शहरं
Join us  
Trending Stories
1
Ajit Pawar : 'पवार साहेबांच्या तब्येतीची काळजी घ्यायला हवी होती, मी जर त्यांच्याबरोबर... '; अजितदादांनी सांगितला २००४ चा प्रसंग
2
आदित्य ठाकरेंचा भाजपा-मनसेवर हल्लाबोल; "ज्यांनी परप्रांतीयांना मारलं अशा मनसेचा..."
3
'मालेगावचा कट करकरेंमुळे उघडा पडला अन्...'; २६/११ चा उल्लेख करत ठाकरे गटाचा मोठा दावा
4
वांद्रे-वरळी सी-लिंक मुख्यमंत्र्यांच्या ताफ्याचा पाठलाग; आरोपी तरुणाला थांबविण्यासाठी रंगला थरार
5
HDFC च्या कोट्यवधी ग्राहकांसाठी मोठी बातमी! Car आणि Home Loan च्या ग्राहकांवर होणार परिणाम
6
'त्या' ५ जागांबाबत राजनाथ सिंह आणि शरद पवारांमध्ये फोनवरून चर्चा; प्रकाश आंबेडकरांचा दावा
7
पवार वि. पवार वादाला मतदार कंटाळला; बारामतीत टक्का घसरला
8
आजचे राशीभविष्य - ८ मे २०२४; धन - मान - सन्मान मिळतील, सरकार कडून फायदा होईल
9
ऐन लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर भाजप सरकार कोसळणार? हरयाणामध्ये तीन अपक्ष आमदारांनी काढला पाठिंबा
10
तीन ईव्हीएम जाळण्याचा प्रयत्न; तरुणावर गुन्हा दाखल; सोलापूर जिल्ह्यातील बागलवाडी येथील बूथवरील प्रकार
11
‘सेक्स स्कँडल’च्या २५,००० पेन ड्राइव्हचे पोलिसांनीच वाटप केले; कुमारस्वामी यांचा आरोप, मोदीही प्रथमच बोलले
12
अरविंद केजरीवाल यांना जामीन देण्यास सुप्रीम कोर्ट अनुकूल; पण...
13
'तुला सहानंतर कोण आहे? बारामतीचा कोण येत नाही'; आमदार दत्ता भरणेंची शरद पवार गटाच्या कार्यकर्त्याला शिवीगाळ
14
मतदानाच्या दिवशी बारामतीत नात्यांचा ट्विस्ट, सुप्रिया सुळेंनी घेतली अजित पवारांच्या आईची भेट; तर अजित पवार म्हणाले... मेरी माँ मेरे साथ है!
15
‘मुस्लीम आरक्षण’ नवा मुद्दा; प्रचारात होतोय वारंवार उल्लेख, मोदींच्या जाळ्यात विरोधक अडकले
16
१० लाख इनाम असलेल्या बासित दारसह ४ अतिरेकी चकमकीत ठार
17
४ जून ‘इंडिया आघाडी’ची एक्स्पायरी डेट : पंतप्रधान मोदी 
18
घराण्याचा वारसा जिंकणार की नव्या चेहऱ्याला कौल मिळणार? विखे-लंके लढत : महसूलमंत्र्यांची प्रतिष्ठा पणाला
19
‘बंगाली प्राइड’वर अन् विकास-अराजकतेमध्ये संघर्ष; दक्षिण बंगालच्या जागांवर तृणमूलची मदार
20
डाॅक्टरांच्या मनाईनंतरही धोनी खेळतोय आयपीएल; याच्या मांसपेशी फाटल्या

एकीच्या अध्यात्माने मोठं संकटसुद्धा जमिनीत गाडता येते

By ऑनलाइन लोकमत | Published: July 10, 2020 4:03 AM

एकीने जबर शत्रूलाही हरवू शकतो याचा गावकऱ्यांना विश्वास होता.

- विजयराज बोधनकरगावातल्या ‘त्या’ वाड्यात जायला गावकऱ्यांना एकप्रकारचं भय वाटायचे. हा तीन पिढ्यांचा प्रवास आहे. बाप गेल्यानंतर वारसाने मिळालेल्या इस्टेटीवर एकुलता एक मुलगा अधिराज्य व हुकुमशाही गाजवत होता. बापाने गरिबांवर सोडलेले हुकूम आणि बळजबरीचा अत्याचारच लहानपणापासून अनुभवले होता, त्याच संस्कारात तो वाढला होता. विषाच्या बाटलीतून काही अमृत बाहेर येणार नव्हते हे गावाला माहीत होते. पण भूतकाळात कधीकाळी अमृताच्या बाटलीचे रूपांतर विषाच्या बाटलीत झाल्याचे सा-या गावाने अनुभविले होते. या एकुलत्या एक नातवाचे आजोबा फार सद्गुणी होते, वारकरी होते. पण त्याची आजी मात्र फार कपटी आणि लोभी मनाची होती. तिच्या कपटी संस्कारातच पोटचा पोरगा लाडावला आणि मग नातू बिघडला. नातवाला इतरांचे तारूण्यही नासविण्याचे व्यसन लागले होते. घरात काम करणा-या गरीब भोळ्या स्त्रियांना फसवून तो अत्याचार करू लागला. कारण त्याला दौलतीने दंश केला होता. हळूहळू गावात त्याची धग जाणवू लागली. लोकांच्या मनात हळूहळू एक चीड निर्माण झाली होती. दौलतीने नातवाने रग्गड माणसे दावणीला बांधली असली तरी गावात एकीचे अध्यात्म विश्वासाचे होते. या एकीने जबर शत्रूलाही हरवू शकतो याचा गावकऱ्यांना विश्वास होता.गावातले पाप समूळ नष्ट करण्याचा गावाने विडा उचलला. एकीचे बळ खूप मोठे असते हे गावकरी जाणून होते. जुलुमाने हैवानाचे रूप घेतले आणि एक दिवस एका पीडित स्त्रीने बंड पुकारले. तिच्यामागे पूर्ण गाव उभा राहिला आणि त्या अत्याचारी नातवाच्या विरोधात गावाने पोलीस दरबारी रिपोर्ट केला. त्या निर्मळ स्त्रीवर झालेला बळजबरीच्या अत्याचाराच्या अर्जावर अर्ध्या गावाच्या सह्या केल्या गेल्या आणि या एकीमुळेच गाव सशक्त बनला. शापित संपत्ती शेवटी हरली. नातवाला तुरूंगाची हवा खावी लागली. तात्पर्य हेच की एकीच्या अध्यात्माने मोठं संकटसुद्धा जमिनीत गाडता येते.

टॅग्स :Adhyatmikआध्यात्मिक