शहरं
Join us  
Trending Stories
1
ब्रह्मोस एरोस्पेसच्या CEO ची नियुक्ती रद्द! 'कॅट'चा ऐतिहासिक निकाल; डॉ. जयतीर्थ जोशींना पदावरून हटवण्याचे आदेश
2
मनसे-उद्धवसेना युती ही आषाढीच्या घरी महाशिवरात्र; भाजपाने आकडेवारी देत ठाकरे बंधूंना डिवचले
3
मृत्यूशय्येवर होत्या, तरीही कालच दाखल केला उमेदवारी अर्ज! खालिदा झियांच्या मृत्यूने बांगलादेश नॅशनलिस्ट पार्टीचे मनसुबे धुळीस मिळाले
4
ATM कमी झाले, बँकेच्या शाखा वाढल्या; बचत खात्यांमध्ये मोठी वाढ, जमा रक्कम ३.३ लाख कोटींच्या पार
5
Video : मुंबईतील बस अपघाताचा व्हिडीओ आला समोर; भांडुपमध्ये रस्त्यावर उभ्या असलेल्या लोकांना बसने चिरडले
6
पहलगाम दहशतवादी हल्ल्याच्या समर्थकाला 'बांगलादेशी' सोडून घेऊन गेले, आसाम पोलिसांवर हल्ला; १० जणांना अटक
7
मनसे सोडल्यावर प्रकाश महाजन पहिल्यांदाच राज ठाकरेंवर थेट बोलले; म्हणाले, “विठ्ठलानेच...”
8
"मला तो सीन करायचा नव्हता पण, रणवीरने...", 'धुरंधर'मधल्या 'त्या' कामुक सीनबाबत अभिनेत्याचा मोठा खुलासा
9
९०% लोकांना माहीतच नाही iPhoneची 'ही' जादू! स्क्रीनला हात न लावता सेकंदात करता येते काम
10
Stock Market Today: मंथली एक्सपायरीवर निराशाजनक सुरुवात; Sensex १२० अंकांनी घसरला, Nifty मध्ये ४० अंकांची घसरण
11
बांगलादेशच्या उच्चायुक्तांनी दिल्ली सोडली! युनूस सरकारकडून तातडीने ढाका गाठण्याचे आदेश; नेमके कारण काय?
12
पोर्टफोलिओमध्ये करा 'हे' ५ बदल! संरक्षण आणि आयटी शेअर्समध्ये मोठी संधी; पाहा नवीन टार्गेट प्राईस
13
'ती' गेल्याचं ऐकलं अन प्रियकरानेही प्राण सोडले! हॉस्पिटलमधून पळाला अन् काही तासांतच…
14
Silver Price: २०२६ मध्ये चांदीची चमक होणार का कमी? एका झटक्यात ₹२४,४७४ ची घसरण, काय आहेत हे संकेत?
15
मोठी बातमी! ९१ ड्रोन... युक्रेनचा पुतीन यांना मारण्याचा प्रयत्न; निवासस्थानाजवळ घातकी ड्रोन पाडले अन्...
16
ब्रह्मपुत्रेच्या काठी हिंदूंच्या रक्ताचा पूर! २०० हून अधिक हल्ले, बांगलादेशातील 'या' जिल्ह्यात हिंदूंचे अस्तित्व धोक्यात
17
इराणवर सर्वात मोठा हल्ला होईल, तो थांबवता येणार नाही; डोनाल्ड ट्रम्प यांचे मोठे विधान
18
भारतातील १० सर्वात मोठ्या कंपन्यांच्या बाजार भांडवलात मोठा चढ-उतार, SBI च्या गुंतवणूकदारांना सर्वाधिक नुकसान
19
बांगलादेशच्या माजी पंतप्रधान बेगम खालिदा झिया यांचे ८० व्या वर्षी निधन; मुलगा १७ वर्षांनी परतताच...
20
हिंगोलीकरांची पहाट भीतीदायक! पिंपळदरी, नांदापूर परिसरात धरणी माता हादरली; पहाटे ५:५६ची ती वेळ...
Daily Top 2Weekly Top 5

साईबाबा आपल्या भक्तांना कधीही विसरत नाही; वाचा, व्यापारी आणि दोन रुपयांची अद्भूत गोष्ट

By देवेश फडके | Updated: January 14, 2021 18:51 IST

साईबाबा आपल्या भक्तांना कधीही विसरत नाही, असा अनेकांचा अनुभव आहे. याचाच प्रत्यय एका व्यापाऱ्याला आला. नेमके काय घडले? वाचा...

ठळक मुद्देशिर्डीच्या साईबाबांची अज्ञात पण प्रेरणादायी कथासाईबाबा आपल्या भक्तांना कधीही विसरत नाहीत, असा अनेकांचा अनुभवव्यापाऱ्याचा आजारी मुलगा आणि दोन रुपयांची अद्भूत गोष्ट

शिर्डीचेसाईबाबा हे कोट्यवधी भाविकांचे आराध्य दैवत आहेत. जगभरात साईबाबांची मंदिरे उभारण्यात आली आहेत. साईबाबांच्या दरबारात सर्वांना येण्याची परवानगी दिली जाते. मग ती व्यक्ती कोणत्याही धर्माची, जातीची, पंथाची असो. साईबाबांनी आपल्या अनेक कृतीतून समाजाला उत्तमोत्तम उपदेश, शिकवण, बोध दिले आहेत. साईबाबा आपल्या भक्तांना कधीही विसरत नाही, असा अनेकांचा अनुभव आहे. याचाच प्रत्यय एका व्यापाऱ्याला आला. नेमके काय घडले? वाचा...

एका व्यापाऱ्याचा मुलगा खूप आजारी होता. किती काही केल्या त्याच्या आजाराचे निदान होत नव्हते. अनेक वैद्य करून झाले. मात्र, तरीही गुण येत नव्हता. व्यापारी साईबाबांचा मोठा भक्त होता. त्या मुलाला त्याने साईबाबांकडे नेण्याचे निश्चित केले. मुलाला घेऊन त्याने लगेचच शिर्डी गाठली. साईबाबांचरणी नतमस्तक होऊन मुलाच्या आजाराबाबत माहिती दिली. 

साईबाबांनी स्मितहास्य केले आणि मुलाला आशिर्वाद दिला. दिवस मावळला, तसे मुलाला बरे वाटू लागले. साईबाबांमुळे मुलगा बरा झाल्याचे त्याने गावभर सांगितले. मात्र, त्याला थांबवत साईबाबा म्हणाले की, सबका मालिक एक. केवळ परमेश्वरच एखाद्याला जीवन देऊ शकतो. यात माझे काही सामर्थ्य नाही. 

काही दिवस व्यापारी शिर्डीत राहिला. मुलाच्या आरोग्यात फरक पडलेला पाहून तो मुंबईला परतला. मुंबईत परतण्यापूर्वी त्या दोघांनी साईबाबांची भेट घेतली. तेव्हा साईबाबांनी त्याला तीन रुपये दिले आणि म्हणाले की, दोन रुपये मी तुला आधीच दिले आहेत. आता हे तीन रुपये घे आणि ते पूजास्थानी ठेव. देवाचे नामस्मरण कर. नेहमी चांगले कर्म कर. तुझे भले होईल, असा आशिर्वाद साईबाबांनी दिला. 

साईबाबांनी मला यापूर्वी कधी दोन रुपये दिले, हे त्या व्यापाऱ्याला काही केल्या आठवेना. या विचारातच त्याने मुंबई गाठली. घरी येऊन घडलेला सर्व प्रकार त्याने आपल्या आईला सांगितला. तेव्हा आईने एक जुनी आठवण त्याला सांगितली. आई म्हणाली की, बाळा, तू लहान असताना बराच आजारी होतास. तेव्हा तुझे वडील तुला साईबाबांकडे घेऊन गेले होते. त्यावेळेस साईबाबांनी तुला आशिर्वाद म्हणून दोन रुपये दिले होते. साईबाबा आपल्या भक्तांच्या मनाशी कायम जोडलेले असतात. म्हणूनच त्यांना प्रत्येक गोष्ट माहीत असते, असे आई म्हणाली. आईने सांगितलेली हकीकत ऐकून त्या व्यापारी आनंद झाला. भक्त आणि देवाचे नाते खूप मजबूत असते. भक्त जरी देवाला विसरला, तरी देव मात्र, त्यांना कधीच विसरत नाहीत. देव नेहमीच कठीण परिस्थितीत भक्ताच्या पाठीमागे खंबीरपणे उभे राहतात, यावरील त्याचा विश्वास आणखी दृढ झाला.

टॅग्स :saibabaसाईबाबाshirdiशिर्डी