शहरं
Join us  
Trending Stories
1
"युक्रेनविरुद्धच्या युद्धासाठी भारत रशियाला निधी पुरवतोय"; डोनाल्ड ट्रम्पच्या जवळच्या सहकाऱ्याचा मोठा आरोप!
2
दोन व्होटर आयडींच्या आपल्याच दाव्यामुळे तेजस्वी अडचणीत, निवडणूक आयोगाची नोटीस; तपशील मागितला
3
Video : ६०० वर्षांनंतर पहिल्यांदाच! भूकंपानंतर ज्वालामुखीचा उद्रेक; रशियाच्या कामचटकाचा धोका अजूनही टळेना
4
आंध्र प्रदेशातील ग्रॅनाइट खाणीत मोठी दुर्घटना, ६ स्थलांतरित कामगारांचा मृत्यू, ३ जखमी
5
सुरक्षित गुंतवणुकीसह जबरदस्त रिटर्न! कमाईची उत्तम संधी आहेत या ५ स्कीम; मिळेल ८% पेक्षा जास्त व्याज
6
वसईची भयंकर घटना, मुंबईला धोक्याची घंटा!
7
मनसे, उद्धवसेना, शेकाप, राष्ट्रवादी एकत्र आले म्हणजे..?
8
विमान उड्डाण करणारच होतं अन् केबिन तापलं; एअर इंडियाची 'ही' फ्लाइट झाली रद्द 
9
‘झोपु’ योजनेत ८० कोटींचा घोटाळा; विकासकांवर गुन्हा; आशापुरा ग्रुपच्या ७ जणांविरोधात टिळक नगर पोलिसांकडून तपास सुरू
10
आजचे राशीभविष्य, ०४ ऑगस्ट २०२५: ६ राशींना शुभ फलदायी दिवस, अचानक धनलाभ योग; कार्यात यश
11
पनवेलमधील लेडीज बारवर मनसेचे खळ्ळखट्याक, १५ ते २० कार्यकर्त्यांवर गुन्हा दाखल
12
अजेंटिक AI : ते काम करेलच, विचारही स्वत:च करेल!
13
स्पाइसजेट कर्मचाऱ्यांवर लष्करी अधिकाऱ्याचा हल्ला; मणका मोडला, जबडा तोडला, ४ जखमी 
14
एकाच कुटुंबातील तीन पिढ्या जपतायत गोविंदाची परंपरा, लालबागच्या पथकातील ६ जणांचा प्रेरणादायी प्रवास
15
पीयूसीसाठी लवकरच नवीन दर, विविध राज्यांच्या अभ्यासासाठी परिवहन विभागाकडून समिती स्थापन
16
Pune Crime: 'किती मुलांसोबत झोपलात?', कोथरुडमधील प्रकरण; रोहित पवार 'त्या' तरुणींसह पोलीस आयुक्तालयात, काय घडलं?
17
IND vs ENG 5th Test Day 4 Stumps : कोण जिंकणार? 'दिल अन् दिमाग' यांची 'टेस्ट' घेणाऱ्या प्रश्नासह थांबला खेळ
18
भगवा दहशतवादी असेल, तर तुम्ही त्याची पूजा करणार का?; शंकराचार्य अविमुक्तेश्वरानंद सरस्वती यांचा सवाल
19
IND vs ENG : टेस्टमध्ये ट्विस्ट; खांदा बांधून बसलेला क्रिस वोक्स एका हाताने बॅटिंग करण्याच्या तयारीत
20
मुलींवर हात टाकणाऱ्यांना हातपाय तोडून पोलिसांकडे दिले पाहिजे; अमित ठाकरे यांचे विधान

भगवान बुद्धांनी शिकवलेली श्रीमंती डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी कायमस्वरूपी अनुभवली!

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 6, 2023 07:00 IST

आज डॉ. बाबासाहेब आंबेडकर महापरिनिर्वाण दिन; त्यांनी बौद्ध धर्म स्वीकारला कारण त्यांना भगवान बुद्धांच्या विचारांनी प्रभावित केले!

एकदा एक शिष्य भगवान बुध्दांजवळ आला आणि म्हणाला, 'भगवान, मी श्रीमंत का नाही?'भगवान म्हणाले, 'कारण तू उदार नाहीस!'शिष्य म्हणाला, 'भगवान, उदार तीच व्यक्ती असते, जी श्रीमंत असते. मी दरिद्री कसली उदारता दाखवणार?'भगवान म्हणाले, 'दरिद्री? तू तर श्रीमंत आहेस. तूच नाही, जगातली प्रत्येक व्यक्ती श्रीमंत आहे. कारण प्रत्येकाकडे पाच रत्न आहेत.'शिष्य आश्चर्यचकित होऊन म्हणाला, 'रत्न आणि माझ्याजवळ? कोणती रत्न भगवान? कृपया सविस्तर सांगा.' भगवान स्मित वदनाने सांगू लागले... 

'पहिले रत्न, स्मित हास्य. लोकांकडे एवढे प्रश्न आहेत, समस्या आहेत की ते हसणे विसरले आहेत. तुझ्याकडे हास्य आहे. ते तू देऊन बघ. तुला पाहून दुसऱ्याच्या चेहऱ्यावर स्मित आल्यावाचून राहणार नाही. एक स्मित हास्य समोरच्याला क्षणभर का होईना दुःख विसरायला भाग पाडते. 

' दुसरे रत्न, डोळे. या डोळ्यांनी आपण जगाकडे पाहतो. पण आपली नजर स्नेहार्द्र असेल, तर केवळ नजरेने समोरच्याला दिलासा मिळू शकतो. आश्वासक नजर फार महत्त्वाची असते. ती नजर कोणाला सकारात्मकता तर कोणाच्या जगण्याला बळ देते. नजरेत प्रेम, माया, वात्सल्य, सहानुभूती असे अनेक भाव दडलेले असतात. अशा प्रेमळ नजरेसाठी अनेक जण आसुसलेले आहेत. 

'तिसरे रत्न, जीभ. ही केवळ विविध पदार्थांचे रस चाखण्यासाठी नाही, तर चांगले बोलण्यासाठी देखील वापरली पाहिजे. आपल्या बोलण्याने दुसऱ्याला प्रोत्साहन देता आले, विश्वास देता आला, कौतुक करता आले, तर त्याचा सकारात्मक परिणाम दुसऱ्याच्या आयुष्यावर नक्कीच होऊ शकतो. म्हणून चांगले बोला. खोटे कौतुक किंवा खोटी प्रशंसा नाही, तर जगायला बळ देणारे दोन शब्द पुरेसे असतात. 

'चौथे रत्न, हृदय. तुमच्या हृदयात दुसऱ्यांबद्दल केवळ मत्सर, राग, द्वेष आणि अहंभाव भरलेला आहे. या गोष्टी हृदयाला उपयोगाच्या नाहीत. उलट त्या हानिकारक आहेत. त्या काढून टाकून हृदयाची जागा प्रेमाने भरून टाका. ज्याचे हृदय प्रेमाने, आनंदाने भरलेले असेल, तोच दुसऱ्याला प्रेम आणि आनंद देऊ शकेल.'

'पाचवे रत्न, शरीर. आपल्याला मिळालेल्या सुदृढ शरीराचा वापर केवळ स्वतः साठी न करता दुसऱ्यांसाठी सुद्धा करा. जेव्हा तुम्ही लोकोपयोगी ठराल, तेव्हा त्या जाणिवेने तुम्ही अधिकाधिक समृद्ध व्हाल. ही जाणीव म्हणजे खरी श्रीमंती! आता मला सांग, ही पाच रत्न तुझ्याजवळ असताना तू गरीब आहेस की श्रीमंत?'

शिष्य उत्तरला, 'भगवान माझ्या श्रीमंतीची तुम्ही मला जाणीव करून दिलीत. या रत्नांचा मी सदुपयोग करेन आणि दुसऱ्यांनाही त्याची जाणीव करून देईन. सगळ्यांना या रत्नांची ओळख झाली आणि प्रत्येकाने त्याचा योग्य वापर करायचा ठरवला, तर हे जगच किती श्रीमंत होईल नाही?'

डॉ. बाबासाहेब आंबेडकरांवर भगवान बुद्धांच्या याच सद्विचारांची मोहिनी पडली, म्हणून त्यांनी बौद्ध धर्म स्वीकारला आणि अनुसरला. मनाची व विचारांची श्रीमंती अनुभवलेल्या या दोन्ही पुण्यात्म्यांना वंदन!

टॅग्स :Inspirational Storiesप्रेरणादायक गोष्टी