शहरं
Join us  
Trending Stories
1
Manoj Jarange: "ही ओबीसीची सभा नसून..." बीडमधील महाएल्गार सभेवर मनोज जरांगेंची टीका
2
Goa Cylinder Blast: दक्षिण गोव्यातील विजय मरीनमध्ये सिलेंडरचा स्फोट; २ ठार, ५ जखमी
3
एकजुटीचा प्रकाश... मनसेच्या 'दीपोत्सवा'त उद्धव ठाकरेंचं ५५ शब्दांचं भाषण, काय संदेश दिला?
4
Rivaba Jadeja Minister: रिवाबा जडेजा यांना कोणतं खातं मिळालं, गुजरातचे नवे गृहमंत्री कोण? खातेवाटप जाहीर
5
चीनमध्ये राजकीय धमाका! जिनपिंग यांचे 'उत्तराधिकारी' वेइडोंगना अचानक पदावरून हटवले, कारण...
6
खरं उद्धट कोण? बिग बींसमोर बसलेला १० वर्षांचा मुलगा, की... क्रिकेटरची विचार करायला भाग पाडणारी पोस्ट
7
'उद्धव ठाकरेंकडून बाण निघून गेलाय आणि उरले फक्त खान'; भाजपने राज ठाकरेंचा व्हिडीओच दाखवला
8
Politics: "क्षण आनंदाचा, सण नात्यांचा" ठाकरे कुटुंबाकडून दिवाळीच्या खास शुभेच्छा! फोटो व्हायरल
9
Naxal-free: 'आम्ही नक्षलवादी नाही' गडचिरोलीतील चारभट्टी गाव नक्षलमुक्त होताच गावकऱ्यांना अश्रू अनावर
10
दिसायला देवकन्या, पण काम न शोभणारं; अनेक तरुणांना प्रेमाची मिठी देणारी काजल पकडली
11
७५ बसस्थानकांवर मोफत 'वाचन कट्टा'; PM मोदींच्या 'पंचाहत्तरी'निमित्त एसटीचा अनोखा उपक्रम!
12
माझं तुझ्यावर प्रेम नाहीये..; तरूणीने दिला नकार; संतापलेल्या तरूणाने मग भररस्त्यातच...
13
महाराष्ट्र सरकारने गौमातेला दिलेला राज्य मातेचा दर्जा कागदावरच, स्वामी अविमुक्तेश्वरानंद सरस्वती यांची टीका 
14
दिवाळीत ट्राय करा या फोटोशूट पोझ, दिसाल एकदम खास, प्रत्येक पोस्टवर होईल लाईक्सची बरसात
15
लाल दहशतीचा अंत! छत्तीसगडमध्ये 210 माओवाद्यांचे आत्मसमर्पण; बस्तर नक्षलमुक्त...
16
Gujarat Cabinet Reshuffle: काँग्रेसचे माजी प्रदेशाध्यक्ष अर्जून मोढवाडिया गुजरात सरकारमध्ये कॅबिनेट मंत्री
17
Ajit Agarkar: शमी टीम इंडियामधून का बाहेर? रोहित- कोहली वर्ल्डकप खेळतील का? आगरकर म्हणाले.
18
विदर्भ हादरला! पतीसोबत पूजाचं बिनसलं, एक्स बॉयफ्रेंड शुभमसोबत पुन्हा प्रेमसंबंध अन् झाला भयंकर शेवट
19
'तिच्या'आवाजाला भुलला अन् दोन कोटी गमावून बसला; नाशिकच्या उद्योजकासोबत फेसबुकवर काय घडले?
20
IND vs AUS : कॅप्टन्सीवरून हटवण्यात आल्यावर रोहित शर्मा पहिल्यांदाच कोच गंभीर यांना भेटला अन्.... (VIDEO)

Pitru Paksha 2025: यंदा पितृपक्षावर दोन ग्रहणांचे सावट; श्राद्धविधीत होणार अडचण? 

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 2, 2025 17:38 IST

Pitru Paksha 2025: पितृपक्ष पंधरवडयाच्या सुरूवातीला आणि शेवटी दोन ग्रहणं आल्यामुळे श्राद्धविधी कधी करावे आणि कधी टाळावे याविषयी खुलासा केला आहे.

भाद्रपद कृष्ण प्रतिपदेपासून अमावस्येपर्यंत अर्थात सर्वपित्री अमावास्येपर्यंत(Sarva Pitru Amavasya 2025), पितृपक्षात (Pitru Paksha 2025) पूर्वजांच्या आत्म्याला शांती मिळावी म्हणून श्राद्ध आणि तर्पण केले जाते. यावर्षी ८ ते २१ सप्टेंबर पितृपक्षाचा कालावधी(Pitru Paksha date 2025) असणार आहे. परंतु एकाच पंधरवड्यात दोन ग्रहण असल्याने श्राद्धविधीवर त्याचा परिणाम होणार का? ते दिवस निषिद्ध ठरणार का? ग्रहण काळाचा भारतात परिणाम होणार का? याबद्दल सविस्तर जाणून घेऊ. 

भाद्रपद कृष्ण प्रतिपदेपासून सुरू होणारा पितृपक्ष याच महिन्याच्या अमावस्येला संपतो. या १५ दिवसांत पितर पृथ्वीवर येतात. म्हणून लोक त्यांच्या पूर्वजांच्या आत्म्याच्या शांतीसाठी आणि त्यांच्या उद्धारासाठी श्राद्ध आणि तर्पण करतात. यावर्षी ८ ते २१ सप्टेंबर पर्यंत हा कालावधी असेल.

चंद्रग्रहण(Lunar Eclipse 2025): 

पितृपक्ष सुरु होण्याच्या आदल्या रात्री अर्थात भाद्रपद पौर्णिमेला, रविवारी ७ सप्टेंबरला चंद्रग्रहण असणार आहे, जे भारतात दिसणार आहे, त्यामुळे त्याचा सुतक काळ देखील वैध असेल. चंद्रग्रहण ७ सप्टेंबर २०२५ रोजी रात्री ९:५८ वाजता सुरू होईल. पौर्णिमा तिथी रात्री ११.३८ मिनिटांनी संपेल, नंतर प्रतिपदा सुरु झाली तरी ती ८ सप्टेंबरचा सूर्योदय पाहणार असल्याने महालयारंभ सोमवारपासूनच होईल. दिनदर्शिकेत म्हटल्यानुसार पौर्णिमेचे महालय ११, १४, १५,१८, २१ यापैकी कोणत्याही दिवशी करावे. 

सूर्यग्रहण(Solar Eclipse 2025): 

यानंतर, २१ सप्टेंबर रोजी होणारे सूर्यग्रहण भारतात दिसणार नाही. त्यामुळे या ग्रहणाचा सुतक काळ देखील विचारात घेतला जाणार नाही. त्यामुळे या दिवशी श्राद्ध आणि तर्पण करण्यास कोणतीही अडचण नाही. त्यामुळे ज्यांना आपल्या पितरांची तिथी माहीत नाही त्यांनी २१ सप्टेंबर रोजी सर्वपित्री अमावस्येला(Sarva Pitru Amavasya date 2025) श्राद्धविधी आणि दानधर्म करावे. 

सर्वपित्री अमावस्या(Sarva Pitru Amavasya 2025) : 

पितृपक्षाचा काळ पितरांच्या आशीर्वाद घेण्याचा मानला जातो. मात्र अनेकांना आपल्या पूर्वजांची श्राद्धतिथी माहीत नसते, तरीदेखील त्यांच्या नावे तर्पण करण्याची इच्छा असते. अशा भाविकांसाठी सर्वपित्री ही तिथी राखीव ठेवली आहे. त्यानुसार रविवार २१ सप्टेंबर रोजी सूर्यग्रहण असले तरी त्यादिवशी सर्वपित्री अमावस्येला श्राद्धविधी करता येतील. 

 

टॅग्स :pitru pakshaपितृपक्षsolar eclipseसूर्यग्रहणLunar Eclipseचंद्रग्रहणPuja Vidhiपूजा विधीAstrologyफलज्योतिष