शहरं
Join us  
Trending Stories
1
हार्दिक पटेल यांनी आळवले बंडाचे सूर, मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून दिला असा इशारा, गुजरातमध्ये भाजपाला धक्का बसणार?
2
धनश्री वर्माशी शेवटचं बोलणं केव्हा झालं? क्रिकेटर युजवेंद्र चहलने सांगितला 'त्या' वेळचा किस्सा
3
Amravati: अमरावतीत जागेच्या वादावरून महिला सरपंच अन् सदस्यांमध्ये फ्रीस्टाईल हाणामारी!
4
Yashasvi Jaiswal Century : यशस्वी 'सेंच्युरी रोमान्स' अगेन्स इंग्लंड! जशी सुरुवात तसाच शेवट
5
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
6
"आम्ही स्वतः कारवाई केली नाही, माधुरीच्या भविष्यासाठी..."; वाढत्या विरोधानंतर वनताराकडून स्पष्टीकरण
7
"ती माझी चूकच..."; युजवेंद्र चहलने दिली प्रामाणिक कबुली, सांगितलं धनश्रीशी नातं तुटण्याचं कारण
8
 Crime: दोस्त दोस्त ना रहा! दारुसाठी मित्राच्या डोक्यात चाकू खुपसला, जालन्यातील घटना
9
Mumbai: आयआयटी मुंबई कॅम्पसमध्ये विद्यार्थ्याचा मृतदेह आढळल्याने खळबळ, पोलीस तपास सुरू!
10
Mumbai: मुंबईतील चारकोपच्या राजाचे १७७ दिवसांनी विसर्जन; ढोल-ताशांच्या गजरात बाप्पाला निरोप!
11
आकाशदीपची फिफ्टी पाहून गिल-जड्डूला सेंच्युरीचं फिल! बॅटसह हेल्मेट उंचावण्याची केली डिमांड (VIDEO)
12
"शिंदे गटाच्या मोर्चाचे लक्ष्य चुकले; मोर्चाच काढायचा तर फडणवीसांच्या बंगल्यावर काढा’’, हर्षवर्धन सपकाळ यांचा टोला 
13
Akash Deep Maiden Fifty : 'नाईट वॉचमन' आकाशदीपनं उडवली इंग्लंडची झोप! ठोकली सॉलिड 'फिफ्टी'
14
मोठी बातमी: सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणात पोलिसांवर नव्हे, अज्ञातांवर खुनाचा गुन्हा
15
जिममध्ये व्यायाम करत असतानाच आला हार्ट ॲटॅक, उदयोन्मुख क्रिकेटपटूचा मृत्यू
16
राज्यात दोन-तीन भागात गुन्हेगारी वाढतेय, त्यात पुणे येतं; याला जबाबदार कोण? - सुप्रिया सुळे
17
राजा रघुवंशीच्या भावाच्या पत्नीने केला सनसनाटी दावा, म्हणाली, "माझ्या मुलाचा बाप…’’
18
Viral Video: नाशकात दुचाकीवरून आलेल्या सोनसाखळी चोराला महिलेनं दाखवला इंगा!
19
कॉफीसोबत झुरळंही रगडली जातात, कॉफीत असतातच झुरळं! खोटं वाटतंय, वाचा FDA काय सांगतेय..
20
IND vs ENG ...तर भारतीय गोलंदाजाला ठोसा मारला असता; आकाशदीपसंदर्भात काय म्हणाला पाँटिंग?

चांगल्या गोष्टी लक्षात ठेवा आणि वाईट गोष्टी विसरून जा - भगवान बुद्ध!

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 1, 2021 08:00 IST

आयुष्य आनंदात घालवायचे असेल, तर नेहमी चांगल्याच गोष्टी आठवणीत ठेवून मार्गक्रमणा करा जेणेकरून या सुंदर प्रवासात दुःखाशी गाठभेट होणार नाही!

एकदा भगवान बुद्ध विहार करण्यासाठी निघाले. त्यांच्यापाठोपाठ त्यांचा शिष्यवर्ग जायला निघाला. भगवान म्हणाले, `मी मोठ्या परिक्रमेसाठी जात आहे, तुम्ही सर्वांनी येऊ नका, इथेच मठात राहून इथली व्यवस्था पहा. मी काही दिवसात परत येतो.'

भगवानांनी केलेल्या सूचनेनुसार शिष्यगण मठात राहिले आणि भगवान एकटेच भ्रमंतीसाठी निघाले. भगवानांना ओळखणारा अनुयायी वर्ग मोठ्या प्रमाणात गावोगावी होता. काही जण त्यांना प्रत्यक्ष ओळखत होते, तर काही जणांनी त्यांची केवळ ख्याती ऐकली होती. 

लोकांचे अभिवादन स्वीकारत भगवान जात होते. एका सकाळी एका गावातून जात असताना दारु प्यायलेला एक माणूस स्वत:च्याच घरासमोर उभा राहून घरच्यांना शिवीगाळ करत होता. भगवान तिथून जात होते. त्या व्यक्तीने भगवानांना पाहिले. हा कोण गोसावी भिक्षा मागायला आला, अशा विचाराने तो त्यांच्याशी उद्धटपणे बोलू लागला. त्याने भगवानांना बरेच काही सुनावले. गाव गोळा झाले. भगवानांनी शांतपणे ऐकून घेतले व ते निघाले.

सायंकाळी त्याची नशा उतरल्यावर गावातल्या बुजूर्ग व्यक्तीने त्या व्यक्तीला चूक निदर्शनास आणून दिली. तो म्हणाला, `पण मी ज्याला बोल सुनावले ते भगवान बुद्ध नव्हतेच, ते कायम आपल्या शिष्यांबरोबर असतात.' बुजूर्ग व्यक्ती म्हणाली, `यंदा, भगवान एकटेच निघाले होते, पण तू नशेत असल्यामुळे तू त्यांना ओळखू शकला नाहीस. तुझ्याकडून मोठे पाप घडले आहे. तू त्यांची क्षमा मागितली पाहिजे.'

दारुड्या माणसाला त्याची चूक उमगली. भविष्यात दारूला स्पर्शही करायचा नाही असा त्याने पण केला आणि भगवान बुद्धांचा शोध घेत तो निघाला. वाटेत लोकांना विचारत विचारत दुसऱ्या दिवशी तो जवळच्या गावात पोहोचला, तिथे एका वटवृक्षाखाली भगवान ध्यानस्थ बसले होते. ते समाधीतून बाहेर यायची वाट बघत तो मनुष्य जमीनिवर बसून राहीला.

भगवान बुद्धांनी डोळे उघडले. ते पुढच्या प्रवासाला जायला निघाले, तो समोर असलेला मनुष्य त्यांचे पाय धरत गयावया करू लागला. भगवान म्हणाले, `तू का रडतोस? कसली क्षमा मागतोस?'

तो म्हणाला, `काल सकाळी मी तुम्हाला नशेच्या भरात वाटेल ते बोललो. मी तुम्हाला ओळखू शकलो नाही. माझी चूक लक्षात घेऊन यापुढे नशा करणार नाही, असा पण मी केला आहे. पण माझ्या हातून घडलेल्या चुकीबद्दल मला माफ करा.'

भगवान बुद्धांनी त्याला उठून उभे केले आणि म्हणाले, `तू नशा सोडलीस हे चांगलेच झाले, परंतु तू सांगत असलेला प्रसंग मला आठवतही नाही. मी विसरलो, तसा तूही विसरून जा. चांगले आयुष्य जग. माणसाने भूतकाळातील चुकांचा विचार न करता भविष्यात कोणत्या चूका टाळता येतील, याचा विचार केला पाहिजे आणि कायम वर्तमानात जगले पाहिजे.'