शहरं
Join us  
Trending Stories
1
दहशतवादी हल्ला करताना धर्म विचारतात का? वडेट्टीवारांचे विधान; CM फडणवीस म्हणाले, "इथे बसून…"
2
'धनंजय मुंडे यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिला, मग...', अंजली दमानियांचे सरकारला दोन सवाल
3
एकही युद्ध जिंकले नाही; मग पाकिस्तानी अधिकारी छातीवर पदके लावून का फिरतात? जाणून घ्या...
4
एकट्याने पाकिस्तानी आक्रमण परतवलेले, त्यानंतर रहस्यमयी मृत्यू; आजही भारतीय सैन्याला सियाचिनमध्ये वाचवितात ओपी बाबा
5
Gold Price on 28 April : अक्षय्य तृतीयेपूर्वी सोनं झालं स्वस्त, पाहा १० ग्रॅम सोन्यासाठी किती खर्च करावा लागणार
6
'पंचायत'च्या मेकर्सची आणखी एक हटके वेबसीरिज, 'ग्राम चिकित्सालय'मधून उडणार हास्याचे फवारे!
7
पहलगामधील हल्ल्याबाबत काश्मीरच्या विधानसभेतून ओमर अब्दुल्लांनी व्यक्त केला संताप, म्हणाले, ‘’मागच्या २६ वर्षांनंतर…’’ 
8
...म्हणून ८ वर्षांनी मोठ्या अविनाश नारकर यांच्यासोबत केलं लग्न, ऐश्वर्या यांनी सांगितलं कारण
9
जीवन संपवण्यापूर्वी डॉ. शिरीष वळसंगकर यांनी चार जणांना केले होते फोन, सीडीआरमधून समोर आली नवी माहिती
10
आईनं हॉस्पिटलसाठी जीवाचं रान केले तरी तिच्यावर ही वेळ आली; मनीषाच्या मुलांची व्यथा
11
पाकिस्तानचे पाणी बंद केले हे पूर्णपणे खोटे; सरकारचे पत्र वाचून दाखवत प्रकाश आंबेडकरांचा दावा
12
शोएब अख्तरसह १६ पाकिस्तानी यूट्यूब चॅनेलवर बंदी; महिन्याला किती कमाई होती?
13
"विधानसभा निवडणुकीत काँग्रेस शहराध्यक्षाची मला मदत"; भाजपच्या सुरेश खाडे यांचा गौप्यस्फोट
14
Ather IPO GMP Today : Ather Energy IPOसह २ आयपीओ आजपासून गुंतवणूकीसाठी खुले, पाहा GMP सह अन्य डिटेल्स
15
"धर्म विचारून गोळ्या घालण्याइतपत वेळ दहशतवाद्यांकडे असतो का?’’, काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांचा सवाल  
16
Akshaya Tritiya 2025: अक्षय्य तृतीयेला साडे तीन मुहूर्तामध्ये स्थान का? जाणून घ्या विविध कारणं!
17
पुणे-पनवेल-पुणे प्रवास अन् सिट्रॉएन ईसी 3 ईव्ही, परतीच्या प्रवासात थोडी एन्झायटी होती...; किती रेंज दिली?...
18
जखमेवर मीठ! मुंबईविरुद्धच्या पराभवानंतर बीसीसीआयने ऋषभ पंतला ठोठावला लाखोंचा दंड
19
डेटा संपल्यानंतर तुम्ही पब्लिक Wi-Fi वापरता? सावधगिरी बाळगा अन्यथा बँक खातं होईल रिकामं
20
भारताचा मोठा निर्णय! पाकिस्तानातील १६ युट्यूब चॅनेल्सवर घातली बंदी, बघा संपूर्ण यादी

सुखवस्तू घराला आदर्श घर म्हणावे का? घराला वास्तुशास्त्र आणि अध्यात्माचे कोंदण कसे द्यावे? वाचा!

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 14, 2021 14:54 IST

दर तीन व्यक्तींमागे एक व्यक्ती नैराश्याने ग्रासली आहे. का? कशामुळे? तर आत्मकेंद्री झाल्यामुळे. मात्र पूर्वी तसे नव्हते...

'ज्याचा कोणी नसतो, त्याचा मोबाईल असतो आणि ज्याच्याजवळ मोबाईल असतो, तो कुणाचा नसतो.' असे मार्मिक आणि मजेशीर विधान समाज माध्यमांवर वाचले. आधी हसू आले, परंतु स्वयंकेंद्री झालेल्या समाजाचे वास्तव त्या एका वाक्याने अधोरेखित केले. सद्यस्थितीत, मी आणि माझे यापलीकडचे विश्व आपल्याला दिसतच नाही. समाज माध्यमांमुळे व्यक्ती सोशल होण्याऐवजी अधिकच एकटी पडत असताना दिसत आहे. दर तीन व्यक्तींमागे एक व्यक्ती नैराश्याने ग्रासली आहे. का? कशामुळे? तर आत्मकेंद्री झाल्यामुळे. सतत दुसऱ्यांच्या सुखाशी तुलना करता करता, मनुष्य स्वत:चे सुख हिरावून बसला आहे. आत्मभान विसरत आहे. जगण्याचे ध्येय विसरत आहे. म्हणून संत तुकाराम महाराज म्हणतात, 

आपुलिया हिता जो होय जागता, धन्य मातापिता तयाचिया।कुळी कन्यापुत्र होती जी सात्त्विका, तयाचा हरिख वाटे देवा।गीता भागवत करिती श्रवण, अखंड चिंतन विठोबाचे।तुका म्हणे मज घडो त्यांची सेवा, तरी माझ्या दैवा पार नाही।

धन्य आहेत ते लोक, जे कितीही खडतर प्रसंग आले, तरी आपल्या ध्येयापासून ढळत नाहीत. ते स्वत:चा आणि आपल्या बरोबर कुटुंबाचा, समाजाचा, राज्याचा, राष्ट्राचा उद्धार करतात. नैराश्यावर मात करतात. त्यांना जन्म देऊन त्यांचे माता पिताही धन्य होतात. अडी अडचणींवर मात करून ज्या मुली स्वत:ला सिद्ध करतात, आपले कसब पणाला लावून लोकोपयोगी काम करतात, समाजाला दिशा देतात, जबाबदाऱ्या सार्थपणे सांभाळतात, त्यांना या पृथ्वीवर पाठवून देवालाही त्यांचा हेवा वाटत असावा. 

आजच्या काळात सुखवस्तू घर आहे, परंतु घरात राहणारे सुखी नाहीत. कारण, त्यांचा आपापसात सुसंवाद होत नाही. चांगल्या विचारांची देवाण घेवाण होत नाही. चांगले विचार कानावरदेखील पडत नाहीत. पूर्वी आजी-आजोबा रामरक्षा, भीमरूपी स्वत: म्हणत आणि नातवांकडून म्हणवून घेत. आता कोणाचा पायपोस कोणाला नसतो. अशा घरात सुख समृद्धी कशी वास करणार? घराला सांधून ठेवण्यासाठी संस्कारांचा मजबूत पाया असावा लागतो. परमार्थाची गोडी असावी लागते. श्लोक, स्तोत्र, संतविचार यांचे ध्वनी उमटावे लागतात. तिथेच लक्ष्मी आणि सरस्वती नांदते.

तुकाराम महाराज म्हणतात, अशा घराचा आपणही आदर्श ठेवला पाहिजे. जिथे सत्संग घडेल, तिथे गेले पाहिजे. जिथे समाजकार्य घडत असेल, तिथे आपणही सहभाग घेतला पाहिजे. अशा ठिकाणी केलेली सेवा, ही ईशसेवेचा भाग आहे. 

टॅग्स :Vastu shastraवास्तुशास्त्र