शहरं
Join us  
Trending Stories
1
देशभरातील घरे होणार स्वस्त; ग्राहकांना थेट लाभ देण्याची क्रेडाईची मोठी घोषणा
2
नेपाळची संसद भंग, निवडणुकीच्या तारखांची घोषणा; शुक्रवारी रात्री शेजारील देशात काय काय घडलं?
3
पोस्टाची जबरदस्त स्कीम; महिन्याला करा 'इतकी' गुंतवणूक देईल ₹४० लाखांचा रिटर्न, जाणून घ्या संपूर्ण गणित
4
आजचे राशीभविष्य- १३ सप्टेंबर २०२५: आर्थिक लाभाचा दिवस, पण वाणीवर संयम ठेवा
5
मराठा समाजाला अगोदर मिळालेले आरक्षण नकोय का? रद्द करायचे का?; ओबीसी नेते छगन भुजबळांचा सवाल
6
महाराष्ट्राविना देशाचा गाडा न चाले! देशात सर्वाधिक रोजगार, कंपन्या अन् पेन्शनधारक राज्यात
7
स्पाईसजेट विमानाचे चाक टेकऑफ घेताना निखळले; एकाच चाकावर मुंबईत लँडिंग, मोठी दुर्घटना टळली 
8
'महादेवी'चा निर्णय उच्चस्तरीय समितीने घ्यावा, सर्वोच्च न्यायालय; हत्तीण मठाकडे पाठविण्यास ‘पेटा’चा विरोध
9
विशेष लेख: ‘जेन झी’च्या डोक्यात ही खदखद कुणी भरली आहे? 
10
पतीचे भाकीत ठरले खरे ; डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्यावरून ठेवले नाव
11
जेन झीने महिलेच्या हाती सोपविली नेपाळची धुरा, एकमताने सुशीला कार्की नव्या पंतप्रधान
12
अग्रलेख: मान्सून तिबेटात, धस्स भारतात! मानवी उपद्व्यापच कारणीभूत
13
कुर्डूतील मुरुम उत्खनन बेकायदेशीरच आहे; पालकमंत्री जयकुमार गोरेंचा खुलासा
14
पंतप्रधान नरेंद्र मोदी आज मणिपुरला भेट देणार; पाच राज्यांचा दौरा 
15
चॅटजीपीटीनं त्याला पाठवलं मृत्यूच्या दारात; घशातील त्रास, AI ने काय दिला सल्ला?
16
‘भारत मोठा झाल्याची भीती वाटते म्हणून टॅरिफ लावला’; सरसंघचालक मोहन भागवतांचे मोठे विधान
17
लेख: वीस हजार बेवारस चपलांना नव्या झिंगाट नशेचं व्यसन !
18
केवळ शब्दांनी नव्हे, तर आपल्या मुलांना महात्मा गांधीजींप्रमाणे वर्तनातून शिकवा -मोरारीबापू
19
कर्नाटकात मोठी दुर्घटना, गणेश विसर्जन मिरवणुकीत घुसला ट्रक; 8 जणांचा मृत्यू, अनेक जखमी
20
'हे फक्त ट्रेलर...'; दिशा पाटनीच्या घराबाहेर फायरिंग! गोल्डी बरार अन् रोहित गोदारानं घेतली जबाबदारी, सांगितलं कारण? 

“कृपा करा, किमान १०-१५ दिवस अयोध्येत येऊ नका”; राम मंदिर ट्रस्टच्या प्रमुखांचे आवाहन

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 28, 2025 17:40 IST

Ayodhya Ram Mandir: महाकुंभमेळ्यात सहभागी झालेले भाविक अयोध्येत जात आहेत. गेल्या ३० तासांत जवळपास २५ लाख भाविक, पर्यटक अयोध्येत राम मंदिरात दर्शन घेण्यासाठी पोहोचले आहेत.

Ayodhya Ram Mandir: अयोध्येतील भव्य राम मंदिराला भेट देणाऱ्या भाविकांची आणि पर्यटकांची संख्या दिवसेंदिवस अधिकच वाढत आहे. २०२५ची सुरुवात झाल्यापासून तर भाविकांचा आणि पर्यटकांचा महासागर अयोध्येत लोटला आहे. एकीकडे १४४ वर्षांनी येणाऱ्या महाकुंभमेळ्याचे आयोजन करण्यात आले आहे. या महाकुंभमेळ्यात सहभागी झालेले साधु-संत-महंत तसेच भाविक, पर्यटक अयोध्येला जाऊन रामलला चरणी नतमस्तक होत आहेत. गेल्या ३० तासांत २५ लाख भाविक अयोध्येत दाखल झाले आहेत. 

उत्तर प्रदेशातील प्रयागराजमध्ये २०२५ च्या महाकुंभमेळ्यासाठी त्रिवेणी संगमात स्नान करण्यासाठी देश-विदेशातील भाविक येत आहेत. हेच भाविक पुढे अयोध्येतील राम मंदिर, काशीत जाऊन काशी विश्वनाथाचे दर्शन घेत आहेत. यामुळे अयोध्येत अपेक्षेपेक्षा जास्त गर्दी आहे. याच कारणास्तव आता रामजन्मभूमी तीर्थक्षेत्राचे प्रमुख चंपत राय यांनी भाविकांना आदरयुक्त विनंती केली आहे.

कृपा करा अन् किमान १०-१५ अयोध्येत येऊ नका

अयोध्ये लगतच्या परिसरात असलेल्या भाविकांनी कृपा करून पुढील किमान १० ते १५ दिवस अयोध्येत येऊ नये. कारण देशातील अन्य भागातून तसेच परदेशातून आलेल्या भाविक, पर्यटकांना रामललाचे दर्शन होऊ शकेल. आमचे निवेदन आहे की, अयोध्या लगतच भाविकांनी १० ते १५ दिवसांनी रामललाचे दर्शन घेण्यासाठी यावे, अशी नम्र विनंती करण्यात आली आहे. श्रीराम जन्मभूती तीर्थक्षेत्र न्यासाचे प्रमुख चंपत राय यांनी एक्सवर एक पोस्ट शेअर केली आहे. त्यात चंपत राय यांनी हे निवेदन केले आहे. मौनी अमावस्येचे मुख्य स्नान २९ जानेवारी रोजी प्रयागराजमधील कुंभमेळ्यात आहे. २९ जानेवारी रोजी प्रयागराजमध्ये सुमारे १० कोटी भाविक स्नान करतील असा अंदाज आहे. प्रयागराजहून मोठ्या संख्येने भाविक अयोध्येत पोहोचत आहेत. प्रयागहून अयोध्येला भाविक रेल्वे आणि रस्ते दोन्ही मार्गांनी येत आहेत.

गेल्या तीन दिवसांपासून अयोध्येत भाविकांच्या संख्येत अभूतपूर्व वाढ

गेल्या तीन दिवसांपासून अयोध्येत भाविकांच्या संख्येत अभूतपूर्व वाढ झाली आहे. अयोध्या धामची लोकसंख्या आणि आकार पाहता, एका दिवसात इतक्या मोठ्या संख्येने भक्तांना रामललाचे दर्शन घेणे खूप कठीण आहे. त्यामुळे भक्तांना अडचणी येत आहेत. परिणामी, कोणताही अनुचित प्रकार टाळण्यासाठी, व्यवस्थांमध्ये योग्य बदल करणे आवश्यक झाले आहे. भाविकांना जास्त चालावे लागत आहे. आम्ही जवळच्या भागातील भाविकांना १५-२० दिवसांनी अयोध्येला भेट देण्याची विनंती करतो. जेणेकरून दूरवरून येणाऱ्या भाविकांना रामललाचे दर्शन सोयीस्करपणे घेता येईल. हे सर्वांसाठी सोयीचे असेल. वसंत पंचमीनंतर फेब्रुवारी महिन्यात गर्दी कमी होऊ शकेल आणि हवामानही चांगले होईल. त्या वेळेसाठी जवळच्या भाविकांनी अयोध्येत येण्याचा कार्यक्रम आखला तर चांगले होईल. कृपया या विनंतीचा विचार करा, असे चंपत राय यांनी म्हटले आहे. 

टॅग्स :Ram Mandirराम मंदिरAyodhyaअयोध्याUttar Pradeshउत्तर प्रदेशspiritualअध्यात्मिक