शहरं
Join us  
Trending Stories
1
"७५ टक्के नगराध्यक्ष महायुतीचे, ४८ टक्के नगरसेवक एकट्या भाजपाचे; एवढा मोठा विजय...," CM फडणवीसांनी आकड्यांसह सांगितली ताकद
2
"कुटुंब आणि लग्न हे केवळ शारीरिक संतुष्टीचे माध्यम नाही तर...", 'लिव्ह-इन रिलेशनशिप'वर मोहन भागवत स्पष्टच बोलले
3
मिस्टर अँड मिसेस नगरसेवक! बदलापूरमध्ये डझनभर जोडप्यांनी निवडणूक लढवली; चार जिंकली, तर पाच...
4
भंडारा उधळला आणि भडका उडाला, जेजुरीत विजयी मिरवणुकीला गालबोट; दोघे भाजले, १८ जखमी
5
इलॉन मस्क यांची संपत्ती ७५० अब्ज डॉलर्सच्या पार; भारताच्या टॉप ४० श्रीमंतांएवढी एकट्याची 'माया'
6
"PM मोदींच्या योजनांवरचा आशीर्वाद"; अमित शाहंकडून कौतुकाची थाप, महायुतीच्या विजयाने दिल्लीत जल्लोष
7
“नगरपालिका निकालाने विरोधकांचे पानिपत, आता मनपासाठी एक दिलाने कामाला लागा”: DCM शिंदे
8
"जर व्हेनेझुएला विरोधात कुठल्याही प्रकारची लष्करी कारवाई झाली तर..."; ब्राझीलच्या राष्ट्राध्यक्षांची अमेरिकेला थेट धमकी!
9
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: सर्वाधिक नगराध्यक्ष भाजपाचे, काँग्रेसलाही किंचित दिलासा! नगरपरिषद निकालांमध्ये कोण 'हिट', कोण 'फ्लॉप'?
10
विनायक चतुर्थी अंगारक योग २०२५: ‘असे’ करा व्रत, गणेश पूजनात ३ गोष्टी हव्याच; पाहा, सोपी पद्धत
11
प्रियकरासोबत मिळून पतीची हत्या, पण एक चूक नडली अन पोलिसांनी ठोकल्या बेड्या  
12
"पक्षाने जे प्रवेश दिले त्याचा फायदाच झाला"; मुनगंटीवारांच्या नाराजीवर CM फडणवीसांचे भरपाई देण्याचे आश्वासन
13
IND vs PAK : मैदानात फुल राडा! आयुष म्हात्रे–वैभव सूर्यवंशीचा पाक गोलंदाजाशी वाद; VIDEO व्हायरल
14
धावत्या ट्रेनमध्ये प्रेमीयुगुलाचा रोमान्स, VIDEO व्हायरल; नेमका कुठे घडला 'हा' लज्जास्पद प्रकार?
15
‘हा महायुतीचा सामूहिक विजय, आम्ही जिथे लढलो तिथे…”, निकालांनंतर अजित पवारांचं मोठं विधान          
16
'हिंदूंनी एकजुटीने...', बांगलादेशातील हिंदू अत्याचारांवर RSS प्रमुख मोहन भागवतांचे मोठे वक्तव्य
17
भाजपाचे ५ आमदार असतानाही काँग्रेसने दिली मात! चंद्रपुरात विजय वडेट्टीवार ठरले किंगमेकर
18
Daund Local Body Election Result 2025: दौंडला दोन्ही गट सत्तेत; नगराध्यक्षपदी राष्ट्रवादी काँग्रेसच्या दुर्गादेवी जगदाळे
19
एकनाथ शिंदेंच्या ठाण्यातील दोन बालेकिल्ल्यांना भाजपाकडून सुरुंग, अंबरनाथ, बदलापूरमध्ये फुललं कमळ
20
“नगरपालिका निवडणुकीतील महायुतीचा विजय निवडणूक आयोगाच्या आशिर्वादाने”: हर्षवर्धन सपकाळ
Daily Top 2Weekly Top 5

Ram Navami 2024: उत्तम राजकारणी असूनही योग्य वयात पदत्याग करण्याचे औदार्य दशरथाकडे होते; वाचा रामकथा!

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 13, 2024 16:37 IST

Ram Navami 2024: अयोध्येचा राज्यकारभार उत्तम रित्या चालवण्याचे सामर्थ्य दशरथाकडे होते, तरी त्याने वयोमर्यादा लक्षात घेऊन केलेला त्याग महत्त्वपूर्ण ठरतो, कसा ते पहा!

>>डॉ. भूषण फडके

भरत आणि शत्रृघ्नचे केकय देशात म्हणजे भरताच्या आजोळी उत्तम स्वागत झाले. भरत-शतृघ्न केकयदेशात आनंदात होते पण त्यांना अयोध्येची, आपल्या माता-पित्यांची आणि बंधू श्रीराम-लक्ष्मणांची सदोदित आठवण होत असे. 

दशरथ राजा आता वृद्धापकाळाकडे झुकत होते. सर्वगुणसंपन्न श्रीरामाला राज्याभिषेक करावा असे दशरथाला वाटले. त्यांनी हा विचार वशिष्ठ, मंत्रिगण आणि प्रजेला सांगितला. सर्वांना अतिशय आनंद झाला. 

आपण वृद्ध झालो आहोत, आता राज्यपद त्यागून योग्य पुत्राला राज्याभिषेक करण्याचा राजा दशरथाचा निर्णय प्रजेला फार आवडतो. खरे तर सत्तेचा मोह अनेकांना सोडवत नाही. पण, राजा दशरथ त्यातले नव्हते. योग्य वेळ येताच योग्य उत्तराधिकारी निवडून आपण निवृत्त होणे अशी त्यागी वृत्ती प्रजाजनांचा आवडली होती आणि त्याचेच गुणगान प्रजा गात होती.

रामाला युवराजपदाचा अभिषेक होणार ही बातमी मंथरा या  कैकयीच्या दासीला कळते. रामाला होणारा युवराजपदाचा अभिषेक कैकयीसाठी घातक आहे, असे मंथरा सांगण्याचा प्रयत्न करते. पण कैकयीचे रामावर पुत्रवत प्रेम असते. म्हणून ती मंथरेचे म्हणने नाकारते. मंथरा ही अतिशय कपटी आणि बुद्धीभेद करण्यात वाकबगार असते. ती कैकयीस म्हणते, “राम राजा झाल्यावर कौसल्या राजमाता होईल आणि तुला तिचे दास्यत्व पत्करावे लागेल.” पुढे ती म्हणते, “तू दशरथ महाराजांची आवडती राणी असूनदेखील तुला ही बातमी न सांगण्यात त्यांच्या मनात कपट आहे.” ही मात्रा बरोबर लागू पडते. कैकयी मंथरेच्या कह्यात जाते. 

राजा दशरथ कैकयीला रामाच्या युवराजपदाच्या अभिषेकपदाची बातमी देण्यास येतात तेव्हा ती क्रोधागारात असते आणि राजाला वचनात अडकवून दोन वर मागते. एका वराने भरतास राज्य आणि दुसऱ्या वराने रामास चौदा वर्ष वनवास! आपल्या आजूबाजूला मंथरेसारखे बुद्धीभेद करणारे असतात, पण त्यांच्या कह्यात जाणे आपण टाळावयास हवे.  श्रीरामांना ही हकीकत कळताच पितृवचन पूर्ण करण्यासाठी ते वनात जाण्याचा निश्चय करतात. ही बातमी माता कौसल्येस कळताच ती दु:खी होते. माझ्या दैवात वनवास आहे, असे राम म्हणतात. हे ऐकताच लक्ष्मण संतापतो आणि दैवापेक्षा पुरुषार्थ श्रेष्ठ आहे असे विचार मांडतो. श्रीराम लक्ष्मणाची समजूत घालतात पण  लक्ष्मणासह सीताही रामांसोबत वनवासात जाण्याचा निश्चय करते. 

वनवासात जाण्यासाठी श्रीराम आणि  लक्ष्मण वल्कले धारण करतात, हे पाहिल्यावर राजा दशरथाला मूर्च्छा येते. सुमित्रा लक्ष्मणाला राम सीतेची काळजी घेण्याचा उपदेश करते. मंत्री सुमंत रथ सिद्ध करतो आणि  हे पाहताच दशरथ राजा जमिनीवर कोसळतो.  श्रीरामांची आणि निषादराजगुहांची श्रुंगवेरपूर येथे भेट होते. निषादराजाच्या नावेतून गंगा पार करून श्रीराम भारद्वाज ऋषींच्या आश्रमात येतात. भारद्वाज ऋषींच्या सल्ल्यानुसार श्रीराम चित्रकूट पर्वतावर आहेत ही बातमी निषादराज कडून सुमंतास कळल्यावर सुमंत जड अंत:करणाने अयोध्येत परत जायला निघतात.

|| बोला सियावर रामचंद्र की जय ||

भ्रमणध्वनी : ९४२२४०९२९८Email-bmphadke@gmail.com

 

टॅग्स :Ram Navamiराम नवमीramayanरामायण