शहरं
Join us  
Trending Stories
1
अमरावती-अकोला महामार्गावर भीषण अपघात; चहा पिऊन परतणाऱ्या ४ तरुणांचा जागीच मृत्यू
2
चमत्कार, वशीकरण नाही तर ‘हे’ तंत्र वापरून केलं महिलांचं शोषण, SITसमोर खरातने दिली कबुली
3
घरगुती गॅस सिलिंडर स्वस्त होणार? एलपीजी आणि पीएनजी 'टॅक्स फ्री' करण्याची मागणी; किती दिलासा मिळेल?
4
खळबळजनक! डोसा खाल्ल्याने २ मुलींचा मृत्यू; आई-वडिलांची प्रकृती गंभीर, नेमकं काय घडलं?
5
सापाची कात, पक्ष्यांचे अवशेष अन् अश्लील व्हिडिओ; एरंडेच्या ऑफिसमध्ये सापडलं भोंदूगिरीचे साहित्य
6
IPL 2026: नाव मोठं दर्शन खोटं! आयपीएलच्या पहिल्याच आठवड्यात फ्लॉप ठरले 'हे' स्टार खेळाडू
7
TATA Group: टाटा समूहाचे ‘हुकुमाचे एक्के’ फेल? २९ हजार कोटींच्या प्रचंड तोट्याचा अंदाज, काय आहेत डिटेल्स?
8
लग्नानंतर ४ महिन्यांतच सूरज चव्हाण होणार बाबा? पत्नी संजनाचे बेबी शॉवरचे फोटो व्हायरल
9
व्हायरल 'IIT बाबा'ने गुपचूप लग्न उरकलं अन् फ्यूचर प्लॅनिंगही सांगितलं! आता त्याची पत्नी म्हणते.. 
10
रेल्वे रुळावर गॅस सिलेंडर ठेवून प्रवाशांचा काळ बनणार होते 'ते' दहशतवादी; एटीएसचा मोठा खुलासा!
11
केंद्र सरकारचा मोठा निर्णय! ५ किलो सिलेंडरसंदर्भात सर्व राज्य सरकारांना पत्र; दिले महत्वाचे आदेश
12
मोजतबा खामेनेई कोमात, ना युद्धाची माहिती, ना..., अमेरिका-इस्राइलला ठावठिकाणाही कळला?
13
Gold Silver Price Today: सोनं-चांदी झाली स्वस्त... लग्नसराईच्या कालावधीत खरेदीची वाट पाहत असाल तर पाहा काय आहेत नवे दर?
14
वडील आणि मुलांचं अपहरण, पण वाटेत गाडीचा भीषण अपघात, तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू, तर...
15
Ghatkopar Crime: घाटकोपरमध्ये मराठी तरुणाला मारहाण; शौचालय वापरल्याचा राग, मनसे धडकताच गुजराती व्यावसायिक गायब
16
Baramati bypoll Election: बारामतीत सुनेत्रा पवारांविरुद्ध ५५ अर्ज; काँग्रेसच्या आकाश मोरेंचाही अर्ज दाखल, हाकेंची माघार
17
ट्रम्प यांची एक धमकी अन् जागतिक बाजारात भूकंप! तेलाचा भडका, सोन्यानंही दीड लाखांचा टप्पा गाठला; भारताचं टेन्शन वाढलं
18
Home Cleaning Schedule: पाहुणे कधीही येऊ दे, तुमचं घर असेल नेहमी रेडी; फॉलो करा 'हे' साधे क्लीनिंग शेड्युल!
19
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
20
Stock Markets Today: Sensex मध्ये ७५० अंकांची मोठी घसरण, निफ्टी २०० अंकांनी घसरला; ऑटो-रियल्टी इंडेक्स १-१ टक्क्यांनी घसरले
Daily Top 2Weekly Top 5

Sankashti Chaturthi 2022: कापूर आरती वरून तळहात न फिरवता तुपाच्या निरांजनावरून आरती ग्रहण करावी! -विष्णुधर्मोत्तरपुराण

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 12, 2022 15:01 IST

Sankashti Chaturthi 2022: आज संकष्टीनिमित्त चंद्रोदय झाल्यावर आरती म्हणून, ती ग्रहण करून उपास सोडला जाईल. त्यानिमित्ताने ही प्रथा समजावून घेऊ!

देवाची आरती झाल्यावर आरतीचे ताट फिरवले जाते आणि उपस्थित सगळे जण त्या ज्योतीवरून तळहात फिरवून तो मस्तकी लावतात, त्यालाच आरती ग्रहण करणे असे म्हणतात. पण हे आपण नेमके का करतो, ते जाणून घेऊ. 

आरतीग्रहण विधी :

देवाची आरती झल्यावर नीरांजनाच्या ज्योतीवर दोन्ही हातांचे तळवे धरून त्यांचा विविध गात्रांना (अवयवांना) स्पर्श करणे हे विधियुक्त आरतीग्रहण म्हटले जाते. एकदा आरतीग्रहण केल्यावर ते निरांजन पुन्हा देवाला ओवाळू नये. कापूरार्तीचे आरतीग्रहण व्यर्ज्य मानले जाते. कारण कापराच्या काजळीने हात काळा होऊन तो चेहऱ्याला लागू शकतो. म्हणून तेलाच्या तसेच कापराच्या आरतीचे ग्रहण करू नये. 

आरतीग्रहण हे देवाला ओवाळल्या जाणाऱ्या केवळ तुपाच्या नीरांजनानचेच करावे. नीरांजनासाठी शुद्ध साजूक तूप व देवकापसाच्या वाती वापरल्यास आरतीग्रहण अधिकाधिक लाभदायी ठरते. 

आरतीग्रहण मुख्यत: नेत्र, मुख, मस्तक या अवयवांना होत असले तरी विशेषकरून व्याधा वा सूज असलेल्या अवयवांना केलेला आरतीग्रहणाचा हस्तस्पर्श आरोग्यदायी ठरतो. कारण, मानवी शरीरात प्रविष्ट होणाऱ्या वैश्विक लहरी तळहातामधून निघतात. देवाला ओवाळलेल्या आरतीची ऊर्जा तळहाताद्वारे शरीराला दिली जाते व ती अधिक परिणामकारक ठरते. 

जपानी रेकीशास्त्र आणि आरतीग्रहण यात साम्य आहे. रोज आरतीग्रहण करणाऱ्या व्यक्तीचे मुख व नेत्र तेज:पुंज तर होतातच शिवाय कालांतराने त्याच्या हातातून वाहणाऱ्या वैश्विक लहरीदेखील अधिकाधिक प्रभावी होत जातात.

मंदिरातील व घरातील देवपूजा झाल्यानंतर तीर्थप्रसादाइतकेच महत्त्व आरतीग्रहणास आहे. विष्णुधर्मोत्तरपुराण सांगते,

यथैवोर्ध्वगतिर्नित्यं राजन् दीपशिखा शुभा दीपदातुस्तथैवोर्ध्वगतिर्भवति शोभना।

अर्थात दिव्याची ज्योती ज्याप्रमाणे नित्य ऊर्ध्वगतीने तेवत असते, त्याप्रमाणी दीपदान करणारे साधक आध्यात्मिकदृष्ट्या उच्चपातळीवर असतात. 

नीराजनबलिविष्णोर्यस्य गात्राणि संस्पृशेत्यज्ञलक्षसहस्त्राणां लभते स्नानजं फलम्

अर्थात, देवाच्या नीरांजनातील ज्योतीचा स्पर्श ज्यांच्या विविध गात्रांना होतो त्या व्यक्तींना लाखो यज्ञातील अवभृतस्नानाचे फळ मिळते असे स्मृतिवचन आहे. हे विधान थोडे अतिशयोक्तीचे वाटत असले, तरी यावरून आरतीग्रहण किती महत्त्वाचे आहे हे लक्षात येते. 

टॅग्स :Sankashti Chaturthiसंकष्ट चतुर्थी