शहरं
Join us  
Trending Stories
1
बाबा सिद्दीकी हत्या प्रकरणात मोठी अपडेट; झिशान अख्तरला कॅनडात पकडले, भारतात आणणार
2
येरवडा कारागृहातून शशांक हगवणे, निलेश चव्हाण पोलिसांच्या ताब्यात; शस्त्र परवाना प्रकरणी तपास करणार
3
मुंबई सोडून पुणे,नागपूरसह सर्व महापालिकांची प्रभाग रचना करण्याचे आदेश; निवडणुकांच्या तयारीला सुरुवात 
4
सोनमच्या समोरच राजावर पहिला वार झाला! चारही आरोपींनी गुन्हा कबुल केला, इंदूर क्राईम ब्रांच...
5
कामगिरी फत्ते! जगभरात पाकिस्तानचा दहशतवादी बुरखा फाडायला गेलेले परतले; सर्व 'सेनापतीं'नी घेतली मोदींची भेट
6
'ऑपरेशन सिंदूर' काळात भारताविरोधात रचला कट; मोहम्मद युनूस यांचा डाव बांगलादेश सैन्यप्रमुखानेच उधळला
7
आधी शाओमी अ‍ॅपलचे फिचर्स पळवायची, आता अ‍ॅपल...; लिक्विड डिस्प्लेवरून नेटकऱ्यांनी पुरावेच दाखविले
8
‘’लग्नानंतर पती-पत्नीला महिनाभर…”, मध्य प्रदेशच्या मुख्यमंत्र्यांनी दिलेल्या सल्ल्यावरून वाद
9
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला कट्टर धर्मवाद मान्य नाही अन् भविष्यातही असणार नाही - अजित पवार
10
...तर राजा रघुवंशी आणि सोनमच्या कुटुंबीयांविरोधात गुन्हा दाखल करणार, मेघालयच्या मंत्र्यांचा इशारा  
11
राष्ट्रवादीच्या वर्धापनदिनाला ३ महत्वाचे नेते गैरहजर; नेमकं कारण काय? अजित पवार म्हणाले...
12
स्थानिक नेतृत्व, कार्यकर्त्यांची इच्छा असेल तरच महापालिका निवडणुकीत युती - अजित पवार
13
विधानसभेला विजय मिळवण्यासाठी लाडकी बहीण योजना समोर आणली;अजित पवारांची थेट कबुली
14
एका प्रेमकहाणीचा हृदयद्रावक शेवट, पतीनं उचललं टोकाचं पाऊल, पाठोपाठ पत्नीनेही...
15
राजा रघुवंशी हत्याकांड प्रकरण: चावी गायब, गेटवरून उड्या मारत आरोपीच्या घरावर छापा; मिळाले महत्वाचे पुरावे - VIDEO
16
Viral News : सासूचा हात धरून पळून गेला जावई, तीन मुलांना घेऊन पोलीस ठाण्यात पोहोचली बायको! म्हणाली...
17
राजस्थान हादरले! ११ जण अंघोळीसाठी नदीत उतरले, वाहून गेले; ८ जणांचे मृतदेह सापडले
18
११ जूनला भद्र योग: ६ राशींना लाभ इच्छापूर्ती, बंपर नफा फायदा; गणपती-लक्ष्मी कृपेने कल्याणच होईल!
19
Mumbai Railway: “रेल्वेमंत्र्यांनी पाऊण तास चर्चा केली”; मुंबई लोकलबाबत CM फडणवीसांनी सांगितला मास्टर प्लान
20
एअरबेसवरील हल्ल्याचा बदला, रशियाचा कहर सुरूच; युक्रेनच्या शहरांवर ३०० हून अधिक ड्रोन, मिसाईल हल्ले

Pitru Paksha 2024: यंदा संकष्टीला करायचे आहे भरणी श्राद्ध; ते कोणी केले पाहिजे हेही जाणून घ्या!

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 20, 2024 13:00 IST

Pitru Paksha 2024: मृत व्यक्तीच्या वर्षश्राद्धाआधी भरणी श्राद्ध करावे की नाही, याबद्दल शास्त्रोक्त माहिती जाणून घ्या!

पितृपक्षात ज्या दिवशी भरणी नक्षत्र येईल त्याला महाभरणी असे नाव आहे. यंदा २१ सप्टेंबर रोजी भरणी श्राद्ध करायचे आहे. पण कोणी? हे जाणून घेणे अधिक महत्त्वाचे आहे.  कारण, हे श्राद्ध सर्वांनी करून चालत नाही. 

संकष्टीचा उपास आणि पितरांचा नैवेद्य : 

२१ सप्टेंबर रोजी संकष्ट चतुर्थी आहे आणि त्याच दिवशी भरणी नक्षत्र येत आहे. पितृपक्षात हे नक्षत्र ज्या दिवशी येते त्या दिवशी भरणी श्राद्ध करायचे असते. संकष्टीला अनेकांचा उपास असतो, पण त्याच दिवशी भरणी श्राद्ध आल्याने पितरांना नैवेद्य कसा दाखवायचा हा विचार करत असाल तर थांबा! उपास गणपतीचा आणि श्राद्ध विधी पितरांसाठी, या दोन्ही गोष्टी वेगवेगळ्या असल्याने श्राद्ध स्वयंपाक करून पितरांना नैवेद्य दाखवायचा आहे आणि तो नैवेद्य आपल्याला ग्रहण करता आला नाही तर एखाद्या गरजू व्यक्तीला द्यावा पण फेकून देऊ नये. अन्न वाया घालवू नये. नैवेद्याचा प्रसाद सायंकाळी चंद्रोदय झाल्यावर सेवेन करता येईल. २१ सप्टेंबर रोजी रात्री ९. ०४ मिनिटांनी चंद्रोदय आहे आणि भरणी श्राद्ध सकाळी करून घ्यायचे आहे. पण कोणी? ते पुढे वाचा... 

भरणी श्राद्ध कोणी करावे? 

मृत व्यक्तीचे वर्षश्राद्ध झाले असेल तरच पितृपक्षात भरणी नक्षत्राला भरणी श्राद्ध करता येते. अन्यथा वर्ष श्राद्ध होण्याआधी पितृ पक्ष आला असता भरणी श्राद्ध करू नये असा शास्त्र संकेत आहे. तसेच वर्षश्राद्धाच्या पाठोपाठ पितृपक्ष आला असता भरणी नक्षत्रावर पुनश्च श्राद्ध विधी केले असता हरकत नाही, उलट त्याचे अधिक पुण्य मिळते. 

भरणी श्राद्ध केल्याने महापुण्य मिळते असे म्हणतात. कारण हे श्राद्ध केले असता मृत व्यक्तीच्या आत्म्याला शांती लाभते आणि तो आत्मा भवसागरातून मुक्त होतो. त्यामुळे श्राद्धविधी केल्याचे पुण्य पदरात पडते. परंतु ते वर्षश्राद्धा नंतरच का करावे तर वर्ष श्राद्ध झाल्यावरच मृत व्यक्तीचे प्रेतत्व नष्ट होते. त्या आत्म्याला पितरांमध्ये स्थान मिळते आणि त्या पितरांची पूजा पितृपक्षात करता येते. 

गरुडपुराण अन्वष्टका भरणी आदी श्राद्धे वर्षश्राद्धानंतरच करावी असे सांगते. तेथेच भरणीबाबत निर्णय करताना  पुढे पित्याचे भक्तीस्तव कोणी भरणीश्राद्ध वर्षापुर्वी केले तरी दोषावह नाही असेही म्हटले आहे. अर्थात केले तरी ते चूक नाही, मात्र त्याला शास्त्राधार नाही. 

थोडक्यात भरणी श्राद्ध मृत व्यक्तीच्या पहिल्या वर्षी न करता दुसऱ्या वर्षांपासून करावे, हे निश्चित! 

टॅग्स :pitru pakshaपितृपक्षSankashti Chaturthiसंकष्ट चतुर्थीPuja Vidhiनवरात्री पूजा विधी २०२३