शहरं
Join us  
Trending Stories
1
Shrivardhan Nagar Parishad Election Result 2025: रायगडमध्ये मोठा ट्विस्ट! श्रीवर्धनमधील ठाकरे गटाचा विजयी नगराध्यक्ष शिंदेसेनेत प्रवेश करणार?
2
Maharashtra Nagar Palika Election Result: महाराष्ट्रातील २४६ नगरपरिषदांमध्ये कोण झालं नगराध्यक्ष? वाचा, पक्षनिहाय यादी
3
Maharashtra Election Results 2025: भाजपाचं 'शतक', ठाकरेसेना सगळ्यात मागे; सर्वाधिक नगराध्यक्ष कुणाचे? शिंदे-अजितदादांमध्ये 'टफ फाइट'
4
Loha Nagar Parishad Election Result 2025: लोह्यात भाजपाला घराणेशाहीचा मोठा फटका; एकाच कुटुंबातील सहाही उमेदवारांचा पराभव
5
'आता तरी आपली लायकी ओळखावी' ; परळीतील विजयानंतर धनंजय मुंडेंची खा. सोनवणेंवर टीका
6
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: राज्यात शिवसेनेची जोरदार फाईट, भाजपाही मजबूत; उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेला किती जागा? जाणून घ्या
7
भोकरदनमध्ये दानवे पिता-पुत्रांना मोठा धक्का, शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या समरीन मिर्जा विजयी; भाजपला किती जागा मिळाल्या? 
8
Maharashtra Nagar Parishad Election Results 2025 : 'एकदम ओक्के'! सर्वांनी एकट पाडलं, पण शहाजीबापूंनी मैदान मारलं; सांगोल्यात शिवसेनेचा मोठा विजय
9
Nitesh Rane: निवडणुका संपल्या, आता...; सिंधुदुर्गातील निकाल स्पष्ट होताच नितेश राणे म्हणाले...
10
Shahada Nagar Parishad Election Results 2025: २९ पैकी २० जागा भाजपाने जिंकल्या, पण नगराध्यक्षद जनता विकास आघाडीकडे
11
Bhagur Nagar Parishad Election Result 2025: २७ वर्षांची शिवसेनेची सत्ता गेली, भगूरमध्ये अजित पवार गटाचा मोठा विजय; ‘अशी’ झाली लढत!
12
Kankavali Nagar Parishad Election Result 2025: कणकवलीत भाजपा मंत्री नितेश राणेंना मोठा धक्का; शहर विकास आघाडीचे संदेश पारकर विजयी
13
Georai Nagar Parishad Election Result 2025: गेवराईत भाजपचे कमळ फुलले; नगराध्यक्षपदाच्या उमेदवार गीता पवार विजयी
14
शूटिंग करताना अक्षय खन्नाला 'या' गोष्टीचा होतो त्रास, 'धुरंधर' अभिनेता म्हणाला- "रात्रीच्या वेळी मला..."
15
Maharashtra Nagar Palika Election Result: अमरावतीत १२ पैकी ४ निकाल हाती, बच्चू कडूंच्या 'प्रहार', भाजपचं काय झालं?
16
क्रूरतेचा कळस! कोंबडा बनवलं, नाक घासायला लावलं...; कचरा वेचणाऱ्या मुलांना अमानुषपणे मारलं
17
धोक्याची घंटा! डिजिटल युगाचा 'सायलेंट किलर'; १८ हजार वृद्ध विसरले घरचा पत्ता, ५०० जणांचा मृत्यू
18
साप्ताहिक राशीभविष्य: ८ राशींवर अष्टविनायक कृपा, सरकारी नोकरी योग; अडकलेले पैसे येतील, धनलाभ!
19
Dharangoan Nagar Parishad Election Result 2025 : शिंदेसेनेचे मंत्री गुलाबराव पाटील यांना होमपीचवर मोठा धक्का; मविआ उमेदवाराचा मोठा विजय
Daily Top 2Weekly Top 5

Solar Eclipse 2024: सूर्यग्रहणाचा कसा आणि कोणावर होणार परिणाम? कोणती पथ्य पाळावी? वाचा!

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 27, 2024 16:26 IST

Solar Eclipse 2024: यावर्षी पितृ अमावस्येला अर्थात २ ऑक्टोबर रोजी सूर्यग्रहण आहे जाणून घ्या त्यासंबंधित सर्व महत्त्वाच्या गोष्टी!

या १५ दिवसांच्या आत, वर्षातील दुसरे आणि शेवटचे ग्रहण होणार आहे, जे कंकणाकृती सूर्यग्रहण आहे. यापूर्वी १८ सप्टेंबर रोजी खंडग्रास चंद्रग्रहण झाले होते. आता सूर्य ग्रहण (Solar Eclipse 2024) ग्रहण पितृ अमावस्येला (Sarva Pitru Amavasya 2024) आणि नवरात्रीच्या (Navratri 2024) एक दिवस आधी म्हणजेच २ ऑक्टोबर २०२४ रोजी असणार आहे. ग्रहणाचा एकूण कालावधी ६ तास ४ मिनिटे असेल. त्यासंबंधी गोष्टी सविस्तर जाणून घ्या. 

सतत ग्रहण लागणे शुभ नाही

ग्रहण ही एक खगोलीय घटना आहे ज्याचे आध्यात्मिक आणि वैज्ञानिक दोन्ही क्षेत्रांमध्ये खूप महत्त्व आहे. लागोपाठ दोन ग्रहण होणे किंवा होणे शुभ मानले जात नाही, ग्रहण दिसणाऱ्या देशांतील लोकांना नैसर्गिक आपत्ती, महामारी आणि देशाच्या आर्थिक स्थितीत अनेक चढ-उतारांना सामोरे जावे लागते. 

ग्रहणाचे नियम कोणासाठी?

२ ऑक्टोबर रोजी होणारे सूर्यग्रहण मेक्सिको, मध्य आणि दक्षिण अमेरिका, उत्तर आणि पश्चिम अंटार्क्टिकाच्या पश्चिम सागरी क्षेत्रामध्ये स्पष्टपणे दिसेल. ग्रहणाशी संबंधित जे काही यम नियम असतील ते त्या देशातील लोकांनी पाळले पाहिजेत. भारतातून हे ग्रहण दिसणार नसले तरी ग्रहणाचा प्रभाव सर्व ठिकाणी जाणवेल. 

या राशीच्या लोकांनी सतर्क राहावे

कणकाकृती सूर्यग्रहण कन्या आणि हस्त नक्षत्रावर पडेल.  ग्रहण प्रभावित देशांमध्ये राहणाऱ्या लोकांनी ग्रहणकाळात ग्रहणाशी संबंधित सर्व नियमांचे पालन करणे महत्त्वाचे आहे.  ग्रहणाच्या प्रभावामुळे हस्त नक्षत्र आणि कन्या राशीच्या लोकांना आजाराला सामोरे जावे लागू शकते, त्यामुळे या लोकांनी कोणत्याही स्थितीत ग्रहण न पाहणे चांगले! भारतात ग्रहण दिसणार नसले तरी कन्या राशीच्या लोकांनी ग्रहण काळात न झोपता ईश्वर स्मरण करावे. 

ग्रहणाची वेळ

भारतीय वेळेनुसार, हे खंडग्रास सूर्यग्रहण रात्री ९:१३ मिनिटांनी सुरु होऊन  स्पर्श करेल आणि  पहाटे ३: १७ मिनिटांनी संपेल. 

ग्रहण काळातील पथ्य 

ग्रहण काळात झोपू नये असे म्हणतात, परंतु सूर्यग्रहण सुरु होत असताना आणि संपताना भारतात रात्र असल्याने झोपणे स्वाभाविक आहे. तसेच ग्रहण भारतातून दिसणार नसल्याने इतर कोणतेही पथ्य न पाळता ईश्वर स्मरण ठेवून विश्वकल्याणाची प्रार्थना करणे एवढेच पथ्य सर्व राशीच्या लोकांनी पाळायला हवे. 

टॅग्स :pitru pakshaपितृपक्षsolar eclipseसूर्यग्रहणNavratriनवरात्रीAstrologyफलज्योतिष