शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
2
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
3
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
4
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
5
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
6
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
7
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
8
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
9
Video: ढोल-ताशावर डान्स, लोकांना लाडू वाटले; घटस्फोटानंतर मुलीचं वडिलांनी असं केलं स्वागत
10
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
11
₹६.२५ लाखांच्या कारचा धुमाकूळ...! ५-स्टार सेफ्टी अन् ३३ किमी मायलेज, विक्रीत ठरली नंबर-१
12
IPL 2026 : Ex टीम विरुद्ध मोहम्मद शमीचा रुबाब! अभिषेक शर्मासह टॅविस हेडचा अचूक टप्प्यावर ‘करेक्ट कार्यक्रम’
13
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
14
CNG Car: देशातील सर्वात परवडणारी सीएनजी कार, क्रॅश टेस्टमध्ये मिळाले ५ स्टार सेफ्टी रेटिंग!
15
कच्च्या तेलाची शंभरी, पण भारतात 'जैसे थे' दर! सरकारी तेल कंपन्यांची तोटा भरून काढण्यासाठी नवी रणनीती
16
खरातचे सीडीआर बाहेर आलेच कसे? कोणाला टार्गेट करण्यासाठी हे सर्व सुरू आहे?"; शशिकांत शिंदेंचे गंभीर आरोप
17
बारामतीत उमेदवार देणार का? शरद पवारांसोबत काय चर्चा झाली?; शशिकांत शिंदेंनी सगळे सांगितले
18
युद्धातून ट्रम्प पुत्रांची मोठी कमाई? इराणच्या भीतीचा फायदा घेत खाडी देशांना ड्रोन्स विकल्याचा आरोप
19
'नवरत्न' होण्याच्या दिशेने हिंदुस्तान कॉपरची मोठी झेप! 'हा' दर्जा मिळाल्यानंतर नेमकं काय होतं?
20
BSNL ग्राहकांसोबत मोठा गेम खेळली; रिचार्ज वाढविले नाही, हळूच प्लॅनची व्हॅलिडिटी कमी केली
Daily Top 2Weekly Top 5

पाप पुण्याचा तराजू कसा सांभाळावा याबाबत शास्त्राने घालून दिलेले नियम वाचा!

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 23, 2021 18:40 IST

देवाच्या दृष्टीने सर्व लोक समान आहेत. देवाचा न्याय कधीच चुकत नाही. जो पुण्य कर्म करील त्याला चांगल्या कुळात जन्म मिळेल. पाप कर्मे केलेल्यांनाही जन्म मिळतो, पण तो फक्त दु:खं भोगण्यासाठी असतो

आपल्या धर्मशास्त्रात पाप आणि पुण्याच्या ज्या गोष्टी सांगितल्या आहेत त्या पूर्णपणे योग्य आहेत. पाप पुण्याचे परिणाम या जीवनाच्या शेवटच्या क्षणापर्यंत भोगून पूर्ण करावे लागतात आणि जर पूर्ण झाले नाहीत तर पुढच्या जन्मातही भोगावे लागतात. पापाची व पुण्याची आपापसात वजावट होऊन उरलेले पापपुण्य भोगावे लागते. अशी एक चुकीची समजूत लोकांमध्ये दिसून येते. पाप पुण्याची बेरीज वजाबाकी कधीच होत नाही.

प्रत्येक मनुष्यात दोन प्रवृत्ती वास करीत असतात. एक सात्विक वृत्ती व दुसरी राक्षसी वृत्ती. मनुष्याचे मन मुळातच आळशी असते. त्यात ते पुन्हा पुन्हा विकाराकडे धाव घेते. पाप कर्मामुळे व्यक्तीचे विचार व वृत्ती पापकर्माकडे वळतात. सुधारण्याची शक्यता फारच कमी राहते. पापाची फेड सर्व जन्मामध्ये व योनीमध्ये सांगितली आहे. त्यामुळे पशु पक्ष्यांनाही पाप पुण्य फेडावे लागते. फक्त पाप कोणते आणि पुण्य कोणते हे त्यांना कळत नाही. म्हणूनच मनुष्य जन्म मिळाल्यावर नितीनियमानुसार वागावे व योग्य धर्माचरण करावे. इतर जन्मात अगर योनीत पापकर्म घडले असल्यास ते भोगून संपवून पुण्यकर्माचा साठा करावा. 

देवाच्या दृष्टीने सर्व लोक समान आहेत. देवाचा न्याय कधीच चुकत नाही. जो पुण्य कर्म करील त्याला चांगल्या कुळात जन्म मिळेल. पाप कर्मे केलेल्यांनाही जन्म मिळतो, पण तो फक्त दु:खं भोगण्यासाठी असतो आणि हेच नेमके लोकांना कळत नाही. देवाच्या दृष्टीकोनातून सगळे सारखेच असले तरी जन्म मिळताना पाप पुण्याचा, पात्रतेचा विचार झालेला असतो. तेव्हा देवाच्या कार्यात आपण हस्तक्षेप करू नये. विनाकारण देवाला दोष देऊ नये. कोणत्याही कुळात का असेना, मनुष्य जन्म मिळाल्याबद्दल आपण देवाचे आभारच मानायला हवे.

काही लोकांची कल्पना असते की, त्याचा जन्म हा केवळ मागील जन्मांची पापे फेडण्याकरीता झाला आहे. म्हणून ते उद्धाराचा कोणताही प्रयत्न न करता चाकोरीबद्ध जीवन जगत असतात. परंतु थोडेजरी प्रयत्न केले तरीही पापे फेडताना त्यांना सत्पुरुषाचे दर्शन घडू शकते. पापक्षालनासाठी व मानसिक समाधानासाठी मनुष्य तीर्थयात्रा करतो, परंतु केलेल्या अपराधातून त्याची सुटका होऊ शकत नाही. सिद्ध पुरुषांनी मनात आणले तर यातून त्यांची सुटका होऊ शकते, तसा त्यांचा अधिकार असतो.

मानवाकडून चुका होतात, तर काही वेळेला नकळत मोठे अपराधही घडतात. काहींच्या मनात पश्चात्तापाची भावना असते. परंतु योग्य परिमार्जन होत नाही. म्हणून एकप्रकारची बोच असते. अशा वेळेस धर्मग्रंथवाचन केल्याने फायदा होतो. कोणत्याही धर्माचे धर्मग्रंथ याच तत्त्वावर आधारित आहेत. धर्मग्रंथांचा अंतिम उद्देश लोकांना नितीनियमांप्रमाणे वागायला शिकवणे, जर चूका झाल्या असतील तर पापक्षालनाचा मार्ग दाखवणे हाच असतो. आपल्याकडून जराशीही चूक झाली असेल तर श्रीगुरुंचे अथवा देवाचे नामस्मरण करा. या गोष्टी आत्मसात करा. सतत नामस्मरणाची सवय लागल्यावर हातून पापकर्मे घडत नाहीत. 

व्यवहारात वागताना आपापला नोकरी व्यवसाय सांभाळताना प्रसंगी खोटे बोलावे लागते, अशा वेळी त्या त्या खूर्चीची जी कर्तव्ये असतील ती प्रामाणिकपणे पूर्ण करावीत. त्यामुळेच कोणाला नोकरीवरून कमी करणे, कोणाला कायद्यानुसार शिक्षा देणे ही कृत्ये, पापे राहत नाहीत. उलट या कृत्याला सद्सद्विवेक बुद्धीला स्मरून दिलेला न्याय म्हणतात. 

ज्याप्रमाणे तुमचे पुण्याचे प्रमाण वाढेल, त्याप्रमाणे पुन्हा जन्म घेणे, चांगल्या कुळात जन्म घेऊन उद्धार करणे. अनेक जन्म पुण्य उपभोगित राहणे म्हणजे त्यासाठी पुन्हा जन्म घेणे आले. त्यासाठी भगवंताला सुचवायचे आहे. याठिकाणी पुण्य फार वाढवू नये आणि पापही वाढवू नये. यासाठी निष्काम कर्म करत राहणे हाच मध्यम दुवा ठरतो.