शहरं
Join us  
Trending Stories
1
"मतदार याद्यांमधले घोळ आम्हीही दाखवले, पण..."; महापालिका निवडणुकांच्या घोषणेवर CMचे विधान
2
Municipal Election 2026 Dates: 'महा'संग्रामाचा शंखनाद! BMCसह राज्यातील २९ महापालिकांसाठी १५ जानेवारीला मतदान, १६ जानेवारीला निकाल
3
"विविहित महिलांनी घरात...", विजयाच्या नशेत केरळच्या सीपीएम नेत्याचं वादग्रस्त विधान; उडाला गोंधळ
4
"हा प्रकार केवळ बेजबाबदारपणा नसून..."; उद्धवसेनेचं राज्य निवडणूक आयुक्तांना खरमरीत पत्र
5
पंतप्रधान मोदींमुळेच CBSE च्या पुस्तकात छत्रपतींचा २१ पानांचा जाज्वल्य इतिहास - देवेंद्र फडणवीस
6
सलग दुसऱ्या आठवड्याची सुरुवात घसरणीने! 'या' ३ कारणांमुळे बाजारात चांगली रिकव्हरी
7
IPL 2026 Mock Auction : CSK ची थट्टा? KKR नं ऑस्ट्रेलियन खेळाडूवर लावली ३०.५० कोटींची विक्रमी बोली!
8
भारतीय ऑटो बाजारातील सर्वात मोठी बातमी! फोक्सवॅगनची हजारो कर्मचाऱ्यांना व्हीआरएसची ऑफर, फोर्डच्याच वाटेवर?
9
पुतिन मायदेशी परतताच भारताने तयार केली ३०० वस्तूंची यादी, काय आहे केंद्र सरकारचा प्लॅन
10
१६ डिसेंबर पासून सुरु होत आहे धनुर्मास; आहार, आरोग्य, लक्ष्मी उपासनेसाठी महत्त्वाचा महिना!
11
Shaheen Afridi: शाहीन आफ्रिदीचा अपमान; बिग बॅश लीगमध्ये गोलंदाजी करण्यापासून रोखलं! नेमकं प्रकरण काय?
12
भारताच्या निर्यातीला मोठा 'बूस्ट'! नोव्हेंबरमध्ये १९.३७% ची वाढ; व्यापार तुटीतही मोठा दिलासा
13
MNS: मनपा निवडणुकीच्या घोषणेपूर्वी मोठा राडा! आयोगाच्या कार्यालयात मनसेची तोडफोड, काय घडलं?
14
याला म्हणतात ढासू स्टॉक...! पॉवर कंपनीचा शेअर बनला रॉकेट, 30% नं वधारला; दिलाय 6500% चा बंपर परतावा, करतोय मालामाल
15
"मुलाचे कान धरू शकतो, सूनेचे धरू शकत नाही; मी उद्धव ठाकरेंना कॉल करून..."; विनोद घोसाळकरांच्या डोळ्यात पाणी
16
'मनरेगा' बंद! मोदी सरकार आणणार 'विकसित भारत-जी राम जी' योजना; राज्यांवर पडणार अतिरिक्त भार
17
"मी पोहून आलो, सकाळी घरी..."; बॉन्डी बीचवर हल्ला करण्यापूर्वी दहशतवाद्याचा आईला कॉल
18
लेडी सेहवागची कमाल! वर्ल्ड कपमध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री; एका मॅचमधील धमाक्यासह जिंकला ICC पुरस्कार
19
ना स्वतःचे विमानतळ, ना चलन, ना भाषा..; तरीदेखील 'हा' आहे युरोपमधील सर्वात श्रीमंत देश
20
Astrology: नवीन वर्षात नवीन वास्तूमध्ये प्रवेश करण्यासाठी २०२६ मधील तारखा आणि शुभ मुहूर्त 
Daily Top 2Weekly Top 5

'अति घाई संकटात नेई' हा संदेश केवळ महामार्गावर नाही, तर आयुष्यातही महत्त्वाचा!

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 4, 2023 13:26 IST

समृद्धी महामार्गावरील अपघाताची कारणे समोर येत असताना त्या प्रसंगातून आपल्याला मोठा बोध घ्यायला हवा; कोणता ते जाणून घ्या!

समृद्धी महामार्गावरील अपघाताच्या बातम्यांनी संपूर्ण महाराष्ट्र गहिवरून गेला आहे. यात कोणी चालकाला दोष आहे, कोणी वाहन मालकाला तर कोणी समृद्धी महामार्ग बनवणाऱ्यांना! वास्तविक पाहता या घटनेतून समोर आलेल्या कारणावरून मुख्य कारण लक्षात घेतले पाहिजे, तो म्हणजे सावध पवित्रा! म्हणून महामार्गावर आपल्याला ठराविक अंतरावर वेग नियंत्रणात आणण्यासाठी सूचक फलक लावलेले दिसतात. त्या फलकावर दिलेल्या सूचनांचे पालन केले तर केवळ प्रवासच नाही तर आयुष्यात होणारे अपघातही सहज टाळता येतील. कसे ते पहा!

दोन साधू प्रवासाला निघाले होते. वाटेत त्यांना एक नदी पार करायची होती. त्या नदीच्या पलीकडे एक द्वार होते. तिथल्या गावाचा नियम होता की सायंकाळी ते द्वार बंद होते व त्यानंतर गावात कोणालाही प्रवेश मिळत नाही. आधीच उशीर झाल्याने दोन साधू एका नाविकाच्या नावेत बसले आणि त्यांनी नाविकाला लवकर लवकर नाव वल्हवत दुसऱ्या तीरावर न्यायला सांगितली. तो संथ गतीने नाव वल्हवत होता. ते पाहून साधू चिडले आणि म्हणाले, आम्ही तुला आमची अडचण सांगतोय तरी तू तुझ्या मनासारखंच वागतोयस, त्याची शिक्षा पुढे आम्हाला भोगावी लागेल!' त्यावर नाविक शांतपणे म्हणाला, महाराज मला वेळेचा पुरेपूर अंदाज आहे, आपण काळजी करू नका, मी वेळेत तुम्हाला तिथे पोहोचवतो. उगीच घाई गड्बगड केली तर होणारे काम बिघडेल आणि तुमची गैरसोय होईल. म्हणून मला माझ्या गतीने चालवू द्या!'

साधूंचा नाईलाज होता. शांत बसण्याशिवाय पर्याय नव्हता. नाविकाला रोजची सवय असल्याने त्याने वेळेत दोघांना दुसऱ्या तीरावर आणून सोडले. साधूंच्या चेहऱ्यावर द्वार बंद होण्याची धाकधूक होती. जेमतेम त्याला मोबदला देऊन दोघे झपझप पावले टाकत द्वाराच्या दिशेने निघाले. त्या गडबडीत एक साधू ठेचकाळून पडले. दुसऱ्याने नाविकाला हाक मारून बोलवून घेतले. त्यांना सावरून तिघे जण द्वाराच्या दिशेने चालू लागले आणि द्वारापर्यंत सोडल्यावर नाविक म्हणाला, 'महाराज आता गावात गेल्यावर उपचार करून घ्या. याबरोबरच एक गोष्ट लक्षात ठेवा, अति घाई संकटात नेई! सगळीकडे घाई करून उपयोग नसतो. काही गोष्टी धीराने, संयमाने घ्याव्या लागतात, तरच काम नीट होते. 

म्हणून महत्त्वाची कामे करताना शांत डोक्याने काम करा अशी सूचना मोठयांकडून दिली जाते. नाविकाचा हा सल्ला केवळ साधूंनी नव्हे तर आपणही लक्षात घेण्यासारखा आहे. नको तिथे केलेली घाई सर्वांना महाग पडू शकते. यासाठी मनावर संयम बाणायला हवा. समोर गुळगुळीत रस्ता दिसला म्हणून तुफान वेगाने गाडी पळवण्यापेक्षा आपल्या गाडीची क्षमता लक्षात घ्यायला हवी आणि आपल्यावर इतरांचे प्राण विसंबून आहेत या जबाबदारीची जाणीव ठेवायला हवी. तरच प्रवास सहलीचा असो नाहीतर आयुष्याचा, तो सुखकरच होईल हे नक्की!

टॅग्स :Inspirational Storiesप्रेरणादायक गोष्टीSamruddhi Mahamargसमृद्धी महामार्ग