शहरं
Join us  
Trending Stories
1
आता पाण्याच्या थेंबा-थेंबासाठी तरसणार पाकिस्तान! पहलगामनंतर भारताचे 'वॉटर स्ट्राइक'; सिंधू जल करार स्थगित
2
अटारी चेकपोस्ट बंद, पाक नागरिकांचे व्हिसा रद्द, ४८ तासात देश सोडण्याचे आदेश; भारताची कठोर भूमिका
3
"तुम्ही हर-हर महादेव म्हणत संघटित तर होऊ शकत नाही, मग अल्लाह हू अकबर म्हणत..."; मनोज मुंतशिर भडकले
4
पहलगाम हल्ल्यातील दहशतवाद्यांची माहिती देणाऱ्यांना 'इतक्या' लाखांचे बक्षीस; काश्मीर पोलिसांची घोषणा
5
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारताच्या बाजूने उभे राहिले हे मुस्लीम देश, काय म्हणतोय पाकिस्तान?
6
दुर्गम भाग, सुरक्षा व्यवस्था नाही...दहशतवाद्यांनी हल्ल्यासाठी पहलगाम का निवडले?
7
पहलगाम हल्ल्यानंतर PM मोदींच्या नेतृत्वात CCSची अडीच तास बैठक, पाकिस्तानला मोठा दणका
8
पहलगाम हल्ला: पाकिस्तानी क्रिकेटरनेच काढली पाकिस्तानची लक्तरं, म्हणाला- लाज वाटते...
9
"तू बाहर आ..."; दहशतवाद्यांनी आयत म्हणायला सांगितली, मग व्यावसायिकावर गोळ्या झाडल्या, मुलीनं सांगितला भयावह प्रसंग
10
पहलगाम हल्ल्यानंतर काश्मीरमध्ये मोठी कारवाई; 1500 लोकांना घेतले ताब्यात, चौकशी सुरू...
11
Pahalgam Terror Attack: मॅच आधी खेळाडूंनी दहशतवादी हल्ल्यातील मृत पर्यटकांना वाहिली श्रद्धांजली
12
बिल क्लिंटन भारतात येण्यापूर्वी झाली होती ३६ शीखांची हत्या; २५ वर्षांनी पहलगाममध्येही तेच घडलं
13
Pahalgam Terror Attack : सुट्टी घेऊन अमेरिकेहून काश्मीर फिरण्यासाठी आला अन् दहशतवादी हल्ल्यात जीव गमावला
14
पहलगाम हल्यामुळे काश्मीरच्या अर्थव्यवस्थेला फटका; पर्यटकांनी रद्द केल्या बुकिंग्स...
15
पहलगाम हल्ला: २४ तासांनंतर बांगलादेशची पहिली प्रतिक्रिया आली; मोहम्मद युनूस म्हणाले...
16
कुलगाममध्ये मोठी चकमक सुरु; पहलगाममध्ये हल्ला करणाऱ्या टीआरएफच्या कमांडरला घेरले
17
"निष्पाप भारतीयांना मारणं हाच पाकिस्तानचा राष्ट्रीय खेळ, आता..."; भारतीय क्रिकेटरला राग अनावर
18
“पंतप्रधानांनी खंबीर भूमिका घ्यावी, २६चा बदला २६०ने घेतला पाहिजे”; शिंदेसेनेचे नेते संतापले
19
"हे सरकार हिंदुत्वाबद्दल बोलतंय, त्यामुळे मुस्लिमांना कमकुवत झाल्यासारखं वाटतंय"; 'पहलगाम'बाबत रॉबर्ट वाड्रा यांचं विधान चर्चेत
20
"यांचा सामना कसा करायचा? भारताला चांगलं ठाऊक, आम्हीही सोबत...!"; पहलगाम हल्ल्यानंतर भारताच्या खास मित्राचं आश्वासन

तणाव नियंत्रणासाठी रोज म्हणा, समर्थ रामदास स्वामी रचित, मनाचे श्लोक!

By ज्योत्स्ना गाडगीळ | Updated: December 1, 2020 15:37 IST

देहावर नियंत्रण मिळ्वण्याआधी मनावर नियंत्रण मिळवणे आवश्यक आहे. म्हणून समर्थांनी मनाला उपदेश केला. तसा उपदेश आपणही मनाला केला, तर बाह्य गोष्टींनी आपले मन दुःखी, कष्टी होणार नाही.

ज्योत्स्ना गाडगीळ 

सद्यस्थितीत सभोवताली घडणाऱ्या घटना मन विचलित करणाऱ्या आहेत. अशा वातावरणात मन शांत ठेवायचे असेल, तर समर्थ रामदास स्वामींनी लिहिलेले `मनाचे श्लोक' यांचे नित्यपठण करायला हवे. मनावर नियंत्रण मिळवले, की देहाला झालेल्या वेदना मनावर विपरित परिणाम घडवू शकत नाहीत. देहाला झालेले कष्ट, हाल, निंदा, वेदना या क्षणिक आहेत. त्या जखमा भरून निघतीलही, परंतु मनाच्या जखमा दीर्घकाळ टिकतात. यासाठीच, मनाला देहापासून अपिप्त ठेवावे, असे समर्थ रामदास स्वामी सुचवतात. देही असोनि विदेही राहणे, ही अवस्था कशी असते, हे श्लोकातून आणि स्वामी विवेकानंदांच्या आयुष्यात घडलेल्या प्रसंगातून जाणून घेऊया.

मना मानसी दु:ख आणू नको रे,मना सर्वथा शोक चिंता नको रे,विवेके देहेबुद्धी सोडूनि द्यावी,विदेहीपणे मुक्ति भोगीत जावी।

हेही वाचा : जगातली सर्वात शांत जागा तुम्ही अनुभवली आहे का? - गौर गोपाल दास

परमपूज्य रामकृष्ण परमहंसांशी भेट होण्यापूर्वी स्वामी विवेकानंदांच्या आयुष्यातील घटना...नरेंद्र एका प्रापंचिक चिंतेने हैराण होऊन शोकाकूल अवस्थेमध्ये रस्त्यातून एकटाच फिरत होता. कितीही नाही म्हटले, तरी परमार्थच करायचा हा निश्चय ठाम असताना अजून `सद्गुरु' न मिळाल्याने प्रापंचिक देहबुद्धी दु:ख देतच होती. इतक्यात एक विचित्र दृष्य त्यांच्या नजरेस पडले. वेडसर दिसणारा एक माणूस रस्त्यातून हातवारे करत चालला होता. इतक्यात काही टवाळखोर पोरांनी त्याला दगड मारण्यास सुरुवात केली. मुलांच्या दगड मारण्याने तो विक्षिप्त माणूस आनंदाने अधिकच चेकाळत होता.आता तर अतिमाराने त्याच्या अंगामधून रक्ताच्या धारा सुरू झाल्या. जोराजोराने धावत तो माणूस गावाबाहेर जाऊन एका झाडाखाली बसला. त्याची दयनीय अवस्था नरेंद्रला बघवेना. त्याच्याजवळ जाऊन त्याच्या जखमांवर ममतेने हात फिरवून नरेंद्रने त्याला विचारले. `बाबा, फार लागले का? त्या वात्रट मुलांनी तुम्हाला बराच त्रास दिला. तुमच्या देहाला बऱ्याच जखमा झाल्या आहेत. मी वनस्पतीचा रस काढून लावतो.'

त्यावर खदाखदा हसत तो माणूस म्हणाला, `कोण मुलं? कुठला देह? त्या भगवंताच्या लीलेने मी तर पार मोहून गेलो आहे. आनंदून गेलो आहे. किती सुंदर रीतीने भगवंत माझ्याशी दगडाचा खेळ खेळत होता. खूप मजा आली. हाहाहाहा.;

त्याच्या या वागण्या बोलण्यावरून नरेंद्रच्या लक्षात आले, देहबुद्धीचे भान हरपलेला, विचार विकारांपासून दूर गेलेला, विदेही अवस्थेमध्ये असलेला जीव वेडा नसून ज्ञानी आहे. उन्मनी अवस्थेतील अनुपम सुख भोगीत आहे. विवेकबुद्धीने मुक्त होण्याचे जीवनातील त्याचे ध्येय निश्चित झाले आहे. मनाला शोक, चिंता, दु:ख हे देहबुद्धी प्रबळ असल्याने होते. विवेकाने विदेही अवस्था प्राप्त होते व जीव मुक्त होतो. 

आपल्यालाही विदेही अवस्था प्राप्त करण्याचा सराव करायला हवा. तो कसा करायचा? तर त्यावर सोपा उपाय म्हणजे, दिवस चांगले असोत की वाईट, मनाला एकच सूचना द्यायची, 'हे ही दिवस जातील.' मग आपोआप विदेही अवस्थेकडे वाटचाल सुरु होईल. 

हेही वाचा : कोणतीही गोष्ट सहजासहजी मिळत नाही, देवही नाही!