शहरं
Join us  
Trending Stories
1
'बीडच्या रेल्वेखाली जीवन संपविणारा मी पहिला असेल'; तरुणाचे मुख्यमंत्र्यांना पत्र, कारण काय?
2
राज ठाकरे यांच्याशी अधिकृत युती कधी जाहीर करणार?; उद्धव ठाकरे यांनी सरळ सांगितले, म्हणाले…
3
“देवाभाऊंच्या जाहिरातीला कोट्यवधी उधळले, तेच पैसे शेतकऱ्यांना दिले असते तर...”: उद्धव ठाकरे
4
टीम इंडियाला ज्या ज्या कंपन्यांनी स्पॉन्सर केले, त्यापैकी तीन कंपन्या बुडाल्या, बंद झाल्या...
5
'जत्रा २' येणार का? दिग्दर्शक केदार शिंदे म्हणाले, "मनापासून इच्छा आहे पण..."
6
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका लांबणीवर; ३१ जानेवारी २०२६ पर्यंत मुदतवाढ, सुप्रीम कोर्टात काय घडलं?
7
बाजारात 'सुपर' तेजी! सेन्सेक्स-निफ्टीमध्ये मोठी उसळी; 'या' शेअर्समध्ये सर्वाधिक वाढ
8
भारतावर आणखी टॅरिफ लावण्याची धमकी अमेरिकेवरच उलटू शकते, जाणून घ्या का?
9
गायीने कहरच केला... धावता-धावता उडी मारून थेट कौलावरच चढली, Video पाहून व्हाल थक्क
10
Pitru Paksha 2025: पितृ पक्षात एखादी अंत्ययात्रा दिसणे शुभ की अशुभ? काय करावे उपाय? वाचा
11
सोन्याच्या किंमतीनं रचला इतिहा, विक्रमी पातळीवर पोहोचला भाव; पटापट चेक करा सोन्या-चांदीचा लेटेस्ट रेट!
12
झोमॅटोने रचला नवा विक्रम! टाटा-अदानी समुहातील मोठ्या कंपन्यांनाही 'या' बाबतीत टाकलं मागे
13
"जे झालं ते अचानक अन् चुकून झालं"; BMW कार अपघातातील आरोपी मागतेय जामीन
14
अपोलो टायर्स प्रत्येक मॅचमागे ४.५ कोटी रुपये मोजणार; टीम इंडियाला नवा स्पॉन्सर मिळाला
15
इस्राइल-गाझाचं उदाहरण देत शाहिद आफ्रिदीने भारताविरोधात ओकली गरळ, मोदींबाबत म्हणाला... 
16
धोक्याची घंटा! कच्ची केळी बादलीत टाकली अन् १ मिनिटात पिकली; लोकांच्या जीवाशी खेळ?
17
दबंग सून... मध्यरात्री गुंडांना घेऊन सासरी आली आणि केला धडाधड गोळीबार, त्यानंतर...  
18
IND vs PAK: पाकिस्तान जय शाहला घाबरला; आधी 'बड्या बाता' केल्या, आता गपचूप बसला, काय घडलं?
19
स्विगीने खास पुणेकरांसाठी लाँच केले 'Toing' ॲप; केवळ ५० रुपयांत मिळणार भरपेट जेवण, काय आहे वैशिष्ट्ये?

Satwik Food: शाकाहारच का करावा? शिवानी दीदी सांगताहेत लोकांच्या अनारोग्याचे कारण!

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 15, 2024 10:21 IST

Sartwik Food: सद्यस्थितीत अमाप पैसा कमवूनही लोक अशांत, असमाधानी, अस्वस्थ आहेत, हे चित्र बदलता येऊ शकते; कसे ते जाणून घेऊ. 

आपले आरोग्य आपल्या खाण्याच्या सवयींनवर अवलंबून असते हे आपण जाणतोच, पण त्यापुढे जाऊन ब्रह्म कुमारी शिवानी दीदी सांगतात, 'जसे धन, तसे अन्न, जसे अन्न तसे मन!' आपल्या घरचे अन्न कोणत्या पैशांनी आणलं आहे, यावरही त्या अन्नाची गुणवत्ता ठरते. धन हे नैतिक मार्गाने कमावलेलं असेल तरच त्यातून खरेदी केलेलं अन्न अंगी लागतं. त्याबरोबरच अन्न शिजवून वाढणाऱ्याचे मन शांत नसेल तर ते भाव देखील अन्नात उतरतात अन्यथा अवघ्या तासाभरात ते अन्न खाणाऱ्या व्यक्तीलाही अस्वस्थ वाटू लागतं!

वरकरणी या गोष्टी खोट्या आहेत असे वाटू शकते, मात्र महिनाभर या गोष्टींकडे बारकाईने लक्ष दिले तर आपल्या शरीरावर, मनावर होणारे परिणाम लक्षात येतील. हृदयाचा मार्ग पोटातून जातो असे म्हणतात, ते यासाठीच! अन्न बनवणारी व्यक्ती जेव्हा आस्थेने, प्रेमाने, जिव्हाळ्याने आपल्या कुटुंबाला जेवू घालते तेव्हा मीठ-मसाल्यांबरोबरच अन्नाची रुची वाढते, पौष्टिकता वाढते, साधे अन्न देखील रुचकर लागते. कारण करणाऱ्याचे, वाढणाऱ्याचे आणि जेवणाऱ्याचे मन शांत असते. अलीकडे बाहेर जेवण्याचे प्रमाण वाढले आहे. बाहेरचे लोक कोणत्या मानसिकतेत अन्न तयार करतात याची कल्पनाही नसते. ते अन्न पोटात जाते आणि अनारोग्याचे कारण ठरते! घरात अन्न तयार होत नसल्याने कुटुंबातील एकतेलाही सुरुंग लागत आहे. 

म्हणूनच आपले आजी आजोबा, जेवणाआधी मन शांत व्हावे म्हणून हात पाय धुवून जेवायला बसत. जेवण सुरु करण्याआधी श्लोक म्हणत असत. ताटाभोवती सुबक रांगोळी, सुगंधी उदबत्ती लावत असत. हा शाही थाट नसून मन शांत करणारे विधी असत. आता आपण जेवण समोर येताच ओरपायला सुरुवात करतो. त्यामुळे चव घेऊन खाणं, शांतपणे जेवणं आपल्याला माहीतच नाही. जोडीला टीव्ही, मोबाईल नाहीतर फोनवर गप्पा, यामुळे जेवणाचा आस्वादही नीट घेता येत नाही. 

अन्न आपल्याला ऊर्जा देते, म्हणून त्याला पूर्णब्रह्म म्हटले आहे. ही सकारात्मक ऊर्जा शरीरात तयार व्हावी म्हणून शांत चित्ताने जेवावे, मन एकाग्र करावे, जेवताना बोलू नये, इतरत्र लक्ष देऊ नये, हे साधे सोपे नियम पाळावेत. 

सात्विक अन्न कोणते? मांसाहाराला विरोध का?

शिवानी दीदी सांगतात, 'ज्या प्राण्याचे मांस खाल्ले जाते त्याला अनेक दिवस बांधून ठेवले जाते, त्याला नैसर्गिक मृत्यू न येता बळे बळे मारले जाते. त्यावेळी त्या जीवाचा आक्रोश, तडफड आणि इच्छा, आकांक्षा, वासनांची अपूर्णता त्या देहाला चिकटते आणि ते मांस शिजवून खाणे म्हणजे शरीरात प्रचंड नकारात्मक ऊर्जा भरून घेण्यासारखे आहे. कांदा, लसूण हे सुद्धा कामवासना वाढवणारे आहेत. त्याचे सेवन टाळले की त्यामुळे होणारे लाभ लक्षात येतात. म्हणून सात्विक जेवणात मांसाहार, कांदा, लसूण, मसालेदार जेवण यांचा समावेश नसतो. असे अन्न, जे रुचकर असते आणि पचायलाही त्रास होत नाही त्याला सात्विक आहार म्हटले जाते. 

टॅग्स :Healthआरोग्यHealth Tipsहेल्थ टिप्सfoodअन्नMental Health Tipsमानसिक आरोग्य