शहरं
Join us  
Trending Stories
1
क्रूरतेचा भागीदार! इराणने मदत मागितलेली, रईसी यांच्या शोधासाठी अमेरिकेने नकार दिला
2
आजचे राशीभविष्य, २१ मे २०२४ : मन प्रसन्न राहिल, कामे सफल होतील पण आरोग्याची काळजी घ्यावी लागेल!
3
अर्धे मतदार गेले तरी कुठे? महाराष्ट्रात ५४.३३ टक्के, तर देशात सरासरी ६०.३९ टक्के मतदान
4
मतदान कमी, गोंधळ जास्त, मुंबईत अनेक ठिकाणी ईव्हीएम यंत्रणा बंद, मतदार यादीत नाव शोधताना नाकीनऊ
5
पोलिसांनी अतिरेकी हल्ल्याचा कट उधळला; अहमदाबाद विमानतळावर चार दहशतवाद्यांना अटक
6
मी दारू पितो, माझ्याकडे परवाना नाही; तरीही वडिलांनीच कार दिली; ‘ब्रह्मा ग्रुप’चे विशाल अग्रवाल यांच्यासह चार जणांवर गुन्हा
7
इराणचे राष्ट्राध्यक्ष इब्राहिम रईसी यांचा हेलिकॉप्टर अपघातात मृत्यू; मृतांमध्ये परराष्ट्रमंत्र्यांसह अधिकाऱ्यांचाही समावेश
8
महाराष्ट्रात पाचव्या टप्प्यातील १३ लोकसभा मतदारसंघात अंदाजे ५४.३३ टक्के मतदान  
9
भगवान जगन्नाथ मोदींचे भक्त; संबित पात्रांच्या वक्तव्याने नवा वाद, विरोधकांनी BJP ला घेरले...
10
इराणमधील सत्तासंघर्षामधून इब्राहीम रईसींचा बळी? खोमेनींच्या मुलावर संशय, इराणमध्ये चर्चांना उधाण
11
Narendra Modi : "राजपुत्र उघडपणे सांगत आहेत..."; राहुल गांधींच्या जुन्या Video चा उल्लेख करत मोदींचा घणाघात
12
उत्तर प्रदेशमध्ये बनावट मतदान, अनेक खुलासे; २५ मे रोजी होणार पुन्हा मतदान
13
लोकसभा निवडणुकीदरम्यान बीड आणि बारामतीमध्ये बोगस मतदान, शरद पवारांचा गंभीर आरोप  
14
भोंगळ कारभार! मतदान करता न आल्यानं कलाकार संतापले; सांगितलं नेमकं काय घडलं
15
‘ही लढाई संपलेली नाही, तर आता खरी सुरुवात झालीय’, जयंत पाटील यांचं शरद पवार गटाच्या कार्यकर्त्यांना भावूक पत्र 
16
सॅमसंगची मोठी घोषणा! तुम्ही तुमचा फुटलेला किंवा खराब झालेला फोन वर्षातून दोनदा दुरुस्त करू शकता
17
"उद्धव ठाकरे यांनी नेहमीप्रमाणे त्यांचे रडगाणे सुरु केले आहे"; देवेंद्र फडणवीसांची बोचरी टीका
18
‘...हा तर अरविंद केजरीवाल यांच्या हत्येचा कट’, ‘आप’चा PMO वर सनसनाटी आरोप
19
... म्हणूनच काँग्रेसवाले आमच्या वाहनांवर हल्ले करतायत; कंगना यांचा गंभीर आरोप
20
प्लेऑफमध्ये KKR विरुद्ध SRHचं पारडं जड, अशी आहे आकडेवारी, थेट फायनल गाठणार की…

Ram Navmi 2021: उपद्रवी व्यक्तींना आधी समजावून बघा, अन्यथा शासन करा; रामायणाचा धडा 

By ऑनलाइन लोकमत | Published: April 19, 2021 10:51 AM

Ram Navmi 2021: शूर्पणखा स्त्री असूनही उपद्रव देणारी होती म्हणून श्रीरामांनी लक्ष्मणाकरवी तिला शासन केले. आयुष्यात असे उपद्रवी कार्यात विघ्न आणतात, त्यांना आधी समजावून सांगावे, न ऐकल्यास त्यांना ते कोणीही असल्यास  शासन करावेच अशी शिकवण श्रीराम या प्रसंगातून आपल्याला देतात.

>> डॉ. भूषण फडके

पंचवटीत लक्ष्मण सुंदर पर्णकुटी बांधतो. एक दिवस रावणाची बहीण शूर्पणखा त्याठिकाणी येते आणि श्रीरामांना विवाह करण्याची गळ घालते. पण, आपण विवाहित आणि एकपत्नीव्रतधारी असल्याचे श्रीराम  सांगतात, तेव्हा ती सीतेवर धावून जाते. श्रीरामांच्या इशाऱ्यासरशी लक्ष्मण शूर्पणखेचे नाक, कान कापून टाकतो. अपमानित शूर्पणखा रावणाने सीमा रक्षणासाठी नेमलेल्या खर दुषणकडे जाते आणि आपली दुर्दशा सांगते. खर दूषण चौदा हजार राक्षसांसहित श्रीरामावर आक्रमण करतात, पण पराक्रमी राम संपूर्ण राक्षस सैन्याचा नि:पात करतात आणि खराला ठार मारतात. 

Ram Navmi 2021: बंधुप्रेम शिकवणारं रामायण... राज्य नाकारणारा भरत अन् वनवासात जाणाऱ्या लक्ष्मणाचा त्याग अतुलनीयच!

शूर्पणखा स्त्री असूनही उपद्रव देणारी होती म्हणून श्रीरामांनी लक्ष्मणाकरवी तिला शासन केले. आयुष्यात असे उपद्रवी कार्यात विघ्न आणतात, त्यांना आधी समजावून सांगावे, न ऐकल्यास त्यांना ते कोणीही असल्यास  शासन करावेच अशी शिकवण श्रीराम या प्रसंगातून आपल्याला देतात.

शूर्पणखा रडत ओरडत रावणाकडे जाते. ती म्हणते, “रावणा, मी तुझी बहीण आहे हे माहीत असूनदेखील त्या मानवाने माझी विटंबना केली. त्याची पत्नी अतिशय सुंदर आहे. ती तुझीच राणी शोभेल. ती तुझी पत्नी व्हावी म्हणून मी  त्याठिकाणी गेले तर लक्ष्मणाने माझे नाक, कान कापून मला कुरूप केले.” शूर्पणखेच्या शब्दांनी रावणाचा स्वाभिमान आणि अहंकार डिवचला गेला. तो सीतेच्या अपहरणाची योजना आखून मारीचाला या कामात सहाय्य करण्याची आज्ञा करतो. 

एक दिवस राम सीता पर्णकुटीबाहेर असतांना एक सोनेरी मृग सीतेच्या दृष्टीस पडतो. तो मृग आणून द्या असे सीता श्रीरामांकडे हट्ट धरते. सोनेरी मृग असणे शक्य नाही, हे श्रीराम जाणून होते. पण हरिणाच्या रुपात राक्षस असल्यास त्याला ठार करून आपले धर्मरक्षणाचे कार्यात हातभार लागेल असे वाटून, जानकीच्या रक्षणार्थ पर्णकुटीत थांबण्याची लक्ष्मणास आज्ञा देऊन  श्रीराम त्या हरिणाला आणण्यासाठी निघतात. 

तो सुवर्णमृग म्हणजे मारीच श्रीरामांना पर्णकुटीपासून बराच दूर नेतो. आता हा आपल्या हातात लागत नाही म्हणून श्रीराम त्याच्यावर बाण सोडतात तेव्हा तो मायावी मारीच , “हे सीते धाव! हे लक्ष्मणा धाव! अशी किंकाळी फोडतो. ती ऐकताच सीता लक्ष्मणास रामाच्या रक्षणार्थ जाण्याची आज्ञा देते”. श्रीरामांवर कोणतेही संकट येऊ शकत नाही, हे लक्ष्मण सांगण्याचा प्रयत्न करतो. तेव्हा सीता म्हणते, “हे लक्ष्मणा, तुझ्या मनात माझ्याबद्दल लालसा उत्पन्न झाली आहे म्हणून तू श्रीरामांच्या सहायार्थ जाण्याचे टाळतो आहेस.”

ज्या भावासाठी सर्वस्वाचा त्याग केला त्याच्या भार्येकडून असे कटू वचन ऐकल्यानंतर लक्ष्मणाच्या डोळ्यात पाणी येते. तो आश्रमाच्या बाहेर एक रेषा ओढतो आणि या रेषेबाहेर न जाण्याचे बजावतो. लक्ष्मण लांब जाताच साधू वेशात दबा धरून बसलेला रावण पर्णकुटीच्या दरवाज्याजवळ येतो आणि भिक्षा मागतो. आपण भुकेले असून जमिनीवर गडबडा लोळण घेतो. सीतेला त्याची दया येते आणि सीता रेखा ओलांडून पर्णकुटीबाहेर येते. तोच रावण आपले मूळ रूप घेतो आणि सीतेला उचलून आकाशमार्गे लंकेकडे जायला निघतो. मारीचाला ठार करून प्रभू राम परत येत असतात तो त्यांना वाटेत लक्ष्मण भेटतो. जानकीची काळजी करत श्रीराम लक्ष्मणासह  पर्णकुटीकडे त्वरेने परत यायला निघतात.  

|| बोला सियावर रामचंद्र की जय ||

भ्रमणध्वनी : ९४२२४०९२९८Email-bmphadke@gmail.com

Ram Navmi 2021: योग्य वेळी सत्तेचं पद सोडण्याचं अन् बुद्धिभेद करणाऱ्यांपासून दूर राहण्याचं महत्त्व पटवणारं रामायण

टॅग्स :ramayanरामायणRam Navamiराम नवमी