शहरं
Join us  
Trending Stories
1
भाजपकडून महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्याचे निवडणूक प्रमुख ठरले; मोठ्या नेत्यांना दिली जबाबदारी, यादी केली जाहीर
2
बोगस मतदानाच्या राहुल गांधींच्या आरोपामुळे खळबळ, तपासात १४ मतदारांनी आपण खरे असल्याचा केला दावा
3
भारतीय महिला संघाने घेतली पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट; विश्वचषक ट्रॉफीसह फोटो समोर आला
4
"एकनाथ शिंदेंना मुख्यमंत्रिपद दिलं तर ते पुन्हा परत करतात म्हणून मी...", मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचं विधान
5
भारतीय महिला क्रिकेटचे 'अच्छे दिन'! विश्वविजेत्या लेकींच्या हस्ताक्षरानं सजलेली 'नंबर वन नमो' जर्सी
6
अंतराळात मोठी दुर्घटना टळली! चीनचे स्पेस स्टेशन स्थानक धडकले, संशोधकांचे परतणे पुढे ढकलले
7
तेलंगणात युध्दबंदीला आणखी सहा महिने मुदतवाढ, माओवाद्यांची घोषणा, शांतता प्रस्तावाला सरकारने प्रतिसाद दिल्याचा दावा
8
आता महाराष्ट्रात इंटरनेट होणार सुपरफास्ट! एलॉन मस्क यांच्या 'स्टारलिंक'शी करार, ठरले भारतातील पहिले राज्य
9
नेटफ्लिक्सवरील 'मनी हाइस्ट' शो पाहिला, टोळी तयार केली; १५० कोटींची फसवणूक, दिल्लीतील धक्कादायक घटना
10
Minuteman 3: अमेरिकेने केली अण्वस्त्र मिसाईलची चाचणी, किती शक्तिशाली आहे मिनटमॅन 3? 
11
प्रियकरासोबत मिळून पतीला संपवलं, मृतदेहाचे तुकडे करून किचनमध्ये गाडले; १४ महिन्यांनी गूढ उकललं
12
धक्कादायक! गव्हाला किडे लागू नये म्हणून ठेवलेल्या गोळ्यांमुळे दोघांचा मृत्यू, तुम्ही ही चूक करु नका
13
संजय राऊतांची तब्येत बिघडली, रुग्णालयात केले दाखल; अलीकडेच प्रकृतीविषयी दिली होती माहिती
14
"विरोधकांची मोगलाई संपली, आता भगवे राज्य येणार; ३ डिसेंबरला दिवाळीपेक्षा मोठे फटाके फुटणार"
15
राहुल गांधींनी बांगलादेशात अन् असदुद्दीन ओवेसींनी पाकिस्तानात निघून जाव! हिमंता बिस्वा सरमा असं का म्हणाले?
16
"नाशिकमधील भाजप आमदाराची माजी नगरसेवकाकडूनच सुपारी", ठाकरेंच्या नेत्याच्या दाव्याने खळबळ
17
Bank Job: बँकेत नोकरी शोधताय? पीएनबी करणार तुमचं स्वप्न साकार, 'या' पदांसाठी भरती सुरू!
18
मत चोरीचा मुद्दा: प्रशांत किशोरांचा राहुल गांधींना सल्ला; म्हणाले, "त्यांनी लढले पाहिजे आणि..."
19
मतदानापूर्वीच प्रशांत किशोर यांना मोठा झटका, जन सूराजचे उमेदवार भाजपमध्ये!
20
'हे लोक चुकून आले तर बिहारमध्ये दहशत माजवतील', चिराग पासवान यांचा निशाणा कुणावर?

Solar Eclipse 2024: सूर्यग्रहणाचा कसा आणि कोणावर होणार परिणाम? कोणती पथ्य पाळावी? वाचा!

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 27, 2024 16:26 IST

Solar Eclipse 2024: यावर्षी पितृ अमावस्येला अर्थात २ ऑक्टोबर रोजी सूर्यग्रहण आहे जाणून घ्या त्यासंबंधित सर्व महत्त्वाच्या गोष्टी!

या १५ दिवसांच्या आत, वर्षातील दुसरे आणि शेवटचे ग्रहण होणार आहे, जे कंकणाकृती सूर्यग्रहण आहे. यापूर्वी १८ सप्टेंबर रोजी खंडग्रास चंद्रग्रहण झाले होते. आता सूर्य ग्रहण (Solar Eclipse 2024) ग्रहण पितृ अमावस्येला (Sarva Pitru Amavasya 2024) आणि नवरात्रीच्या (Navratri 2024) एक दिवस आधी म्हणजेच २ ऑक्टोबर २०२४ रोजी असणार आहे. ग्रहणाचा एकूण कालावधी ६ तास ४ मिनिटे असेल. त्यासंबंधी गोष्टी सविस्तर जाणून घ्या. 

सतत ग्रहण लागणे शुभ नाही

ग्रहण ही एक खगोलीय घटना आहे ज्याचे आध्यात्मिक आणि वैज्ञानिक दोन्ही क्षेत्रांमध्ये खूप महत्त्व आहे. लागोपाठ दोन ग्रहण होणे किंवा होणे शुभ मानले जात नाही, ग्रहण दिसणाऱ्या देशांतील लोकांना नैसर्गिक आपत्ती, महामारी आणि देशाच्या आर्थिक स्थितीत अनेक चढ-उतारांना सामोरे जावे लागते. 

ग्रहणाचे नियम कोणासाठी?

२ ऑक्टोबर रोजी होणारे सूर्यग्रहण मेक्सिको, मध्य आणि दक्षिण अमेरिका, उत्तर आणि पश्चिम अंटार्क्टिकाच्या पश्चिम सागरी क्षेत्रामध्ये स्पष्टपणे दिसेल. ग्रहणाशी संबंधित जे काही यम नियम असतील ते त्या देशातील लोकांनी पाळले पाहिजेत. भारतातून हे ग्रहण दिसणार नसले तरी ग्रहणाचा प्रभाव सर्व ठिकाणी जाणवेल. 

या राशीच्या लोकांनी सतर्क राहावे

कणकाकृती सूर्यग्रहण कन्या आणि हस्त नक्षत्रावर पडेल.  ग्रहण प्रभावित देशांमध्ये राहणाऱ्या लोकांनी ग्रहणकाळात ग्रहणाशी संबंधित सर्व नियमांचे पालन करणे महत्त्वाचे आहे.  ग्रहणाच्या प्रभावामुळे हस्त नक्षत्र आणि कन्या राशीच्या लोकांना आजाराला सामोरे जावे लागू शकते, त्यामुळे या लोकांनी कोणत्याही स्थितीत ग्रहण न पाहणे चांगले! भारतात ग्रहण दिसणार नसले तरी कन्या राशीच्या लोकांनी ग्रहण काळात न झोपता ईश्वर स्मरण करावे. 

ग्रहणाची वेळ

भारतीय वेळेनुसार, हे खंडग्रास सूर्यग्रहण रात्री ९:१३ मिनिटांनी सुरु होऊन  स्पर्श करेल आणि  पहाटे ३: १७ मिनिटांनी संपेल. 

ग्रहण काळातील पथ्य 

ग्रहण काळात झोपू नये असे म्हणतात, परंतु सूर्यग्रहण सुरु होत असताना आणि संपताना भारतात रात्र असल्याने झोपणे स्वाभाविक आहे. तसेच ग्रहण भारतातून दिसणार नसल्याने इतर कोणतेही पथ्य न पाळता ईश्वर स्मरण ठेवून विश्वकल्याणाची प्रार्थना करणे एवढेच पथ्य सर्व राशीच्या लोकांनी पाळायला हवे. 

टॅग्स :pitru pakshaपितृपक्षsolar eclipseसूर्यग्रहणNavratriनवरात्रीAstrologyफलज्योतिष