शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

हसरे चेहरे आनंदी असतातच असे नाही; खरा आनंद मिळवण्यासाठी.... 

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 27, 2021 16:45 IST

चंचल मनाला विषयात गुंतवून ठेवण्याचा आपण प्रयत्न करतो, परंतु अस्थिर मनाला शांत करण्यासाठी प्रयत्न करायला हवा. सगळे काही ठीक आहे, सुरळीत सुरु आहे, हे दाखवण्यासाठी लोक मुखवटे धारण करतात. मात्र प्रत्यक्षात परिस्थिती वेगळीच असते. 

सद्यस्थितीत प्रत्येक व्यक्ती तणावग्रस्त आहे. तणाव त्यांना येतो, जे शरीराला, मनाला थोडीही विश्रांती देत नाहीत. स्वत:ला सतत कामात गुंतवून घेतात. कामात असणे केव्हाही चांगले, परंतु कामाचा अतिरिक्त ताण मनाला त्रासदायक ठरतो. 

कोणतेही काम करताना आनंद मिळत असेल, तर त्या कामाचा ताण येत नाही. याउलट ताण घेऊन केलेल्या कामातून कधीच आनंद मिळू शकत नाही. ज्ञान आणि ध्यान, काम आणि आराम हे जीवनरथाचे दोन चक्र आहेत. पैकी एकही चाक निकामी झाले, तर जीवनरथ चालणार नाही. परंतु, हे लक्षात न घेता अलीकडे एका रथावर जीवनरथ ओढण्याचा लोकांचा अट्टहास सुरू आहे. 

चंचल मनाला विषयात गुंतवून ठेवण्याचा आपण प्रयत्न करतो, परंतु अस्थिर मनाला शांत करण्यासाठी प्रयत्न करायला हवा. सगळे काही ठीक आहे, सुरळीत सुरु आहे, हे दाखवण्यासाठी लोक मुखवटे धारण करतात. मात्र प्रत्यक्षात परिस्थिती वेगळीच असते. 

एकदा एक मनुष्य अशांत मनावर तोडगा काढण्यासाठी डॉक्टरांकडे गेला. डॉक्टरांनी त्याला विविध उपाय सांगितले. संगीत ऐक, पुस्तक वाच, चित्रपट बघ. तो मनुष्य म्हणाला, मी सगळे उपाय करून पाहिले, तरी मन रमेना. त्यावर डॉक्टर म्हणाले, जवळच्या नाट्यगृहात एक छान हास्यविनोदाचा कार्यक्रम सुरू आहे असे ऐकले आहे, तो ऐकून या, अनेक लोकांना त्याचा फायदा झाला असे ऐकले. तुम्हीही जाऊन या, तुम्हाला बरे वाटेल.' यावर तो मनुष्य डॉक्टरांना म्हणाला, `डॉक्टर, तो कार्यक्रम मीच सादर करतो.' तात्पर्य, हसणारे चेहरे आनंदी असतीलच असे नाही. म्हणून मन शांत असणे सर्वात महत्त्वाचे आहे. 

सद्यस्थितीत जगभरात सर्वात जास्त रुग्ण असतील, तर ते मानसकि आजाराचे. या आजारावर ठराविक औषधेही नाहीत. मानसोपचार तज्ज्ञ समजूत काढू शकतील, परंतु, मनाची जडण घडण ही प्रत्येकाला स्वत:लाच करावी लागते आणि ती केलीही पाहिजे. शरीर स्वास्थ्याची आपण काळजी घेतो, तशी मन:स्वास्थ्याची काळजी घेणे महत्त्वाचे आहे.

कोणतेही कारण आपले मन अस्थिर करू शकत नाही, जोवर आपण ते मनाला लावून घेत नाही. मात्र, बारीक सारीक गोष्टींचा विचार मन:शांती हिरावून घेऊ शकतो. मन अस्थिर तेव्हाच होते, जेव्हा एखादी गोष्ट आपल्या मनाविरुद्ध घडते. परंतु, दर वेळी आपल्या मनासारख्या गोष्टी घडणार नाहीत, हे आपल्यालाही माहित असते. तरीदेखील आपण अकारण अपेक्षा ठेवतो आणि त्या पूर्ण झाल्या नाहीत, की खेद करतो. 

मनशांती शोधायला जाऊ नका. मन शांतच असते. एखाद्या नदीच्या डोहाप्रमाणे. आपणच त्यात खडा टाकून त्यात अस्थिरता निर्माण करतो. ती शांतता अबाधित ठेवण्यासाठी, कोणत्या विषयांना किती महत्त्व द्यायचे, कोणत्या आठवणी किती काळ मनात ठेवायच्या, कोणाचे बोलणे मनाला लावून घ्यायचे या गोष्टींची मनाशी आखणी करायला हवी. तरच, मन कायमस्वरूपी शांत आणि आनंदी राहू शकेल.

टॅग्स :Mental Health Tipsमानसिक आरोग्य