शहरं
Join us  
Trending Stories
1
तुळजापुरातील मंदिरात जिंतेंद्र आव्हाड समर्थक आणि सुरक्षारक्षकांमध्ये धक्काबुक्की, नेमकं काय घडलं?
2
काँग्रेसने ३००० मते खरेदी केली, भाजप निवडणूक आयोगात पोहोचला; २०१८ मध्ये CM सिद्धरामय्या १६९६ मतांनी विजयी झाले
3
पगार येताच, ५ मिनिटांनी कर्मचाऱ्याने राजीनामा दिला! एचआरची पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल
4
पुन्हा आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या! सात अधिकाऱ्यांचे खाते बदलले; कोणते खाते कोणाकडे?
5
India-China Flight: भारत - चीन दरम्यान लवकरच थेट विमानसेवा सुरू होणार; सरकारने विमान कंपन्यांना दिल्या या सूचना
6
जगदीप धनखड अचानक पंतप्रधान मोदींना का भेटले? काँग्रेसचा नवा दावा आणखी एक प्रश्न
7
केंद्र सरकारचा मोठा निर्णय; ४ सेमीकंडक्टर प्रकल्पांना मंजुरी, 'या' राज्यांमध्ये हजारो कोटींची गुंतवणूक
8
Aaditya Thackeray: "आम्ही काय खायचं, हे सांगणारे तुम्ही कोण?" आदित्य ठाकरे केडीएमसीवर भडकले!
9
आधी पत्नीचे नग्न फोटो काढले, मग बळजबरी बाप आणि मेहुण्यासोबत ठेवायला लावले संबंध; कारण...
10
"...त्यानंतरच होणार राज ठाकरेंना मविआत घेण्याचा निर्णय", काँग्रेसचे प्रभारी रमेश चेन्निथला स्पष्टच सांगितलं
11
महाराष्ट्राच्या पैठणीला लंडनमध्ये मोठा मान, व्हिक्टोरिया अल्बर्ट संग्रहालयामध्ये दिसणार!
12
आधारबाबत सुप्रीम कोर्टाचं सूचक विधान, बिहारमधील SIRवरून निवडणूक आयोगाला दिलासा 
13
कोण आहेत 'बेडरूम जिहादी', जे सुरक्षा यंत्रणेसाठी बनले डोकेदुखी?; भारतात दहशत पसरवण्याचा नवा डाव
14
बिहारपासून दिल्लीपर्यंत गोंधळ, अखेर १२४ वर्षांची महिला मतदार आली समोर, वयाबाबत म्हणाली...  
15
"शोना, मला मार" फक्त एवढेच ऐकताच प्रेयसीने प्रियकराचं डोकं भिंतीवर आपटलं, त्यानंतर जे घडले...
16
पाकिस्तानी दहशतवादी दक्षिण कोरियात पोहोचला, ओळख बदलून कंपनीत काम करत होता; दहशतवाद्याला अटक
17
"देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री आहेत की निवडणूक आयुक्त? प्रश्न आयोगाला विचारले तर तुम्ही उत्तर का देता?", रमेश चेन्निथला यांचा सवाल   
18
RCB मुळं वर्ल्ड कप स्पर्धेवर संकट! एम. चिन्नास्वामी स्टेडियमवर बंदी; BCCI सह ICC चं टेन्शन वाढलं
19
९ महिने पाठपुरावा केला तरीही ऊसाचे बिल थकवले; चिठ्ठी लिहून तरुण शेतकऱ्यानं आयुष्य संपवले
20
भारतासाठी धोक्याची घंटा; चीन LAC जवळ उभारतोय नवीन रेल्वे प्रकल्प, तणाव वाढणार..?

Religious Rules: शास्त्रानुसार केस असो वा नखं ती दिवसाच कापावी, सायंकाळी नाही; जाणून घ्या कारण!

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 27, 2023 16:21 IST

Religious Rules: मोठ्यांच्या सांगण्यानुसार काही गोष्टी आपण नियम म्हणून किंवा शास्त्र म्हणून पाळतो, त्यामागील कारण जाणून घेण्याची जिज्ञासा दाखवली पाहिजे!

हिंदू धर्मात अनेक रूढी-प्रथा पिढीदर पिढी पाळल्या जातात. कालपरत्वे काही नियम शिथिल होतात तर काही नियम काटेकोरपणे पाळले जातात. त्याच नियमांपैकी एक नियम म्हणजे सूर्यास्तानंतर केस आणि नखं कापू नयेत. पण का? ते जाणून घेऊ. 

बालपणी आपल्याला छोट्या मोठ्या सवयींची शिस्त लावण्याचे खाते विशेषतः आई नाहीतर आजीकडे असे. सोमवारी, शनिवारी केस धुवू नये, सायंकाळी केर काढू नये, तेल मीठ सायंकाळी विकत आणू नये, सूर्यास्तानंतर कोणाला पैसे देऊ नये. अशा अनेक नियमांचे आपण जमेल तसे, जमेल तेव्हा पालन करतो. यापैकीच एक सवय म्हणजे सायंकाळनंतर नखं आणि केस कापू नये. 

काय आहे त्यामागचे कारण? जाणून घेऊ. 

सांयकाळी दिवेलागणीची वेळ ही लक्ष्मी मातेच्या आगमनाची वेळ मानली जाते. तिच्या स्वागतासाठी आपण संध्याकाळ होण्याआधी घर आवरतो, केर काढून स्वच्छ करतो. अशा वेळी कापलेली नखं घरात टाकणे किंवा संध्याकाळी केस कापायला जाणे हा लक्ष्मी मातेचा अपमान समजला जातो. तिची नाराजी ओढवली जाऊ नये म्हणून सायंकाळी या गोष्टी करू नयेत असे त्यामागचे धार्मिक कारण आहे. तर शास्त्रीय दृष्ट्या तसे करणे अयोग्य का, तेही पाहू. 

शास्त्रीय कारण : 

रात्री केस आणि नखे न कापण्यामागे वैज्ञानिक कारण देखील आहे. पूर्वी दिव्याच्या अल्प प्रकाशात जमिनीवर पडलेली नखं, गुंतूळ, कापलेले केस दिसत नसत. भारतीय बैठकीनुसार जेवायला खाली बसताना ते जेवणात येऊ नये, त्यामुळे रोगराई पसरू नये, त्यामुळे सायंकाळी या गोष्टी टाळल्या जात असत. मग तुम्ही म्हणाल, आता तर घराघरात सायंकाळीसुद्धा भरपूर प्रकाश असतो, मग आता हा नियम मोडल्यास काय हरकत आहे? तर प्रश्न पुन्हा स्वच्छतेचा आहे. केस किंवा नखं कापल्यानंतर स्वच्छ अंघोळ करणे महत्त्वाचे असते. सायंकाळी केस किंवा नखं कापल्यावर अंघोळीचा कंटाळा केला तर आरोग्याच्या तक्रारी उद्भवू शकतात. त्यापेक्षा या दोन्ही गोष्टी सकाळच्या वेळी करणे इष्ट ठरते!