शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs PAK Asia Cup Final : दुबईत विजयाचा जल्लोष झाला; पण टीम इंडियानं बहिष्कारानं केला शेवट; नेमकं काय घडलं?
2
IND vs PAK: आधी 'सिंदूर', आता विजय 'तिलक'! भारताने आशिया कप जिंकला, पाकिस्तान पराभूत
3
IND v PAK: हिंदुस्थान झिंदाबाद! भारत जिंकल्यावर काश्मीरमध्ये लष्करी जवान, नागरिकांचा जल्लोष
4
IND vs PAK: "खेळाच्या मैदानात 'ऑपरेशन सिंदूर' आणि..."; पंतप्रधान मोदींनी पाकिस्तानला डिवचलं
5
IND vs PAK : सिक्सर मारला तिलक वर्मानं अन् चर्चा गौतम गंभीरची; ड्रेसिंग रुममधील व्हिडिओ व्हायरल
6
IND vs PAK Final : अडचणीत आणणाऱ्या पाकला नडला! तिलक वर्माची कडक फिफ्टी!
7
VIDEO: हिशेब चुकता... हॅरिस रौफची दांडी गुल केल्यावर जसप्रीत बुमराहचं 'मिसाईल' सेलिब्रेशन
8
Suryakumar Yadav Out Or Not Out : सूर्याचा कॅच नीट पकडला की, पाक कॅप्टनकडून चिटींग? (VIDEO)
9
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या बाल व शिशू स्वयंसेवकांचा विजयादशमी उत्सव उत्साहात संपन्न
10
सांगलीत चारित्र्याच्या संशयातून पत्नीची गळा चिरून हत्या, मग पती स्वत:हून पोलिस ठाण्यात हजर
11
खेड: भीमा नदीपात्रात कार बुडून एकाचा मृत्यू; पाण्याचा अंदाज न आल्याने घटना घडल्याचा अंदाज
12
IND vs PAK Final : कुलदीपची कमाल! ओव्हर हॅटट्रिकसह मारला 'चौकार'; जोमात सुरुवात करून पाक कोमात
13
कर्तव्यनिष्ठ! वडिलांचे अंत्यसंस्कार झाले, दुसऱ्याच दिवशी धाराशिवचे 'सीईओ' मदतीसाठी बांधावर धावले!
14
तुमच्या कॅप्टनचं तुम्ही बघा, आमच्याच आम्ही बघतो! IND vs PAK Final मध्ये टॉस वेळी काय घडलं? (VIDEO)
15
“नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना महायुती सरकारने तत्काळ भरीव मदत द्यावी, अन्यथा...”: हर्षवर्धन सपकाळ
16
युवराज, उथप्पा, रैनाची मालमत्ता ED जप्त करणार? मनी लॉड्रिंग प्रकरणात आली महत्त्वाची अपडेट
17
“पाक लिंक खोटी, जेलमध्ये भेटायला दिले नाही, ते गांधीवादी...”; सोनम वांगचूकच्या पत्नीचा दावा
18
रेल्वे इंजिनमध्ये आता टँकरने डिझेल भरता येणार; शेडमध्ये जाण्याची गरज भासणार नाही!
19
जळगावमध्ये माजी महापौरांच्या फार्म हाऊसवर सुरू होतं धक्कादायक काम, पोलिसांची धाड, ८ जण अटकेत
20
IND vs PAK Final, Asia Cup 2025 : सूर्यानं टॉस जिंकला; हार्दिक पांड्या 'आउट'! रिंकूला संधी; कारण...

Shravan 2022: उत्तर भारतीयांचा श्रावण आता सुरू झाला, पण आपला नाही; वाचा आणि गोंधळ दूर करा! 

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 18, 2022 13:09 IST

Shravan 2022: दिनदर्शिकेत २९ जुलै पासून श्रावण सुरु होत असल्याचे दाखवले असताना अनेक ठिकाणी श्रावण सुरू झाल्याचे वाचनात येते, त्यामुळे गोंधळून जाऊ नका, दोन्ही पंचांगातील फरक जाणून घ्या!

दिनदर्शिकेत वेगळ्या रंगात रंगवलेला श्रावण त्याचे वेगळेपण दर्शवतो. मात्र समाज माध्यम तसेच बातम्यांमध्ये श्रावण सुरु झाल्याचे पाहून अनेक भाविकांचा गोंधळ होतो. असे कशामुळे होते ते आधी जाणून घेऊ. 

खगोलीय दृष्टिने पृथ्वीला स्वतःभोवती फिरण्यासाठी २४ तासांचा कालावधी लागतो. यालाच आपण एक दिवस असे म्हणतो. तर सूर्याभोवती एक प्रदक्षिणा करण्यासाठी एक वर्ष म्हणजे ३६५ दिवस लागतात. हिंदू पंचांगानुसार, प्रत्येक महिना हा दोन भागांमध्ये विभागला गेला आहे. यालाच शुद्ध पक्ष आणि वद्य पक्ष असे म्हटले जाते. एका महिन्यातील हे दोन्ही पक्ष चंद्रकलेच्या आधारावर विभागले गेले आहेत. पौर्णिमेनंतर वद्य पक्ष आणि अमावास्येनंतर शुद्ध पक्ष सुरू होतो. उत्तर आणि पूर्व भारतातील पंचांगानुसार, कृष्ण पक्षापासून महिना सुरू करण्याची परंपरा आहेत. तर पश्चिम भारतासह अन्य भागात शुद्ध पक्षापासून महिना सुरू करण्याची परंपरा आहे. त्यामुळे देशभरात सण-उत्सव, व्रत-वैकल्ये, परंपरा, संस्कृती तीच असली, तरी ती साजरी करण्याच्या कालावधीत तफावत आढळते. त्यामुळे उत्तर भारतीयांचा श्रावण १४ जुलै रोजी सुरू झाला पण महाराष्ट्रात श्रावण २९ जुलै रोजी सुरु होणार आहे हे लक्षात घेतले पाहिजे. 

उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश, बिहार, झारखंडसह उत्तर आणि पूर्व भारतात श्रावण महिना सुरू झाला आहे. उत्तर भारतातील पंचांगानुसार, १८ जुलै, २५ जुलै, १ आणि ८ ऑगस्ट रोजी त्यांचा श्रावणी सोमवार आहे. मात्र, महाराष्ट्रासह गुजरात आणि भारताच्या अन्य भागांमध्ये मंगळवार, २९ जुलै २०२२ पासून श्रावण सुरू होत असून, १, ८, १५, २२ ऑगस्ट रोजी श्रावणी सोमवार आहे.

श्रावण मास येताच सृष्टीतील बदल आपल्याला जाणवू लागतात. बालकवींनी `श्रावणमासी हर्षमानसी' या कवितेत केलेल्या उल्लेखाप्रमाणे क्षणात येती सरसर शिरवे,क्षणात फिरूनी ऊन पडे!असा हा ऊन पावसाचा खेळ श्रावणात रंगतो. श्रावणसरींनी, व्रत वैकल्यांनी, सण-उत्सवांनी हा महिना चिंब भिजलेला असतो, म्हणून त्याला मराठी महिन्यांचा राजा म्हटले जाते. 

या महिन्याच्या पौर्णिमेला अथवा आधी किंवा नंतर श्रवण नक्षत्र असते, म्हणून याला श्रावण या नावाने ओळखले जाते. श्रावण हा सणांच्या व्रत-वैकल्याच्या दृष्टीने चातुर्मासातीलच नव्हे तर बारा महिन्यातील महत्त्वाचा महिना म्हणावा लागेल. त्याचे महत्त्वाचे वेगळेपण म्हणजे श्रावणातील प्रत्येक दिवशी प्रत्येक तिथीला कोणते ना कोणते तरी व्रत केले जाते. इतर महिन्यातील व्रत वैकल्ये ही बहुतेक तिथीनुसार आलेली आहेत. पण श्रावणातील व्रते ही तिथीप्रमाणे, वारानुसार योजलेली असतात. 

दर श्रावणी सोमवारी भगवान शिवशंकरांसाठी एकभुक्त उपास केला जातो. तसेच शिवाला शिवामूठ वाहिली जाते. मंगळवारी नूतन विवाह झालेल्या मुली मंगळागौरीची पूजा आणि जागरण करतात. बुधवारी बुधपूजन तर गुरुवारी बृहस्पतिपूजन करतात. शुक्रवारी लक्ष्मीच्या पूजेचे स्त्रियांसाठी खास व्रत आहे. या दिवशी पुरणावरणाचा स्वयंपाक रांधून सवाष्णींना जेवू घालतात. शनिवारी मुंज झालेल्या मुलाला जेवू घालतात. तसेच मारुतीला किंवा शनिला तेल वाहून नारळ वाढवतात. रविवारी सूर्यपूजा करून खीरीचा नैवेद्य दाखवतात. 

श्रावणात मंदिरांमध्ये तसेच ठिकठिकाणी कथा, कीर्तन, प्रवचनाचे आयोजन केले जाते. शुभमुहूर्त पाहून भागवत सप्ताह आयोजित केला जातो. त्यानिमित्ताने लोक भगवद्कार्य करणाऱ्या कथेकरीला शिधा, दक्षिणा देतात. 

याबरोबर श्रावणात अनेक मोठे सणही येतात. नागपंचमी, नारळीपौर्णिमा, रक्षाबंधन, कृष्णजन्म, गोपाळकाला, पिठोरी अमावस्या, बैलपोळा इ. वैविध्याने युक्त असलेल्या सण समारंभातून आनंदाचा वर्षाव होतो. वर्षा ऋतूमुळे थबकलेल्या सणांना नागपंचमीपासून पुन्हा प्रारंभ होतो. त्यात पावसामुळे निसर्गानेदेखील चहुकडे `हिरवे हिरवे गार गालिचे' अंथरले असतात. निसर्गाचा सृजनसोहळा मानवी मनालाही उभारी देतो. म्हणून श्रावण सर्व महिन्यांचा राजा ठरतो.

टॅग्स :Shravan Specialश्रावण स्पेशल