शहरं
Join us  
Trending Stories
1
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
2
होर्मुजच्या समुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
3
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
4
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
5
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
6
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
7
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
8
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
9
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
10
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
11
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
12
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
13
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
14
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
15
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
16
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
17
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
18
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
19
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
Daily Top 2Weekly Top 5

'अति घाई संकटात नेई' हा संदेश केवळ महामार्गावर नाही, तर आयुष्यातही महत्त्वाचा!

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 4, 2023 13:26 IST

समृद्धी महामार्गावरील अपघाताची कारणे समोर येत असताना त्या प्रसंगातून आपल्याला मोठा बोध घ्यायला हवा; कोणता ते जाणून घ्या!

समृद्धी महामार्गावरील अपघाताच्या बातम्यांनी संपूर्ण महाराष्ट्र गहिवरून गेला आहे. यात कोणी चालकाला दोष आहे, कोणी वाहन मालकाला तर कोणी समृद्धी महामार्ग बनवणाऱ्यांना! वास्तविक पाहता या घटनेतून समोर आलेल्या कारणावरून मुख्य कारण लक्षात घेतले पाहिजे, तो म्हणजे सावध पवित्रा! म्हणून महामार्गावर आपल्याला ठराविक अंतरावर वेग नियंत्रणात आणण्यासाठी सूचक फलक लावलेले दिसतात. त्या फलकावर दिलेल्या सूचनांचे पालन केले तर केवळ प्रवासच नाही तर आयुष्यात होणारे अपघातही सहज टाळता येतील. कसे ते पहा!

दोन साधू प्रवासाला निघाले होते. वाटेत त्यांना एक नदी पार करायची होती. त्या नदीच्या पलीकडे एक द्वार होते. तिथल्या गावाचा नियम होता की सायंकाळी ते द्वार बंद होते व त्यानंतर गावात कोणालाही प्रवेश मिळत नाही. आधीच उशीर झाल्याने दोन साधू एका नाविकाच्या नावेत बसले आणि त्यांनी नाविकाला लवकर लवकर नाव वल्हवत दुसऱ्या तीरावर न्यायला सांगितली. तो संथ गतीने नाव वल्हवत होता. ते पाहून साधू चिडले आणि म्हणाले, आम्ही तुला आमची अडचण सांगतोय तरी तू तुझ्या मनासारखंच वागतोयस, त्याची शिक्षा पुढे आम्हाला भोगावी लागेल!' त्यावर नाविक शांतपणे म्हणाला, महाराज मला वेळेचा पुरेपूर अंदाज आहे, आपण काळजी करू नका, मी वेळेत तुम्हाला तिथे पोहोचवतो. उगीच घाई गड्बगड केली तर होणारे काम बिघडेल आणि तुमची गैरसोय होईल. म्हणून मला माझ्या गतीने चालवू द्या!'

साधूंचा नाईलाज होता. शांत बसण्याशिवाय पर्याय नव्हता. नाविकाला रोजची सवय असल्याने त्याने वेळेत दोघांना दुसऱ्या तीरावर आणून सोडले. साधूंच्या चेहऱ्यावर द्वार बंद होण्याची धाकधूक होती. जेमतेम त्याला मोबदला देऊन दोघे झपझप पावले टाकत द्वाराच्या दिशेने निघाले. त्या गडबडीत एक साधू ठेचकाळून पडले. दुसऱ्याने नाविकाला हाक मारून बोलवून घेतले. त्यांना सावरून तिघे जण द्वाराच्या दिशेने चालू लागले आणि द्वारापर्यंत सोडल्यावर नाविक म्हणाला, 'महाराज आता गावात गेल्यावर उपचार करून घ्या. याबरोबरच एक गोष्ट लक्षात ठेवा, अति घाई संकटात नेई! सगळीकडे घाई करून उपयोग नसतो. काही गोष्टी धीराने, संयमाने घ्याव्या लागतात, तरच काम नीट होते. 

म्हणून महत्त्वाची कामे करताना शांत डोक्याने काम करा अशी सूचना मोठयांकडून दिली जाते. नाविकाचा हा सल्ला केवळ साधूंनी नव्हे तर आपणही लक्षात घेण्यासारखा आहे. नको तिथे केलेली घाई सर्वांना महाग पडू शकते. यासाठी मनावर संयम बाणायला हवा. समोर गुळगुळीत रस्ता दिसला म्हणून तुफान वेगाने गाडी पळवण्यापेक्षा आपल्या गाडीची क्षमता लक्षात घ्यायला हवी आणि आपल्यावर इतरांचे प्राण विसंबून आहेत या जबाबदारीची जाणीव ठेवायला हवी. तरच प्रवास सहलीचा असो नाहीतर आयुष्याचा, तो सुखकरच होईल हे नक्की!

टॅग्स :Inspirational Storiesप्रेरणादायक गोष्टीSamruddhi Mahamargसमृद्धी महामार्ग