शहरं
Join us  
Trending Stories
1
जागे राहा, सतर्क राहा, महाराष्ट्र विकला जाऊ देऊ नका; मनसे प्रमुख राज ठाकरेंचं जनतेला आवाहन
2
नव्या भारताकडे दहशवाद्यांना मातीत गाडण्याची अन् शत्रूला घरात घुसून संपवण्याची क्षमता- योगी आदित्यनाथ
3
मुंबईत शिंदेसेना आक्रमक, काँग्रेसच्या टिळक भवनावर मोर्चा; पोलिसांनी कार्यकर्त्यांना रोखले
4
शाळांना राजकारणापासून दूर ठेवा; आंध्र प्रदेश सरकारचा कौतुकास्पद निर्णय, नवी नियमावली वाचा
5
रशियाकडून कच्चं तेल खरेदी करणं बंद केलंय का? ट्रम्प यांच्या दाव्यावर भारतानं दिलं उत्तर
6
राज्यसभेत भाजपाचं 'शतक' पार! ३ वर्षांनी पुन्हा गाठली शंभरी; 'असा' रेकॉर्ड करणारा दुसरा पक्ष ठरला
7
Shravan Shanivar 2025: श्रावण शनिवारी केलेले 'हे' सोपे उपाय देतात शनी पीडेपासून मुक्ती!
8
एका बॅगेमुळे नवी दिल्ली स्टेशनवर झाला १८ जणांचा मृत्यू; रेल्वे मंत्र्यांनी लोकसभेत दिली अपघाताची माहिती
9
२०१५मध्ये ड्रायव्हिंग लायसन्स, २०२०मध्ये पासपोर्टही बनवला; १० वर्षे भारतात लपून राहिलेला अफगाणी कसा पकडला गेला?
10
'या' देशात राहातात सर्वाधिक लिव्ह-इन रिलेशनशिप जोडपी, भारतात हा ट्रेंड किती?
11
अबब! मंदिराला मिळालेलं दान पाहून डोळे दीपतील; २८ कोटींची रोकड, सोने-चांदीचीही कमी नाही
12
'एकाच शॉटमध्ये दोन पुरुषांसोबत टॉपलेस सीन केला अन्...', मराठी अभिनेत्रीचा खुलासा
13
Tarot Card: पुढचा सप्ताह, वेगवान घडामोडींचा; नक्की काय काय घडणार? वाचा टॅरो भविष्य
14
रिकाम्या दारूच्या बाटलीवर मिळणार २० रुपये कॅशबॅक; 'या' राज्य सरकारनं आणली अजब योजना
15
Viral Video : इंडिगोच्या विमानात प्रवाशाने दुसऱ्या प्रवाशाच्या कानशिलात लगावली; मोठा राडा, व्हिडीओ व्हायरल
16
४००० कोटींच्या 'रामायण'साठी रणबीर कपूरने 'या दिग्गज गायकाचा' बायोपिक सोडला, अनुराग बसू म्हणाले..
17
Anil Ambani: अनिल अंबानींसमोरील समस्या वाढल्या, समन नंतर आता लुकआऊट सर्क्युलर जारी
18
भारतात पहिल्यांदा पार पडली 'लॅप्रोस्कोपिक' शस्त्रक्रिया; 'श्री' नावाच्या कासवाला मिळाली संजीवनी
19
शाहरुख खानला 'जवान'साठी राष्ट्रीय पुरस्कार, मात्र चाहत्यांनी विचारले भलतेच प्रश्न; रंगली चर्चा
20
LIC च्या 'या' स्कीममध्ये केवळ ४ वर्षांपर्यंत भरा प्रीमिअम; १ कोटींच्या सम अश्योर्डची गॅरेंटी, सोबत मिळतील अनेक बेनिफिट्स

Swapna Jyotish: पहाटेच्या वेळी अलार्म होण्याआधी अचानक जाग येत असेल? हे तर शुभ लक्षण!

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 6, 2023 07:00 IST

Swapna Shastra: अनेक जण लहान बाळांप्रमाणे दचकून जागे होतात, ती वेळ रोज एकसारखी असेल तर स्वप्नज्योतिष शास्त्राचे भाकीत जाणून घ्या!

प्रत्येक गोष्ट घडण्यामागे काही ना काही कारण असते. अकारण कोणतीही गोष्ट कधीच घडत नसते. म्हणून तर आपण म्हणतोही, जे होते ते चांगल्यासाठी! परंतु या सगळ्या घटना अचानक घडतात का? तर नाही! प्रत्येक घटनेमागे काही ना काही संकेत असतात. जे आपल्याला कधी वेळेत कळतात, तर कधी वेळ निघून गेल्यावर! आबाल वृद्धांच्या बोलण्यातून नकळत काही सूचना मिळतात. आपण दुर्लक्ष करतो, परंतु घटना घडून गेल्यावर आपल्याला त्या शब्दांची आठवण येते. त्याचप्रमाणे काही प्रसंग त्याक्षणी आपल्याला अडचणीत टाकणारे वाटतात, परंतु त्यामागे काहीतरी चांगलेच घडणे नियतीला अपेक्षित असते. 

तुमचा जर परमेश्वरावर विश्वास असेल, दृढ श्रद्धा असेल, तर या पूर्वसूचना तुम्ही ओळखू शकता किंवा संधी म्हणून त्यांचा वापरही करू शकता. यासाठी काही बाबतीत आपण डोळसपणे विचार केला पाहिजे. प्रत्येक घटनेमागे कारण शोधले पाहिजे. तरच अनेक प्रश्नांची आपल्याला उकल होऊ शकते. जसे की, रोज पहाटे ३ ते ५ दरम्यान जाग येणे. 

झोपेतून जाग येणे यात कदाचित काही विशेष नसेलही, परंतु रोज ठराविक वेळेतच जाग येणे, तेही पहाटे, हा ईश्वरी संकेत आहे असे समजावे. पहाटे ३ ते ५ ही वेळ ब्रह्म मुहूर्त म्हणून ओळखली जाते. या वेळेत उठल्यामुळे अनेक फायदे होतात, हे आपण सगळेच जाणतो. परंतु अनेकांना ठरवूनही या वेळी जाग येत नाही. अलार्म बंद करून ते झोपी जातात. याउलट तुम्हाला त्या वेळेत जाग येत असेल, तर तुम्ही खरोखरच नशीबवान आहात असे समजा. 

ब्रह्मदेवाने सृष्टीची निर्मिती या मुहूर्तावर केली होती. म्हणून त्या मुहूर्ताला ब्रह्म मुहूर्त तसेच ईश्वरी मुहूर्त असे म्हणतात. ही वेळ सर्वसाधारण नसून अतिशय प्रभावी असते. प्रभाव कोणावर? तर जी व्यक्ती या वेळेचा सदुपयोग करते, त्यावर! या वेळेत शक्ती, बुद्धी, बल, तेज असे आरोग्याशी निगडित जे घटक हवे, ते सगळे प्राप्त होतात. या कालावधीत नभोमंडलातील ग्रहस्थिती आपल्या प्रगतीकरिता उत्तम असते. वातावरण शुद्ध असते. परिसर शांत असतो. त्यामुळे या कालावधीत जे काही मनाशी ठरवाल, ते अवश्य प्राप्त करू शकाल, असा ब्रह्म मुहूर्ताचा महिमा आहे. 

भगवान श्रीकृष्ण यांनीदेखील भगवद्गीतेत अर्जुनाला ब्रह्म मुहूर्तावर उठण्याचे महत्त्व सांगितले आहे. आपले पूर्वज, ऋषी मुनी ब्रह्म मुहूर्तावर उठून दिन चर्येची, ध्यानधारणेची सुरुवात करत असत. याउलट आपण, सूर्य डोक्यावर आला, तरी अंथरूण सोडत नाही. 

परंतु तुम्हाला जर भल्या पहाटे जाग येत असेल, तर पुन्हा झोपण्याची चूक करू नका. तुमच्याकडून चांगले कार्य घडण्याचे ते संकेत आहेत. या वेळेचा सदुपयोग करा. तुम्हाला त्याचा अवश्य लाभ होईल. परंतु चांगले काही घडण्यासाठी चांगले प्रयत्नही करावे लागतील. यासाठी वेळेत झोपा आणि ब्रह्म मुहूर्तावर जाग आली, की आपल्या ध्येयाप्रती चांगली कामगिरी करा. ध्येय निश्चित नसेल, तर उत्तम आरोग्य प्राप्तीसाठी मेहनत घ्या. तन सुदृढ असेल, तर मन ही सुदृढ असेल. शांत आणि प्रसन्न मन तुम्हाला ध्येयाची वाट दाखवेल. 

हे शुभचिन्ह ओळखा आणि आपले आयुष्य आंतर्बाहय बदलण्याची संधी अजिबात दवडू नका.