शहरं
Join us  
Trending Stories
1
"ऑफर देणारे, अटी ठेवणारेही तेच, त्यामुळे मी..."; राज-उद्धव एकत्र येण्यावर CM फडणवीसांनी व्यक्त केला आनंद
2
"जाऊ दे यार, कामाचं बोला"; राज-उद्धव एकत्र येण्याच्या प्रश्नावर एकनाथ शिंदे चिडले
3
मला स्टार्क वैगेरे व्हायचं नाही; ऑस्ट्रेलियन स्टारशी तुलना केल्यावर आवेश खाननं असा दिला रिप्लाय
4
शेकापच्या संतोष पाटलांच्या दोन्ही मुलांचा वेळास बीचवर एकाच वेळी मृत्यू; बहिणीचा मुलगाही सुमद्रात बुडाला
5
"माय नेम इज खान"! LSG साठी आवेशची 'हिरोगिरी' यॉर्करचा मारा करत RR च्या हातून हिसकावून घेतला सामना
6
रशिया-युक्रेन युद्ध थांबले; तीन दिवस युद्धविराम जाहीर, व्लादिमीर पुतिन यांची घोषणा
7
कॅनडात बस स्टॉपवर भारतीय तरुणीची गोळीबारात हत्या; हल्लेखोरांना दुसऱ्यावर चालवायची होती गोळी
8
Vaibhav Suryavanshi : "छोटा पॅक बडा धमाका"! पहिल्याच बॉलवर सिक्सर.. तेही लॉर्ड शार्दुल ठाकूरसमोर
9
IPL 2025 GT vs DC : बटलर इज बॉस! दिल्ली कॅपिटल्सला पराभूत करत गुजरात टायटन्सनं रचला इतिहास
10
"देशात धार्मिक युद्ध भडकवण्यासाठी सुप्रीम कोर्ट जबाबदार"; मर्यादेबाहेर जाताय म्हणत भाजप खासदाराची टीका
11
वाळूमाफियांची आता खैर नाही! नियमांचे उल्लंघन केल्यास थेट डेपो होणार रद्द, सर्वांना नोटीस जारी
12
ठाकरे बंधू एकत्र येण्याच्या चर्चेवर मनसे नेते नाराज? म्हणाले, “त्यांनी आम्हाला दोनदा फसवलेय”
13
8व्या वेतन आयोगाबाबत मोठी बातमी; सरकार या 35 पदांवर करणार नवीन नियुक्त्या
14
IPL 2025 Video: भरमैदानात झाला राडा !! इशांत शर्मा भडकला, आशुतोषवर बोट रोखलं, नेमकं काय घडलं?
15
राज ठाकरेंशी युती झाल्यास उद्धव ठाकरे महाविकास आघाडीतून बाहेर पडणार का?; संजय राऊत म्हणाले...
16
Big Breaking: तनिषा भिसे मृत्यू प्रकरणात अखेर डॉ. सुश्रुत घैसास यांच्यावर गुन्हा दाखल
17
Vaibhav Suryavanshi : १४ वर्षीय वैभव सूर्यवंशी पदार्पणासह रचणार इतिहास; जाणून घ्या सविस्तर
18
Video - अग्निकल्लोळ! एका ठिणगीमुळे बोटीला भीषण आग; १४८ जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
19
“मुंबई महापालिकेच्या निवडणुकीमुळे राज ठाकरेंची उपयुक्तता सर्वांना वाटत आहे”: छगन भुजबळ
20
“राहुल गांधींचा ‘डरो मत’ संदेश अमलात आणू, एकता, अखंडतेची मशाल घेऊन वाटचाल करू”: सपकाळ

'बोले तैसा चाले, त्याची वंदावी पाउले', असे संतश्रेष्ठ तुकाराम महाराज म्हणतात कारण... 

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 2, 2023 16:07 IST

आश्वासन देणारे अनेक जण असतात मात्र शब्द पाळणारे फार कमी, त्यांचा समाचार घेत तुकोबा राय प्रतिपादन करतात... 

संतश्रेष्ठ तुकाराम महाराजांचा हा अभंग सर्वपरिचित आहे. पण तो लिहिण्याची गरज महाराजांना का भासली असावी? कारण, महाराजांनी तत्कालीन परिस्थितीत समाजाचे अवलोकन केले, समाज मनाचा अभ्यास केला आणि भोळ्या भाबड्या जनतेला वेठीस धरणारे ठग पाहिले आणि समाजहितासाठी त्यांनी प्रबोधनपर या अभंगाची निर्मिती केली. यात ते म्हणतात, 

बोले तैसा चाले । त्याची वंदीन पाउले ॥अंगे झाडीन अंगण । त्याचे दासत्व करीन ॥त्याचा होईन किंकर । उभा ठाकेन जोडोनि कर ॥तुका म्हणे देव । त्याचे चरणी माझा भाव ॥

"जो 'जसा बोलतो त्याप्रमाणेच वागतो' त्याच्या पाउलांचे मी वंदन करतो. अशा उक्ती आणि कृतीत साधर्म्य असणाऱ्या लोकांच्या घराचे अंगण मी स्वतःच्या अंगाने झाडीन, त्याचा दास बनून राहीन. त्यांच्या सेवेत तप्तर राहीन. माझ्यासाठी तेच देव असतील आणि त्यांच्या चरणी माझा प्रेमभाव असेल, असा या अभंगाचा साधा सोपा अर्थ आहे. 

अशा शब्दाला जगणाऱ्या लोकांची समाजाला गरज आहे. अशा लोकांसमोर समाज नतमस्तक होतो. त्यामुळे महाराज सांगतात बोलण्याआधी विचार करा, बोलून झाल्यावर नाही आणि विचाराअंती जे बोलल त्या विषयावर ठाम राहा, मात्र बोलून झाल्यावर आपल्या शब्दांपासून तुम्ही मागे फिरणार असाल तर न बोलणे इष्ट!