शहरं
Join us  
Trending Stories
1
कोणत्याही परिस्थितीत पीडितेला न्याय अन् आराेपींना शिक्षा मिळेल; देवेंद्र फडणवीस यांची फलटणमध्ये ग्वाही
2
आजचे राशीभविष्य, २७ ऑक्टोबर २०२५: धनलाभ योग, ठरवलेली कामे होतील; यशाचा-प्रसन्न दिवस
3
Video - अग्निकल्लोळ! रेस्टॉरंटमध्ये भीषण आग; एकामागून एक ४ सिलिंडरचा स्फोट, महिलेचा मृत्यू
4
राज्यात पुन्हा अवकाळी पावसाचा फेरा, हातातोंडाशी आलेल्या पिकांवर मारा; जोर वाढण्याची शक्यता, चार-पाच दिवस सावट
5
रशियावरच्या निर्बंधाने भारतीय तेल कंपन्या अडचणीत; फटका बसू नये म्हणून ONGC जाणार न्यायालयात
6
पश्चिम उपनगरातील वाहतूककोंडी सुटण्यास आणखी ३ वर्षे; गोरगाव ते ओशिवरा केबल-स्टेड पूल उभारणार
7
गृहनिर्माण सोसायट्यांना पुनर्विकासास पूर्ण मुभा; कोर्टाच्या निर्णयामुळे संभ्रम दूर, जुने परिपत्रक मागे घेण्याचे आदेश
8
११३९ कोटी कधी मिळणार? १६ लाख शेतकरी अजून बँकांच्या केवायसीत अडकलेले
9
पाऊस पुन्हा मुक्कामी, मुसळधारेमुळे महामुंबईत धावपळ; ३० ऑक्टोबरपर्यंत मुंबईसह कोकणात मुसळधार
10
"मृत डॉक्टर तरुणीला तिच्यावर कोणत्या ठिकाणी बलात्कार झाले, हे..."; आरोपी गोपाळ बदनेच्या वकिलने कोर्टात काय म्हटलं?
11
देशभरातील आठ हजार शाळा ‘रिकाम्या’; २० हजार शिक्षक घेताहेत फुकटचा पगार
12
एमबीबीएस प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांचा उडाला गोंधळ; निकालापूर्वीच बीएएमएस, बीएचएमएस प्रवेश फेरी सुरू
13
Womens World Cup 2025: पावसाचा 'षटकार'; ऑस्ट्रेलिया विरुद्धच्या सेमीफायनलआधी टीम इंडियाला मोठा धक्का
14
Buldhana Crime: पुण्यावरून गावी निघाला अन् बापाने चिमुकल्या जुळ्या मुलींचा गळा चिरून केला खून
15
सलग दुसऱ्या दिवशीही प्रसूतिगृहाचा काेंडवाडा; सहा महिला वेटिंगवर, दाटीवाटीने लावले बेड
16
दिल्ली विद्यापीठाच्या विद्यार्थिनीवर ॲसिड हल्ला, ओळखीतल्याच तरुणाचं भ्याड कृत्य 
17
भारत-ऑस्ट्रेलियात नवी मुंबईमध्ये सेमीफायनल रंगणार, पावसामुळे सामना रद्द झाल्यास कोण फायनलमध्ये जाणार?
18
Nanded Crime: "मंगल माझ्याशी लग्न कर"; प्रेयसीकडे लावला तगादा, तिने नकार देताच संपवलं
19
Bihar Election: आजी-माजी आमदार, माजी मंत्र्यांसह १६ जणांची पक्षातून हकालपट्टी, नितीश कुमारांचा तडाखा
20
मतदार याद्यांत घोळ, मतचोरीचे आरोप, निवडणूक आयोग मोठा निर्णय घेणार, उद्या संध्याकाळी घोषणा करणार

Shravan Purnima 2021 : नारळाला श्रीफळ का म्हणतात? तो अर्पण करताना कोणती बाजू पुढे ठेवावी आणि का? ते जाणून घ्या

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 20, 2021 13:47 IST

Narali Purnima 2021: नारळ मानवाला चारित्र्यपूजनाची प्रेरणा देतो म्हणूनच श्रीफळ हे मनुष्य जीवनाचे व मनाच्या वैभवाचे प्रतीक आहे.

श्री म्हणजे लक्ष्मी. म्हणजे ऐश्वर्य, समृदधी. नारळाच्या झाडाच्या प्रत्येक भागाचा काही ना काही उपयोग होतोच. हीच त्या झाडातली खरी श्री आहे. म्हणूनही ते उत्तम टिकाऊ, आरोग्यदायी, एकाच वेळी क्षुधा व तृष्णा भागवणारे फळ आहे म्हणून ते श्रेष्ठ फळ- श्रीफळ म्हणून ओळखले जाते. शेंडीखाली डोळे हे त्रिगुणांचे निदर्शक म्हणून काही वेळा त्याला देवत्त्वही बहाल केले जाते व त्याची पूजाही होते. जसे की नारळी पौर्णिमा! समुद्राचा सन्मान म्हणून नारळ अर्पण केला जातो. त्याच्याशिवाय पूजा अपूर्ण मानली जाते.

श्रीफळ म्हणजे नारळ. हे शुभनिदर्शक फळ असून ते सृजनशक्तीचे फळ मानलेले आहे. श्री म्हणजे लक्ष्मी आणि श्रीफळ म्हणजे नारळ. लक्ष्मीला नारळ फार आवडतो म्हणून याला श्रीफळ हे बहुमानाचे व आदराचे नाव प्राप्त झाले. हिंदू धर्मियांच्या धार्मिक आणि सामाजिक जीवनात नारळाला अनिवार्य असे अनन्यसाधारण महत्त्व आहे. 

मंगल कार्यारंभी इष्ट देवापुढे पानाचा विडा, सुपारी व नारळ ठेवण्याची प्रथा आहे. नारळ हे महाफळ म्हणून देवाला अर्पण करतात. शुभकार्याप्रसंगी घराच्या दारावर जे तोरण बांधतात, त्यात मध्यभागी नारळ गुंफतात.

नववधू माहेरवाशीण सासरी जायला निघाली की असोला म्हणजे न सोललेला नारळ देण्याची पूर्वी प्रथा होती. हा नारळ नववधूच्या हस्ते रुजत घालीत. नववधूला संततीप्राप्तीचे सुख लाभावे, ही त्यामागची कल्पना होती. यावरुन अपत्यहीन स्त्री आपल्या इष्ट देवतेला नारळाचे तोरण बांधण्याचा नवस बोलत असते. नवजात बालकाच्या नामकरणप्रसंगी नारळाची कुंची (इरल्याच्या आकाराची लहान मुलाची टोपी) घालून प्रथम पाळण्यात घालतात आणि मग मुलाला पाळण्यात ठेवतात. नारळ हे भावी अपत्याचे प्रतीक असल्याने नववधूंची आणि सुवासिनींची ओटी नारळाने भरतात.

Shravan Purnima 2021: 'वल्हव रे नाखवा हो वल्हव रे रामा' या शब्दांचे मूळ सापडते रामायणात!

धार्मिक विधीप्रसंगी कलस प्रतिष्ठापित करतात, त्या वेळी कलशावर पूर्णपात्र ठेवायचे नसल्यास नारळ ठेवतात. मंदिराच्या कळसावरही सर्वोच्च ठिकाणी नारळाची प्रतिकृती घडवतात. श्रावणी पौर्णिमेला नारळी पौर्णिमा म्हणतात. सागरकिनारी वास्तव्य करणारे लोक व कोळीबांधव महासागराला नारळ अर्पण करून जलदेवतेचे पूजन करतात.

महाबली मारुती, शक्तिदेवता, इष्टदेवता व ग्रामदेवता यांच्यापुढे नारळ फोडण्याची परंपरागत प्रथा आहे. अमावस्या व पौर्णिमेस कुलदैवत, जागृत देवस्थान तसेच भूमीच्या, घराच्या संरक्षणकशक्तीला प्रसन्न करून अनिष्ट घटना घडू नये, या उद्देशाने नारळ देतात. हा प्राचीन नरबळीचा पर्याय आहे असे संशोधकांचे मत आहे. नरबलीच्या अघोरी प्रथेत बळीचे शरीर देवापुढे ठेवत असत. नरबली प्रथा बंद झाल्यावर त्याऐवजी पूर्ण नारळ किंवा तो फोडून त्याची शकले देवापुढे ठेवण्याची प्रथा पडली. 

नारळाला ब्राह्मण मानण्याचा एक संकेत आहे. म्हणून नारळ फोडतेवेळी त्याची संपूर्ण शेंडी काढून शिखानष्ट करू नये. शेंडीसकट नारळ हा नरमुंडाचा प्रतिनिधी आहे.

जलाने पूर्ण भरलेला कलश घेऊन त्यावर पाने, फुले, फुलवीत नारळ ठेवून पूजेला आसनस्थ व्हायचे असते. नारळात जसे पाणी असते, तसेच आपल्या मनातही ओलावा असावा ही त्यामागची विशुद्ध भावना आहे. नारळ हा सद्भावना, सत्प्रवृत्तीचे प्रतीक म्हणून नारळाची पूजा करतात. याचा कोणताही भाग वाया जात नसल्यामुळे दक्षिण हिंदुस्थानात लोक `हरा सोना' म्हणतात. इतरत्र नारळाला कामधेनू म्हणतात तर कोकणवासीय नारळाच्या झाडाला कल्पवृक्ष म्हणतात. नारळाला असलेले डोळे हे त्रिगुणाचे प्रतीक मानले जात असल्यामुळे कुणालाही देताना तो शेंडीची बाजू पुढे करून लाल कुंकू लावून देण्याची प्रथा आहे. 

नारळ मानवाला चारित्र्यपूजनाची प्रेरणा देतो म्हणूनच श्रीफळ हे मनुष्य जीवनाचे व मनाच्या वैभवाचे प्रतीक आहे. अशा अनेक भावरुपांनी भारतीय मनाशी नाते जडलेला नारळ भारतीयांच्या जीवनाशी एकरूप झालेला आहे. 

Shrvan Purnima 2021 : नारळी पौर्णिमेला समुद्राला नारळ का अर्पण करतात, त्यामागील शास्त्र जाणून घ्या!

टॅग्स :Shravan Specialश्रावण स्पेशलRaksha Bandhanरक्षाबंधन