शहरं
Join us  
Trending Stories
1
ठाकरे बंधूंच्या युतीला काँग्रेसचा ग्रीन सिग्नल? संजय राऊत म्हणतात, “आमची चर्चा झाली आहे...”
2
जेवढे जन्माला येतायेत, त्यापेक्षा १० लाख जास्त मरतायेत; भारताच्या मित्र देशात 'सायलेंट इमरजंन्सी'!
3
ठाकरे बंधू दादरच्या कबुतरखाना विरोधातील आंदोलनात दिसणार? ‘या’ समितीचे सहभागी होण्याचे आवाहन
4
₹४ चा शेअर खरेदी करण्यासाठी गुंतवणुकदारांच्या उड्या; आता बंद करावं लागलं ट्रेडिंग, अदानींचं जोडलंय नाव
5
चंद्रावर घेऊन जातो...! नासाच्या इंटर्नने चंद्रावरून आणलेला दगड चोरला, बेडखाली ठेवला अन् गर्लफ्रेंडसोबत रोमान्सही केला...
6
Budh Gochar 2025: वक्री गेलेला बुध मार्गी लागला; पुढील दोन वर्षात कोणकोणते लाभ देणार? वाचा!
7
"एकीकडे जवान सीमेवर शहीद होतायत अन् आपण IND vs PAK क्रिकेट..."; हरभजन सिंगचा संताप
8
कुस्तीपटू सुशील कुमारला सर्वोच्च न्यायालयाचा दणका, रद्द केला जामीन, कारण काय?
9
“मतांची चोरी पकडली गेली, आता भाजपाची सत्ता जायची वेळ आली आहे”; उद्धव ठाकरेंचा मोठा दावा
10
इतका कसला राग? सासूला मारलं अन् १९ तुकडे १९ ठिकाणी फेकले; जावई इतका निर्दयी का झाला?
11
मतचोरीविरोधात वाराणसीत अजब आंदोलन; पराभूत काँग्रेस उमेदवाराच्या नावाने जल्लोष
12
पाकविरुद्ध १२ वर्षांपूर्वी धडाडली होती स्टेन'गन'! Jayden Seales नं वनडेतील तो वर्ल्ड रेकॉर्ड मोडला
13
"बँकर नाही, तुम्ही DJ बना," गोल्डमॅन सॅक्सच्या सीईओंवर डोनाल्ड ट्रम्प यांचा संताप; म्हणाले, "तुमचे अंदाज..."
14
Lunchbox Recipe: ढोबळी मिरचीची 'अशी' करा पीठ पेरून भाजी; कोरडी नाही लागणार, डब्यातही नेता येणार 
15
म्युच्युअल फंड-स्टॉक नाही! 'या' ठिकाणी पैसे गुंतवण्यासाठी लोकांचा कल वाढला, पाहा तुमच्याकडे संधी आहे का?
16
६ शिफ्टमध्ये २८ मंत्र्यांची ड्युटी...यूपी विधानसभेत २४ तासांचं ऐतिहासिक कामकाज, कारण काय?
17
Ladki Bahin Yojana: ‘लाडकी बहीण’ योजनेकडे महिलांची पाठ? ५ महिन्यांत एकही नवा अर्ज नाही! क्रेझ ओसरल्याची चर्चा
18
ट्रम्पमुळे ज्यांचे रक्त खवळतेय त्या सामान्यांना काहीच नाही; तेल कंपन्यांना २५ टक्के नफा, सरकार घेतेय ४५ टक्के टॅक्स...
19
जगाच्या नकाशावरचा 'हा' देश बनलाय भूकंपाचं केंद्र; दर तासाला जाणवतात १८ भूकंपाचे झटके!
20
३ वर्षांपूर्वी बिझनेसला सुरुवात! आता थेट गुगलला क्रोम ब्राउझर खरेदी करण्याची ऑफर; कोण आहे अरविंद श्रीनिवास?

Shravan Somvar 2021 vrat : श्रावणी सोमवारचा उपास करा आणि कायमस्वरूपी 'हा' लाभ करून घ्या!

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 14, 2021 16:05 IST

Shravan Somvar 2021 vrat : श्रावणी सोमवारी आपण उपास करतो. हा उपास केवळ पोटासाठी नसून मनावर, विकारांवर, विचारांवर, काम वासनेवर नियंत्रण ठेवणारा आहे.

चांगल्या-वाईट परिणामाचा अंदाज घेऊन केलेला विचार त्याला आपण सारासार विचार म्हणतो. हा विचार करण्याची क्षमता असलेली ग्रंथी आपल्या मेंदूजवळ असते. ती आपल्याला योग्य-अयोग्य विचारांचे मार्गदर्शन करते. आपण कधी तिचे ऐकतो, तर कधी ऐकत नाही. त्या ग्रंथींवरील तोल सुटला, की आपल्याला राग येतो, रागाच्या भरात आपण काहीबाही बोलतो आणि वागायला नको, तशी कृती करून बसतो. म्हणून त्या ग्रंथीवर नियंत्रण आवश्यक असते. तिलाच शिव ग्रंथी असेही नाव आहे. 

भगवान शिव ज्याप्रमाणे सृष्टीवरील वाईट गोष्टींवर नियंत्रण ठेवण्याचे कार्य करतात, त्यानुसार ही ग्रंथी देखील आपल्या वाईट विचारांवर नियंत्रण ठेवत असते. अशा दृष्टीने तिचे नाव सार्थ वाटते. परंतु त्या ग्रंथीवर नियंत्रण मिळवायचे असेल, तर संयम हवा. हा संयम उपासाने आणि उपासननेनेच साध्य होऊ शकतो. 

श्रावणी सोमवारी आपण उपास करतो. हा उपास केवळ पोटासाठी नसून मनावर, विकारांवर, विचारांवर, काम वासनेवर नियंत्रण ठेवणारा आहे. उपासाच्या दिवशी देहाचीच नाही, तर मनाची शुद्धताही तेवढची महत्त्वाची असते. यासाठी उपासाला नियमांची जोड दिली आहे. उपासाच्या दिवशी केवळ फलाहार करावा, मद्यपान करू नये, मांसाहार करू नये, शरीरसंबंध ठेवू नये. हा देहाचा आणि मनाचा उपास आहे. 

सोळा सोमवारच्या व्रतात खंड पडला, तर पुन्हा नव्याने एक पासून सोळा सोमवार करावे लागतात. ही संयमाची परीक्षा असते आणि संयम वाढवणारी उपासना असते. त्यावर नियंत्रण मिळवले, तर शिवग्रंथी आटोक्यात राहते आणि मन स्थिर होऊन उपासनेला बळ मिळते. 

भगवान महादेवांनी जसा कामासूरावर विजय मिळवला होता, त्याप्रमाणे आपल्या मनातील, विचारातील वासना नियंत्रणात राहण्यासाठी श्रावणात ही व्रते आयोजली आहेत. जी व्यक्ती देहावर आणि मनावर नियंत्रण मिळवू शकते, ती कोणतीही गोष्ट मिळवू शकते, असा विश्वास श्रावणी सोमवारच्या उपासातून, उपासनेतून आणि व्रतामधून प्राप्त होतो. 

काम, क्रोध, लोभ, मोह, मद, मत्सर या षड्रिपूंचे आपल्या आयुष्यात अविभाज्य स्थान आहे. परंतु त्यांचे प्रमाण आखून दिलेले आहे. हे रस मर्यादित प्रमाणात असले, तरच जीवन सुसह्य होईल, अथवा जीवन नरक बनेल. त्यांच्यावर संयम मिळवायचा असेल, तर अशा व्रत-वैकल्यांचे पालन अवश्य करायला हवे. तसेच श्रावण संपल्यावरही आठवड्यातून एकदा देहाचा आणि मनाचा उपास घडवणारे हे व्रत आजीवन पाळायला हवे. 

टॅग्स :Shravan Specialश्रावण स्पेशल