शहरं
Join us  
Trending Stories
1
ट्रम्प प्रशासनाचा नवा नियम! नवीन व्हिसा ऑर्डरनुसार, लठ्ठपणा किंवा मधुमेहामुळे अमेरिकेत प्रवेश मिळणार नाही; इतर आजारांचाही उल्लेख
2
धक्कादायक! ऑनलाइन क्रीम खरेदी केली, महिलेच्या शरीरावर सापासारखे व्रण; १० वर्षांत १२ लाख रुपये खर्च
3
हिवाळी अधिवेशन ८ डिसेंबरपासूनच, दोन आठवड्यांचे कामकाज; २८ नोव्हेंबरपासून सचिवालय नागपुरात, पत्र आले
4
अधिकाऱ्यांना वाचवण्याच्या नादात दोघांचा मृत्यू; सॅण्डहर्स्ट रेल्वे अपघातामध्ये मुलीचा मृत्यू; आई जखमी
5
सरकार कुणालाही पाठीशी घालणार नाही, अहवालात जो दोषी आढळेल त्याच्यावर कारवाई, जमीन घोटाळ्यासंदर्भात मुख्यमंत्र्यांची स्पष्टोक्ती
6
Women's World Cup : भारताच्या लेकींसह प्रेक्षकांनीही रचला इतिहास; ते पाहून ICC चा ऐतिहासिक निर्णय!
7
पार्थ पवार भूखंड प्रकरणाचा व्यवहार रद्द; अजित पवार म्हणाले, "मी मुख्यमंत्री फडणवीसांना कॉल केला आणि..."
8
देशातील सर्वात मोठ्या विमानतळावर विमानांच्या उड्डाणाला ब्रेक! ATC मध्ये झाला तांत्रिक बिघाड, १००० विमानांना फटका
9
पाकिस्तानला बेकायदेशीर अणु कारवायांचा इतिहास, आम्ही ट्रम्प यांच्या विधानाची दखल घेतली: भारत सरकार
10
60 टक्क्यांहून अधिक मतदान म्हणजे NDA ची सत्ता परतणार; बिहारबाबत अमित शाहांचा दावा
11
माझ्या नवऱ्याला महिन्यापासून दारु पाजून जरांगेविरुद्ध षडयंत्र रचलं; अमोल खुणेंच्या कुटुंबीयांनी सगळंच सांगितलं
12
"त्या एक टक्केवाल्या पाटलाला पार्थ पवारने जमीन दिली असती का?"; अजित पवारांचा उल्लेख, दानवेंची मोठी मागणी
13
IPL 2026 : डेफिनेटली! MS धोनी पुन्हा मैदानात उतरण्यास तयार; CSK च्या ताफ्यातील आतली गोष्ट आली समोर
14
धोत्रे हत्या प्रकरण: अत्यंविधीला आला आणि पोलिसांनी पकडला, स्मशानभूमीत लावला होता सापळा
15
चार नाही, दहा लाख महिना पोटगी, मोहम्मद शमीच्या पत्नीच्या मागणीवर सर्वोच्च न्यायालयाने नोटीस बजावली
16
महाराष्ट्राचा अभिमान! स्मृती, जेमिमा अन् राधाचा मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते कोट्यवधींच्या बक्षीसासह सन्मान
17
बेळगावमध्ये ऊस आंदोलन पेटले! हत्तरगी टोल नाक्यावर शेतकऱ्यांकडून दगडफेक
18
Maharashtra Crime: तुकाराम स्वत:च लपून बसला आणि अपहरणाचा बनाव केला; पण असं का केलं?
19
"धन्या, तू आता पक्का अडकला"; धनंजय मुंडेंचा एकेरी उल्लेख, मनोज जरांगेंनी थेट ऑडिओ क्लिपच ऐकवली
20
AI Industry: 'एआय'चा फुगा फुटू लागला? अमेरिकेमध्ये १.५ लाख लोकांनी नोकऱ्या गमावल्या; गुंतवणूकदारही झाले अलर्ट

Sai Baba: अजून शिर्डीला जाणे झाले नाही? पुण्याजवळच्या प्रतिशिर्डीला जाऊन साईंची भेट घेऊन या!

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 24, 2023 17:02 IST

Travel: अनेकदा ठरवूनही आपल्या आवडत्या देवस्थानांना भेट देणे होत नाही, अशा वेळी पर्यायी देवस्थानांना भेट द्यावी आणि मूळ देवस्थानांना जाण्याचा संकल्प करावा. 

शिर्डीच्या साईबाबांच्या देवळाची आठवण व्हावी अशी बाबांची प्रति शिर्डी पुण्याजवळच्या शिरगावात आहे. साईबाबांचे प्रशस्त मंदिर, पंचतारांकित हॉटेलसदृश श्री साई अन्न छत्र आणि मंदिराच्या गाभाऱ्यात साईंची संगमरवरी मूर्ती पाहण्यासाठी भक्तांची रीघ लागते. 

मुंबई पुणे महामार्गावरील सोमाटणे फाटा या टोल नाक्यावरून डाव्या बाजूला पाच किलोमीटर अंतरावर हे साई स्थान आहे. शिर्डीच्या देवस्थानची पदोपदी आठवण येईल अशा खुणा या मंदिरातही आहेत. भव्य मंदिर, प्रशस्थ परिसर, नयनरम्य बाग, साईंचा दरबार, सोनेरी आणि पिवळसर रोषणाई असलेली प्रकाशयोजना, गाभाऱ्यात आरसे आणि सिंहासनावर विराजमान झालेली साईंची संगमरवरी मूर्ती चित्त वेधून घेते. 

पुण्याचे माजी आमदार प्रकाश देवळे यांच्या पुढाकाराने २००९ मध्ये हे मंदिर तयार झाले, मात्र तेथील स्वच्छतेमुळे आजही त्या मंदिराची नवलाई टिकून आहे. या परिरसरात साई बाबांची धुनीदेखील आहे, तसेच शिर्डीसारखे कडुलिंबाचे झाडदेखील आहे. तिथे दरदिवशी हजारो भाविक दर्शनासाठी येतात. त्यांच्यासाठी प्रसादालय अर्थात अन्नछत्र देखील उभारले आहे. 

साई अन्नछत्राचे बांधकाम एवढे सुंदर झाले आहे की तिथे प्रवेश करताना आपण अन्नछत्रात जात नसून एखाद्या पंचतारांकित हॉटेलमध्ये जात आहोत कि काय असा भास होतो. आतमध्येही सुंदर रोषणाई, सुविचार, साईंचे फोटो आणि अन्न वाटप केंद्र. स्वच्छ खणाच्या ताटात पोटभर प्रसाद आणि थंडगार पाणी दिले जाते. तो प्रसाद कोणी ताटात टाकू नये अशी सूचना केली जाते. तिथे एकावेळी १००० भाविक भोजन करू शकतील एवढी मोठी बैठक व्यवस्था आहे. ती तीनमजली इमारत राजवाडा म्हणूनही ओळखली जाते. 

गुरु पौर्णिमा, दसरा, राम नवमी इ. महत्त्वाचे उत्सव तिथे साजरे केले जाते. मात्र मंदिराच्या सभोवतालच्या परिसराचा अजून म्हणावा तसा विकास झालेला नाही. ती वस्ती अजूनही बकाल आहे. जत्रासदृश खेळणी, बायकांसाठी दागिन्यांचे तर मुलांसाठी खाऊचे स्टॉल, देवाची उपकरणी, रुद्राक्ष माळा, सरबताची दुकानं  मंदिराबाहेर आहे. तिथला विकास झाला, नेटके नियोजन झाले, तर आणखी मोठ्या प्रमाणात भाविक तिथे येऊ शकतील हे नक्की. भविष्यात साईबाबाच ती योजना करून घेतली, तोवर आपण श्रद्धा आणि सबुरी ठेवू.