शहरं
Join us  
Trending Stories
1
आले किती, गेले किती...! एकट्या दिल्लीत ५००० पाकिस्तानी, IB ने यादी सोपविली; पुढे काय...
2
पहलगाम हल्ल्यातील मृतांच्या वारसांना शासकीय नोकरी देण्याबाबत मुख्यमंत्र्यांचं मोठं वक्तव्य; म्हणाले...
3
मुदत संपली! मायदेशात परतण्यासाठी पाकिस्तानी नागरिकांची धावाधाव, वाघा बॉर्डरवर रांगा...
4
पहलगाम हल्ल्याचा तपास NIA च्या हाती; पाकिस्तानी कनेक्शन अन् 26/11 सारख्या कटाचा संशय
5
पाकिस्तान प्रेग्नेंट, कधीही बलुचिस्तानची डिलीवरी होऊ शकते; विकास दिव्यकीर्ती यांनी पाकिस्तानची परिस्थिती सांगितली
6
सोलापूर डॉक्टर आत्महत्या: कॉल रेकार्डमधील माहितीमध्ये नवा पुरावा आढळणार?
7
हे काश्मीरच्या शत्रूंना पहावले नाही; पंतप्रधान नरेंद्र मोदींचे मन की बातमध्ये न्याय देण्याचे आश्वासन
8
Pahalgam Terror Attack : "मी वडील गमावले, पण माझे २ भाऊ काश्मीरमध्ये..."; आरतीने सांगितली डोळे पाणावणारी घटना
9
पती झाला हैवान! बहिणीच्या लग्नासाठी भावाने घर विकलं, हुंड्यासाठी सासरच्यांनी तिलाच मारलं
10
पहलगाम हल्ल्यानंतर दहशतवादाविरुद्धची कारवाई तीव्र, आतापर्यंत १० घरे उद्ध्वस्त; १७५ संशयितांना ताब्यात
11
शिक्षक, स्पर्धा परीक्षांची तयारी अन् अचानक झाला गायब; २६ पर्यटकांना मारणारा आदिल दहशतवादी कसा बनला?
12
प्रभसिमरन सिंगने इतिहास रचला, आयपीएलमध्ये खास विक्रम करणारा पहिला अनकॅप्ड खेळाडू ठरला
13
वंदे भारत आणि शताब्दी एक्सप्रेस गाड्यांचा खरा मालक कोण? अनेकांच्या मनात गैरसमज
14
नरेश म्हस्के यांची ज्ञानपीठच्या दिशेने वाटचाल होत आहे, सावधान..!
15
पहलगामनंतर काश्मीरमध्ये कडक सुरक्षा, कुपवाडामध्ये सामाजिक कार्यकर्त्यावर दहशतवादी हल्ला
16
अनंत अंबानींना रिलायन्स इंडस्ट्रीजमध्ये मिळाली मोठी जबाबदारी; आकाश आणि ईशा अंबानी काय करतात?
17
"मी दहशतवाद्यांना एकच गोष्ट सांगेन की..."; 'केसरी २'च्या स्क्रीनिंगला अक्षय कुमारचा संताप अनावर, काय घडलं?
18
तुम्ही मराठी सिनेसृष्टीत आजवर असं कधीच पाहिलं नसेल! 'माझी प्रारतना'चा विलक्षण ट्रेलर रिलीज
19
WhatsApp मध्ये सीक्रेट चॅटसाठी आलं नवं फीचर; आता प्रायव्हसीचं टेन्शन होणार छूमंतर
20
घरी आणि ऑफिस दोन्ही ठिकाणी Wi-Fi? मग 'हे' रिचार्ज प्लॅन तुमच्यासाठी बेस्ट; कोण देतंय चांगली ऑफर?

....पण दुसऱ्याच्या डोळ्यातील कुसळ दिसते; वाचा ही बोधकथा!

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 15, 2021 12:02 IST

समंजसपणे प्रत्येकाने परिस्थिती हाताळली, तर वाद होतीलच कशाला?

आपण जेव्हा समोरच्यावर दोषारोप करण्यासाठी बोट उगारतो तेव्हा बाकीची चार बोटे आपल्याकडे असतात. म्हणजेच चूका फक्त दुसऱ्यांकडून होतात असे नाही, त्या सगळ्यांकडूनच होतात. पण म्हणतात ना, आपल्या डोळ्यातील मुसळ दिसत नाही, पण दुसऱ्याच्या डोळ्यातील कुसळ दिसते. परंतु, ही सवय वाईट आहे. आपण आधी आपल्या चूका मान्य करायला शिकले पाहिजे. दुसऱ्यातील दोष दाखवत असताना, स्वत:चे दोष सुधारले पाहिजेत. 

एक लग्न झालेले जोडपे होते. दोघांचे एकमेकांवर अतोनात प्रेम होते. परंतु, लग्नानंतर बारा वर्षे झाली, तर आपत्यप्राप्ती झाली नव्हती. अनेक वैद्यकीय उपचारानंतर त्यांना पूत्रप्राप्ती झाली. त्या बाळावर दोघांचा खूप जीव होता. बाळ दिसामासाने मोठे होत होते. 

एक दिवस नवरा आजारी असतान डॉक्टरांनी दिलेले औषध घेऊन ऑफिसला जायला निघाला. त्याने औषध घेतले पण झाकण लावायला विसरला. आठवण येताच त्याने बायकोला फोन करून बाटलीला झाकण लावायला सांगितले. फोनवर हो म्हणून फोन ठेवताच ती आपल्या कामात गुर्फटून गेली. शांत झोपलेल्या बाळाला जाग कधी आली, ते तिला कळलेच नाही. ती स्वयंपाक घरात काम करत असताना बाळ रांगत रांगत बाहेर आले आणि त्याने नेमकी उघडी असलेली बाटली तोंडाला लावली. 

मोठ्यांचे औषध बाळाच्या पोटी गेल्याने आणि औषधाचा मारा झाल्याने बाळ तत्काळ बेशुद्ध पडले. त्याच्या तोंडातून फेस येऊ लागला. बाळाची आई काम उरकून बाळाजवळ गेली, तर बाळ खोलीत नव्हते. बाळाला शोधत बाहेर आली, तर बाळ बेशुद्ध होऊन पडले होते. तिने तत्काळ अ‍ॅम्ब्युलन्स बोलावली आणि बाळाला हॉस्पिटला नेले. एवढे नवसासायासाने, उपचाराने झालेले बाळ आपल्या मूर्खपणाने आपण गमावणार तर नाही ना याची तिला भीती वाटू लागली. त्याहून जास्त भीती नवऱ्याची होती. कारण त्याने सांगूनही आपल्याकडून चूक घडली होती. तिने घाबरतच नवऱ्याला फोन केला आणि रडत रडत सगळी हकीकत सांगितली आणि माफी मागू लागली. 

नवरा काही काळात तिथे पोहोचला. त्याने बायकोला धीर दिला. सगळे काही ठीक होईल म्हणाला. बायकोला आश्चर्य वाटले. नवरा आपल्याला ओरडेल असे तिला वाटले होते. तेवढ्यात डॉक्टर बाहेर येऊन म्हणाले, बाळाला आता कसलीही भीती नाही. काही वेळात ते शुद्धीवर येईल. काळजी करू नका. 

बायकोने नवऱ्याला कडकडून मिठी मारली आणि दोघांनी देवाचे आणि डॉक्टरांचे आभार मानले. बायकोने आपली भीती व्यक्त केली, त्यावर नवरा म्हणाला, 'चूक तुझी एकटीची नव्हती. मीच माझे काम पूर्ण करून निघालो असतो, तर ही वेळ आली नसती. म्हणून तुझ्याआधी दोष माझा आहे. असे असताना मला तुझ्यावर चिडण्याचा अधिकारच काय?'

इतक्या समंजसपणे प्रत्येकाने परिस्थिती हाताळली, तर वाद होतीलच कशाला, नाही का?