शहरं
Join us  
Trending Stories
1
"विरोधकांच्या ‘लवंग्या-सुरसुरी’चा धुरळा, महायुतीचा ‘ॲटम बॉम्ब’ फुटला की..."; एकनाथ शिंदेंचा इशारा
2
उपोषणकर्त्याला घरी का बोलवलं? संजय शिरसाट म्हणाले, "माझा आणि त्याचा प्रवासाचा वेळ सारखा होता"
3
दिवाळीनिमित्त राहुल गांधी पोहोचले मिठाईच्या दुकानात, स्वत: बनवली इमरती आणि बेसनाचे लाडू
4
Sanjay Nirupam: "राज ठाकरेंनी नवा छंद जोपासलाय, ते...", संजय निरुपम नेमकं काय बोलून गेले? पाहा
5
"युद्ध थांबवण्याची खरी वेळ...!" रशिया-युक्रेन युद्धावर झेलेंस्की यांचं मोठं विधान
6
Diwali Bonus: मुंबई विमानतळावरील कामगारांची दिवाळी दणक्यात, मिळाला 'इतका' बोनस!
7
Laxmi Pujan 2025 Wishes: लक्ष्मी पूजनाच्या हार्दिक शुभेच्छा, मराठी ग्रीटिंग्स, Images, Facebook, Whatsapp Status द्वारा द्या मंगलमय दिवसाच्या शुभेच्छा!
8
चीनचा अमेरिकेला आणखी एक झटका; ७ वर्षात पहिल्यांदा असं काही घडलं, डोनाल्ड ट्रम्प चिंतेत पडले
9
OLA कंपनीतील कर्मचाऱ्यानं उचललं टोकाचं पाऊल, २८ पानी अखेरची चिठ्ठी सापडली; मालकावर FIR दाखल
10
पुढच्या वर्षी 1.60 लाखपर्यंत पोहोचू शकतं सोनं; चांदी कितीपर्यंत वधारणार? जाणून डोळे फिरतील!
11
टायर बनवणाऱ्या कंपनीच्या शेअरनं घेतला रॉकेट स्पीड, q2 च्या रिझल्टने गुंतवणूकदार खुश!
12
Bihar Election 2025: लालूंच्या राजदची यादी आली! काँग्रेसविरोधात तीन जागांवर उमेदवार दिले, तेजस्वी यादव राघोपूरमधून लढणार...
13
दिवाळीच्या दिवशी शेअर बाजाराचा 'जोश हाय'; Nifty २५,८४३ वर बंद, उद्या मुहूर्त ट्रेडिंग
14
Manu Garg : करून दाखवलं! आठवीत असताना गमावली दृष्टी, आईच्या साथीने रचला इतिहास, झाला अधिकारी
15
पाण्याच्या पाटावरून वाहिले रक्ताचे पाट, भीषण गोळीबार, २ जणांचा मृत्यू, ३ जखमी 
16
मेडिकल कॉलेजमध्ये MBBS च्या जागा वाढल्या, आता एवढ्या विद्यार्थ्यांना मिळणार प्रवेश, महाराष्ट्रात किती वाढल्या?
17
Laxmi Pujan 2025: स्थिर लक्ष्मी हवी? लक्ष्मीपूजन करताना झाडू आणि खडे मीठाने करा 'हा' खास उपाय!
18
बाथरूममध्ये कॅमेरा लपवला, आंघोळ करताना मेहुणीचा व्हिडीओ बनवला अन्...; भावोजीच्या कृत्याने कुटुंबाला धक्का बसला 
19
रेखा झुनझुनवाला यांनी 'या' शेअरमधून मिनिटांत कमावले ₹६७ कोटी, एक्सपर्ट म्हणाले ₹२५० रुपयांपर्यंत जाणार भाव!
20
IND vs AUS: रोहित शर्मा दुसऱ्या वनडेत रचणार इतिहास; करणार विराट-सचिनलाही न जमलेला विक्रम

Ritual: तीर्थक्षेत्री गेल्यावर अचानक पाळी आली तर दर्शन घ्यावे की नाही? प्रेमानंद महाराजांनी केला खुलासा!

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 17, 2025 13:32 IST

Shri Hit Premanand Govind Sharan Ji Maharaj: अनेक महिलांच्या मनात असलेली ही शंका, त्यावर प्रेमानंद महाराजांनी दिलेलं उत्तर तुमच्याही शंकेचं समाधान करू शकेल!

Period During Pilgrimage: पाळी ही नैसर्गिक क्रिया आहे. नव्हे तर ती निसर्गाने स्त्रियांना दिलेले वरदान आहे असे प्रेमानंद महाराज म्हणतात. याबाबत विशेषण देताना त्यांनी सांगितले, 'मासिक धर्म निंदनीय नाही तर वंदनीय आहे!' स्त्रियांना येणारा मासिक धर्म केवळ त्यांच्या आरोग्यासाठी लाभदायी नसून प्रकृती निर्मितीसुद्धा त्या करू शकतात. त्यामुळे मासिक धर्म हा पवित्रच मानला पाहिजे. मात्र, तीर्थक्षेत्री गेल्यावर पाळी आली तर? एका महिला भाविकेने विचारलेल्या प्रश्नावर प्रेमानंद महाराजांनी अतिशय संयमित उत्तर दिले. 

भारतात राहणाऱ्या अनेक स्त्रियांच्या मनात घोळणारा हा प्रश्न आहे. कारण कुठेही सहलीचे बेत आखताना स्त्रियांना मासिक पाळीची तारीख लक्षात घ्यावी लागते. सर्वांचेच मासिक चक्र सुरळीत असते असे नाही, तर अनेक महिलांना एक दोन महिने पाळीच येत नाही. त्यामुळे त्यांना तारखेचे गणित बसवता येत नाही. अशा वेळी तीर्थक्षेत्री जाताना त्यांना विचार करावा लागतो. काही जणी तर धार्मिक स्थळी गेल्यावर पाळी येऊ नये म्हणून पाळी पुढे ढकलण्याच्या गोळ्यासुद्धा घेतात. तसे करणे आरोग्याच्या दृष्टीने अत्यंत घातक असते. मात्र देवाचा कोप होईल या भीतीने त्या ही कृती करतात. वास्तविक पाहता यावर उत्तर आहे कामाख्या देवी, जिथे देवी सतीच्या योनीची पूजा केली जाते. एवढेच नाही तर वर्षभरात तिथे देवीचा मासिक धर्म म्हणून चार दिवस मंदिर बंदही ठेवले जाते. अपवित्र म्हणून नाही तर देवीला विश्रांती म्हणून! तर मग अपवित्र होण्याचा प्रश्न कुठून आला? तरीदेखील पापभिरू स्वभावामुळे अनेक जणी या गोंधळात अडकतात आणि देवाच्या पायथ्यापाशी जाऊन परत येतात. 

यावर प्रेमानंद माहाराजांनी दिलेले उत्तर निश्चितच चिंतन करण्यास प्रवृत्त करणारे ठरेल. ते म्हणाले, '' एखाद्या तिर्थीक्षेत्री गेल्यावर मासिक पाळी आली तर देवदर्शन घ्यावे की नाही हा संभ्रम मनात निर्माण होणे स्वाभाविक आहे. तीर्थक्षेत्री जाण्याचे योग वारंवार येत नाहीत. मोठ्या परिश्रमाने शारीरिक, मानसिक, आर्थिक गणित बसवून आपण तिथे पोहोचतो. मात्र तिथे गेल्यावर असा प्रश्न उपस्थित झाला तर अशा वेळी दर्शन टाळणे म्हणजे तोंडाशी आलेला घास दूर करण्यासारखे आहे. ज्याच्या दर्शनासाठी आलो आहे, त्याचे दुरून दर्शन घ्यावे. गर्भगृहात जाऊ नये. सभागृहातून दर्शन घ्यावे आणि बाहेर यावे. आपली अवस्था देवाला सांगावी, भक्तिभावाने नमस्कार करावा. असे करणे चुकीचे नाही. कारण तीर्थक्षेत्री जाण्याचा योग आयुष्यात पुन्हा कधी येईल हे माहीत नसते. अशा वेळी स्वतःशी आणि परमात्म्याशी प्रामाणिक राहणे कधीही चांगले!

पहा प्रेमानंद महाराजांचा व्हिडीओ -

टॅग्स :Healthआरोग्यMenstrual Healthमासिक पाळी आणि आरोग्यTravel Tipsट्रॅव्हल टिप्सspiritualअध्यात्मिक