शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धवसेनेशी युतीच्या शक्यतेवर CM फडणवीस स्पष्टच बोलले; म्हणाले, "सध्याची महायुती..."
2
IND vs ENG : "मी रोहित भाईला पाहिलं अन्..." शतकी खेळीनंतर यशस्वीनं शेअर केली ती खास गोष्ट (VIDEO)
3
हार्दिक पटेल यांनी आळवले बंडाचे सूर, मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून दिला असा इशारा, गुजरातमध्ये भाजपाला धक्का बसणार?
4
IND vs ENG 5th Test Day 3 Stumps: मियाँ मॅजिक! परफेक्ट यॉर्करसह थांबला खेळ; सलामी जोडी फुटली
5
Mumbai LocaL: तिकीट तपासणीवरून लोकलमध्ये वाद, प्रवाशाचा कर्मचाऱ्यांवर हल्ला, कार्यालयाचीही तोडफोड!
6
Asia Cup 2025 Venues : भारत-पाक 'हायहोल्टेज' सामना दुबईत; या ठिकाणी रंगणार आशिया कप स्पर्धेतील सामने
7
"मोदी, योगी आणि मोहन भागवतांवर आरोप कर, नाहीतर…’’, प्रज्ञा सिंह यांचा ATS वर गंभीर आरोप
8
रिलेशनमध्ये असतानाही ५० टक्के महिला ठेवतात बॅकअप पार्टनर, सर्वेतून धक्कादायक माहिती समोर
9
बेकरीत काम करणाऱ्या २५ वर्षीय तरुणाची आत्महत्या, ६ जणांविरुद्ध गुन्हा दाखल
10
आम्ही पुन्हा प्रयत्न करतोय...; सायना नेहवालचे Ex-पती पारूपल्ली कश्यपची 'पॅच-अप'; २० दिवसांत 'यू-टर्न'
11
VIDEO : एकदम कडक! ओव्हलच्या स्टेडियमवर दिसली हिटमॅन रोहितची झलक; अन्...
12
Amravati: अमरावतीत जागेच्या वादावरून महिला सरपंच अन् सदस्यांमध्ये फ्रीस्टाईल हाणामारी!
13
धनश्री वर्माशी शेवटचं बोलणं केव्हा झालं? क्रिकेटर युजवेंद्र चहलने सांगितला 'त्या' वेळचा किस्सा
14
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
15
२० हजारांपेक्षा कमी किंमतीत वनप्लस, सॅमसंग आणि आक्यूओओचे 5G फोन!
16
Yashasvi Jaiswal Century : यशस्वी 'सेंच्युरी रोमान्स' अगेन्स इंग्लंड! जशी सुरुवात तसाच शेवट
17
"आम्ही स्वतः कारवाई केली नाही, माधुरीच्या भविष्यासाठी..."; वाढत्या विरोधानंतर वनताराकडून स्पष्टीकरण
18
"ती माझी चूकच..."; युजवेंद्र चहलने दिली प्रामाणिक कबुली, सांगितलं धनश्रीशी नातं तुटण्याचं कारण
19
 Crime: दोस्त दोस्त ना रहा! दारुसाठी मित्राच्या डोक्यात चाकू खुपसला, जालन्यातील घटना
20
Mumbai: आयआयटी मुंबई कॅम्पसमध्ये विद्यार्थ्याचा मृतदेह आढळल्याने खळबळ, पोलीस तपास सुरू!

शुभ मुहूर्त पाहून केलेल्या घटनांचे परिणाम शुभच होतात असे शास्त्र सांगते; जाणून घ्या महत्त्व!

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 1, 2023 16:49 IST

मुहूर्त पाहून प्रत्येक कार्य करण्याकडे पूर्वीच्या लोकांचा कल होता, रणदीप हुड्डाच्या विवाहामुळे पुन्हा हा विषय चर्चेत आला आहे!

प्रसिद्ध अभिनेता रणदीप हुडा याने ३० नोव्हेंबर रोजी आपल्या प्रेयसी बरोबर झालेल्या लग्नाचे फोटो सोशल मीडियावर टाकले आणि त्यांचा पारंपरिक विवाह सोहळा पाहून चाहत्यांनी त्यांच्यावर कौतुकाचा वर्षाव केला. मणिपूरच्या इंम्फाळमध्ये पारंपारिक मणिपुरी पोशाखात शुभ मुहूर्तावर दोघांचा विवाह सोहळा पार पडला. आजच्या आधुनिक काळात अशा पारंपरिक पद्धतीने केलेल्या केलेला विवाह सर्वत्र चर्चेत आहे. हिंदू धर्मात मुहूर्ताला, शुभ दिवसाला, शुभ तिथीला अनन्यसाधारण महत्त्व आहे. विशेषतः लग्नकार्यात, मुंजीत मुहूर्त पाहून शुभ कार्य पार पाडली जातात. रणदीप हुडाने अशाच पारंपरिक गोष्टींचे पालन केल्यामुळे तो चर्चेचा विषय ठरला आहे. त्यानिमित्ताने आपणही मुहूर्ताचे महत्त्व जाणून घेऊ. 

कालचक्र हे गोलाकार आवृत्त होत असते. त्यामुळे निसर्गात घडणाऱ्या घटना नियमित वेळेस पुनरावृत्त होत असतात. सूर्य-चंद्राची ग्रहण नियमित वेळी पुनरावृत्त होतात. त्यामुळेच त्यांच्या स्पर्श मध्य आणि मुक्तीच्या वेळा मिनिट सेकंदात पंचांगात अगोदर वर्तवल्या जातात व त्या बिनचूक अनुभवाला येतात. अमेरिकेत साठ वर्षांचे पंचांग अगोदर तयार करतात. म्हणजे साठ वर्षे त्या संदर्भाची गणिते अगोदर करून ठेवतात. रोजच सूर्य-चंद्राचे उदयास्त, समुद्राची भरती ओहोटी, रोज होणाऱ्या तिथी वर्ष वर्ष अगोदर छापून दिलेल्या असतात. तीन वर्षांनी येणारा अधिक मास, १८ वर्षांनी येणारे सिंहस्थ पर्व, कन्यागताचे पर्व नियमित काळानेत येत असते. 

पूर्व मीमांसा शास्त्रात शुंना व उपवास या नावाने स्वतंत्र अधिकरण जैमिनीने लिहिले आहे. त्यात ते लिहितात काही कुत्रे नियमितपणे एकादशी तिथीलाच उपवास करतात. महिन्यातला एकच एकादशीचा दिवस कुत्र्याला बिनचूक कळतो. रानडुक्कर या प्राण्याला वर्षाच्या तीनशे पासष्ठ दिवसांपैकी एकच दिवस म्हणजे भाद्रपद शुद्ध चतुर्थीचा दिवस बिनचूक समजतो. त्या दिवशी चंद्रदर्शन घडू नये, म्हणून रानडुक्कर सूर्यास्ताचे पूर्वीच खाडा करून त्यात आपले तोंड लपवून ठेवतो. त्यादिवशी शिकारीसुद्धा रानडुक्कराला मारीत नाहीत. इंद्रायणी तीरावर देहू आणि आळंदी आहे. भाद्रपद महिन्यातील वद्य पक्षाचे पंधरा दिवस देहूच्या डोहातील मासे आळंदीला जातात. ऋतूचे चक्र नियमित वेळेवर चालते. साराश सृष्टी संचालन नियमित वेळापत्रकानुसार चाललेले आहे. त्या त्या नैसर्गिक घटना त्या त्या काळी घडतात व त्या त्या कलांशावर नियमित पुनरावृत्त होत असतात. 

तेव्हा या अशा कालांशावर एखादी घटना शुभफल देणारी ठरते तेव्हा तो कालांश म्हणजे सुमुहूर्त होय आणि ज्या कालांशावर एखादी घटना अशुभ घडते, तो कुमुहूर्त होय. कारण त्या त्या वेळी तसेच्या तसे फळ देण्यासाठी पुनरावृत्त होत असतात.हीच सुमूहुर्त आणि कुमुहूर्त यांची शास्त्रीय उत्पत्ती आहे. 

अमेरिका, रशिया अंतराळयान अवकाशात सोडताना नियमितपणाने विशिष्ट तिथीलाच ते सोडतात. एका मुलाखतीत तसे स्पष्ट लिहिले होते, की ही प्रगत राष्ट्रेदेखील चतुर्थीच्या मुहूर्तावर अंतराळयान सोडतात. याचाच अर्थ ते देखील तिथीपालन करतात. 

ही सर्व माहिती पाहता रणदीप हुडाने आपल्या रीती, भाती, परंपरांना दिलेले प्राधान्य नक्कीच कौतुकास्पद आहे. आयुष्यात सगळे मंगलकारी व्हावेसे वाटत असेल तर आपणही मुहूर्त पाहून शुभ कार्याला सुरुवात करायला हवी असे शास्त्र सांगते. 

टॅग्स :Astrologyफलज्योतिष