शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानने पीओकेमध्ये इमरजन्सी घोषित केली, आरोग्य कर्मचाऱ्यांच्या सुट्या रद्द; काय घडतेय...
2
Pahalgam Terror Attack : "माझ्या पतीला शहीद दर्जा द्यावा, त्याने अनेकांचा जीव वाचवला"; शुभमच्या पत्नीची सरकारकडे मागणी
3
जिल्हाधिकारी पैसे घेतात, अधिकारी २% शिवाय फाइल काढत नाहीत, खासदार, आमदारांचा आरोप
4
TCS की इन्फोसिस, कोणी वाढवला सर्वाधिक पगार? आयटी क्षेत्रात कोणती कंपनी देणार जास्त नोकऱ्या?
5
घर खरेदीदारांच्या नुकसान भरपाईसाठी अधिकाऱ्यांची होणार नियुक्ती; राज्यभरात १२ जिल्हा नियंत्रक अधिकारी, महसूल वसुली अधिकारी
6
Pahalgam Terror Attack : Video- मोठी कारवाई! पहलगाम हल्ल्यानंतर सुरक्षा दलांनी ९ दहशतवाद्यांची घरं केली उद्ध्वस्त
7
इराणच्या बंदरावर भीषण स्फोट की घातपात? १४ जणांचा मृत्यू तर ७५० लोक जखमी 
8
गुजरात पोलिसांची मोठी कारवाई! अहमदाबाद, सुरतमध्ये १ हजार बांगलादेशी ताब्यात
9
पर्यटकांवरील गोळीबाराच्या व्हिडीओंमुळे बेचैनी, अस्वस्थता वाढली, देशभरात नागरिकांमध्ये चिंता
10
ईडीचे कार्यालय असलेल्या कैसर-ए-हिंद इमारतीला भीषण आग; पहाटे २.३० वाजल्यापासून अद्याप धुमसतेय...
11
पहिलाच प्रकार! बँक अकाऊंट सांभाळता सांभाळता डीमॅट अकाऊंट खाली झाले; रातोरात ५ लाखांचे शेअर वळते केले
12
पाकची कोंडी करण्यासाठी हालचाली; अमेरिकेसह विविध देशांचा पाठिंबा मिळविण्यासाठी संपर्क साधणे सुरू
13
पाकिस्तानी दहशतवाद्यांना आता धास्ती 'अननोन गनमॅन'ची; दोन वर्षांत २० ते २५ अतिरेक्यांचा केला खात्मा
14
आजचे राशीभविष्य, २७ एप्रिल २०२५: नव्या कार्याचा आरंभ न करणे हितावह राहील
15
बिलावल बरळले; पाणी रोखले तर भारतीयांच्या रक्ताचे पाट वाहतील
16
काश्मीरमध्ये मोठे कोंबिंग ऑपरेशन, दहशतवाद्यांना मदत करणाऱ्या ४४६ पेक्षा जास्त लोकांना घेतले ताब्यात
17
दहशतीच्या भयाण रात्री खुर्शीदभाईंनी आम्हा पाच कुटुंबांना दिला घरात आश्रय; आमच्यासाठी धावून आलेले देवदूतच
18
बेकायदा पार्किंगबाबत जनजागृती करा; उच्च न्यायालयाची ज्येष्ठ नागरिकांना सूचना
19
पर्यटकांना होऊ शकतो घाबरण्याचा आजार; मानसिक आरोग्यावर घातक परिणाम होऊ शकतात
20
पाकचे तीन तुकडे होणे गरजेचे, तर युद्ध क्षमता कमी होईल..!

जीवनात संघर्षाशिवाय गत्यंतर नाही

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 29, 2020 10:45 IST

संघर्षातून मिळविलेला विजय आत्मिक आनंद प्राप्त करून देतो. आध्यात्मिक व भौतिक जीवनात संघर्ष आपला पिच्छा सोडत नाही. संघर्ष जर योग्य पद्धतीने झाला तर धैर्य प्राप्त होते. त्यातून त्याला यश मिळते.

- डॉ. तुळशीराम गुट्टे महाराज, संत साहित्याचे अभ्यासक व सिद्धिविनायक मानव कल्याण मिशनचे अध्यक्षआईच्या गर्भापासूनच मानवी जीवनात संघर्ष आहे. अनुकूल वा प्रतिकूल परिस्थितीमध्येही संघर्ष असतोच. समजा अनुकूल परिस्थिती असेल तर तो गर्भ पूर्णत्व प्राप्त करतो. प्रतिकूल अवस्थेमध्ये तो गर्भ नष्ट होतो म्हणजे जीवनात संघर्ष आहे. अभ्यास, परीक्षा यातही संघर्ष आहेच, जे अभ्यास करतात ते चांगले मार्क मिळवितात जे अभ्यास करीत नाही ते नापास होतात. पास झालेले मोठ्या नोकरीच्या शोधात असतात तर नापास झालेले छोटी-मोठी नोकरी शोधण्यात वेळ घालवितात. कृषी, व्यापार, व्यवसाय, कला, कौशल्य, विज्ञान या सर्वच क्षेत्रात संघर्ष करावाच लागतो. योग करणे यातही संघर्ष आहेच.संयम आणि इंद्रिय निग्रह करण्यासाठी संघर्ष आवश्यक आहेच. उत्कर्ष व उत्थान यासाठीही संघर्ष आहे. सूर्य, चंद्र, भूमी, नक्षत्र, जल, वनस्पती, अग्नी, आकाश, वायू या सर्वांनाही संघर्ष असतोच. संघर्षातून मिळविलेला विजय आत्मिक आनंद प्राप्त करून देतो. आध्यात्मिक व भौतिक जीवनात संघर्ष आपला पिच्छा सोडत नाही. संघर्ष जर योग्य पद्धतीने झाला तर धैर्य प्राप्त होते. त्यातून त्याला यश मिळते. संघर्षातून मिळविलेल्या वस्तूंची किंमत कळते त्या व्यक्तीसाठी वा वस्तूसाठी किती प्रयत्न करावे लागतात. यातून त्या व्यक्तीला संघर्षाची किंमत कळते. दृढ विश्वास हा संघर्षातून येतो. संघर्ष हा सुखाचा महासागर आहे.सखोल प्रयत्नातून एखादी वस्तू मिळविली तर त्याचा आनंद गगनात मावत नाही. संघर्षाचे तरंग उमटत राहावेत. यामुळे यशस्वी जीवन जगायला चैतन्याची ऊर्जा प्राप्त होते. संघर्षामुळे मनुष्य अधिक चांगला वागतो. संघर्षाच्या कचाट्यातून कोणीही सुटलेले नाही. संत ज्ञानेश्वरांपासून ते स्वामी विवेकानंदांपर्यंत सर्वांनाच संघर्ष करावाच लागतो. तो स्वकीयांबरोबर अथवा परक्या लोकांबरोबर असो, संघर्ष हा जीवनात अटळ आहे. संघर्षशाली जीवन जगण्याला बळ देते. संघर्षातून एखादी ऊर्जा मिळवून पुढील कार्याला गती मिळते. संघर्ष हा जीवनाचा एक अमूल्य घटक आहे. संघर्ष करा, संघटित व्हा व आपले कार्य साध्य करा.