शहरं
Join us  
Trending Stories
1
सज्ज राहा...सीमेवर पाकसोबत संपूर्ण युद्ध नव्हे, तर कारगिलसारखे लहान युद्ध होऊ शकते
2
उरलेसुरले अस्तित्वही पूर्णपणे उद्ध्वस्त करण्याची हीच ती वेळ; PM नरेंद्र मोदींचा निर्धार
3
भारत-पाक यांच्यात संघर्ष वाढणार; सिंधू जल अन् सिमला करार स्थगित केल्याने काय होईल?
4
एक घाव अन् दोन तुकडेच! भारताला फक्त प्रतिकारात्मक नव्हे, तर प्रतिबंधात्मक पावले उचलावी लागतील
5
आम्ही कायम तुमच्यासोबत... दहशत झुगारून काश्मिरात देशभरातून पर्यटकांचा ओघ कायम! 
6
आम्ही कपाळाच्या टिकल्या काढल्या, तरी मारले...; गनबोटे यांच्या पत्नी संगीता यांची आपबीती
7
‘राग’ येऊ द्या, पण आपल्याच पायावर कुऱ्हाड मारू नका; पर्यटनस्थळी जागता पाहारा का नाही?
8
Pahalgam Attack: ‘मिनी स्वित्झर्लंड’ला इतकी मोठी गर्दी असताना एकही लष्करी जवान नव्हता
9
महाराष्ट्राची भाग्यरेषा उजळणार, ‘समृद्धी’चा अंतिम टप्पा लोकार्पणाच्या उंबरठ्यावर
10
‘आई’वर कुरघोडी करू पाहणाऱ्या ‘मावशी’चा राग; हिंदी सक्तीचा परस्पर GR काढला कुणी?
11
"लोकांच्या टॅक्समधून विमानसेवा; तुम्ही घरून पैसे भरले नाहीत"; नरेश म्हस्केंवर रोहिणी खडसेंची टीका
12
श्रीनगर येथे DCM एकनाथ शिंदे सक्रीय, १८४ जणांना सुखरूप पाठवले; जखमींची केली विचारपूस
13
आता ना LOC, ना...! काय आहे शिमला करार, जो रद्द करण्याची धमकी देतोय पाकिस्तान? भारताच्या पथ्थ्यावर?
14
मस्तच! कडू लागणाऱ्या 'डार्क चॉकलेट'चे गोड आरोग्यदायी फायदे; वजन कमी करायचं असेल तर...
15
पहलगाम हल्ला: दिल्लीत सर्वपक्षीय बैठक, ठाकरे गटाचे नेते गैरहजर; पत्र पाठवले अन् म्हणाले...
16
"Today I Say to the Whole World..."; बिहारच्या भाषणात PM मोदी इंग्रजी का बोलले? यामागे आहे खास कारण
17
“अचानक गोळीबार झाला, २ लहान मुले सोबत होती अन्....”; देवदूत ठरला गाइड, ११ जणांचे जीव वाचवले
18
चुकून सीमा ओलांडून पाकिस्तानात पोहोचला बीएसएफ जवान; पाकिस्तानी रेंजर्सनी घेतले ताब्यात
19
“आता कलमा वाचायला शिकतोय, कधी कामी येईल माहिती नाही”: भाजपा खासदार निशिकांत दुबे
20
"अख्खं हॉटेल रिकामं, सकाळी ६ वाजता रुमचं दार वाजलं अन्...", कल्याणमधील जोडप्याचा जम्मू-काश्मीरमधील भयावह अनुभव

Think Positive: सहलीला जाताना होणारा आनंद ऑफिसला जाताना का टिकत नाही? त्यामागे आहे 'हे' मुख्य कारण!

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 13, 2023 12:46 IST

Think Positive: रोज अलार्म होऊनही तो बंद करून झोपणारे आपण सहलीला जाताना अलार्म वाजण्याआधी उठतो; ती जादू रोज होण्यासाठी वाचा ही गोष्ट!

रोजचे ऑफिस, रोजची शाळा, रोजचे काम यातून आपल्याला ब्रेक हवा असतो, त्यामुळे आपण कधी घरच्यांबरोबर तर कधी मित्रमैत्रिणींबरोबर तर कधी सोलो ट्रिपला जातो आणि मोकळेपणाची भरपूर ऊर्जा साठवून पुढच्या ब्रेकची वाट बघू लागतो. पण आपले रोजचेच जगणे उत्साहाचे बनवता आले तर? सहलीचा आनंद एक दिवसापुरता न राहता तो रोज उपभोगता येईल. पण कसा? ते जाणून घेण्यासाठी वाचा ही गोष्ट!

एकदा एक यात्री प्रवासाला निघाला होता. वाटेत एक घर पाहून तो काही काळ विश्रांतीसाठी थांबला. घरात एक साधू राहत होते. मात्र घर, संसाराच्या काहीच खुणा त्या घरात दिसत नव्हत्या. निदान एखादा पलंग, उशी, चादरी तरी! त्या यात्रीने साधू बाबांना विचारले, 'बाबा, तुम्ही नक्की या घरात राहता ना? मग तुमचे सामान कुठे?'

त्याला उत्तर देण्याऐवजी साधू बाबा त्याला म्हणाले, 'माझे सोड तुझा पलंग, उशी, चादर कुठे?'

तो यात्री हसून म्हणाला, 'बाबा, मी एक यात्री आहे, यात्रेत जेवढे सामान कमी तेवढा यात्रेचा आनंद जास्त!'

साधू बाबा म्हणाले, 'मी सुद्धा एक यात्रीच आहे, जेवढे सामान कमी तेवढा आनंद जास्त!"

या गोष्टीवरून लक्षात येते, की जगण्यासाठी पूरक गोष्टी मिळाल्या तरी त्यात आपण समाधानी राहू शकतो, अति सामान असो नाहीतर अति विचार असो ते ओझे आपल्याला मानवत नाही, म्हणून प्रवासापेक्षा जास्त थकवा त्या ओझ्यामुळे आपल्याला येतो. 

सहलीला जाताना शेकडो छोट्या मोठ्या गोष्टी आपल्याला न्याव्याशा वाटतात, मात्र बॅग जड होऊ लागली आणि ती आपल्यालाच पाठीवर उचलून प्रवास करायचा आहे याची कल्पना आल्यावर आपण त्याच आवश्यक गोष्टीतून अनावश्यक किंवा पुढच्या वाटेवर मिळू शकतील अशा गोष्टींचे ओझे कमी करतो आणि सुटसुटीत बॅग पॅकिंग करतो. 

रोजची ऑफिस बॅग सहलीच्या बॅगेच्या तुलनेत हलकी असते, पण सहलीला जाताना मनावरचे ओझे कमी असल्याने पाठीवरचे ओझे जड वाटत नाही. याउलट ऑफिसला जाताना पाठीवर कमी आणि मनावर विचारांचे ओझे लादून घेतलेले असते. 

अति विचार किंवा अति काळजी हे विनाकारण मनावर घेतलेले ओझे आहे. ठराविक मर्यादेपर्यंत आपण ते ओझे पेलू शकतो. मात्र ज्या क्षणी आपण ते ओझे उतरवायला शिकतो, तिथून आपला प्रवास सोपा आणि आनंददायी होतो.

त्यामुळे नोकरी असो नाहीतर शाळा, कॉलेज किंवा घरकाम, मनावर ओझे बाळगून ते करायचे नाही तर आनंदाने करायचे. रोज नवे काही शिकायचे. आपल्या आनंदाच्या वाटा आपण शोधायच्या. एकदा का ही कला अवगत झाली की आपले रोजचे जगणे सहलीसारखे उत्साहवर्धक झालेच म्हणून समजा!

टॅग्स :Inspirational Storiesप्रेरणादायक गोष्टी