शहरं
Join us  
Trending Stories
1
India-China Flight: भारत - चीन दरम्यान लवकरच थेट विमानसेवा सुरू होणार; सरकारने विमान कंपन्यांना दिल्या या सूचना
2
जगदीप धनखड अचानक पंतप्रधान मोदींना का भेटले? काँग्रेसचा नवा दावा आणखी एक प्रश्न
3
केंद्र सरकारचा मोठा निर्णय; ४ सेमीकंडक्टर प्रकल्पांना मंजुरी, 'या' राज्यांमध्ये हजारो कोटींची गुंतवणूक
4
Aaditya Thackeray: "आम्ही काय खायचं, हे सांगणारे तुम्ही कोण?" आदित्य ठाकरे केडीएमसीवर भडकले!
5
आधी पत्नीचे नग्न फोटो काढले, मग बळजबरी बाप आणि मेहुण्यासोबत ठेवायला लावले संबंध; कारण...
6
"...त्यानंतरच होणार राज ठाकरेंना मविआत घेण्याचा निर्णय", काँग्रेसचे प्रभारी रमेश चेन्निथला स्पष्टच सांगितलं
7
महाराष्ट्राच्या पैठणीला लंडनमध्ये मोठा मान, व्हिक्टोरिया अल्बर्ट संग्रहालयामध्ये दिसणार!
8
आधारबाबत सुप्रीम कोर्टाचं सूचक विधान, बिहारमधील SIRवरून निवडणूक आयोगाला दिलासा 
9
कोण आहेत 'बेडरूम जिहादी', जे सुरक्षा यंत्रणेसाठी बनले डोकेदुखी?; भारतात दहशत पसरवण्याचा नवा डाव
10
बिहारपासून दिल्लीपर्यंत गोंधळ, अखेर १२४ वर्षांची महिला मतदार आली समोर, वयाबाबत म्हणाली...  
11
"शोना, मला मार" फक्त एवढेच ऐकताच प्रेयसीने प्रियकराचं डोकं भिंतीवर आपटलं, त्यानंतर जे घडले...
12
पाकिस्तानी दहशतवादी दक्षिण कोरियात पोहोचला, ओळख बदलून कंपनीत काम करत होता; दहशतवाद्याला अटक
13
"देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री आहेत की निवडणूक आयुक्त? प्रश्न आयोगाला विचारले तर तुम्ही उत्तर का देता?", रमेश चेन्निथला यांचा सवाल   
14
RCB मुळं वर्ल्ड कप स्पर्धेवर संकट! एम. चिन्नास्वामी स्टेडियमवर बंदी; BCCI सह ICC चं टेन्शन वाढलं
15
९ महिने पाठपुरावा केला तरीही ऊसाचे बिल थकवले; चिठ्ठी लिहून तरुण शेतकऱ्यानं आयुष्य संपवले
16
भारतासाठी धोक्याची घंटा; चीन LAC जवळ उभारतोय नवीन रेल्वे प्रकल्प, तणाव वाढणार..?
17
Dewald Brevis: बेबी एबीनं इतिहासच बदलून टाकला, ऑस्ट्रेलियाविरुद्ध 'अशी' कामगिरी करणारा एकटाच!
18
१४ लाखांचं पॅकेज असलेला तरुण भररस्त्यात मॉडेलसमोर अचानक उभा राहिला, पॅन्टची चेन उघडली अन्...
19
E10 च्या वाहनांमध्ये E20 पेट्रोल वापरू नका, नाहीतर...; टोयोटाचा वाहन मालकांना इशारा...
20
अहो आश्चर्यम्...! ६५० किमी पर्यंतची रेंज असलेल्या या २ कारला जुलै महिन्यात एकही ग्राहक मिळाला नाही! जाणून घ्या किंमत

Swami Samartha: आपले अनंत अपराध जशी आई पदरात घेते तसे स्वामीही घेतात; मात्र लक्षात ठेवा 'ही' एक गोष्ट!

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 13, 2023 15:41 IST

Swami Samartha: 'अशक्यही शक्य करतील स्वामी' असे आपण म्हणतो, पण स्वामींना गृहीत न धरता प्रत्येक स्वामीभक्ताने काही नियम पाळलेच पाहिजेत... 

>> अस्मिता दीक्षित, ज्योतिष अभ्यासक 

लहानपणी आपण मस्ती करायचो खोड्या काढायचो मग आई आपल्याला सांगायची, की हे बघ, चुकीचे वागले ,खोटे बोलले की बाप्पा शिक्षा करतो. मग आपण लगेच त्याची माफी मागायचो आणि आईच्या कुशीत शिरायचो . हेच संस्कार घेवून आपण लहानाचे मोठे होतो . व्यथा ही आहे की मोठे झाल्यावर आपण आपल्या आईला म्हणजेच प्रत्यक्ष स्वामीना सुद्धा विसरतो . आईचे संस्कार बर्यापैकी लोप पावतात कारण आपल्याला शिंग फुटतात . 

आपल्या जीवन प्रवासात अनेक लोक आपल्याला वेळोवेळी मदत करत असतात , पावलोपावली आपण त्यांच्या ऋणातच असतो पण अनेकदा हे विसरून आपण त्यांचा अपमान करतो , त्यांना दुखावतो , मला कोण अडवणार अश्याच वृत्तीचे आपले वर्तन असते . आपण चुकलो तर साधी माफी सुद्धा मागत नाही आपण खोटेपणाचा ,दांभिक पणाचा टेंभा घेवून मिरवत असतो.  आयुष्यात पुढे जाताना कदाचित स्वतःच्याच कष्टांनी फळ मिळू लागते .ज्यांनी आपल्यावर संस्कार केले ज्यांनी मार्ग दाखवला पडत्या काळात मदतीचा हात दिला त्यांच्या खरतर ऋणात असतो आपण पण त्याचसोबत जोपासला गेलेला अहंकार आपल्यातील सतसत विवेक बुद्धी ला मारक ठरतो . वाटेल तसे वागायचा जणू परवाना मिळाल्यासारखे वागतो आणि तिथेच चुकतो.

आपल्या कष्टाचे फळ बाप्पा देतो पण मिजास केली तर ते काढून सुद्धा देतो हेही आईने सांगितले होते जे नेमके आपण विसरतो. अहो स्वामी कोण कुठले. ज्यांनी मदत केली त्यांना हवे तेव्हा जवळ करा हवे तेव्हा दूर करा ही वृत्ती बळावते  कारण आपली विचार क्षमता हरवून आपल्याच कोशात मग्न असतो. अश्याच एका उंच टोकावर जाऊन सर्व हातातून निसटून जायला लागते तेव्हाच आपल्याला शुद्ध येते पण वेळ निघून गेलेली असते . आपल्या चुका आठवतात पण माफी मागायची वेळ निघून गेलेली असते आणि ती मागायची आपल्यात हिम्मत सुद्धा नसते. माफी मागायला आणि ती करायला सुद्धा मन मोठे लागते आणि त्याला सद्गुरुकृपा सुद्धा लागते. रोज आपण आपल्यातील चुका शोधल्या पाहिजेत . इथे कुणी परिपूर्ण नाही प्रत्येक जण कधीना कधी चुकणार पण ती मान्य करायला वाघाचे काळीज लागते आणि त्या साठी गुरुकृपा लागते.

नुसते उपास तापास , व्रत वैकल्ये आणि पारायण करून काहीही होत नाही कारण इतके सगळे करून आपण जैसे तिथेच आहोत . पण ज्या क्षणी ह्या सगळ्या गोष्टींची जाणीव होते तेव्हा तरी आपण बदलले पाहिजे . अंतर्मानापासून आपल्यात बदल घडवायचा असेल तर मन निर्मळ हवे , अंतर्बाह्य एकच वृत्ती असायला हव्यात , नियत शुद्ध हवी आणि राजकारणी धोरणी वृत्ती दूर हवी तरच एखादा ज्ञानाचा किरण सापडेल.

आपल्याला कोण सुधारू शकतो तर आपण स्वतःच . ह्या जगात सर्वात श्रेष्ठ काय आहे तर कर्म.  एखादे कर्म केले कि त्याचे फळ त्याला चिकटले म्हणून समजा. आपण दुसर्याचा अपमान केला कि भविष्यात आपलाही होणार आणि तोही दसपट जास्ती आणि तेव्हा समजते सर्व काही पण वेळ निघून गेलेली असते.    अजूनही आपल्याला परमार्थ समजला नाही , भक्ती समजली नाही , समर्पित होणे जमत नाही , अहंकार जात नाही , दुसर्याचे मन समजत नाही त्यामुळे स्वामी समजणे हि खूपच दूरची गोष्ट आहे. ते समजण्यासाठी मनाचे शुद्धीकरण होणे अति आवश्यक आहे. मनाला येयील तसे वागलो तर स्वामीच काय ह्या भूतलावरील कुठलीच देवता आपल्याला आशीर्वाद देणार नाही मग तुम्ही काहीही कराल.

काय हवे आहे आपल्याला ह्याचा खरच एकदा शांतपणे बसून शोध घ्या. हारतुरे , सत्कार , वाहवा , प्रसिद्धी नक्की काय हवे आहे . आपल्या महाराजांना सुद्धा जिथे ह्या सगळ्याचा मोह नाही तिथे आपल्याला कश्याला हवा आहे ? विचार करण्यासारखी गोष्ट आहे . यशाच्या उत्तुंग शिखरावर जाऊन सुद्धा तिथे आपण एकटेच असू कारण ह्या सर्वच गोष्टींचा तिटकारा असणारे सद्गुरू आपल्यासोबत नसतील. आपण त्यांचे धरलेले बोट कधीच सुटले आहे ह्याची सुद्धा जाणीव नाही आपल्याला इतके आपण आपल्याच विश्वात रमलो आहोत .

आयुष्यत प्रत्येक गोष्टीत समर्पण लागते . स्वयपाक करताना गृहिणीला त्यात जीव ओतावा लागतो तेव्हाच त्याला चव येते. तसेच प्रपंच ते परमार्थ हा अवघड प्रवास पार तोच करू शकतो जो स्वतःला गुरु चरणी “ समर्पित “ करतो. मला महाराज खूप आवडतात ...अहो पण तुम्ही त्यांना आवडता का? त्यांच्या आवडी निवडीचे काय ? आपल्या लहानपणी बाप्पा होता आणि तो अजूनही आहेच . त्याच्याबद्दल वाटणारे प्रेम आणि वेळप्रसंगी भीती आजही तितकीच वाटली पाहिजे किबहुना काकणभर अधिकच तेव्हाच आयुष्याची संध्याकाळ सुकर होईल नाहीतर सर्व व्यर्थ आहे.