शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
2
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
3
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
4
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
5
अमली पदार्थ जप्ती प्रकरणात दोघांची अखेर निर्दोष मुक्तता; नियम पालनात सरकारी पक्ष अपयशी
6
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
7
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
8
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
9
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
10
Fastest Delivery In IPL 2026 : भारताची नवी स्पीडगन! Ashok Sharma चा १५४.२ kmph वेग, Nortje चा रेकॉर्ड मोडला
11
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
12
मंत्री गणेश नाईक म्हणतात... ठाण्यातील शिवसेनेचा खरा इतिहास सांगितला जात नाही!
13
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
14
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
15
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
16
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
17
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
18
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
19
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
20
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
Daily Top 2Weekly Top 5

Peace of Mind: पश्चात्ताप टाळायचा असेल तर रागाचा क्षण टाळा, पण कसा? सांगताहेत संदीप माहेश्वरी!

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 6, 2023 07:00 IST

Peace of Mind: डोकं शांत ठेवण्यासाठी फक्त एकदा 'ही' एक कृती अवश्य करून बघा! 

आजच्या काळात आपण संयम गमावून बसलेलो आहोत. प्रत्येक गोष्ट क्षणार्धात मिळवण्याची सवय आपल्याला लागली आहे. कधी इंटरनेट बंद पडले, फोन लागला नाही, जेवणाची ऑर्डर वेळेत आली नाही, तरी लोक जमदग्नीचे रूप धारण करतात. एकूणच रागावर संयम राहिलेला नाही. सतत काहीतरी गमावण्याची भीती मनाला पोखरत राहते. या भीतीतून स्वत:ला सावरायचे कसे आणि क्षणार्धात डोकं शांत कसे ठेवायचे, याबद्दल सांगताहेत तरुणांचे लाडके व्याख्याते संदीप महेश्वरी!

आपल्या डोक्यात एकाच वेळी अनेक विचार सुरू असतात. आपल्या मेंदूला कल्पना आणि वास्तव यातला फरक स्पष्ट करता येत नाही. कल्पनेतून, अतिविचारातून निर्माण झालेल्या गैरसमजांना आपला मेंदू वास्तव समजू लागते आणि ते चिंताग्रस्त राहते. कल्पना आणि वास्तव यातला भेद अन्य कोणी नाही, तर आपणच आपला दूर करायला शिकलो, तर क्षणात डोकं शांत ठेवायला शिकू शकता. कसे ते पहा-

आपण सगळेच जण झोपेत स्वप्न पाहतो. स्वप्नात रंगून जातो. काही स्वप्नं आनंद देणारी तर काही भयभीत करणारी असतात. कधी कधी तर आपण आपला किंवा आपल्या आप्तजनांचा मृत्यू पाहतो. पटकन जाग येते. सर्वांगाला घाम फुटलेला असतो. पण क्षणात लक्षात येते आणि हायसे वाटते, की ते स्वप्नं होते. वास्तव नाही. वास्तवात आपण किंवा स्वप्नात मृत पाहिलेली व्यक्ती जीवंत आहे. या विचाराने आपण आनंदून जातो.

हीच कृती आपल्याला जागेपणी करायची आहे. एखाद्या गोष्टीची भीती जेव्हा मनात तयार होते. तेव्हा एक क्षण थांबून आपल्याला विचार करायला हवा, की ही केवळ आपली कल्पना आहे की वास्तव? एखाद्या कामात, नात्यात, आर्थिक व्यवहारात, स्पर्धेत आपण अपयशी ठरलो, याचा अर्थ आपण आयुष्यातून उध्वस्त होतो का? तर नाही! ही केवळ आपली कल्पना आहे. त्यात किती वेळ अडकून राहायचे? जेवढा वेळ आपण स्वप्न विसरायला लावतो, तेवढाच! अपयश, आळस झटकून पुन्हा कामाला लागलो, तर कोणीही आपल्याला यशस्वी होण्यापासून अडवू शकत नाही. 

हीच बाब राग नियंत्रणाची! एखाद्यावर रागवताना क्षणभर थांबून विचार करा आणि मग व्यक्त करा. खरोखरच नुकसान होण्याइतकी काही गोष्ट घडली आहे का? ती दुरुस्त होऊ शकणार नाही का? तेवढ्यासाठी रागवण्याची खरंच गरज आहे का? हा विचार केलात तरी क्षणात मन, डोकं शांत होऊन सहज पुढच्या कामाला सुरूवात करू शकाल. अन्यथा विचारात अडकून राहाल.

जेव्हा आपण कल्पना आणि वास्तव यात फरक ओळखायला शिकू तेव्हा आपल्याला आपल्याच वाईटात वाईट विचारांची गंमत वाटू लागेल आणि सदासर्वकाळ मन, विचार, डोकं शांत राहील आणि तुम्ही आनंदी राहाल.

टॅग्स :Mental Health Tipsमानसिक आरोग्य