शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
3
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
4
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
5
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
6
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
7
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
8
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
9
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
10
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
11
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
12
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
13
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
14
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
15
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
16
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
17
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
18
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
19
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
20
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
Daily Top 2Weekly Top 5

आजच्या फसव्या जगात आपणही सीतेप्रमाणे सोन्याचे हरीण पाहून कसे भुलतो ते वाचा!

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 19, 2021 19:06 IST

अशी रोज दिसणारी सोन्याची हरणं आता तुम्ही सुद्धा आठवून पहा म्हणजे आपण ओलांडलेली लक्ष्मणरेखा आपल्यालाच लक्षात येईल!

त्राटिकेचा मुलगा मारीच आणि लंकेचा राजा रावण यांनी रामचंद्र पंचवटीत राहत असताना सीतेला पळवून नेण्याकरीता एक युक्ती योजली. मारीचाने सोनेरी हरणाचे रूप घेतले. ते पाहून सीतेला त्याचा मोह झाला. राम तिचा हट्ट पूर्ण करण्याकरीता कांचनमृगाची शिकार करायला निघाले. लक्ष्मणाने खूप सांगितले, पण त्याचे न ऐकता राम सीतेचा हट्ट पुरवण्यासाठी सुवर्णमृगापाठोपाठ गेले. 

लक्ष्मणााला पंचवटीतील गुहेत सीतेचे रक्षण करायची त्यांनी आज्ञा केली होती. मारीचने रामाला फार दूर नेले. अखेर रामाचा बाण लागला आणि त्याने आपले मूळ रूप घेतले. मरता मरता, रामाच्या आवाजात तो ओरडला, `सीते, लक्ष्मणाऽऽ धावा!' तेव्हा रामाला त्याचे कपट उमजले. पण आता त्याचा उपयोग नव्हता. 

सीतेला वाटले, राम खरोखरच संकटात आहेत. लक्ष्मणाला राक्षसांची माया माहित होती. म्हणून तो काहीच बोलला नाही. पण सीता व्यावूâळ झाली. तिने लक्ष्मणाला रामाच्या मदतीसाठी जायला सांगितले. लक्ष्मणाने सीतेला सांगितले, `राम स्वत:च्या रक्षणासाठी समर्थ आहेत. त्यांना माझ्या मदतीची गरज नाही.'

सीता व्याकूळ झाली होती. पतीच्या आवाजाने, त्याच्या आक्रोशाने अस्वस्थ झाली होती. रागाच्या भरात ती लक्ष्मणाला अध्वातद्वा बोलली. तेव्हा नाईलाजाने लक्ष्मणाला रामाच्या शोधार्थ निघावे लागले. सीता पर्णकुटीत एकटीच होती. तिच्या संरक्षणाचा उपाय म्हणून लक्ष्मणाने पर्णकुटीच्या दारात मंत्रावलेली एक रेषा काढली आणि सीतेने या रेषेबाहेर जाऊ नये, अशी विनंती केली. 

लक्ष्मण गेल्यावर रावण गोसाव्याचे सोंग घेऊन भिक्षा मागायला आला. सीता त्याला झोपडीच्या दाराआडूनच भिक्षा देऊ लागली. लक्ष्मणाने रेषेबाहेर जाऊ नको, ही सूचना तिच्या लक्षात होती. रेषा झोपडीच्या उंबरठ्याजवळ होती. रावण ती रेषा पार करू शकत नव्हता. त्याने सीतेला, `माई, बाहेर येऊन भिक्षा दे, देव तुझे भले करो.' असे म्हटले. 

सीतेला वाटले, हा खरोखरच कोणी भिक्षूक आहे. तिने लक्ष्मणाच्या वचनाविरुद्ध रेषा ओलांडली, तेव्हा रावणाने लगेच तिला पकडले, खांद्यावर बसवले आणि आकाशमार्गे लंकेला नेले. सीतेने खूप आक्रोश केला. परंतु, तो रामापर्यंत पोहोचू शकला नाही. सीतेला क्षणिक मोहाचा, रामाकडे केलेल्या हट्टाचा आणि लक्ष्मणाला बोललेल्या अपशब्दाचा पश्चात्ताप झाला. 

रामायणातील या घटनेची आठवण आचारविचारांची लक्ष्मणरेषा ओलांडून नव्या फॅशन आणि विषयोपभोगाच्या कांचमृगापाठी धावताना आपण सदैव ठेवली पाहिजे. पैसे दुप्पट करून देणाऱ्या योजना, दुपारच्या वेळी दारावर येऊन दागिने चमकवून देणारे, भविष्य सांगणारे, छोट्या खरेदीवर मोठ्या वस्तूंचे प्रलोभन देणारे लबाड लोक रावणासारखे टपून बसलेले असतात. अशा वेळी आपण आपली लक्ष्मणरेषा न ओलांडता, कांचनमृगामागे न धावता, या फरव्या जगाकडे डोळसपणे पाहिले पाहिजे.

टॅग्स :ramayanरामायण