शहरं
Join us  
Trending Stories
1
"Today I Say to the Whole World..."; बिहारच्या भाषणात PM मोदी इंग्रजी का बोलले? यामागे आहे खास कारण
2
“अचानक गोळीबार झाला, २ लहान मुले सोबत होती अन्....”; देवदूत ठरला गाइड, ११ जणांचे जीव वाचवले
3
चुकून सीमा ओलांडून पाकिस्तानात पोहोचला बीएसएफ जवान; पाकिस्तानी रेंजर्सनी घेतले ताब्यात
4
“आता कलमा वाचायला शिकतोय, कधी कामी येईल माहिती नाही”: भाजपा खासदार निशिकांत दुबे
5
"अख्खं हॉटेल रिकामं, सकाळी ६ वाजता रुमचं दार वाजलं अन्...", कल्याणमधील जोडप्याचा जम्मू-काश्मीरमधील भयावह अनुभव
6
Akshaya Tritiya 2025: सोन्याचे वाढते भाव पाहता अक्षय्य तृतीयेला सुवर्णदान शक्य नाही? करा 'या' पाच वस्तूंचे दान!
7
Video - संतापजनक! मोबाईल घेतल्याने विद्यार्थिनीला आला राग, शिक्षिकेला केली चपलेने मारहाण
8
पाकिस्तानचा तीळपापड! भारतासोबत व्यापार नाही, हवाई क्षेत्रही केलं बंद; म्हणे, पाणी रोखणे युद्धाची घोषणाच...
9
दिल्लीत हालचालींना वेग; गृहमंत्री अमित शाहा अन् एस परराष्ट्रमंत्री जयशंकर राष्ट्रपतींच्या भेटीला...
10
समस्या संपत नाही, अडचणी थांबत नाही? मनापासून ‘या’ गोष्टी सुरू करा, स्वामी नक्की कृपा करतील!
11
आयपीएल २०२५ मध्ये हेनरिक क्लासेनं मारला सर्वात लांब षटकार, पाहा टॉप १० खेळाडूंची यादी
12
'ओयो'विरोधात तक्रार करणारा रिसॉर्ट मालकच आला अडचणीत; अग्रवाल यांच्यावर दाखल झाला होतो गुन्हा
13
...तोपर्यंत तृणमूल काँग्रेसचे खासदार साकेत गोखले यांचा पगार जप्त करा, हायकोर्टाचे आदेश, कारण काय? 
14
जबरदस्त! पाकिस्तानने जिथे घोषणा केली, त्याच समुद्रात भारताने केली Destroyer मिसाइलची चाचणी
15
पहलगाम हल्ल्यातील जखमींसाठी मुकेश अंबानींची मोठी घोषणा; म्हणाले 'दहशतवाद हा मानवतेचा शत्रू..'
16
"पहलगाममधील हल्ला एक कटकारस्थान, स्क्रिप्ट आधीच लिहिली गेली होती’’, आरजेडीच्या नेत्याचं वादग्रस्त विधान
17
दिल्ली उच्च न्यायालयाने स्विगी, झेप्टोला नोटीस पाठवली, एनजीओने दाखल केली याचिका; नेमकं प्रकरण काय?
18
नववर्षातील पहिला शुक्र प्रदोष: व्रताचरण करा, सुख-सौख्य मिळवा; महादेव भरभराट करतील
19
सीमा हैदर भारतातच राहणार, झाले स्पष्ट! सर्व पाकिस्तानींना ४८ तासांत देश सोडण्याचे आदेश पण...
20
मायेची फुंकर! ब्रेकअप-स्ट्रेस- रागावर नियंत्रण यासाठी थेरपी देणारी उशी,अनेक दुखण्यांवर औषध

Positive Affirmation: रोज सकाळी उठून स्वत:ला द्या 'या' दहा सूचना; उजळेल भाग्य!

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 4, 2025 07:05 IST

Positive Affirmation : ब्रह्मकुमारी शिवानी दीदी सांगतात, दिवसाची सुरुवात सकारात्मक झाली तर संपूर्ण दिवसही आनंदात जातो; त्यासाठी या दहा सूचना नक्की द्या.

'सत्य संकल्पाचा दाता' असे आपण म्हणतो, परंतु आपले संकल्प सिद्धीस जावेत यासाठी त्या संकल्पांची आपण उजळणीच करत नाही. दिवसभर उगाळत बसतो, ते केवळ दुःख, उणिवा आणि कठीण परिस्थिती. काय मिळाले नाही याचा विचार करण्यात जे आहे त्याचाही आपल्याला विसर पडतो. म्हणून दिवसभराची नकारात्मकता दूर करण्यासाठी दिवसाची सुरुवात आणि शेवट दहा संकल्पांनी करा, असे ब्रह्मकुमारी शिवानी दीदी सुचवतात. 

सकारात्मक विचारांमध्ये सकारात्मक गोष्टी घडवण्याचे सामर्थ्य असते. म्हणून कितीही कठीण काळ सुरु असला तरी स्वतःला सकारात्मक ठेवा. कारण वेळ बदलते तशी परिस्थितीसुद्धा बदलते. ही खूणगाठ मनाशी बांधली की अडचणींना सामोरे जाण्याचेही बळ मिळते. यासाठी पुढील संकल्प-

१. मी शक्तिशाली आहे. २. मी नेहमी खुश असतो.  ३. मी निर्भयी आहे . ४. मी शांत आणि स्थिर आहे.  ५. मी निरोगी आहे, मला कसलाही आजार नाही. 

६. माझी सगळी नाती अतूट आहेत.  ७. माझं कुटुंब माझी ताकद आहे.  ८. मी माझं ध्येय गाठणारच.  ९. सर्व प्रकारच्या अडचणींवर मात करणारच . १०. परमात्म्याचे सुरक्षा कवच माझ्या सभोवती आहे. 

दीदी सांगतात, या दहा संकल्पांची उजळणी करण्यासाठी एक मिनीटांपेक्षाही कमी कालावधी लागतो. या संकलपांमध्ये तुम्ही तुमच्या निवडीप्रमाणे बदल करू शकता. फक्त त्यात सकारात्मक भाव असायला हवा ही मुख्य अट आहे. रोज सकाळी दिवसाला सामोरे जाताना मेंदूला या दहा संकल्पाची आठवण करून द्या. मेंदू या गोष्टींची नोंद घेतो आणि त्यानुसार तुम्हाला सकारात्मक राहण्याचे बळ देतो. हीच सूचना रात्री झोपण्यापूर्वी करा. शांत मनात विचारांचे पडसाद उमटत असतात. हे विचार सकारात्मकच असायला हवेत. त्यानुसार हे सत्यसंकल्प आयुष्याचा एक भाग बनवा आणि प्रत्येक क्षणाचा भरभरून आनंद घ्या!

टॅग्स :Inspirational Storiesप्रेरणादायक गोष्टी