शहरं
Join us  
Trending Stories
1
RCBचा विराट कोहली जबाबदार! बेंगळुरू चेंगराचेंगरी प्रकरणात कर्नाटक सरकारचा अहवाल सादर
2
आरोपीच्या बोलावण्यावरून वारंवार हॉटेलमध्ये का गेलात? पती असताना परपुरुषाशी...! बलात्काराचा आरोप करणाऱ्या महिलेला सुप्रीम कोर्टानं फटकारलं
3
नॅशनल पार्कमधील ‘वनराणी’चे रुपडे पालटले; व्हिस्टाडोमसह नव्या अवतारात सेवेत, कधी सुरू होणार?
4
वृद्धाला हातपाय बांधून कारमध्ये कोंडले, मग कुटुंब ताजमहाल पाहण्यात रंगले, सुरक्षा रक्षकाने पाहिल्याने अनर्थ टळला   
5
10th Pass Job: दहावी पास उमेदवारांना उच्च न्यायालयात चांगल्या पगारी नोकरी, २६ जुलैआधीच करा अर्ज!
6
"आमचं शांततापूर्ण जीवन..."; गुहेत राहणाऱ्या रशियन महिलेने फोन चार्ज झाल्यावर पहिलं काय केलं?
7
Maharashtra Politics : 'दिनो मोरियाने तोंड उघडले तर अनेकांचा मोरया होईल';एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरेंना इशारा
8
प्रत्येक शेअरवर ५०,००० रुपयांचा फायदा; ना बोनस, ना स्टॉक स्प्लिट तरीही गुंतवणूकदार झाले मालामाल
9
Shravan 2025: शिवपुराणात दिलेल्या 'या' मंत्राने श्रावणात रोज जप केल्यास होते मनोकामनापूर्ती!
10
"दुसऱ्याच दिवशी वडील वारले, ठरलेलं लग्न मोडलं...", 'बिग बॉस' फेम अभिनेत्रीने सांगितली लाबुबू डॉलची भयानक स्टोरी
11
रॉबर्ट वाड्रांची ED कडून १८ तास चौकशी; चार्जशीटही दाखल, काय आहे प्रकरण? जाणून घ्या...
12
IT आणि बँकिंग शेअर्समध्ये मोठी पडझड; पण, टाटांच्या 'या' शेअर्ससह २ स्टॉक्सनी वाचवली इज्जत!
13
"शाकिबला मीच घरी आणलं पण पत्नीने त्याच्यासोबत..."; घरगुती वादातून तरुणाने स्वतःला संपवलं, व्हिडीओही काढला
14
“प्रताप सरनाईकांनी एकदा तरी शिवनेरीने प्रवास करावा”; बसची दुरवस्था, प्रवाशांचा संताप
15
मौलवींना बोलावून नाव बदललं, धर्मांतरण करण्यास भाग पाडलं; पीडित तरुणाचे पत्नीवर गंभीर आरोप!
16
"खूप मारलं, उपाशी ठेवलं, गोळ्या देऊन गर्भपात..."; सासरी अमानुष छळ, 'तिने' आयुष्य संपवलं
17
वडापाव, समोसा... आता वर्तमानपत्रात गुंडाळल्यास दुकान बंद? 'या' चुकीमुळे ७५ वर्षांची बेकरी झाली सील!
18
दहाव्यांदा बोनस शेअर देणार 'ही' मल्टीबॅगर कंपनी; १८ जुलै आहे रेकॉर्ड डेट, तुमच्याकडे आहे का?
19
डोनाल्ड ट्रम्प पाकिस्तानच्या दौऱ्यावर जाणार, तारीखही ठरली; पाक मीडियाचा मोठा दावा

Ritual: तीर्थक्षेत्री गेल्यावर अचानक पाळी आली तर दर्शन घ्यावे की नाही? प्रेमानंद महाराजांनी केला खुलासा!

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 17, 2025 13:32 IST

Shri Hit Premanand Govind Sharan Ji Maharaj: अनेक महिलांच्या मनात असलेली ही शंका, त्यावर प्रेमानंद महाराजांनी दिलेलं उत्तर तुमच्याही शंकेचं समाधान करू शकेल!

Period During Pilgrimage: पाळी ही नैसर्गिक क्रिया आहे. नव्हे तर ती निसर्गाने स्त्रियांना दिलेले वरदान आहे असे प्रेमानंद महाराज म्हणतात. याबाबत विशेषण देताना त्यांनी सांगितले, 'मासिक धर्म निंदनीय नाही तर वंदनीय आहे!' स्त्रियांना येणारा मासिक धर्म केवळ त्यांच्या आरोग्यासाठी लाभदायी नसून प्रकृती निर्मितीसुद्धा त्या करू शकतात. त्यामुळे मासिक धर्म हा पवित्रच मानला पाहिजे. मात्र, तीर्थक्षेत्री गेल्यावर पाळी आली तर? एका महिला भाविकेने विचारलेल्या प्रश्नावर प्रेमानंद महाराजांनी अतिशय संयमित उत्तर दिले. 

भारतात राहणाऱ्या अनेक स्त्रियांच्या मनात घोळणारा हा प्रश्न आहे. कारण कुठेही सहलीचे बेत आखताना स्त्रियांना मासिक पाळीची तारीख लक्षात घ्यावी लागते. सर्वांचेच मासिक चक्र सुरळीत असते असे नाही, तर अनेक महिलांना एक दोन महिने पाळीच येत नाही. त्यामुळे त्यांना तारखेचे गणित बसवता येत नाही. अशा वेळी तीर्थक्षेत्री जाताना त्यांना विचार करावा लागतो. काही जणी तर धार्मिक स्थळी गेल्यावर पाळी येऊ नये म्हणून पाळी पुढे ढकलण्याच्या गोळ्यासुद्धा घेतात. तसे करणे आरोग्याच्या दृष्टीने अत्यंत घातक असते. मात्र देवाचा कोप होईल या भीतीने त्या ही कृती करतात. वास्तविक पाहता यावर उत्तर आहे कामाख्या देवी, जिथे देवी सतीच्या योनीची पूजा केली जाते. एवढेच नाही तर वर्षभरात तिथे देवीचा मासिक धर्म म्हणून चार दिवस मंदिर बंदही ठेवले जाते. अपवित्र म्हणून नाही तर देवीला विश्रांती म्हणून! तर मग अपवित्र होण्याचा प्रश्न कुठून आला? तरीदेखील पापभिरू स्वभावामुळे अनेक जणी या गोंधळात अडकतात आणि देवाच्या पायथ्यापाशी जाऊन परत येतात. 

यावर प्रेमानंद माहाराजांनी दिलेले उत्तर निश्चितच चिंतन करण्यास प्रवृत्त करणारे ठरेल. ते म्हणाले, '' एखाद्या तिर्थीक्षेत्री गेल्यावर मासिक पाळी आली तर देवदर्शन घ्यावे की नाही हा संभ्रम मनात निर्माण होणे स्वाभाविक आहे. तीर्थक्षेत्री जाण्याचे योग वारंवार येत नाहीत. मोठ्या परिश्रमाने शारीरिक, मानसिक, आर्थिक गणित बसवून आपण तिथे पोहोचतो. मात्र तिथे गेल्यावर असा प्रश्न उपस्थित झाला तर अशा वेळी दर्शन टाळणे म्हणजे तोंडाशी आलेला घास दूर करण्यासारखे आहे. ज्याच्या दर्शनासाठी आलो आहे, त्याचे दुरून दर्शन घ्यावे. गर्भगृहात जाऊ नये. सभागृहातून दर्शन घ्यावे आणि बाहेर यावे. आपली अवस्था देवाला सांगावी, भक्तिभावाने नमस्कार करावा. असे करणे चुकीचे नाही. कारण तीर्थक्षेत्री जाण्याचा योग आयुष्यात पुन्हा कधी येईल हे माहीत नसते. अशा वेळी स्वतःशी आणि परमात्म्याशी प्रामाणिक राहणे कधीही चांगले!

पहा प्रेमानंद महाराजांचा व्हिडीओ -

टॅग्स :Healthआरोग्यMenstrual Healthमासिक पाळी आणि आरोग्यTravel Tipsट्रॅव्हल टिप्सspiritualअध्यात्मिक