शहरं
Join us  
Trending Stories
1
बाबा सिद्दीकी हत्या प्रकरणात मोठी अपडेट; झिशान अख्तरला कॅनडात पकडले, भारतात आणणार
2
येरवडा कारागृहातून शशांक हगवणे, निलेश चव्हाण पोलिसांच्या ताब्यात; शस्त्र परवाना प्रकरणी तपास करणार
3
मुंबई सोडून पुणे,नागपूरसह सर्व महापालिकांची प्रभाग रचना करण्याचे आदेश; निवडणुकांच्या तयारीला सुरुवात 
4
सोनमच्या समोरच राजावर पहिला वार झाला! चारही आरोपींनी गुन्हा कबुल केला, इंदूर क्राईम ब्रांच...
5
कामगिरी फत्ते! जगभरात पाकिस्तानचा दहशतवादी बुरखा फाडायला गेलेले परतले; सर्व 'सेनापतीं'नी घेतली मोदींची भेट
6
'ऑपरेशन सिंदूर' काळात भारताविरोधात रचला कट; मोहम्मद युनूस यांचा डाव बांगलादेश सैन्यप्रमुखानेच उधळला
7
आधी शाओमी अ‍ॅपलचे फिचर्स पळवायची, आता अ‍ॅपल...; लिक्विड डिस्प्लेवरून नेटकऱ्यांनी पुरावेच दाखविले
8
‘’लग्नानंतर पती-पत्नीला महिनाभर…”, मध्य प्रदेशच्या मुख्यमंत्र्यांनी दिलेल्या सल्ल्यावरून वाद
9
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला कट्टर धर्मवाद मान्य नाही अन् भविष्यातही असणार नाही - अजित पवार
10
...तर राजा रघुवंशी आणि सोनमच्या कुटुंबीयांविरोधात गुन्हा दाखल करणार, मेघालयच्या मंत्र्यांचा इशारा  
11
राष्ट्रवादीच्या वर्धापनदिनाला ३ महत्वाचे नेते गैरहजर; नेमकं कारण काय? अजित पवार म्हणाले...
12
स्थानिक नेतृत्व, कार्यकर्त्यांची इच्छा असेल तरच महापालिका निवडणुकीत युती - अजित पवार
13
विधानसभेला विजय मिळवण्यासाठी लाडकी बहीण योजना समोर आणली;अजित पवारांची थेट कबुली
14
एका प्रेमकहाणीचा हृदयद्रावक शेवट, पतीनं उचललं टोकाचं पाऊल, पाठोपाठ पत्नीनेही...
15
राजा रघुवंशी हत्याकांड प्रकरण: चावी गायब, गेटवरून उड्या मारत आरोपीच्या घरावर छापा; मिळाले महत्वाचे पुरावे - VIDEO
16
Viral News : सासूचा हात धरून पळून गेला जावई, तीन मुलांना घेऊन पोलीस ठाण्यात पोहोचली बायको! म्हणाली...
17
राजस्थान हादरले! ११ जण अंघोळीसाठी नदीत उतरले, वाहून गेले; ८ जणांचे मृतदेह सापडले
18
११ जूनला भद्र योग: ६ राशींना लाभ इच्छापूर्ती, बंपर नफा फायदा; गणपती-लक्ष्मी कृपेने कल्याणच होईल!
19
Mumbai Railway: “रेल्वेमंत्र्यांनी पाऊण तास चर्चा केली”; मुंबई लोकलबाबत CM फडणवीसांनी सांगितला मास्टर प्लान
20
एअरबेसवरील हल्ल्याचा बदला, रशियाचा कहर सुरूच; युक्रेनच्या शहरांवर ३०० हून अधिक ड्रोन, मिसाईल हल्ले

“कृपा करा, किमान १०-१५ दिवस अयोध्येत येऊ नका”; राम मंदिर ट्रस्टच्या प्रमुखांचे आवाहन

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 28, 2025 17:40 IST

Ayodhya Ram Mandir: महाकुंभमेळ्यात सहभागी झालेले भाविक अयोध्येत जात आहेत. गेल्या ३० तासांत जवळपास २५ लाख भाविक, पर्यटक अयोध्येत राम मंदिरात दर्शन घेण्यासाठी पोहोचले आहेत.

Ayodhya Ram Mandir: अयोध्येतील भव्य राम मंदिराला भेट देणाऱ्या भाविकांची आणि पर्यटकांची संख्या दिवसेंदिवस अधिकच वाढत आहे. २०२५ची सुरुवात झाल्यापासून तर भाविकांचा आणि पर्यटकांचा महासागर अयोध्येत लोटला आहे. एकीकडे १४४ वर्षांनी येणाऱ्या महाकुंभमेळ्याचे आयोजन करण्यात आले आहे. या महाकुंभमेळ्यात सहभागी झालेले साधु-संत-महंत तसेच भाविक, पर्यटक अयोध्येला जाऊन रामलला चरणी नतमस्तक होत आहेत. गेल्या ३० तासांत २५ लाख भाविक अयोध्येत दाखल झाले आहेत. 

उत्तर प्रदेशातील प्रयागराजमध्ये २०२५ च्या महाकुंभमेळ्यासाठी त्रिवेणी संगमात स्नान करण्यासाठी देश-विदेशातील भाविक येत आहेत. हेच भाविक पुढे अयोध्येतील राम मंदिर, काशीत जाऊन काशी विश्वनाथाचे दर्शन घेत आहेत. यामुळे अयोध्येत अपेक्षेपेक्षा जास्त गर्दी आहे. याच कारणास्तव आता रामजन्मभूमी तीर्थक्षेत्राचे प्रमुख चंपत राय यांनी भाविकांना आदरयुक्त विनंती केली आहे.

कृपा करा अन् किमान १०-१५ अयोध्येत येऊ नका

अयोध्ये लगतच्या परिसरात असलेल्या भाविकांनी कृपा करून पुढील किमान १० ते १५ दिवस अयोध्येत येऊ नये. कारण देशातील अन्य भागातून तसेच परदेशातून आलेल्या भाविक, पर्यटकांना रामललाचे दर्शन होऊ शकेल. आमचे निवेदन आहे की, अयोध्या लगतच भाविकांनी १० ते १५ दिवसांनी रामललाचे दर्शन घेण्यासाठी यावे, अशी नम्र विनंती करण्यात आली आहे. श्रीराम जन्मभूती तीर्थक्षेत्र न्यासाचे प्रमुख चंपत राय यांनी एक्सवर एक पोस्ट शेअर केली आहे. त्यात चंपत राय यांनी हे निवेदन केले आहे. मौनी अमावस्येचे मुख्य स्नान २९ जानेवारी रोजी प्रयागराजमधील कुंभमेळ्यात आहे. २९ जानेवारी रोजी प्रयागराजमध्ये सुमारे १० कोटी भाविक स्नान करतील असा अंदाज आहे. प्रयागराजहून मोठ्या संख्येने भाविक अयोध्येत पोहोचत आहेत. प्रयागहून अयोध्येला भाविक रेल्वे आणि रस्ते दोन्ही मार्गांनी येत आहेत.

गेल्या तीन दिवसांपासून अयोध्येत भाविकांच्या संख्येत अभूतपूर्व वाढ

गेल्या तीन दिवसांपासून अयोध्येत भाविकांच्या संख्येत अभूतपूर्व वाढ झाली आहे. अयोध्या धामची लोकसंख्या आणि आकार पाहता, एका दिवसात इतक्या मोठ्या संख्येने भक्तांना रामललाचे दर्शन घेणे खूप कठीण आहे. त्यामुळे भक्तांना अडचणी येत आहेत. परिणामी, कोणताही अनुचित प्रकार टाळण्यासाठी, व्यवस्थांमध्ये योग्य बदल करणे आवश्यक झाले आहे. भाविकांना जास्त चालावे लागत आहे. आम्ही जवळच्या भागातील भाविकांना १५-२० दिवसांनी अयोध्येला भेट देण्याची विनंती करतो. जेणेकरून दूरवरून येणाऱ्या भाविकांना रामललाचे दर्शन सोयीस्करपणे घेता येईल. हे सर्वांसाठी सोयीचे असेल. वसंत पंचमीनंतर फेब्रुवारी महिन्यात गर्दी कमी होऊ शकेल आणि हवामानही चांगले होईल. त्या वेळेसाठी जवळच्या भाविकांनी अयोध्येत येण्याचा कार्यक्रम आखला तर चांगले होईल. कृपया या विनंतीचा विचार करा, असे चंपत राय यांनी म्हटले आहे. 

टॅग्स :Ram Mandirराम मंदिरAyodhyaअयोध्याUttar Pradeshउत्तर प्रदेशspiritualअध्यात्मिक