शहरं
Join us  
Trending Stories
1
एअर इंडियाच्या जिवात जीव आला! बोईंग-787 विमानांत मोठी समस्या सापडली नाही; डीजीसीएकडून घोषणा
2
"सोनमनं दिली होती लग्न न करण्याची धमकी?", पोलिसांनी कुटुंबीयांना विचारले हे 10 प्रश्न!
3
F-35 Shot Down: इस्रायलचं पाचवं F-35 पाडलं, इराणच्या दाव्यानं अमेरिकेचं टेन्शन वाढलं! 
4
इस्राइलचा निशाणा 'सुप्रीम लीडर'वरच! खामेनेईंचा बंकर असलेल्या भागात केला बॉम्बचा मारा
5
फास्टॅग पास एक्स्प्रेस हायवे, समृद्धी, अटल सेतूवरही लागू होणार? जाणून घ्या, नेमका कुठे फायदा होणार
6
“भाजपा केवळ देशातील नव्हेच तर जगातील मोठा पक्ष, पण...”; जयंत पाटील नेमके काय म्हणाले?
7
Sonam Raghuvanshi : "आम्ही कोणतंही पाप केलेलं नाही..."; नार्को टेस्टच्या मागणीवर सोनम रघुवंशीचा भाऊ संतापला
8
“काँग्रेस दिशाहीन पक्ष”; CM फडणवीसांच्या उपस्थितीत जयश्रीताई पाटील यांचा भाजपा प्रवेश
9
एअर इंडियाच्या अपघातात विमा धारकाचाही मृत्यू अन् नॉमिनीचाही; विमा कंपन्या पेचात सापडल्या, इरडाचे तर स्पष्ट आदेश आहेत...
10
हजारो जीव वाचणार! आपत्कालीन परिस्थितीत विमानातील प्रवाशांचे केबिन वेगळे होणार, युक्रेनियन अभियंत्याने केले डिझाइन
11
"राजा भाई तुम तो गए...!" ...अन् अँकर गमतीत बोलला, ते खरं ठरलं; बघा संपूर्ण VIDEO 
12
जेव्हा James Bond चित्रपट सत्यात उतरतो; पहिल्यांदाच MI6 चे नेतृत्व एका महिलेकडे...
13
Video - जिंकलंत मित्रांनो! झोमॅटो डिलिव्हरी बॉयचे पाणावले डोळे, ग्राहकांनी दिलं मोठं सरप्राईज
14
काहीतरी विपरित घडणार? तामिळनाडूत आढळली Doomsday fish; सोशल मीडियावर वेगळीच चर्चा
15
लग्नासाठी गोव्याला घेऊन गेला, पण तिथेच नेऊन खेळ संपवला! माथेफिरू प्रियकराला अटक
16
१९९५पासूनचा बालेकिल्ला ढासळला, कोकणात ठाकरे गटाला धक्का; माजी आमदार, नेते NCP अजित पवार गटात
17
आतापर्यंत इस्रायलच्या हल्ल्यात इराणचे किती लोक मारले गेले? आकडा पाहून धक्का बसेल; तेहरान सोडून पळ काढणाऱ्यांचीही लागली रांग
18
इतिहासाची पुनरावृत्ती... तारीख, दिवस अन् घटनाही त्याच; ८४ वर्षापूर्वी घडलेले, सेम टू सेम...
19
एका दिवसांत किती वेळाही Toll क्रॉस करा; वार्षिक पासमुळे सामान्यांना काय होणार फायदा?

साईबाबा आपल्या भक्तांना कधीही विसरत नाही; वाचा, व्यापारी आणि दोन रुपयांची अद्भूत गोष्ट

By देवेश फडके | Updated: January 14, 2021 18:51 IST

साईबाबा आपल्या भक्तांना कधीही विसरत नाही, असा अनेकांचा अनुभव आहे. याचाच प्रत्यय एका व्यापाऱ्याला आला. नेमके काय घडले? वाचा...

ठळक मुद्देशिर्डीच्या साईबाबांची अज्ञात पण प्रेरणादायी कथासाईबाबा आपल्या भक्तांना कधीही विसरत नाहीत, असा अनेकांचा अनुभवव्यापाऱ्याचा आजारी मुलगा आणि दोन रुपयांची अद्भूत गोष्ट

शिर्डीचेसाईबाबा हे कोट्यवधी भाविकांचे आराध्य दैवत आहेत. जगभरात साईबाबांची मंदिरे उभारण्यात आली आहेत. साईबाबांच्या दरबारात सर्वांना येण्याची परवानगी दिली जाते. मग ती व्यक्ती कोणत्याही धर्माची, जातीची, पंथाची असो. साईबाबांनी आपल्या अनेक कृतीतून समाजाला उत्तमोत्तम उपदेश, शिकवण, बोध दिले आहेत. साईबाबा आपल्या भक्तांना कधीही विसरत नाही, असा अनेकांचा अनुभव आहे. याचाच प्रत्यय एका व्यापाऱ्याला आला. नेमके काय घडले? वाचा...

एका व्यापाऱ्याचा मुलगा खूप आजारी होता. किती काही केल्या त्याच्या आजाराचे निदान होत नव्हते. अनेक वैद्य करून झाले. मात्र, तरीही गुण येत नव्हता. व्यापारी साईबाबांचा मोठा भक्त होता. त्या मुलाला त्याने साईबाबांकडे नेण्याचे निश्चित केले. मुलाला घेऊन त्याने लगेचच शिर्डी गाठली. साईबाबांचरणी नतमस्तक होऊन मुलाच्या आजाराबाबत माहिती दिली. 

साईबाबांनी स्मितहास्य केले आणि मुलाला आशिर्वाद दिला. दिवस मावळला, तसे मुलाला बरे वाटू लागले. साईबाबांमुळे मुलगा बरा झाल्याचे त्याने गावभर सांगितले. मात्र, त्याला थांबवत साईबाबा म्हणाले की, सबका मालिक एक. केवळ परमेश्वरच एखाद्याला जीवन देऊ शकतो. यात माझे काही सामर्थ्य नाही. 

काही दिवस व्यापारी शिर्डीत राहिला. मुलाच्या आरोग्यात फरक पडलेला पाहून तो मुंबईला परतला. मुंबईत परतण्यापूर्वी त्या दोघांनी साईबाबांची भेट घेतली. तेव्हा साईबाबांनी त्याला तीन रुपये दिले आणि म्हणाले की, दोन रुपये मी तुला आधीच दिले आहेत. आता हे तीन रुपये घे आणि ते पूजास्थानी ठेव. देवाचे नामस्मरण कर. नेहमी चांगले कर्म कर. तुझे भले होईल, असा आशिर्वाद साईबाबांनी दिला. 

साईबाबांनी मला यापूर्वी कधी दोन रुपये दिले, हे त्या व्यापाऱ्याला काही केल्या आठवेना. या विचारातच त्याने मुंबई गाठली. घरी येऊन घडलेला सर्व प्रकार त्याने आपल्या आईला सांगितला. तेव्हा आईने एक जुनी आठवण त्याला सांगितली. आई म्हणाली की, बाळा, तू लहान असताना बराच आजारी होतास. तेव्हा तुझे वडील तुला साईबाबांकडे घेऊन गेले होते. त्यावेळेस साईबाबांनी तुला आशिर्वाद म्हणून दोन रुपये दिले होते. साईबाबा आपल्या भक्तांच्या मनाशी कायम जोडलेले असतात. म्हणूनच त्यांना प्रत्येक गोष्ट माहीत असते, असे आई म्हणाली. आईने सांगितलेली हकीकत ऐकून त्या व्यापारी आनंद झाला. भक्त आणि देवाचे नाते खूप मजबूत असते. भक्त जरी देवाला विसरला, तरी देव मात्र, त्यांना कधीच विसरत नाहीत. देव नेहमीच कठीण परिस्थितीत भक्ताच्या पाठीमागे खंबीरपणे उभे राहतात, यावरील त्याचा विश्वास आणखी दृढ झाला.

टॅग्स :saibabaसाईबाबाshirdiशिर्डी