शहरं
Join us  
Trending Stories
1
'उद्यापासून सर्वांचे तोंड गोड होणार'; GST रिफॉर्मची पंतप्रधान मोदींकडून घोषणा, म्हणाले, 'नागरिक देवो भव'
2
जीएसटी कपातीच्या पूर्वसंध्येलाच घोषणा; MG Hector १.४९ लाख, Gloster  ३.०४ लाख तर Astor एवढ्या हजारांनी कमी झाली...
3
'९९% वस्तू ५% GST स्लॅबमध्ये येणार', PM मोदींनी सांगितले नवीन जीएसटी सुधारणांचे फायदे...
4
खोटी वचनं देऊन नर्सला प्रेमाच्या जाळ्यात ओढलं, लग्नाचा तगादा लावताच खरं रूप दाखवलं! ऐकून होईल संताप
5
२२ सप्टेंबरपासून 'या' वस्तूंच्या किमतीत कोणताही बदल नाही; तुमच्या यादीत आहे का?
6
जातीऐवजी आर्थिक निकषावरील आरक्षणाला सुप्रिया सुळेंचा पाठिंबा? नेमकं काय म्हणाल्या वाचा...
7
उद्यापासून अनेक वस्तू होणार स्वस्त! पाहा तुमच्या घरातील कोणत्या गोष्टींवर किती जीएसटी लागणार...
8
AUS vs IND : वैभव सूर्यवंशीचा ऑस्ट्रेलियात धमाका; हा फक्त ट्रेलर; पिक्चर अजून बाकी!
9
'महानायक' मोहनलाल; एका वर्षात दिले २५ ब्लॉकबस्टर चित्रपट, ५ वेळा मिळाला राष्ट्रीय पुरस्कार
10
भारताच्या शेजारील देश भूकंपाने हादरला; म्यानमारमध्ये ४.० तीव्रतेचा भूकंप, भारतावरही परिणाम?
11
शेअर्स आहे की पैशांचा पाऊस? 'या' ५ स्टॉक्सनी एकाच आठवड्यात दिले तब्बल ५५% रिटर्न!
12
१६ कोटींचा बंगला, चॉपर, दुबईच्या कंपनीत ३८ कोटी... ईडीच्या कारवाईत मोठं घबाड हाती, पोलिसांना कल्पनाच नाही
13
कोरोनापासून जगाला सावध करणाऱ्या चिनी पत्रकाराला पुन्हा तुरुंगवास; आधीच चार वर्षे भोगली शिक्षा..., आता पुन्हा
14
गुणरत्न सदावर्ते यांच्या गाडीवर हल्ला, आंदोलकांनी ताफा अडवल्याने उडाला गोंधळ; पोलिसांची धावपळ
15
YouTube वरून पैसे कमवायचे आहेत? मग ‘या’ महत्त्वाच्या अटी पूर्ण करा, लगेच सुरू होईल कमाई!
16
शुबमन गिल प्लेईंग ११ बाहेर बसणार, संजू सॅमसनला संधी? भारत-पाकिस्तान सामन्यापूर्वी मोठा बदल होण्याची शक्यता...
17
भारत-पाकिस्तान सामन्याच्या दिवशीच एकनाथ शिंदेंचे X अकाऊंट हॅक; राजकीय वर्तुळात खळबळ
18
आधार कार्डबाबतची 'ही' चूक केल्यास १० वर्षांचा तुरुंगवास! यूआयडीएआयने जारी केले कठोर नियम
19
Viral Video : चीनला पोहोचलेल्या भारतीय व्यक्तीने दाखवलं असं काही की पाहणारेही झाले थक्क! तुम्हीही कमाल बघाच
20
चिंता वाढली! एलियन्स, AI आणि तिसरे महायुद्ध; बाबा वेंगाची 2026 वर्षाबद्दल भविष्यवाणी काय?

आपल्या दिवसाची आणि नव वर्षाची प्रसन्न सुरुवात 'या' श्लोकांनी करा!

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 1, 2022 08:00 IST

अंत:करणात आपली श्रद्धास्थाने व समाजाविषयी स्वधर्म, स्वसंस्कृती, आदर, निष्ठा व आत्मविश्वास निर्माण करण्यासाठी प्रात:काली पवित्रसमयी मनावर व कुटुंबावर सुसंस्काराचे शिंपण घालण्यासाठी प्रात:स्मरणाच्या या अलौकिक परंपरेचे जतन घराघरात झाले पाहिजे. 

आपली सकाळ कशी होते, यावर आपला संपूर्ण दिवस अवलंबून असतो. सकाळ प्रसन्न तर दिवसही मजेत जातो. म्हणून सद्विचारांचे बीज सुपीक डोक्यात पेरून दिवसभर मनाची उत्तररित्या मशागत करावी. अशात आज नवं वर्षाचा पहिला दिवस! यासाठी आपल्या संस्कृतीने उत्तम संस्कार घातला आहे. तो कोणता, हे सविस्तर जाणून घेऊया. 

प्रात:काली अंथरुणावरून उठल्यानंतर आपल्या इष्ट देवतांचे श्लोक व मंत्ररुपाने स्मरण करावे. या उपचाराला प्रात:स्मरण म्हणतात. याविषयी एका श्लोकात वर्णन केले आहे,

ब्राह्मे मुहुर्ते चोथात्म चिन्तयेदात्मनो हितम् स्मरणं वासुदेवस्य कुर्यात् कलिमलावहम्

ब्राह्म मुहूर्ती उठून आत्मकल्याणाचे चिंतन करावे. त्याचप्रमाणे कलीदोष दूर करणारे वासुदेवाचे स्मरण करावे. प्रात:स्मरण करण्याचे काही विधीसंकेत आहेत. आपण काही ब्राह्म मुहूर्तावर उठणाऱ्यातले नाही. निदान, जेव्हा उठू, तेव्हा ईश स्मरणाने सुरुवात नक्कीच करता येईल. 

आदित्य गणनाथं च देवी रूद्रं यथाक्रममनारायणं विशुद्धाख्यमनोच कुलदेवताम

सूर्य, गणपती, देवी व विशुद्ध कीर्तीचा नारायण यांचे यथाक्रम स्मरण करून शेवटी आपल्या कुलदेवतेचे स्मरण करावे. ऋग्वेदीय ब्रह्मकर्मात सूर्यस्मरणाचे, गणपतीस्मरणाचे, देवी स्मरणाचे, शिवाच्या स्मरणाचे व भगवान विष्णूच्या स्मरणाचे श्लोक दिले आहेत.

नवग्रह, भृग्वादी ऋषी, सनत्कुमारादी देवर्षी, सप्तलोक, सप्तसमुद्र, सप्तर्षी, सप्तकुलपर्वत, पृथू, अश्वत्थामा, बळी, व्यास, हनुमान, बिभीषण, कृष्ण, परशुराम हे सप्तचिरंजीव, अहिल्या, द्रौपदी, सीता, तारा, मंदोदरी या पतिव्रता, पाच पांडव, नल, युधिष्ठिर इ. पुण्यश्लोक राजे, अयोध्या, मथुरा, माया, काशी, कांची, अवंतिका, द्वारावती ही मोक्षदायी तीर्थक्षेत्रे यांचे पुण्यस्मरण करावे. चारित्र्य, कर्तृत्व, श्रेष्ठत्व असलेल्या पुण्यशील विभूतींचे, श्रद्धा स्थानांचे पुण्यस्मरण, नामसंकीर्तन करावे. ज्यांच्या स्मरणाने मन:शांती प्राप्त होते. आपल्या जीवनातील अंध:कार जाऊन जीवन प्रकाशमय होईल अशा चैतन्यशील प्रेरणादायी श्रेष्ठतम गुणवर्धक रुपांचे चिंतन, स्मरण करावे. हा हिंदूंचा मूलाधार आहे. जीवन सुखसमृद्ध करणाऱ्या सृष्टीतल्या सर्व गोष्टी व भूतमात्रांबद्दलची कृतज्ञता हे भारतीय संस्कृतीचे वैशिष्ट्य आहे.

यथोचित प्रात:स्मरण झाल्यावर ज्या भूमीवर आपले सर्व जीवन व्यवहार चालतात, जिच्या आधअरावर आपले सर्वस्व उभारले, तारले जाते, अशा भूमीमातेला कृतज्ञतापूर्वक नमस्कार करून श्लोक म्हणावा. 

समुद्रवसने देवि पर्वतस्तनमंडले,विष्णुपत्नि नमस्तुभ्यं पादस्पर्श क्षमस्व मे।

समुद्राचे वस्त्र परिधान करणाऱ्या व पर्वतरूपी उरोजांनी शोभणाऱ्या हे विष्णूपत्नी भूमाते, तुला नमस्कार आहे. माझ्या पायाचा तुला स्पर्श होतो त्याबद्दल मला क्षमा कर. प्रात:स्मरण हे हिंदू जीवन संस्काराचा श्रीगणेशा आहे. अशा संस्कारांमुळे आपली संस्कृती टिकली. वर्धिष्णु झाली. यातच आपल्या परंपरेची चिरंतन थोरवी आहे. अंत:करणात आपली श्रद्धास्थाने व समाजाविषयी स्वधर्म, स्वसंस्कृती, आदर, निष्ठा व आत्मविश्वास निर्माण करण्यासाठी प्रात:काली पवित्रसमयी मनावर व कुटुंबावर सुसंस्काराचे शिंपण घालण्यासाठी प्रात:स्मरणाच्या या अलौकिक परंपरेचे जतन घराघरात झाले पाहिजे.