शहरं
Join us  
Trending Stories
1
Sushila Karki: सुशीला कार्की आहेत तरी कोण? नेपाळच्या पंतप्रधानाच्या शर्यतीत आघाडीवर!
2
डोनाल्ड ट्रम्प यांच्या निकटवर्तीयाची गोळ्या झाडून हत्या, विद्यापीठातील कार्यक्रमात घडलेल्या घटनेने अमेरिकेत खळबळ
3
समीकरणे बदलली अन् अशी वाढत गेली ठाकरे बंधूंची जवळीक; युती होण्याच्या चर्चेने कार्यकर्त्यांत उत्सुकता
4
केवळ ₹५ लाखांपासून ते ₹२.६४ कोटींचा प्रवास! आपल्या मुलांना द्या हे फायनान्शिअल फ्रीडमचं गिफ्ट; कम्पाऊंडींगची जादू पाहा
5
युतीबाबत एक पाऊल पुढे! शिवतीर्थावर उद्धव-राज यांच्यात अडीच तास चर्चा, बंधुऐक्याची ‘फ्रेम’ ठरली 
6
नेपाळमधील तुरुंगात झालेल्या संघर्षात पाच जणांचा मृत्यू, देशभरातील सुमारे ७००० कैदी फरार
7
आजचे राशीभविष्य- ११ सप्टेंबर २०२५: आजचा दिवस लाभदायी, नियोजित कामे पूर्ण होतील!
8
Maratha Reservation: हैदराबाद गॅझेटियर अधिसूचनेला मुंबई उच्च न्यायालयात आव्हान; काय आहे याचिकेत?
9
सोने-चांदीने गुंतवणूकदार मालामाल, गेल्या एका वर्षात मिळाले सोन्यातून ४४ तर चांदीतून ४५ टक्के रिटर्न
10
अग्रलेख: राधाकृष्णन आता देशाचे! नव्या उपराष्ट्रपतींनी हे लक्षात ठेवायला हवेच
11
विम्याचा हप्ता दहा वर्षांत दुप्पट! कंपन्यांकडून ग्राहकांची लूट; भीती दाखवून प्रीमियमवाढ
12
‘डीवाय पाटील’ बीकेसीत उभारणार शैक्षणिक संकुल; दहा भूखंड भाडेतत्त्वावर देण्याचा निर्णय
13
‘कोहिनूर’ची ‘बहीण’ ११७ वर्षांनी दिसणार! या बहिणीचं नाव आहे ‘दरिया-ए-नूर’ 
14
भाडेकरार, भाडेवाढीशिवाय घरे रिकामी करणार नाही; नायगाव बीडीडी प्रकल्पग्रस्तांचा म्हाडाला कडक इशारा
15
Maratha Reservation: राज्यात आजपर्यंत दिलेल्या कुणबी प्रमाणपत्रांची श्वेतपत्रिका काढावी; ओबीसी मंत्रिमंडळ उपसमितीची भूमिका
16
विशेष लेख: एका परिवर्तनशील, सहृदय नेतृत्वाचा अमृतमहोत्सव
17
नेपाळमध्ये देशभरात संचारबंदी लागू; महाराष्ट्रातील १०० पर्यटकांसह शेकडो प्रवासी अडकले 
18
भारत-अमेरिका यांच्यात चर्चेची दारे खुली होणार; पंतप्रधान मोदी म्हणाले, "ट्रम्प यांच्याशी..."
19
नेपाळनंतर फ्रान्समध्येही जनतेचा उद्रेक; २५० निदर्शकांना अटक 
20
Asia Cup 2025 : बुमराहच्या परफेक्ट यॉर्करशिवाय ही गोष्ट ठरली लक्षवेधी; कारण ६ वर्षांनी असं घडलं

'बोले तैसा चाले, त्याची वंदावी पाउले', असे संतश्रेष्ठ तुकाराम महाराज म्हणतात कारण... 

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 2, 2023 16:07 IST

आश्वासन देणारे अनेक जण असतात मात्र शब्द पाळणारे फार कमी, त्यांचा समाचार घेत तुकोबा राय प्रतिपादन करतात... 

संतश्रेष्ठ तुकाराम महाराजांचा हा अभंग सर्वपरिचित आहे. पण तो लिहिण्याची गरज महाराजांना का भासली असावी? कारण, महाराजांनी तत्कालीन परिस्थितीत समाजाचे अवलोकन केले, समाज मनाचा अभ्यास केला आणि भोळ्या भाबड्या जनतेला वेठीस धरणारे ठग पाहिले आणि समाजहितासाठी त्यांनी प्रबोधनपर या अभंगाची निर्मिती केली. यात ते म्हणतात, 

बोले तैसा चाले । त्याची वंदीन पाउले ॥अंगे झाडीन अंगण । त्याचे दासत्व करीन ॥त्याचा होईन किंकर । उभा ठाकेन जोडोनि कर ॥तुका म्हणे देव । त्याचे चरणी माझा भाव ॥

"जो 'जसा बोलतो त्याप्रमाणेच वागतो' त्याच्या पाउलांचे मी वंदन करतो. अशा उक्ती आणि कृतीत साधर्म्य असणाऱ्या लोकांच्या घराचे अंगण मी स्वतःच्या अंगाने झाडीन, त्याचा दास बनून राहीन. त्यांच्या सेवेत तप्तर राहीन. माझ्यासाठी तेच देव असतील आणि त्यांच्या चरणी माझा प्रेमभाव असेल, असा या अभंगाचा साधा सोपा अर्थ आहे. 

अशा शब्दाला जगणाऱ्या लोकांची समाजाला गरज आहे. अशा लोकांसमोर समाज नतमस्तक होतो. त्यामुळे महाराज सांगतात बोलण्याआधी विचार करा, बोलून झाल्यावर नाही आणि विचाराअंती जे बोलल त्या विषयावर ठाम राहा, मात्र बोलून झाल्यावर आपल्या शब्दांपासून तुम्ही मागे फिरणार असाल तर न बोलणे इष्ट!