शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs SA :गोलंदाजीत बुमराह-चक्रवर्तीचा जलवा! मालिका विजयासह टीम इंडियानं वर्षाचा शेवट केला गोड
2
तैवान: मेट्रो स्टेशनवर थरार! ग्रेनेड, चाकूहल्ल्यात तीन जणांचा मृत्यू, हल्लेखोरही ठार
3
"मी माझ्या पार्टनरलाही सांगितले होते की,..." मॅचनंतर पांड्यानं शेअर केली आक्रमक खेळीमागची गोष्ट
4
अमरावतीत १९ वर्षीय तरुणाच्या हत्येनंतर तणाव, २०-२५ जणांच्या टोळक्याचा धुडगूस, १० जण ताब्यात
5
टीम इंडियाची 'वाघीण' परत आलीये... Smriti Mandhana चा 'किलर' लूक, पाहा लेटेस्ट PHOTOS
6
अवैध सावकारी प्रकरणात ब्रह्मपुरीत पुन्हा तक्रार; राजकुमार बावणे यांचा गंभीर आरोप
7
VIDEO : पांड्याची भर मैदानातून गर्लफ्रेंडवर प्रेमाची 'बरसात'; फ्लाइंग किस अन् तिची रिअ‍ॅक्शन चर्चेत
8
लालू यादव यांची पत्नी राबडी देवी यांंना दिल्ली न्यायालयाचा मोठा धक्का, काय आहे प्रकरण?
9
Hardik Pandya : पांड्याचा हार्ड हिटिंग शो! जलद अर्धशतकी खेळीसह घातली विक्रमाला गवसणी
10
रशिया-युक्रेन युद्ध तत्काळ थांबवण्यासाठी पुतिन तयार, पण ठेवली एक मोठी अट! ट्रम्प यांच्यासंदर्भातही बोलले
11
सायबर फ्रॉड करणाऱ्यांना आता चक्क मारले जाणार चाबकाचे फटके; कुठल्या देशात झाला निर्णय?
12
IND vs SA 5th T20I : तिलक वर्मा- हार्दिक पांड्यानं धु धु धुतलं! भारतीय संघानं उभारला धावांचा डोंगर
13
"She was Lo, plain Lo"; अल्पवयीन मुलींच्या शरीरावर एपस्टीनने लिहिलेल्या ओळींमागे भयानक अर्थ, अमेरिकेचे डार्क सिक्रेट उघड
14
"मीरा भाईंदर महापालिका निवडणुकीत ५० टक्के जागा द्या, नाहीतर..."; मंत्री सरनाईकांचा इशारा
15
SIR मुळे तामिळनाडूत खळबळ, मतदार यादीतून हटवली तब्बल ९८ लाख नावं, धक्कादायक माहिती समोर
16
IND vs SA 5th T20I : वर्ल्ड कप संघ निवडीआधी गिल 'आउट'; संजूला पुन्हा मिळाली ओपनिंगची संधी अन्...
17
Manikrao Kokate: माणिकराव कोकाटे यांची अटक टळली; हायकोर्टाने शिक्षेला स्थगिती दिली, पण...
18
नालासोपारा: जमिनीवर पाडलं, लाथाबुक्क्यांनी मारलं... सख्ख्या भावाचा खून करणाऱ्या आरोपीला अटक
19
सावधान! तुम्हीही घाईघाईत जेवताय? आताच बदला सवय; स्वत:च देताय अनेक आजारांना आमंत्रण
20
लाडात वाढवलं, खूप शिकवलं, पण मुलीनं पळून जाऊन लग्न केलं, संतप्त कुटुंबानं जिवंतपणी काढली अंत्ययात्रा 
Daily Top 2Weekly Top 5

Shravan Somvar 2021 vrat : श्रावणी सोमवारचा उपास करा आणि कायमस्वरूपी 'हा' लाभ करून घ्या!

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 14, 2021 16:05 IST

Shravan Somvar 2021 vrat : श्रावणी सोमवारी आपण उपास करतो. हा उपास केवळ पोटासाठी नसून मनावर, विकारांवर, विचारांवर, काम वासनेवर नियंत्रण ठेवणारा आहे.

चांगल्या-वाईट परिणामाचा अंदाज घेऊन केलेला विचार त्याला आपण सारासार विचार म्हणतो. हा विचार करण्याची क्षमता असलेली ग्रंथी आपल्या मेंदूजवळ असते. ती आपल्याला योग्य-अयोग्य विचारांचे मार्गदर्शन करते. आपण कधी तिचे ऐकतो, तर कधी ऐकत नाही. त्या ग्रंथींवरील तोल सुटला, की आपल्याला राग येतो, रागाच्या भरात आपण काहीबाही बोलतो आणि वागायला नको, तशी कृती करून बसतो. म्हणून त्या ग्रंथीवर नियंत्रण आवश्यक असते. तिलाच शिव ग्रंथी असेही नाव आहे. 

भगवान शिव ज्याप्रमाणे सृष्टीवरील वाईट गोष्टींवर नियंत्रण ठेवण्याचे कार्य करतात, त्यानुसार ही ग्रंथी देखील आपल्या वाईट विचारांवर नियंत्रण ठेवत असते. अशा दृष्टीने तिचे नाव सार्थ वाटते. परंतु त्या ग्रंथीवर नियंत्रण मिळवायचे असेल, तर संयम हवा. हा संयम उपासाने आणि उपासननेनेच साध्य होऊ शकतो. 

श्रावणी सोमवारी आपण उपास करतो. हा उपास केवळ पोटासाठी नसून मनावर, विकारांवर, विचारांवर, काम वासनेवर नियंत्रण ठेवणारा आहे. उपासाच्या दिवशी देहाचीच नाही, तर मनाची शुद्धताही तेवढची महत्त्वाची असते. यासाठी उपासाला नियमांची जोड दिली आहे. उपासाच्या दिवशी केवळ फलाहार करावा, मद्यपान करू नये, मांसाहार करू नये, शरीरसंबंध ठेवू नये. हा देहाचा आणि मनाचा उपास आहे. 

सोळा सोमवारच्या व्रतात खंड पडला, तर पुन्हा नव्याने एक पासून सोळा सोमवार करावे लागतात. ही संयमाची परीक्षा असते आणि संयम वाढवणारी उपासना असते. त्यावर नियंत्रण मिळवले, तर शिवग्रंथी आटोक्यात राहते आणि मन स्थिर होऊन उपासनेला बळ मिळते. 

भगवान महादेवांनी जसा कामासूरावर विजय मिळवला होता, त्याप्रमाणे आपल्या मनातील, विचारातील वासना नियंत्रणात राहण्यासाठी श्रावणात ही व्रते आयोजली आहेत. जी व्यक्ती देहावर आणि मनावर नियंत्रण मिळवू शकते, ती कोणतीही गोष्ट मिळवू शकते, असा विश्वास श्रावणी सोमवारच्या उपासातून, उपासनेतून आणि व्रतामधून प्राप्त होतो. 

काम, क्रोध, लोभ, मोह, मद, मत्सर या षड्रिपूंचे आपल्या आयुष्यात अविभाज्य स्थान आहे. परंतु त्यांचे प्रमाण आखून दिलेले आहे. हे रस मर्यादित प्रमाणात असले, तरच जीवन सुसह्य होईल, अथवा जीवन नरक बनेल. त्यांच्यावर संयम मिळवायचा असेल, तर अशा व्रत-वैकल्यांचे पालन अवश्य करायला हवे. तसेच श्रावण संपल्यावरही आठवड्यातून एकदा देहाचा आणि मनाचा उपास घडवणारे हे व्रत आजीवन पाळायला हवे. 

टॅग्स :Shravan Specialश्रावण स्पेशल