शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ल्यानंतर भारताचा पाकवर कायदेशीर स्ट्राईक; पाकिस्तानची आज बैठक
2
आजचे राशीभविष्य, २४ एप्रिल २०२५: नोकरदारांना आजचा दिवस शुभ आहे
3
१५,००० जणांनी कॅन्सल केलं काश्मीरचे विमान तिकीट; पहलगाम हल्ल्यानंतर पर्यटनाचा बेत रद्द
4
Pahalgam Terror Attack: भारत झुकणार नाही, कुणालाही सोडणार नाही; गृहमंत्री अमित शाह यांचा इशारा
5
हादरलेल्या काश्मीरमध्ये आजही महाराष्ट्र, गुजरातचे २०,००० पर्यटक; हॉटेलमध्ये मुक्काम
6
धर्मादाय रुग्णालयांवर आता तपासणी पथकाचा वॉच; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे निर्देश
7
आम्ही आमच्या देशात सुरक्षित आहोत का?; डाेंबिवलीकरांचा संंतप्त सवाल
8
अजूनही पर्यटकांची पहिली पसंती काश्मीरलाच; हल्ल्याचा परिणाम तात्पुरता, सर्व सुरळीत होण्याची आशा
9
‘जशास तसे’ व ‘लक्षात राहील’ असे उत्तर देणे; पाकिस्तानला धडा शिकवावा लागेलच, पण...
10
‘आपल्या’ इतकाच राग, तितकेच दु:ख ‘त्यांना’ही आहे; १९ वेळा दहशतवाद्यांनी मला उचलून नेले
11
स्वीडनमधील हे जोडपं देश सोडून पळालं, मात्र जाताना १५८ पिंप मानवी विष्ठा मागे ठेवले
12
Pahalgam Terror Attack: मॅच आधी खेळाडूंनी दहशतवादी हल्ल्यातील मृत पर्यटकांना वाहिली श्रद्धांजली
13
बिल क्लिंटन भारतात येण्यापूर्वी झाली होती ३६ शीखांची हत्या; २५ वर्षांनी पहलगाममध्येही तेच घडलं
14
Pahalgam Terror Attack : सुट्टी घेऊन अमेरिकेहून काश्मीर फिरण्यासाठी आला अन् दहशतवादी हल्ल्यात जीव गमावला
15
पहलगाम हल्ला: २४ तासांनंतर बांगलादेशची पहिली प्रतिक्रिया आली; मोहम्मद युनूस म्हणाले...
16
कुलगाममध्ये मोठी चकमक सुरु; पहलगाममध्ये हल्ला करणाऱ्या टीआरएफच्या कमांडरला घेरले
17
"निष्पाप भारतीयांना मारणं हाच पाकिस्तानचा राष्ट्रीय खेळ, आता..."; भारतीय क्रिकेटरला राग अनावर
18
“पंतप्रधानांनी खंबीर भूमिका घ्यावी, २६चा बदला २६०ने घेतला पाहिजे”; शिंदेसेनेचे नेते संतापले
19
"हे सरकार हिंदुत्वाबद्दल बोलतंय, त्यामुळे मुस्लिमांना कमकुवत झाल्यासारखं वाटतंय"; 'पहलगाम'बाबत रॉबर्ट वाड्रा यांचं विधान चर्चेत
20
"यांचा सामना कसा करायचा? भारताला चांगलं ठाऊक, आम्हीही सोबत...!"; पहलगाम हल्ल्यानंतर भारताच्या खास मित्राचं आश्वासन

विश्वविजेता गुकेशप्रमाणे आपल्याही मुलांना ध्येयनिष्ठ बनवण्यासाठी आवर्जून सांगा 'ही' बोधप्रद गोष्ट!

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 14, 2024 08:30 IST

Motivational Story: आपल्या मुलांनी त्यांच्या क्षेत्रात विश्वविक्रम करावा असे वाटत असेल तर त्यांना ध्येयनिश्चिती कशी करावी हे शिकवणारी पुढील गोष्ट नक्की सांगा!

१८ व्या वर्षी जागतिक बुद्धिबळ स्पर्धा जिंकून डी. गुकेश विश्वविजेता झाला. हे ध्येय गाठायचे हे त्याने बालपणीच ठरवले होते. त्यासंदर्भात अनेक मुलाखती आपणही पाहिल्या असतील. आजच्या रिल्स युगाचा प्रतींनिधी असूनही इतर मुलांसारखा वेळ वाया न घालवता त्याने आपले ध्येय निश्चित केले आणि साध्यही केले. यासाठी त्याने कठोर परिश्रम घेतले. त्या परिश्रमाचे चीज झाले. आपल्याही मुलांनी त्यांच्या क्षेत्रात विश्वविजेता व्हावे असे वाटत असेल तर त्यांना पुढे दिलेली बोधप्रद कथा जरूर सांगा!

एकदा एका गुरूंनी आपल्या शिष्याला धनुर्विद्येच्या प्रशिक्षणाकरिता बोलावून घेतले. वास्तविक पाहता शिष्याचे सर्व धडे गिरवून झाले होते. याआधी गुरूंच्या धनुर्विद्येचे सादरीकरणही त्याने अनेकदा पाहिले होते. तरीदेखील गुरुआज्ञा पाळण्यासाठी तो गुरूंनी बोलावलेल्या वेळी आणि बोलावलेल्या जागी पोहोचला. 

गुरूंच्या खांद्यावर धनुष्य आणि हातात बाण होते. गुरूंनी दूरवरच्या एका झाडावरील फळावर निशाणा धरायचा असे ठरवले. हा प्रयोग सुद्धा गुरूंनी अनेकदा यशस्वीपणे पार पाडला होता. मग आज नवीन काय शिकायला मिळणार याबद्दल शिष्याच्या मनात कुतूहल होते. नेहमीच्या जंगलात सरावाच्या ठिकाणी पोहोचल्यावर गुरूंनी शिष्याच्या हाती एक रुमाल दिला आणि तो त्यांच्या डोळ्यावर बांधायला सांगितला. शिष्याने तो बांधला. 

गुरुजींनी बाण धनुष्यावर चढवला आणि झाडाचा वेध घेऊन सोडला. बाण सोडल्यावर त्यांनी डोळ्यावरचा रुमालही काढला आणि आपला नेम अचूक लागला की नाही हे बघायला शिष्याला पाठवले. शिष्य उत्सुकतेने गेला. दूर वर पोहोचूनसुद्धा त्याला बाण आढळला नाही आणि फळही आढळले नाही. बराच वेळ शोधून तो परतला. गुरुजींनी त्याला विचारले, 'अचूक बाण लागला ना?'शिष्य मान खाली घालून म्हणाला, 'नाही गुरुजी, यंदा बहुतेक नेम चुकला. फळच काय, मला बाणही आढळला नाही.'गुरुजी म्हणाले, 'वेड्या यात नाराज होण्याचे काय कारण? आज हाच धडा शिकवायला तुला बोलावले होते.'

शिष्याच्या चेहऱ्यावरचे प्रश्नचिन्ह बघत गुरुजींनी खुलासा केला, 'आज माझा नेम चुकला कारण माझं ध्येय मी पाहू शकत नव्हतो. आपल्याला आपल्या आयुष्याचे ध्येय दिसत नसेल तर हवेत सोडलेले बाण असेच भरकटत जातील. म्हणून डोळ्यावर पट्टी न बांधता उघड्या डोळ्यांनी आधी ध्येय निश्चित कर. त्यादृष्टीने प्रयत्न कर. ध्येयावर लक्ष केंद्रित कर. तर आणि तरच तुझा नेम अचूक ठरेल!'

हा पाठ आपल्यालाही आयुष्यातील ध्येय निश्चितीचे महत्त्व सांगून जातो. आपण रोज उठतो, जेवतो, झोपतो पण या पलीकडे आपण आपले ध्येय निश्चित केलेच नसेल तर अशा रोजच्या जगण्याला काहीच अर्थ राहणार नाही. म्हणून रोज नवीन ध्येय, नवीन स्वप्नं उराशी बाळगून दिवसाची मस्त सुरुवात करा आणि ध्येयाच्या दिशेने अचूक आणि अविरत मेहनत करा. 

टॅग्स :Inspirational Storiesप्रेरणादायक गोष्टी