शहरं
Join us  
Trending Stories
1
७५ वर्षांचे झाले, PM मोदींनी निवृत्ती घ्यावी का? शरद पवार म्हणाले, “त्यांनी थांबावे हे...”
2
मर्सिडीज-हुरुनचा अहवाल आला! भारतात करोडपतींच्या संख्येत ९० टक्क्यांनी वाढ..., महाराष्ट्र टॉपर, प्रचंडच...
3
मारुती अल्टोपेक्षा ही कार स्वस्त झाली; जीएसटीने कमालच केली, मारुतीचे जगच इकडचे तिकडे केले...
4
'हैदराबाद गॅझेटिअरच्या नावाखाली सरकारने फसवणूक केली'; मराठा गोलमेज परिषदेत आरोप
5
अमेरिकन राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचे विमान न्यू यॉर्कमध्ये अपघातातून थोडक्यात बचावले...
6
तज्ज्ञांचा इशारा...! ‘या’ बँकेचा स्टॉक 17 रुपयांपर्यंत कोसळणार, गुंतवणूकदारांचे टेन्शन वाढले; SBI सह अनेक दिग्गजांनी शेअर विकले
7
“तुम्ही बोलत नाही, आम्ही ओबीसी आरक्षणासाठी लढायचे नाही का?”; छगन भुजबळांचा शरद पवारांना सवाल
8
मतचोरीचा राहुल गांधींचा आरोप, एकनाथ शिंदेंचे खुले आव्हान; म्हणाले, “ठोस पुरावे द्या अन्...”
9
शेतकऱ्यांना या संकटातून बाहेर काढा ! सातबारा कोरा करण्यासाठी कर्जमुक्ती करा
10
Nanded: शांतता बैठकीतच मराठा-ओबीसी वादाला हिंसक वळण, रिसनगावात ४ जखमी
11
हैदराबाद गॅझेटवर हायकोर्टाचा मोठा निर्णय; याचिकाकर्त्यांना सुनावले, आता मराठा आरक्षणाचे काय?
12
डोनाल्ड ट्रम्प यांची माघार! लवकरच भारतावरील शुल्क हटवणार; कुणी केला दावा? पाहा...
13
“GST सुधारणा हा राहुल गांधींच्या दूरदृष्टीचा विजय, २२ तारखेला राज्यभर पेढे वाटणार”: काँग्रेस
14
Sairat: 'सैराट' सिनेमात रिंकू राजगुरुच्या आईवडिलांचीही दिसलेली झलक, कोणता आहे तो सीन?
15
यंदाच्या गणेशोत्सवात तब्बल ६ लाख कोकणवासीयांचा STने सुखरुप प्रवास; २३ कोटींचे उत्पन्न
16
'खोटारडं' पाकिस्तान पुन्हा उघडं पडलं... मॅच रेफरीच्या केबिनमध्ये काय घडलं? सत्य समोर आलं...
17
Kangana Ranaut : "माझ्याच हॉटेलचा काल ५० रुपयांचा धंदा", पूरग्रस्तांसमोर कंगना राणौतने मांडली स्वत:चाची व्यथा
18
अभिमानास्पद! वडील हवाई दलात अधिकारी, लेक झाली लेफ्टनंट; इंजिनिअरिंगनंतर देशसेवेचं स्वप्न
19
ठाकरे बंधू एकत्र आले तर मविआवर काय परिणाम होईल? शरद पवार थेट म्हणाले, “मग आता वेगळे...”
20
Video: उंटाने पहिल्यांदाच चाखली लिंबाची चव अन् 'अशी' झाली अवस्था, पाहून तुम्हालाही येईल हसू

पालकांनो मुलं तुमचं ऐकत नाहीत? मग 'ही' चाणक्यनीती जरूर आजमावून पहा!

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 18, 2022 15:56 IST

योग्य वेळी दिलेलं योग्य वळण मुलांच्या मनाला आकार देतं आणि आयुष्यालाही! त्यासाठी लक्षात ठेवा पुढील तीन गोष्टी!

'अगर किसी बच्चे को खिलोना ना दिया जाए, तो वह कुछ देर तकी रोएगा, मगर संस्कार ना दिए जाए तो जिंदगीभर रोएगा।' मध्यंतरी हे सुंदर वाक्य वाचनात आले होते. भारतात संस्कार, मूल्य, परंपरा या गोष्टींना महत्त्व का आहे, याचे सार वरच्या एका वाक्यात एकवटले आहे. आपले आयुष्य, जडणघडण, वागणूक या सर्वांवर संस्कारांचा मोठा हातभार असतो. ओल्या मातीला योग्य वयात वळण दिले, तरच ती चांगला आकार देते. ही ओली माती म्हणजे बाल्य दशा. याच वयात मुलांना प्रेम, आपुलकी, राग, लोभ, आदर, नम्रता या गोष्टींचे वळण लावायचे असते.

दुर्दैवाने आज घरोघरी या गोष्टींचा अभाव दिसत आहे. 'आमचा मुलगा आमचे ऐकत नाही', ही बाब आजचे पालक हसत हसत सांगतात. परंतु हेच हसू उद्या पाल्य आणि पालकांच्या डोळ्यातले आसू बनतात. यासाठी आचार्य चाणक्य म्हणतात, पुढच्या पिढीच्या हाती देशाचे भवितव्य आहे. त्यांना योग्य रीतीने घडवणे हे आपले कर्तव्य आहे. याची जाणीव ठेवून काही बाबतीत पथ्य जरूर पाळा. 

वाईट वळण, वाईट सवयी लागायला वेळ लागत नाही. मनुष्य स्वभाव वाईट गोष्टी पटकन आत्मसात करतो. लहान मुले त्याला अपवाद कशी असतील? म्हणून त्यांना वाईट गोष्टी कळण्याआधी जगात चांगले काय आहे, याची ओळख करून देणे ही पालकांची जबाबदारी आहे. माळी ज्याप्रमाणे ऊन, वारा, पाऊस यांपासून आपल्या बागेची राखण करतो, रक्षण करतो, तशी राखण पालकांना करायला हवी. आपल्या घरची बाग हसरी, खेळती राहावी वाटत असेल, तर स्वतः जातीने लक्ष घातले पाहिजे.

मुलांवर प्रेम करावे, माया करावी परंतु अति लाड करू नये. साखर गोड असते, परंतु त्याचे अति सेवन केले तर मधुमेह होतो आणि मधुमेहाने शरीर निकामी बनते. म्हणून नात्यात साखरेचा गोडवा असावा. परंतु अति लाडाने मुलांचेच नुकसान होते. त्यांचा स्वभाव हट्टी बनतो. राग राग करून, आक्रस्ताळेपणा करून, रडून, चिडून एखादी गोष्ट लगेच मिळवता येते हा चुकीचा संदेश मुलांना जातो. मुलांचे लाड जरूर पूरवा. परंतु गरज ओळखा आणि त्यांनी मागितलेली वस्तू त्यांना दोन दिवसांनी नाहीतर दोन महिन्यांनी द्या. त्यांचा संयम वाढेल आणि मिळणाऱ्या वस्तूची किंमत कळेल. 

मोठयांप्रमाणे लहान मुलांनाही मान अपमान कळतो. म्हणून त्यांच्याकडून चूक झाली असता चारचौघात त्याला ओरडण्यापेक्षा समजवून सांगा आणि चूक मोठी असेल, तर वेळीच एक फटका द्या. वेळेवर मारलेला एक फटका आयुष्यभराची शिकवण देऊन जातो. मुलांना अपमान वाटला तरी चालेल, परंतु मोठ्या अपराधाची शिक्षा वेळीच द्यायला हवी आणि नंतर त्यांची कानउघडणी देखील करायला हवी. मुलांना केवळ मारून मुटकून वळण लावता येत नाही. त्यांना त्यांच्या कलाने घेत समजवावे लागते. परंतु, पालकांकडे तेवढा संयम हवा. हा समतोल नीट राखला, तर मुलांकडून भविष्यात मोठे अपराध घडणार नाही. चुकीच्या गोष्टी करताना मन धजावणार नाही. आई वडिलांबद्दल आदरयुक्त भीती वाटेल आणि तेवढेच प्रेमही कायम राहील.