास्तू शास्त्राने सांगितलेल्या गोष्टीही लक्षात ठेवल्या पाहिजेत. त्या पुढीलप्रमाणे-

आरसा : वास्तूनुसार सकाळी उठल्यावर आरशात तोंड पाहू नये. कारण सकाळी आपण आळसावलेले असतो. अशातच स्वतःला आळसावलेले पाहिले तर आळस आणखीनच अंगावर येऊ शकतो. यासाठी सकाळी उठल्यावर आरशात न पाहता आधी चेहरा पाण्याने स्वच्छ धुवा. मरगळ झटकून टाका आणि नंतर स्वतःला आरशात बघा. 

खरकटी भांडी : शास्त्रानुसार जेवण झाल्यावर भांडी खरकटी ठेवू नयेत असे म्हणतात. म्हणून पूर्वीच्या काळी जेवण झाल्या झाल्या भांडी घासून टाकली जात असे. मात्र आता सगळेच जण व्यस्त जीवन शैलीमुळे ठराविक कामे वेळच्या वेळी करू शकतीलच असे नाही. यावर पर्याय म्हणून भांड्यांमध्ये पाणी घालून ठेवा आणि सकाळी सकाळी ती निदर्शनास पडणार नाही याची काळजी घ्या. त्यामुळे नकारात्म ऊर्जा निर्माण होऊन दिवस खराब जाऊ शकतो. तोंड धुवून ताजेतवाने होईपर्यंत खरकटी भांडी दिसणार नाहीत याची काळजी घ्या. 

बंद घड्याळ : वास्तूनुसार घरात कधीही बंद घड्याळ लावू नये. जर तुम्ही सकाळी उठून बंद घड्याळ पाहिले, तर त्यावर विसंबून तुमचा दिवस उशिरा सुरु होऊ शकतो. त्यामुळे अन्य कामांमध्ये दिरंगाई होऊ शकते आणि त्यामुळे तुमची चिडचिड होऊ शकते. म्हणून घरात बंद घड्याळ असेल तर ते आधी दुरुस्त करा किंवा त्याजागी नवे घड्याळ लावा, मात्र जुने घड्याळ वापरू नका!

आक्रमक चित्र : आपली बुद्धी डोळ्याला दिसणारी प्रत्येकी छबी डोक्यात साठवून ठेवते आणि ती प्रतिमा आणि त्याच्याशी संबंधित विचार दिवसभर घोळवत ठेवते. म्हणून सकाळी उठल्यावर आणि रात्री झोपताना आपल्या डोळ्यासमोर प्रसन्न चित्राकृती असणे अत्यंत महत्त्वाचे आहे. म्हणून अधिकतर लोक देवाचे, लहान बाळांचे, निसर्गाचे, फुलांचे चित्र आपल्या बेडरूम मध्ये लावणे पसंत करतात. वास्तुशास्त्राच्या दृष्टीने ती योग्य निवड मानली जाते. 

टॅग्स :Vastu shastraवास्तुशास्त्र